Saturday, 31 May 2025

साॅ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनल का पाहिजे ?

साॅ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनल का पाहिजे ?
 

साॅ.गुलाबराव शेळके व चिरंजीव उदय शेळके यांच्या निधनानंतर २०१० नंतर प्रथमच निवडणूक लागली असून ७० शाखा असलेली जी एस महानगर बँक हि महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील पटलावर विशाल असं स्वरूप बनविण्यात यशस्वी झाली आहे.

अ.नगर जि, पारनेर तालुक्यातून सुरू झालेला प्रवास महाराष्ट्रात पोहचला असून ७० शाखा आहेत, हजारो कोटींचा ठेवी व आर बी आय कडून अ प्रमाणपत्र पात्र व शुन्य NPA असलेली बँक हि एखाद्या उत्तम प्रशासकी अनुभव , सामाजिक,लोक जनसंपर्क व ती पेलण्याची क्षमता असणारा च्या हातात जाणे गरजेचे आहे .

जी एस महानगर बँक सदस्य, हितचिंतक,ठेवीदार ज्यांना या बॅकेने आपला संसार उभा करण्यासाठी, आर्थिक संकटात मोलाचा आधार दिला अशा जी एस महानगर बँक चे कार्य व विशाल असं स्वरूप पाहून सक्षम,कणखर , धडाडीचे व संपूर्ण जाण असलेल्या श्रीमती गीतांजली उदयराव शेळके ह्याच वारसा पुढे चालवू शकतात बाकी मतदार, हितचिंतक हे हुशार व अभ्यासू आहेत.

सौजन्य -
बजरंग तांगडकर 
अध्यक्ष, स्मृती फाउंडेशन 

Friday, 30 May 2025

रोहीणी नक्षत्र झाले सुरू, शेतकरी पेरणी लागला करू !!

रोहीणी नक्षत्र झाले सुरू, शेतकरी पेरणी लागला करू !!

** अवकाळी पडलेल्या पावसाने शेतकरी मात्र झाला हैराण

कोकण, (शांताराम गुडेकर)

            दरवर्षी वाट पाहायला लावणारा पाऊस अवकाळी रूपाने लावणी वेळी जुलै महिन्यात पडणार्या धोधो पावसाप्रमाणे पडला व त्यामुळें पावसाळ्यासाठी करावयाची साठवण कामे शिल्लक राहिली. तेवढ्यातच रोहीणी सुरु झाले. परंतु पाणीच पाणी झालेल्या शेतात पेरणी करतांना शेतकरी कसरत करत असल्याचे दिसले. ट्रॅक्टरने नांगरणी अलिकडे होत असली तरीही अजूनही  बैलांचे नांगर बघायला मिळत आहे.
          पेरणीचे रोहीणी नक्षत्र सुरु झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख, आंगवली, मारळ, कासार कोळवण, बामणोली, बोंडये तसेच धामणी, गोळवली तुरळ परिसरात शेतकरी प्रत्यक्ष  बियाणे पेरणी करू लागला आहे.

मुसळधार पावसात मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी लक्षवेधी !!

मुसळधार पावसात मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी लक्षवेधी !!

 कोकण, (शांताराम गुडेकर) :

       रत्नागिरी जिल्ह्यातील  संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहर पासून जवळच असलेल्या मारळ गावा जवळील श्री क्षेत्र मार्लेश्वर व तेथील धारेश्वर धबधबा संपूर्ण राज्यात विशेष प्रसिद्ध आहे. सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील उंच अशा सह्याद्रीच्या डोंगरातून छोटे-छोटे धबधबे व दुधाळ, फेसाळणारा असा येथील धारेश्वर धबधबा सध्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. 
        सह्याद्रीच्या कुशीत हिरव्यागार डोंगररांगा आणि समोर फेसाळणारा धारेश्वर धबधबा असे नयनरम्य निसर्गाच्या सानिध्यातील संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणजे मार्लेश्वर. पावसाळ्यामध्ये याठिकाणचा उंचावरून काेसळणारा, फेसाळणारा धारेश्वर धबधबा भाविकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो.पावसाळ्यात संगमेश्वर तालुक्यातीलच नाही तर राज्यभरातून लाखो भाविक, पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येथील निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी येत असतात. गेली आठवडाभर संगमेश्वर तालुक्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे मार्लेश्वर तीर्थक्षेत्री सह्याद्रीच्या डोंगररांगातून सात छोटे-छोटे धबधबे प्रवाहित झाले आहेत. हे धबधबे उंचावरून खाली कोसळणाऱ्या धबधब्याला जाऊन मिळतात. त्यामुळे देवस्थानच्या समोरून दिसणारा मोठा धबधबा सध्या धुवाॅंधार वाहत आहे. हे दृश्य पर्यटकांसाठी लक्षवेधी ठरत आहे. 
           मार्लेश्वर हे पर्यटनस्थळ देवरुख बसस्थानकापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर आहे. या पर्यटनस्थळी पायथ्यापर्यंत गाड्या जाण्याची व्यवस्था आहे. तिथून सुमारे ५३० पायऱ्या चढून वर जावे लागते. तिथे गेल्यानंतर गुहेमध्ये स्वयंभू मार्लेश्वराचे देवस्थान आहे. येथील धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या व वाट आहे. मात्र, पावसाळ्यात हा धबधबा अति प्रवाहित असतो. त्यावेळी धबधब्याखाली आंघोळ करणे धोक्याचे आहे. सातत्याने उंचावरून पडणाऱ्या धबधब्याच्या पाण्यामुळे येथे तलावसदृश्य स्थिती निर्माण हाेते. त्याची खोलीही मोठी आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसात धबधब्यावर जाण्यासाठी बंदी घालण्यात येते. तशा प्रकारचे सुरक्षा फलकही याठिकाणी लावण्यात आले आहेत.

वर्ल्ड वाइड ह्युमन राइट्स ए.फ. व राष्ट्रीय शिवस्वराज्य सेना यांच्या संयुक्त विद्यमाने सिने क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ यांचा सत्कार !!

वर्ल्ड वाइड ह्युमन राइट्स ए.फ. व राष्ट्रीय शिवस्वराज्य सेना यांच्या संयुक्त विद्यमाने सिने क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ यांचा सत्कार !!

