Saturday, 31 July 2021
डॉ.दीपक म्हैसकर लिखित 'कोविड मुक्तीचा मार्ग' पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन !
राज्यातील पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा व मुंबईतील पत्रकारांना लोकल प्रवास खुला करावा या मागण्यांसाठी -- मुंबई मराठी पत्रकार संघाची; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
कल्याण ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच.. विधुत कार्यालयावर धडकले विध्यार्थी व नवतरुण.. वीज पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून ऊर्जा मंत्र्यांना साकडे...
पुरग्रस्तांना मदत करण्याच्या नावाखाली भामटे व समाजकंटक सक्रिय !
३) मदत करण्यापूर्वी संस्था अधिकृत असल्याची खात्री करा.
समाजहितासाठी झटणारा कार्यकर्ता- 'शरद भावे' महाराष्ट्र शासनातर्फे विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती !
नाथा शेवाळे यांची जनता दल (से) च्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड !
चिमुकल्यांना हवा मदतीचा हात: सोशल मिडियावरील अवाहानला तरुणाचा प्रतिसाद !
एकाच वेळी मंत्रालयातील 103 सहाय्यक कक्षाधिकाऱ्यांच्या बदल्या.!
Friday, 30 July 2021
शेकापचे ज्येष्ठ नेते मा. आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन!
शेकापचे ज्येष्ठ नेते मा. आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन!
पुणे : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं आज निधन झालं आहे. ते ९४ वर्षांचे होते. गणपतराव देशमुख हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सोलापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज रात्री ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
सोलापूरमधील अश्विनी रुग्णालयात काही दिवसांपूर्वी त्यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया पार पडली होती. मात्र तेव्हापासूनचं देशमुख यांच्या प्रकृतीत सतत चढ- उतार होत होते. मात्र आज त्यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. आबासाहेब देशमुख यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. राजकारणामध्ये ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं त्यांच्या सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आबासाहेबांची प्रकृती आत्तापर्यंत चांगली होती. पण आज रात्री ९ वाजता आबासाहेबांचं निधन झालं.'
१० ऑगस्ट १९२६ ला त्यांचा जन्म झाला होता. १९६२ ला त्यांनी सांगोल्यातून सर्वात प्रथम निवडणूक लढवली. त्यानंतर पुढे ते ११ वेळा आमदार झाले. सर्वाधिक वेळा आमदार होण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. आबा या नावाने ते सगळ्या महाराष्ट्रात परिचित होते. गणपतराव देशमुख यांनी राजकीय कारकिर्दीला सुरूवात केल्यापासूनच ते शेतकरी कामगार पक्षातच होते.
मुंबई महानगरपालिकेकडून रस्त्यांवर २१ हजार कोटींहून अधिक खर्च !
पुरग्रस्त भागात वीजबिल वसुलीला स्थगिती ! उर्जामंत्री नितीन राऊत...
पुरग्रस्त भागात वीजबिल वसुलीला स्थगिती ! उर्जामंत्री नितीन राऊत...
मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुराचा मोठा प्रमाणात राज्याला फटका बसला आहे. अनेकांची घरे उद्धवस्त होण्यासह काहींना आपल्या जवळच्या व्यक्तीला या पुराच्या परिस्थितीत गमवाले लागले आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेतेमंडळी आता पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर येत आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पुरग्रस्तांना दिलासा मिळेल अशी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार नितीन राऊत यांनी असे म्हटले आहे की, पुराचा तडाखा बसलेल्या भागात वीज बिलाच्या वसूलीसाठी स्थगिती देण्यात यावी.
नितीन राऊत यांनी असे म्हटले आहे की, पुराची परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी नागरिकांकडून वीज बिल वसूल करु नका. तसेच पुरग्रस्त भागातील स्थिती पुर्ववत झाल्यानंतर बिल भरण्यासाठी सुद्धा नागरिकांना सवलत दिली जाईल असे ही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
पुरग्रस्त भागात वीजबिल वसूलीसाठी विद्यूत म़ंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची 'दादागिरी'!
गुटखा विक्रीला अभय ! वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदार अटकेत !
नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या बोगस पत्रकाराला अटक !
