Sunday 31 July 2022

सौ. सुवर्णा ताई कानवडे याना महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय पुरस्कार ! "युनिफाईड ह्यूमन राइट्स कोन्सिल वर सुवर्णा ताई कानवडे याची ठाणे जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती"

सौ. सुवर्णा ताई कानवडे याना महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय पुरस्कार !

"युनिफाईड ह्यूमन राइट्स कोन्सिल वर 
सुवर्णा ताई कानवडे याची ठाणे जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती" 


ठाणे, बातमीदार : श्रमिक पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा संघटिका ह्या पदावर संस्थापक प्रकाश गणपत संकपाळ यांनी नियुक्ती केली होती ताई सतत आपल्या पदाचा वापर करून राज्यात महिला अन्याय अत्याचार वर मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. 


तसेच ताई महानगर सफाई कामगार संघ पदावर ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आहेत तसेच मिशन महाराष्ट्र नारी शक्ती जिल्हा संघटिका आहेत. त्या मानवी अन्याय निर्मूलन संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत. सतर्क पोलीस टाइम्स चे ठाणे जिल्हा प्रतिनिधी सुद्धा आहेत.


आज पर्यत ताईने शेकडो महिलांना कोटूंबिक हिंसाचार, बलात्कार अपहरण. जेष्ठ नागरिकांनवर हिंसाचार बाबत अनेक समस्यांना सोडविण्यात ताई ना यश मिळाले आहे.


महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेगवेगळ्या मार्गाने त्यांना मदत करत असते. महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्या जोमाने विकासकामांत सहभागी व्हाव्यात यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. महिला बचत गट, सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना आदी विविध योजना वेगवेगळ्या विभागामार्फत राबविल्या जातात.

निराधारांसाठी शासनाचा आधार...बालिका समृध्दी योजना.....
इंदिरा गांधी महिला संरक्षण योजना। देवदासी पुनर्वसन योजना....
महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षणाची योजना.... 

सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना महिला बचत गट अश्या अनेक क्षेत्रात ताई कार्यरत आहेत. ताई ना अनेक जिल्हा स्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक नामदार ओमप्रकाश बच्चू कडू यांना महिला व बाळ कल्याण त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली असल्याने ताईने राज्यातील अनेक महिलांना महिला संरक्षण अधिकारी यांच्या मदतीने न्याय मिळवून देण्याची मोठी भूमिका पार पाडत आहेत, ताईने असा संकल्प केला आहे की आंध्र प्रदेश या राज्यात महिला अत्याचार बाबत आरोपीना २१ दिवसात शिक्षा होते हा कायदा ही महाराष्ट्रात लागू झाला पाहिजे या साठी २५००० महिलांना घेऊन ताई विधान भवन गाठणार आहेत, असा ही संकल्प ताईने घेतला आहे. त्यामुळं त्यांचं सामाजिक वजन प्रचंड वाढलं आहे. आज पर्यत ताई ने शेकडो कोटुंबिक वादाच्या प्रकरणाला न्याय मिळवून दिला आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात तााईंन स्वतः पुढाकार घेऊन महिलांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी 12 पेक्षा जास्त बलात्कार गुन्हे नोंदविले आहेत. असह्य अनेक सामजिक कार्यात ताई अग्रेसर असतात त्यामुळे ताई ला महाराष्ट्र शासन उपक्रम 'ग्लोबल महाराष्ट्र' ठाणे जिल्हा पर्यटन महोत्सव समिती व महाराष्ट्र राज्य कला व पर्यटन सांस्कृतिक समिती द्वारे महाराष्ट्र राज्य स्तरीय देऊन पर्यटन भूषण महाराष्ट्र मा. उमाजी भिषेन याच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. असून ताई ला युनिफाईड ह्युमन राइट्स कोन्सिल मध्ये राष्ट्रिय अध्यक्ष सय्येद ओवेसी व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ आदर्श भालेराव याच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली त्यामुले ताई ची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे ही दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...