*** संघटनेच्या वतीने त्यांचे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन 

मुंबई (शांताराम गुडेकर) :

           वर्ल्ड वाइड ह्युमन राईट्स ए.एफ. (जागतिक मानव अधिकार) चे संस्थापक/अध्यक्ष डॉ.अविनाश सकुंडे यांच्या सूचनेनुसार व WHRAF राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेचे अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थित वर्ल्ड वाइड ह्युमन राइट्स ए.फ. व राष्ट्रीय शिवस्वराज्य सेना यांच्या संयुक्त विद्यमाने सिने क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते श्री.अशोक सराफ यांना त्यांची कला क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन भारत सरकार तर्फे मानाचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्ताने उपरोक्त संघटनेच्या वतीने त्यांचे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
                याप्रसंगी WHRAF चे महाराष्ट्र सरचिटणीस श्री.अमोल वंजारे, महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.प्रताप गाथे, महाराष्ट्र सचिव सौ.ज्योती ताई भोसले, मुंबई अध्यक्ष श्री.प्रकाश वाणी, मुंबई उपाध्यक्ष श्री.सचिन भांगे, ठाणे जिल्हा सचिव कु.सानिया अन्सारी, मुंबई सचिव श्री.महेश आंब्रे, श्री.साईगोपाल चिल्का, सांताक्रुज विधानसभा अध्यक्ष श्री.हितेश सोलंकी, समाजसेवक श्री.चंद्रकांत हळदणकर, श्री.लितेश केरकर, श्री.नितीन पन्हाळकर, श्री.जितेंद्र गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

Thursday, 29 May 2025

टाकळी अमिया वस्ती रस्त्याविना अडचणीत – ग्रामस्थांची प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनेची मागणी !!

टाकळी अमिया वस्ती रस्त्याविना अडचणीत – ग्रामस्थांची प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनेची मागणी !!

टाकळी अमिया (ता. आष्टी, जि. बीड) – प्रतिनिधी

टाकळी अमिया गावातील शेत वस्तीवर जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः आजारी लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि गर्भवती महिलांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. अवकाळी पावसामुळे साऱ्या परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून, जीवनावश्यक सेवा, तसेच रुग्णवाहिका देखील या भागात पोहोचू शकत नाही.

वेशीपासून वस्तीपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात हा रस्ता पूर्णतः निष्क्रिय होतो. अशा अवस्थेत ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून वस्तीपर्यंत प्रवास करावा लागतो. परिणामी, आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळणे जवळपास अशक्य झाले आहे.

या गंभीर पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, मौजे गावातील सर्व वस्ती ठिकाणी तातडीने सर्वेक्षण करून पक्के रस्ते बांधावेत. तसेच गरोदर महिलांसाठी तातडीची रुग्णसेवा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ग्रामीण भागांमध्ये आजही पायाभूत सुविधांचा अभाव ही मोठी समस्या असून, आरोग्यसेवा आणि वाहतूक व्यवस्था सक्षम होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 
ग्रामस्थ : गणेश ससाणे +919850495688

हिंदूंचा पराक्रम, शौर्याचा इतिहास नव्या पिढीला सांगणं आवश्यक असून त्याला सावरकर चरित्राची जोड देणं गरजेचे आहे - स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी, अभ्यासक व वक्ता पार्थबावस्कर

हिंदूंचा पराक्रम, शौर्याचा इतिहास नव्या पिढीला सांगणं आवश्यक असून त्याला सावरकर चरित्राची जोड देणं गरजेचे आहे - स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी, अभ्यासक व वक्ता पार्थ
बावस्कर

डोंबिवली, प्रतिनिधी : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवली  विभागातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करत सावरकर जयंतीला सावरकर विचारांचा जागर करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थाचे ह्या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले. 

राष्ट्राच्या सीमा या खडगांची तिखट धार  आणि तोफांचे गोळे ठरवित असतात,  हे तात्याराव सावरकरांचे वाक्य आज ही किती योग्य आहे आणि त्याचा आशय समजून घेत हा कार्यक्रम सर्वेश हॉल, डोंबिवली येथे संपन्न झाला. 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नाशिकचे माननीय महंत श्री. सुधीर दासजी हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी, अभ्यासक आणि प्रथितयश वक्ता श्री पार्थ बावस्करजी यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत  सावरकरांचे प्रखर हिंदुत्व  समजावत, सावरकरच्या जीवनातील खडतर आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर हे विराजमान होते. तसेच स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थाचे अध्यक्ष निवास कुलकर्णी हे स्टेजवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व गणेश वंदनाने झाली. ऑपरेशन सिंदूर मधील हुतात्म्यांना आदरांजली वाहून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष शशांक खेर  यांनी महासंघ  चालवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जावे यासाठी  सह्यांची मोहीम राबवण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींनी सावरकरांची पुस्तके खरेदी करण्याचा आनंद घेतला.

आपल्या पूर्वजांनी त्या अटकेपार झेंडे लावलेले आहेत. तो हिंदूंच्या पराक्रमाचा, शौर्याचा, स्वाभिमानाच्या इतिहासाची  आठवणं, पुन्हा एकदा नव्या पिढीपुढे  सांगणे आवश्यक आहे आणि त्या सगळ्याला वीर सावरकर चरित्राची जोड देणं आवश्यक आहे. त्याच कारण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र  हे तेजोमय चरित्र आहे. आणि हे तरुणपिढी पुढे मांडले जाणे अत्यंत आहे गरजेचे आहे असे श्री पार्थ बावस्कर ह्यांनी आवर्जून सांगितले. नियोजनबद्ध कार्यक्रम आयोजनाबद्दल पार्थ जी ने दोन्ही संस्थांचे कौतुक केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डोंबिवली आणि कल्याण मधील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सदस्य यांचे मोलाचे सहकारी लाभले. या कार्यक्रमाला सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता मधुर आवाजात वंदे मातरम, राष्ट्रगीताने  झाली.

गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे व वनिता कांबळे यांना महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार जाहीर ; दि.8 जून रोजी दादर येथे होणार सत्कार !!

गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे व वनिता कांबळे यांना महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार जाहीर ; दि.8 जून रोजी दादर येथे होणार सत्कार !!