Thursday, 29 July 2021
सोमवारपासून निर्बंधात शिथीलता ! "आरोग्यमंत्री राजेश टोपे" यांची घोषणा..
सोमवारपासून निर्बंधात शिथीलता ! "आरोग्यमंत्री राजेश टोपे" यांची घोषणा..
मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केल्याने उत्साहाचा श्रावण व्यावसायिकांसाठी तसेच व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उत्साह घेऊन येणार आहे.
मागील वर्षी मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने विविध व्यवसायाला सरकारने परवानगी दिली. परंतु, परवानगी दिल्यानंतर निर्बंधाची वेसण घातली होती. यात शिथिलता येईल, या आशेवर व्यापारी, लहान-मोठे दुकानदार होते.
आठवड्याभरातच डेल्टा प्लस रुग्णाच्या वाढीमुळे दुकाने, हॉटेल्सच्या वेळा चारपर्यंत करण्यात आला. काही जिल्हात पॉझिटिव्हिटी दर खाली असूनही निर्बंधात शिथिलता आणली जात नसल्याने राज्यातील व्यापाऱ्यांत चांगलाच असंतोष निर्माण झाला होता. आता उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडूनही सकारात्मक चिन्हे मिळाली. त्यानंतर व्यापारी, दुकानदारांनाही निर्बंध शिथिल होण्याचे वेध लागले होते.
गुरुवारी सायंकाळी त्यांच्या कानावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा पडली अन् चेहऱ्यावर उत्साह दिसून आला. निर्बंधात शिथिलतेचा अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर त्यावर १ ते २ दिवसांमध्ये जीआर निघेल असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सोमवारपासून निर्बंधात शिथिलता येण्याची शक्यता असून व्यावसायिक, लहान मोठे दुकानदारांच्या आशा पल्लवित झाल्या.
निर्बंध कायम असलेले ११ जिल्हे यात सध्या अस्तित्वात असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर हे जिल्हे, मराठवाड्यातील बीड तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील निर्बंध कायम राहणार आहेत.
सरकारने पूरग्रस्तांना केली दहा हजारांची मदत जाहीर.!
हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा ! "बंगालच्या उपसागरात निर्माण झाला कमी दाबाचा पट्टा"
डोंबिवलीत भरवस्तीत चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ! "ठाण्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलची कारवाई"
डोंबिवलीत भरवस्तीत चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश !
"ठाण्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलची कारवाई"
सुशिक्षित आणि सांस्कृतिक नगरी अशी डोंबिवलीची ओळख. मात्र यात डोंबिवलीत भरगच्च लोकवस्तीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये सेक्स रॅकेट चोरी-छुपे चालू असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघडकीस आले आहे. या लॉजिंग अँड बोर्डिंगवर टाकलेल्या छाप्यात तेथील चार तरुणींची सुटका करण्यात आली. तर या कारवाईत लॉजिंग-बोर्डिंगच्या व्यवस्थापकासह 6 जणांना अटक करण्यात आली.
डोंबिवली पूर्वेकडील जिमखाना रोडला सांगर्ली चौकात बालाजी दर्शन इमारतीत साईराज लॉजिंग अँड बोर्डींग आहे. या लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती मिळताच ठाण्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलने सोमवारी रात्री अचानक याठिकाणी छापा टाकला. यावेळी चार तरूणी तेथे वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या. या लॉजमध्ये पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवून प्रथम खात्री केली होती.
पोलिसांनी छाप्यादरम्यान सदर लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि तरुणींच्या पुरवठादार दोन दलालांच्या तावडीतून 4 तरुणींची सुटका केली. या अवैध मार्गाला लागलेल्या या तरुणींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.
या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि दोन दलालांच्या विरोधात या प्रकरणी 376 (2), 370 (3), 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
पुरग्रस्तांचे अश्रू पुसणा-या मराठमोळ्या अभिनेत्री दिपाली सय्यद-भोसले कडून दहा कोंटीची मदत, बाँलिवूडवाले कुठे लपले?
Wednesday, 28 July 2021
महाराष्ट्रात आज कोरोनाबाधित रुग्णसंख्या सात हजाराच्या आत !
