नंदिकेश्वर सामाजिक संस्थेच्या वतीने प्रभाग क्रमांक १६ मधील गरजु गरीब मजुर व विस्थापित कुटुंबांना भाजीपाला वाटप
प्रतिनिधी, कल्याण
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉक-डाऊन मुळे विस्थापित कामगार व गोरगरीब मजुरांचे अतोनात हाल होत आहेत. शासनाच्या वतीने कम्युनिटी किचन व शिवभोजन थाळी इत्यादींच्या माध्यमातून दोन वेळचे जेवण पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु उपासमारीच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने अनेक स्वयंसेवी संस्थांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक कोरोना आपत्कालीन परिस्थितीत कोणीही उपाशी पोटी राहू नये व सर्वांना सकस आहार मिळावा या शासनाच्या हाकेला साद देत नंदीकेश्वर सामाजिक संस्था व या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष , कामगार नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी परत एकदा आपल्या स्वःखर्चाने त्यांचे मार्गदर्शक गजानन पाटील (मा.विभाग प्रमुख) व सहकारी सामाजिक नेते सुरेंद्र आढाव, सचिन भोईर, प्रकाश सोनावले, संदिप पाटील, दुर्योधन पाटील, रवी भोईर, संदिप मोरे, गणेश पाटील, उन्मय पाटील, ललिता पाटील, स्वाती पाटील यांना सोबत घेऊन प्रभाग क्रमांक १६ या परिसरातील कामगार, रिक्षाचालक, हातावर पोट असणारे मजुर व गरीब गरजु कुटुंबीयांना सकस आहार मिळावा यासाठी भाजीपाला वाटप केले नंदिकेश्वर सामाजिक संस्था व अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी या माध्यमातून आतापर्यंत ४०० च्या वर कुटुंबांना सर्व प्रकारच्या गरजेच्या भाजीपाल्याचे वाटप केले.
लॉक-डाऊनचा कालावधी ३ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आला असल्याने याचा विपरित परिणाम गरिब व मोलमजुरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करणा-या जनतेच्या मानसिकतेवर होत आहे. त्यांची चिंता कमी व्हावी त्यांना सकस आहार मिळावा व आपणही समाजाचे देणेकरी आहोत या भावनेतून नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व कामगार नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी त्यांचे बंधु गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकाऱ्यांना सोबत घेऊन गरजवंतांना सकस आहार भाजीपाल्याचे वाटप केले तसेच प्रभागातील गरजवंत नागरिकांना आपण, व आपले सहकारी नंदिकेश्वर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदत करत रहाणार असे सांगितले.
-
No comments:
Post a Comment