मुंबई, (पंकजकुमार पाटील) : गौरव कर्तुत्वाचा, गौरव महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र व विक्रोळी मुंबई येथे वास्तव्यास राहून सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारे महाराष्ट्र कामगार मंडळाचे गुणवंत कामगार व विशेष कार्यकारी अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच वनिता फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक प्रभाकर तुकाराम कांबळे व त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महिलांच्या प्रश्नावर अहोरात्र झटणाऱ्या धडाडीच्या समाजसेविका व वनिता फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ वनिता प्रभाकर कांबळे या उभयतांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ८ जून 25 रोजी दादर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक सुरज भोईर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
          स्वराज्य प्रतिष्ठान पुरस्कृत हुतात्मा बाबू गेनू स्मारक समिती यांच्या विशेष सहकार्याने व धडक कामगार युनियन महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार वितरण व शिवराज्याभिषेक सोहळा दिनांक  8 जून 25 रोजी सायंकाळी  5.30 वाजता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, 2रा मजला, सुरेंद्र गावस्कर सभागृह, शारदा सिनेमा जवळ, दादर (पूर्व ) मुंबई- 14. येथे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने व धडक कामगार युनियन चे अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाकर कांबळे व वनिता कांबळे. या दाम्पत्यास " महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार*  देऊन गौरविण्यात येणार असून त्या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून व विभागातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Wednesday, 28 May 2025

जी एस महानगर बँक पंचवार्षिक निवडणूक २०२५ "आम्ही नगरकर प्रतिष्ठान व स्फूर्ती फाउंडेशनचा" साॅ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलला पाठिंबा !!

जी एस महानगर बँक पंचवार्षिक निवडणूक २०२५ "आम्ही नगरकर प्रतिष्ठान व स्फूर्ती फाउंडेशनचा" साॅ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलला पाठिंबा !!

*** श्रीमती गीतांजली उदय शेळके यांच्या नेतृत्वावर दाखवला विश्वास
 

मुंबई, प्रतिनिधी - जी एस महानगर बँक पंचवार्षिक निवडणूक २०२५ जाहीर होऊन ती अंतिम टप्प्यात आली असून प्रचाराचा जोर वाढला‌ असून‌ जी एस महानगर बँक पंचवार्षिक निवडणूक २०२५ मध्ये श्रीमती सुमन गुलाबराव शेळके यांचे एक पॅनल व श्रीमती गीतांजली उदय शेळके यांचे एक पॅनल असून अशी सासू व सून यांच्या मध्ये थेट लढत असून खरा वारसदार कोण व हि बॅंक चालविण्यासाठी सक्षम, कणखर नेतृत्व कोण हाच प्रचाराचा मुद्दा असून दोन्ही पॅनल कडून दावे प्रतिदावे केले जात असून मतदारांना वळविण्यासाठी दोन्ही पॅनल कडून सर्वातो प्रयत्न होत असून निवडणूक रंगतदार स्थितीत पोहचली आहे 

साॅ. गुलाबराव शेळके व चिरंजीव उदय शेळके यांच्या निधनानंतर २०१० नंतर प्रथमच निवडणूक लागली असून ७० शाखा असलेली जी एस महानगर बँक हि महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील पटलावर विशाल असं स्वरूप बनविण्यात यशस्वी झाली आहे. अ.नगर जि, पारनेर तालुक्यातून सुरू झालेला प्रवास महाराष्ट्रात पोहचला असून ७० शाखा आहेत.

दि.१ जून २०२५ रोजी मतदार आपले मतदान कोणाच्या पारड्यात टाकतील व विजयाचा गुलाल कोण उडवणार हे २ जून २०२५ समजेलच दरम्यान आम्ही नगरकर प्रतिष्ठान मुंबई संघ ने जी एस महानगर बँक चा कार्य व विशाल असं स्वरूप पाहून श्रीमती गीतांजली उदय शेळके यांच्या नेतृत्वा वर विश्वास दाखवत समर्थन दिले असून सर्व बँकेच्या सभासदांनी, मतदारांनी श्रीमती गीतांजली ताई उदय शेळके यांच्या पॅनल ला म्हणजे साॅलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलला *कप बशी* या चिन्हावर आपले मत देवून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने मतांनी विजयी करावे असे आवाहन 
आम्ही नगरकर मुंबई संघ व स्फूर्ती फाउंडेशन पदाधिकारी वतीने करण्यात आले आहे

म्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण योजनेत गुणवंत कामगारांनाही आरक्षण देण्यात यावे !!

म्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण योजनेत गुणवंत कामगारांनाही आरक्षण देण्यात यावे !!

*** राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष  प्रभाकर कांबळे यांची मागणी.

विक्रोळी, (शांताराम गुडेकर) :
            महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व क्षेत्रविकास  म्हाडा, कोकण मंडळ व सिडको यांनी तयार केलेल्या सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेमध्ये 49 टक्के आरक्षण 15 घटकासाठी तर 51 टक्के आरक्षण सर्वसाधारण घटकासाठी दिले आहे .पण महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नोंदीत आस्थापनेतील कामगार हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र सेवाभावी वृत्तीने कार्य करत असल्याने त्याला " विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार"महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री यांच्या हस्ते प्रदान केला जातो पण या गुणवंत कामगारांना इतर विभागाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारथीप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा मायबाप सरकारकडून मिळत नाहीत हे निर्विवाद सत्य आहे.
        महाराष्ट्र शासनाने म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच अपंग व्यक्तीसाठी व इतर घटकासाठी आरक्षणाचे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे गुणवंत कामगारांनाही किमान 5 ते 10 टक्के पर्यंत आरक्षण देण्यात यावे अशी मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे (SEO) यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 
         महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) सन 1981 मधील नियमानुसार निरनिराळ्या गट व प्रवर्गानुसार साध्यकांचे आरक्षण करण्यात आले त्यानुसार अत्यल्प, अल्प, मध्यम, उच्च व इतर गटा नुसार तसेच प्रवर्गानुसारही  सदनिकाची संख्या नमूद करण्यात आली आहे. यामध्ये माजी सैनिक, पत्रकार, कलाकार, अपंग, खासदार, आमदार, मंत्री तसेच अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती इतर मागासवर्ग आदींचा आरक्षणामध्ये समावेश करण्यात आला आहे पण विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त कामगार विविध संस्था तसेच संघटनाच्या माध्यमातून तन-मन-धन अर्पून समाजातील सर्व घटकापर्यंत अविरतपणे कार्य करीत असतात. महाराष्ट्र शासनाने देखील त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी /सामान्य प्रशासन विभागाकडून विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर त्यांची. वयाच्या 70 वर्षापर्यंत  नियुक्ती करून त्यांना काही मोजकेच अधिकार दिलेले असून ते मरेपर्यंत समाजासाठी काम करत असतात त्याप्रमाणे त्यांना तह्यात/मरेपर्यंत विशेष कार्यकारी अधिकारी पदावर ठेवण्यात यावे अशी मागणी गुणवंत कामगार वर्गातून करण्यात येत आहे.
       तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून देण्यात आलेल्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांचे वैशिष्ट्यपूर्ण तसेच उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन नुकत्याच चालू असलेल्या महाडा व सिडकोच्या घराच्या सोडतीत गुणवंत कामगारासाठी किमान 5 ते 10 टक्के पर्यंत घरे राखून ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारने म्हाडा, सिडको व कोकण मंडळाला देऊन त्वरित त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी आग्रही मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर, मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर तुकाराम कांबळे महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा डावरे ठाणे जिल्हाध्यक्ष भरत सकपाळ बाळकृष्ण तावडे ,अजय दळवी विद्याधर राणे, संजय तावडे, विनोद विचारे तानाजी निकम आ आधी गुणवंत कामगारांच्या उपस्थितीत प्रभाकर कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Tuesday, 27 May 2025

