Monday 30 January 2023

कांग्रेस कमिटी तर्फे महात्मा गांधी यांना अभिवादन !

कांग्रेस कमिटी तर्फे महात्मा गांधी यांना अभिवादन !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३० : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमीत्त्त अभिवादन करुन भारत जोडो यात्रेचा श्रीनगर येथे समारोप निमीत्त्त पक्ष कार्यालय गांधी भवन येथे ध्वजारोहन संपन्न झाले.

दि.७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथुन सुरु झालेली मा.खा.राहुलजी गांधी याच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेचा दि.३० जानेवारी २०२३ रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी श्रीनगर येथे समारोप होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष मा.आ. नानाभाऊ पटोले यांच्या सुचनेनुसार शहर जिल्हा मुख्यालयात महात्मा गांधी यांना अभिवादन करुन ध्वजारोहणाचा कार्यकम आयोजीत करावयाचा होता. यानुसार औरंगाबाद शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने दि.३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळा येथे अभिवादन करुन पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे ध्वजारोहणाचा कार्यकम जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.कल्याण काळे व औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच प्रोफेशनल कॉंग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतीचौक ते गांधी पुतळा पर्यत पायी यात्रा काढण्यात आली होती.तसेच पक्ष कार्यालय गांधी भवन येथील ध्वजारोहन झाल्यानंतर कार्यकम घेण्यात आला. यामध्ये तीन जणाचें प्रामुख्याने मार्गदर्शन झाले. संदिप पाटील यांचे मार्गदर्शन झाले यामध्ये यांनी प्रोफेशनल कॉंग्रेस बददल पुर्ण माहिती दिली. भारत जोडो यात्रा कशासाठी निघाली याचा हेतु काय होतो याची सविस्तर माहिती दिली. भारतीय जनता पार्टी समाजामध्ये कुठल्या पध्दतीने तेढ निर्माण करत आहे.त्याला तोड देण्यासाठी भारत जोडो यात्रा निर्माण करण्यात आली. शहर अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांनी आपल्या भाषणामध्ये पक्षाची पुर्ण धोरणे ठेवली. हाथ से हाथ जोडो जे अभियान चालु झाल त्या संदर्भामध्ये त्यांनी प्रकाश टाकला. त्याच प्रमाणे त्यांनी हे ही सांगीतले भारत जोडो यात्रा आज आपल्या लक्ष वरती पोहचली असेल.तर संपुर्ण भारतामध्ये नविन चेतना निर्माण करण्याचे काम या यात्रेव्दारे परत निर्माण करण्यात आले. शेवटी जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी आपली सुचना मांडली व आपले मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आज भारत जोडो यात्रा याचा समारोप नसुन पुर्ण भारतामध्ये नविन उर्जा पसरविण्याचे काम झालेले आहे. ठराव मांडण्यात आला की, राहुलजी गांधी यांनी भारतामध्ये यात्रा काढुन नविन संदेश दिला त्याबददल  त्यांचे आभार अभिनंदनाचा ठराव मांडला. त्या ठरावाला अनुमोदन माजी मंत्री अनिल पटेल व शहर अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांनी दिला व कार्यकमाचा समारोप करण्यात आला.    
   
यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष शेख युसूफ लिडर, किरण पाटील, भाऊसाहेब जगताप, डॉ.पवन डोंगरे, रविंद्र काळे, अनिस पटेल,अतिश पितळे, कैसर बाबा, प्रा.प्रकाश वाघमारे, शेख रईस, शेख अथर, सय्यद फयाजोददीन, आसमत खान, अनिल माळोदे,  उमाकांत खोतकर, मुददसिर अन्सारी, विजया भोसले, अनिता भंडारी, दिपाली मिसाळ, रेखा राऊत, अरुणा लांडगे, राजशेखर साळवे, साहेबराव बनकर, मनोज शेजुळ, जमील पटेल, योगेश बहादुरे, सिंधुताई पवार, संदिप जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...