कल्याण महसून विभागाकडून पूरग्रस्त भागांचे पंचनामे सुरू..! "तहसीलदार दिपक आकडे" यांनी दिले तलाठ्यांना केल्या सूचना.. 'मांडा-टिटवाळ्यात ८१८ घरांचे पंचनामे पूर्ण'
टिटवाळयात रस्त्यावर आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह !!
मुरबाड तालुक्यातील प्रतिनियुक्त्या रद्द करून तात्काळ रिक्त पदे भरा !!
कल्याण-पडघा रस्त्यावरील गांधारी पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला ! "हजारो नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास"
कल्याण-पडघा रस्त्यावरील गांधारी पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला !
"हजारो नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास"
कल्याण, २७ जुलै : वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जाणारा कल्याण-पडघा रस्त्यावरील गांधारी पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. तब्बल २० तासांनी हा पूल खुला करण्यात आला. पुलाच्या खांबाला कोणतेही तडे गेले नसल्याचे तसेच हा उड्डाणपूल सुस्थितीत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आल्याने या पुलावरील वाहतूक सुरू केल्याची माहिती कल्याण शहर वाहतूक यांनी दिली.
हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गांधारी पुलाच्या खांबाला तडे गेल्याच्या प्राथमिक माहितीच्या आधारे सोमवारी रात्री १० वाजल्यापासून इथली वाहतुक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कल्याण कार्यालयातील उपअभियंता प्रशांत मानकर यांनी सांगितल्याप्रमाणे आज दुपारी अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत पुलाला कोणतेही तडे गेलेले नसून पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या काळ्या कापडाने सर्व गोंधळ उडाल्याचे समोर आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हिरवा कंदील दिल्यानंतर आज संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा खुला करण्यात आल्याची माहिती ट्रॅफिक एसीपी उमेश माने पाटील यांनी दिली. तसेच वाहतुक बंद करण्यासाठी घालण्यात आलेले बॅरिकेट्सही तातडीने बाजूला करण्यात आले.
हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू झाल्याने पुला पलीकडे राहणाऱ्या गावातील हजारो नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पूल सुरू झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.
ठाणे -मुंब्रा येथील एका तरुणाचा सापाशी खेळतांना सर्पदंशाने मृत्यू.!
Tuesday, 27 July 2021
मुरबाड मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !!
ऍक्सॉन हॉस्पिटल मध्ये मेंदूच्या धमणीच्या फुग्याची किचकट न्यूरो इंटरव्हेशनल शस्रक्रिया यशस्वी ! "मेंदू विकार तज्ञ् इंटरव्हेशनल न्यूरॉलॉजिस्ट डॉक्टर निलेश किनगे यांच्या ऍक्सॉन ब्रेन हॉस्पिटल मध्ये मेंदूच्या धमणीच्या फुग्याची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्यात आली".
भिवंडीतील "नागरी हक्क संघर्ष समिती"ने दिले मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांला निवेदन.!
अखेर आमदार कुमार आयलानी यांनी म्हारळ,वरप गावांना दिली भेट, अनेक प्रश्न सोडविण्यासाठी तहसीलदारांचा पुढाकार !
मनसेने पर प्रांतीयांच्या विरोधातील भूमिका बदलायला हवी --चंद्रकांत पाटील.
Monday, 26 July 2021
कल्याण तालुक्यात सर्दी तापाचा पूर, खाजगी सरकारी दवाखाने हाऊसफुल्ल!
आमच्या जाई 'भाल बाई प्रतिभा प्रभाकर भालेराव मंडग आजही आईबी ओळख आहे ती मुळे आणि शाळाही ऑफखली जाते ती भालेराव बाईची शाळा म्हणूनच. शाळा व आ...
-
कडोंमनपा स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर कमावतात महिन्यात पाच लाख रुपये - माहिती अधिकार कार्यकर्ते मेढेकर *** आयुक्तांचे यांच्यावर नाही नि...
-
वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक ! मुंबई, प्रतिनिधी : केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989...
-
कल्याण स्टेशन परिसरात ट्रॅफिक ची जीवघेणी कोंडी. कल्याण पश्चिम मधील नागरीकांची 'रोज मरे त्याला कोण विचारे' अशी अवस्था !! ** स्मृती फा...