आम्हाला गर्व हिंदुत्वाचा व्हॉट्सॲप ग्रुपचा ५ वा वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यातील समशेरसिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा वरदडा येथे उत्साहात साजरा !!

आम्हाला गर्व हिंदुत्वाचा व्हॉट्सॲप ग्रुपचा ५ वा वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यातील समशेरसिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा वरदडा येथे उत्साहात साजरा !!

मुंबई, (केतन भोज) : आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हॉट्सॲप ग्रुपच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त २६ वा सामाजिक उपक्रम दि.२५ मे २०२५ रोजी समशेर सिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा जिल्हा बुलढाणा येथे साजरा करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबई येथील एकनिष्ठ शिवसैनिकांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र भर "आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गरजू नागरिकांना आर्थिक आणि वैद्यकीय मदतीसोबतच होतकरू विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांना शालेय साहित्य तसेच धान्य आदि वस्तू देणगी स्वरूपात देण्यात येते. कोरोना काळात २५ एप्रिल २०२० रोजी सुरु करण्यात आलेल्या "आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रभर विविध सामाजिक उपक्रम राबवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या ब्रिद वाक्याप्रमाणे सामाजिक ऋण फेडण्याचे काम या ग्रुपच्या माध्यमातून केले जात असून संपूर्ण महाराष्ट्रात या ग्रुपचे सदस्य आहेत.त्यांच्या या स्पृहाणीय कामाची खुद्द उद्धव ठाकरे यांनीही मुक्तकंठाणे प्रशंसा केलेली आहे. "आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या व्हॉट्सॲप ग्रुपचा वरदडा, बुलढाणा येथे झालेला हा २६ वा सामाजिक उपक्रम असून या ग्रुपकडून समशेरसिंग पारधी आदिवासी आश्रम शाळेतील १२० विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी एक वर्षाच्या नेट पॅकसह ५० इंच एलईडी टीव्ही, ब्लॅंकेट, धान्य, गृह उपयोगी वस्तू आणि शालेय साहित्य देण्यात आले.शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कर्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे, सिंदखेड तालुका प्रमुख महेंद्र पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याच बरोबर ग्रुपचे संस्थापक, संचालक संतोष पाटील, अध्यक्ष सुरेश वाडकर, उपसेक्रेटरी भालचंद्र उकिर्डे, सल्लागार विलास चव्हाण, उपसेक्रेटरी सौ.वासंती गोताड, उपखजिनदार सोनिया पाटील तसेच ग्रुपचे सदस्य रेणुका पालांडे, संतोषी पवार, गीता कांबळे, छाया गायकवाड, श्रीराम खेलदार, दत्ताराम मोतेकर, संदीप पाटील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शिवसैनिक यावेळी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी विद्येची देवी सरस्वती, क्रांतिवीर समशेरसिंग पारधी तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. तद्नंतर आशिष रहाटे, संतोष पाटील, रेणुका पालांडे आणि रत्नाबाई पवार यांची समायोजित भाषणे झाली.

औषधी वनस्पती लागवड घटकाकरीता अर्ज करण्याचे आवाहन !!

औषधी वनस्पती लागवड घटकाकरीता अर्ज करण्याचे आवाहन !!

पुणे, प्रतिनिधी : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०२५-२६ या वर्षात ‘औषधी वनस्पती लागवड’ घटक नव्याने समाविष्ट करण्यात आला असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या घटकाचा लाभ होण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. औषधी व सुगंधी वनस्पती लागवड या घटकाकरिता केंद्र शासनाने सन २०२५ -२६ मध्ये ४ कोटी ४० लक्ष एवढ्या रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजूरी दिलेली आहे. औषधी व सुगंधी वनस्पतींचे पीकनिहाय आर्थिक मापदंड पुढीलप्रमाणे आहेत.

ज्येष्ठमध किंवा मुलेठी, शतावरी, कालीहारी किंवा कळलावी, सफेद मुसळी, गुग्गुळ, मंजिष्ठा, कुटकी, अतिस, जटामासी, अश्वगंधा, ब्राम्ही, तुलसी, विदारीकंद, पिंपळी, चिराटा, पुष्करमूळ या औषधी वनस्पतीकरीता प्रतिहेक्टर १ लाख ५० हजार रुपये; गुलाब, रोझमेरी, निशिगंध,जिरेनियम, कॅमोमाईल, चंदन, दवणा, जाई, लॅव्हेंडर या महाग सुगंधी वनस्पतीकरीता १ लाख २५ हजार रुपये आणि इतर सुगंधी वनस्पतीकरीता ५० हजार रुपये सर्वसाधारण क्षेत्रात ४० टक्के तर अधिसूचित क्षेत्रामध्ये ५० टक्के (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

नालासोपारात अनधिकृत बांधकामांचा विळखा....

नालासोपारात अनधिकृत बांधकामांचा विळखा....

*** सहाय्यक आयुक्त अश्विनी मोरे यांच्यावर बिल्डर लॉबीचा दबाव

नालासोपारा, प्रतिनिधी : नालासोपारा पश्चिम येथिल 
टाकी पाडा करारी बाग येथिल इंदानी तलाव भोवती अनधिकृत बांधकाम जोरात सुरू आहे. अनधिकृत बांधकामांना नोटीस देऊन हि पाच मजली भव्य अनधिकृत इमारत उभी करण्यात आली आहे. या अनधिकृत बांधकांमावर कारवाई करण्याबाबत मागणी करून हि सहाय्यक आयुक्त अश्विनी मोरे कारवाई करण्यास टाळाटाळ करत असुन अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचे काम करत आहेत.

इंदानी तलाव भोवती अनधिकृत बांधकाम उभे केल्यामुळे बांधकाम व्यवसायिक पटेल यांच्यावर MRTP अंतर्गत गुन्हे दाखल करून हि त्याठिकाणी ५ मजली भव्य अनधिकृत इमारत उभी करून सांडपाणी व इतर कचरा या तलाव सोडल्याने तलावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
यामुळे येथिल महापालिकेचा इंदानी तलावाचे लिलाव टेंडर कोणीच घेण्यास तयार नसल्याने महापालिकेचे दरवर्षी लाखो रूपयांचे नुकसान होते. 

तलावाचे संरक्षण व सुशोभिकरण करणे हि महापालिकेची जबाबदारी असताना हि महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रभाग समिती ई मध्ये  अनधिकृत बांधकामाचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा बांधकामांवर प्रशासनाचा अंकुश न राहिल्याने शहरात बेकायदा ईमारती, गाळे, मोबाईल टॉवर उभारले जात आहे. नियमांची पायमल्ली करून बांधकामे केली जात आहेत, 
प्रभाग समिती ई मधिल अनधिकृत बांधकामे रोखण्यात आणि बिल्डरांवर कारवाई करण्यात वसई विरार महानगरपालिकेला सपशेल अपयश आल्याने रोज अनधिकृत बांधकाम वाढत चालले आहे.

प्रभाग समिती ई  क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असून अनेक ठिकाणी बांधकामांना परवानगी देण्यात  आली आहे. तसेच श्रीप्रस्था येथिल म्हाडा रोड जवळ राजकीय नेत्याने महापालिकेच्या जागेत कंटेनर मध्ये प्रशस्त ऑफीस उघडुन याठिकाणी ५ ते ६ मुलींना कामास ठेऊन महापालिकेची जागा हडप करण्याचे काम केले आहे. याबाबत कारवाई करण्याबाबत पत्र व्यवहार करून हि १० दिवस उलटून हि कारवाई होत नसल्याचे दिसत आहे.

याबाबत अनेकवेळा कारवाई करण्याबाबत मागणी करून हि प्रभाग समिती  ई चे सहाय्यक आयुक्त दखल घेत नसल्याने याउलट अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचे काम करत असल्याचे निदर्शनास आले. नालासोपारातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर तातडीने MRTP अंतर्गत गुन्हे दाखल करून तोडक कारवाई करण्याची मागणी शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी केली आहे.

Sunday, 25 May 2025

कोकणात ओला दुष्काळ जाहीर करा- स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे संस्थापक /अध्यक्ष श्री.संजय कोकरे

कोकणात ओला दुष्काळ जाहीर करा- स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे संस्थापक /अध्यक्ष श्री.संजय कोकरे

मुंबई (शांताराम गुडेकर)
     यंदा कोकणात न भूतो न भविष्यति असा पाऊस मे महिन्यात पडतोय. अवकाळी पाऊस (ज्याला आम्ही 'धडकवनी' म्हणतो) पडतो, पण एवढा नाही. तास दोन तास पडून मोकळा व्हायचा. यावर्षी १५ मे पासूनच तो रोज हजेरी लावू लागला आणि १९ पासून तर जुलै महिन्यात पडतो तसा मुसळधार हंगामी पाऊस पडतोय. यंदा आंबा हंगाम चांगला होता.विक्री जोमाने सुरू होती. शेतकऱ्यांना चांगला दर मिळत होता. अजून झाडावर आंबा काढायचा आहे, तो तसाच राहिला. या पावसामुळे विक्री योग्य आंब्याचा दर पडला.
           पावसाच्या पुर्वीचा नारळाचा पाडा अर्धवट राहिला. करवंद, अळुची उसरी, फणसाचे गरे, आंब्या फणसाची साठं यांचं वाळवण सुकवण भिजून गेले. हे पदार्थ देखील आमच्या तुटपुंज्या अर्थ व्यवस्थेचा भाग आहे.
           आमच्या आगोटी कामात लाकूड फाटा भरणे, गुरांसाठी वैरण भरून ठेवणे, अशी किरकोळ वाटणारी कामेही जरुरीची असतात. कारण फाटी आणि वैरण भिजली, तर होणारे हाल शेतकऱ्यालाच माहीत.
        मेहनतीने केलेल्या भाजावणीवर धुळ पेरणी करणे तर दूरच पण आता भिजून गार झालेल्या शेतात बी रुजून तरी येईल का आणि पाऊस पेरणी करायला उसंत तरी देईल का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 
        अशा वेळी सरकारने कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. वर उल्लेखिलेल्या काही बाबी सरकारच्या लेखी किरकोळ असल्या तरी आमच्या संसारोपयोगी आहेत. त्यांची मोजदाद सरकारी व्यवस्थेत बसत नाही. म्हणून नेहमी प्रमाणे आम्ही कोकणवासी शासनाच्या दुष्काळाच्या चौकटीत बसणार नाही. आता कसोटी आहे, आमच्या लोक प्रतिनिधींची...! ते कशाप्रकारे आमची समस्या शासन दरबारी मांडतात आणि कोकणात ओला दुष्काळ जाहीर करतात, इकडे आमचे डोळे लागले आहेत. तरी एकंदरीत विचार करता शासनाने कोकणात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे संस्थापक /अध्यक्ष श्री.संजय कोकरे करत आहेत.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून एलिम्को तर्फे दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी राबविलेले दोन दिवसीय तपासणी शिबिर यशस्वीपणे संपन्न.....

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून एलिम्को तर्फे दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी राबविलेले दोन दिवसीय तपासणी शिबिर यशस्वीपणे संपन्न.....

डोंबिवली, प्रतिनिधी : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम मार्फत दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांसाठी डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेत आयोजित दोन दिवसीय तपासणी शिबिर २४ मे व २५ मे २०२५ रोजी उत्साही वातावरणात आणि यशस्वीपणे संपन्न झाले. सदर दोन दिवसीय शिबिरामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांनी  मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेतला. या योजनेनुसार दोन दिवसांमध्ये उपस्थित राहिलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, बॅटरी संचालित मोटराईज्ड सायकल, कुबड्या, वॉकिंग स्टिक, सीपी चेअर, श्रवण यंत्र, ब्रेल साहित्य, स्मार्टफोन, कृत्रिम अवयव तसेच सहभागी ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर, कमोड खुर्ची, ट्रायपॉड, ग्रीवा कॉलर, डेंचर, एल एस बेल्ट इत्यादी साहित्य उपस्थित डॉक्टर वर्गाकडून आवश्यकतेनुसार मंजूर करण्यात आले. सदरच्या शिबिरामध्ये गरजू ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळावा याकरिता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे तडफदार आमदार श्री राजेश गोवर्धन मोरे यांच्या वतीने उत्पन्नाच्या दाखल्याचे वाटप करून मोलाचे सहकार्य करण्यात आले.

या दोन दिवसीय शिबिराचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक २४ मे २०२५ रोजी सकाळी डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री गोपाळ लांडगे, जिल्हा महिला संघटक सौ. लताताई पाटील, उपजिल्हाप्रमुख श्री राजेश कदम, श्री रवी पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख श्री विवेक खामकर महिला आघाडीच्या जिल्हा संपर्कप्रमुख कविताताई गावंड, तालुका प्रमुख श्री महेश पाटील, ज्येष्ठ नेते सदा थरवळ, कल्याण तालुका कल्याण तालुका संघटक श्री अर्जुन पाटील आणि अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाच्या शिक्षण आणि प्रशिक्षण समितीचे अध्यक्ष श्री महादेव नरसिंग ढोकळे यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी सह-कार्यालय प्रमुख श्री बालन मोरे, श्री धर्मराज शिंदे, श्री शैलेंद्र भोजने, माजी नगरसेवक संजय पावशे, कल्याण ग्रामीण तालुका महिला संघटक सौ कल्पना पाटील, उपशहर प्रमुख श्री दिनेश शिवलकर, महिला शहर संघटक डोंबिवली पूर्व सौ स्वाती हिरवे, मंगलाताई पोखरकर, सुवर्णाताई भापकर, शिक्षिका आणि दिव्यांग भगिनी निकिताताई म्हात्रे, समन्वय समिती ज्येष्ठ नागरिक संघ डोंबिवली अध्यक्ष श्री सुरेश पालकर, साई सार्थक ज्येष्ठ नागरिक संघ पाथर्डी सदस्य श्री उदय गोखले, साई सार्थक ज्येष्ठ नागरिक संघ पाथर्ली सदस्य श्रीमती भाग्यश्री पुरंदरे, उपशहर संघटक संतोष तळाशीलकर, उपशहर प्रमुख श्री दीपक भोसले, विधानसभा प्रमुख व शहर सचिव श्री संतोष चव्हाण, महानगर प्रमुख सौ सारिका चव्हाण, सौ प्रभावती म्हात्रे, सारिकाताई रावल, श्वेताताई विश्वकर्मा, सौ.आरती राजपूत,  डॉ. वृषाली गडाड, विधानसभा संघटक अवनी शर्मा, साउथ इंडियन सेल प्रमुख श्री पॉली जेकप, उपशहर संघटक ज्ञानेश पवार, शैलेश चव्हाण, उपविभाग प्रमुख यशवंत भावसार, विभाग प्रमुख शिवराम हळदणकर, सौ प्रमिला जाधव, सौ मंजुळा शेट्टी, सौ शिल्पाताई मोरे, सौ गीता राजपूत, सौ सुरेखा राणे, सौ प्रतिभा पांचाळ, सौ नमिता मयेकर, सौ आकांक्षा साईल, सौ. स्वाती मोहिते, संस्कृती गुप्ता मारुती मोतीराम ठोंबरे, आमदार राजेश मोरे यांचे स्वीय सहाय्यक श्री सतीश मोडक तसेच खासदार कार्यालयाचे प्रकाश माने इतर कर्मचारी आणि शिवसेनेचे अनेक महिला पुरुष पदाधिकारी / कार्यकर्ते, समाजसेवक, दिव्यांग भगिनी, ज्येष्ठ नागरिक संघांचे प्रतिनिधी व मान्यवर यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. 

या शिबिरामध्ये १८० ज्येष्ठ नागरिकांनी आणि ६६ दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला असून त्यापैकी १५५ ज्येष्ठ नागरिक व ५२ दिव्यांग बांधवांनी त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार व त्यांना असलेल्या आवश्यकतेनुसार विविध वस्तूंची मंजूरी उपस्थित अधिकारी वर्गाने दिली. या कार्यक्रमाद्वारे उपस्थित कल्याण लोकसभा मतदारसंघातील गरजू ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव तसेच डोंबिवली शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी / कार्यकर्ते, विविध दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सातत्याने विविध कार्यक्रम राबविणारे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब तसेच ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांग बांधवांना शिबिरस्थळी उत्पन्नाचा दाखला मिळवून देण्यासाठी सक्रिय सहभाग घेणारे कल्याण ग्रामीण विधानसभेचे तडफदार आमदार श्री राजेश गोवर्धन मोरे, तसेच शिबिरातील लाभार्थ्यांना विविध वस्तू पुरवणाऱ्या एलिम्को संस्थेचे पदाधिकारी, उपस्थित डॉक्टर्स आणि समस्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

या शिबिरासोबतच कल्याण मतदारसंघातील मुंब्रा, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व व ग्रामीण भागातील यापूर्वीच्या शिबिरांमधील लाभार्थ्यांना पुढील पंधरवड्यात साहित्य वितरणाचा समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे सहाय्यक साहित्य त्यांच्या दैनंदिन जीवनात नक्कीच सुलभता आणि आत्मसन्मान निर्माण करणारे ठरेल असे मत उपस्थितांनी व्यक्त केल्याने शिबिर समारोपाच्या वेळी एलीमको कंपनीच्या वस्तीने उपस्थित राहिलेले डॉक्टर व स्टाफ यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल - श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांचे आभार मानून आनंदी व हर्षमय वातावरणात संध्याकाळी ५ वाजता दोन दिवसीय शिबिराची सांगता करण्यात आली.

Friday, 23 May 2025

“लोकशाही वाचवण्यासाठी आंबेडकरी विचारांची गरज” — दलित पँथर नेते कीर्ती ढोले यांचे वक्तव्य

“लोकशाही वाचवण्यासाठी आंबेडकरी विचारांची गरज” — दलित पँथर नेते कीर्ती ढोले यांचे वक्तव्य

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

            सदिच्छा सामाजिक विकास संस्था च्या वर्धापन दिन व बुद्ध पौर्णिमाचे औचित्य साधत नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले दलित पँथरचे नेते कीर्ती ढोले यांचे प्रभावी व ज्वलंत भाषण. कीर्ती ढोले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “समाजासाठी काम करणाऱ्यांच्या कार्याची कृतज्ञतेने दखल घेतली पाहिजे. त्यांना बळ मिळाले पाहिजे. त्यांच्या चळवळीला ताकद मिळाली पाहिजे.”
         ते पुढे म्हणाले, “आजच्या परिस्थितीत आपण लोकशाहीच्या गंभीर संकटातून जात आहोत. बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे केवळ वैचारिक नाहीत, तर मानवतेचा मार्ग दाखवणारे आहेत. माणसं जगवणं हे त्यांचं ध्येय होतं, मारणं नाही. ”भारतातील लोकशाहीवर होत असलेल्या हल्ल्यांकडे लक्ष वेधत, ढोले म्हणाले, “नेत्यांना बदनाम करण्याचे कट रचले जात आहेत. हे थांबवायचे असेल, तर आंबेडकरी विचारांशी निष्ठा ठेवत प्रश्न विचारण्याचे आणि चुकीला विरोध करण्याचे धैर्य आपल्यात पाहिजे. ”त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “प्रबोधन आजही गरजेचे आहे. बाबासाहेबांनी सर्वांचे प्रबोधन केले, आता त्यांचे अनुयायी पुढे येणे गरजेचे आहे.”
            कार्यक्रमाच्या शेवटी कीर्ती ढोले यांनी सदिच्छा सामाजिक संस्थेला मनापासून शुभेच्छा दिल्या व सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देण्याचे आवाहन केले. या सोहळ्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात आयु. तजीलाबाई खैरमोडे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या समाजहितासाठीच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. उपस्थित सर्वांनी त्यांच्या कार्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
               यावेळी इतर मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापैकी राजेंद्र नायकर, ए. रविचंद्रन (समाज गौरव पुरस्कार), मनोहर मोरे (समाज भूषण पुरस्कार), राहुल भंडारे (कलावैभव पुरस्कार), आणि पल्लवी जाधव व चैतन्य जावळे (धम्म प्रेरणा पुरस्कार) यांनाही गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष सुनील कांबळे ,सचिव शशिकांत गायकवाड आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी केले होते. सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रम यशस्वी केला.

पर्यटकांनी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' द्वारे ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा - विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पर्यटकांनी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' द्वारे ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा - विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, प्रतिनिधी : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरटीसीटी) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. ही यात्रा 'भारत गौरव टुरिस्ट ट्रेन' अंतर्गत ९ जून २०२५ पासून सुरू होत आहे. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

या ५ दिवसांच्या विशेष प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. याबाबत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली  हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यात्रेदरम्यान गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटकांना आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत.

🔶 सहल तपशील -
          सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट
          शुभारंभ दिनांक: ९ जून २०२५
          कालावधी: ५ दिवस / ६ दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)
          प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई
          प्रवास सुरु व संपण्याचे स्थानक : दादर, ठाणे

🚆 यात्रेचा प्रवासमार्ग -
मुंबई (सीएसएमटी)-रायगड-पुणे-शिवनेरी-भीमाशंकर-प्रतापगड-कोल्हापूर-पन्हाळा- मुंबई.
 
🏰 प्रमुख स्थळांची माहिती -
          रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.
          लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.
          कसबा गणपती व शिवसृष्टी,पुणे –पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.
          शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.
          भीमाशंकर ज्योतिर्लिंग – १२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.
          प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.
          कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर
          पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.
 
💰 पॅकेज शुल्क (प्रति व्यक्ती): -
            उपरोक्त सहलासाठी विविध पॅकेजिस तयार करण्यात आली असुन सोयीनुसार इकोनॉमी (एसएल), कम्फर्ट (३एसी), सुपीरियर (२एसी) अशा प्रकारच्या सुविधांची निवड करता येणार आहे.  सदरच्या पॅकेज बाबत सविस्तर माहीती आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

✅ पॅकेज मध्ये समाविष्ट सेवा: -
          भारत गौरव ट्रेनने प्रवास 
          वातानुकूलीत/ विनावातानुकूलीत हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था
          सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक व गाईड
          ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन
          प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क (किल्ले, मंदिरे, रोपवे, शिवसृष्टी इत्यादी)
          सुरक्षा व्यवस्था.

❌ पॅकेजमध्ये नसलेल्या सेवा: -
          साहसी खेळ, बोटिंग इत्यादी.
          खोलीतील सेवांसाठी वेगळी रक्कम आकारली जाईल.
          इतर कोणताही वैयक्तिक खर्च.
          कोणतेही अतिरिक्त पर्यटन स्थळ.

🗓️ दैनंदिन टूर कार्यक्रम (संक्षिप्त): -
          पहिला दिवस: मुंबई – रायगड – पुणे.
          दुसरा दिवस: पुणे (लाल महाल, शिवसृष्टी, कसबा गणपती).
          तिसरा दिवस: शिवनेरी – भीमाशंकर – पुणे.
          चौथा दिवस: प्रतापगड – कोल्हापूर.
          पाचवा दिवस: कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर – पन्हाळा किल्ला – मुंबई.
          सहावा दिवस: मुंबई (टूर समाप्त).

📌 आरक्षण व अधिक माहिती साठी संकेतस्थळ- www.irctctourism.com

उरण नेरूळ किंवा उरण बेलापूर लोकल प्रत्येक पंधरा मिनिटाला सुरु करा !!

उरण नेरूळ किंवा उरण बेलापूर लोकल प्रत्येक पंधरा मिनिटाला सुरु करा !!

                              अशोक दामू भोईर / न्हावा रायगड

           अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरण नेरुळ तसेच उरण - बेलापूर लोकल सेवा दिनांक १२ जानेवारी २०२४ उरणकरांच्या मागणीनुसार सुरू झाली. उरण नेरुळ व उरण बेलापूर लोकल ट्रेन सुरू झाल्याने उरणकरांचा पनवेल नवी मुंबई ते मुंबई प्रवास जलद झाला उरण चा औद्योगिक विकास झाल्याने नोकरवर्ग, विद्यार्थी, व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. रेल्वे सेवा सुरू झाली. त्यामुळे उरणकरांचा प्रवास अति जलद झाला.प्रवासी संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
           उरण आणि पनवेलच्या मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे तसेच शिवडी-न्हावा शेवा सागरी पूल देखील उरण तालुक्यामध्ये चिरले येथे येतो इत्यादी साठी उरण हे महत्त्वाचे शहर आहे. येथून राष्ट्रीय महामार्ग 348 व 348A येथुन जातो. नेरूळ - बेलापूर - उरण रेल्वे मार्ग पुर्ण झाले आहे. मात्र दर एका तासाने रेल्वे असल्याने हा रेल्वेमार्ग लोकल न वाटता शटल सारखी वाटते.
             लोकल फेऱ्यांची संख्या कमी असल्याने उरणकरांची परवड होत आहे. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या एक तासाऐवजी प्रत्येक पंधरा मिनिटाला असावी, तसेच उरण सीएसटी लोकल उरण ठाणे लोकल ताबडतोब चालू करण्यात यावी व बेलापूर ते उरण रस्त्यावरील मालवाहतूक हा सगळा जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी हजारो प्रवासांच्या हितासाठी सरकारने व रेल्वे बोर्डाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी रायगड जिल्ह्यातील प्रवाशी करत आहे. आणि ते बरोबर पण आहे.कारण हजारो महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य नोकरवर्ग या लोकलने प्रवास करत आहेत, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, संबंधित रेल्वे विभाग, रेल्वे मंत्रालय यांनी या विषयाची दखल घेऊन ताबडतोब निर्णय घ्यावा.
          उरण नेरूळ किंवा उरण बेलापूर लोकल प्रत्येक पंधरा मिनिटाला असावी याला कारण उरण, बामन डोंगरी, खारकोपर एकंदर सर्वच स्टेशन वरील प्रवाशांची वाढती संख्या आहे. सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब, चाकरमानी मुंबई नवी मुंबई येथे घर घेऊ शकत नसल्यामुळे, त्याचप्रमाणे रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वी सरकार आणि बिल्डरने जाहीर केले होते लोकलसेवा प्रवाशांच्या सोयीसाठी जास्तीत जास्त फेऱ्या केल्या जातील मात्र आजवर तसं झाले नाही.
          कामाला जाणे-येणे सोयीचे व्हावे म्हणून बहुतेक नोकरवर्गाने आपली कमाई, कर्ज काढून उरण नेरुळ मधील विकसित होणाऱ्या वेगवेगळ्या नोडमध्ये घरे घेतली आहेत, परंतु उरण नेरूळ किंवा सीबीडी बेलापूर या प्रत्येक तासाला असणाऱ्या लोकलच्या फेऱ्या ह्या सर्वसामान्यांच्या धावपळीच्या जीवनामध्ये अत्यंत त्रासदायक ठरत आहेत याशिवाय लोकलचे टायमिंग सकाळी पाच वाजल्यापासून किंवा रात्री उशिरा साडेदहा नंतर नसल्यामुळे कामगार वर्गासाठी खूप गैरसोयीचे होत आहे. सेकंड शिप किंवा उशिरा कामावरून उशीर झाल्यास प्रवाशाला त्रास सहन करावा लागत आहे.म्हणून उरण नेरूळ किंवा उरण बेलापूर लोकल प्रत्येक पंधरा मिनिटाला सुरु करून प्रवाशांना त्रासमुक्त करावे.

सौजन्य -
शांताराम गुडेकर (जेष्ठ पत्रकार)

महापालिकेची जागा बळकावण्याचा प्रकार.....

महापालिकेची जागा बळकावण्याचा प्रकार.....

नालासोपारा, प्रतिनिधी : नालासोपारा श्रीप्रस्था येथिल म्हाडा रोड जवळ महापालिकेच्या मालकीची जागा बळकावली जात आहे. तेथे अनधिकृत कंटेनर मध्ये भव्य ऑफीस सुरू करून संबंधित जागा लाटण्याचा प्रकार सुरू आहे. महापालिकेने याबाबत ठोस कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी केला.

या जागेची बाजारभावानुसार लाखो रूपये   इतके मूल्य होत असल्याचा दावा रूचिता नाईक  यांनी  केला.संबंधित जागा बळकावत तेथे अनधिकृत कंटेनर उभे केल्याची तक्रार  महापालिकेकडे केली  दोन वेळा नोटीस बजावूनदेखील अतिक्रमण हटवलेले नाही, प्रभाग समिती ई अनधिकृत विभाग यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार रूचिता नाईक यांनी केली आहे.

श्री दत्ता म्हात्रे सर (मंत्रीवाडी) व मित्र परिवार आयोजित दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न !!

श्री दत्ता म्हात्रे सर (मंत्रीवाडी) व मित्र परिवार आयोजित दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न !! 

*** संपूर्ण वाशी विभागामध्ये प्रथमच झालेल्या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक...

पेण (प्रतिनिधी) : प्रत्येक विद्यार्थ्याच्या आपल्या शैक्षणिक वाटचालीतील दहावी - बारावी बोर्ड परीक्षेचा टप्पा करिअर दृष्टीने अतिशय महत्वाचा समजला जातो. शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक संकटाशी सामना करत आपले शिक्षण पूर्ण करावे लागते हि वस्तुस्थिती आहे. 

यावर्षी अशाच खारेपाट पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी स्वतः च्या जिद्द, मेहनत, चिकाटीच्या जोरावर व पालक, शिक्षक यांच्या मार्गदर्शनातून  दहावी बारावी परीक्षेत सुयश प्राप्त करून आपल्या कुटुंबाचे नाव रोशन करून  गावाचे नाव देखील प्रकाशात आणले अशा विद्यार्थ्यांची दखल घेऊन एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याच्या सद्हेतूने  श्री दत्ता म्हात्रे सर (मंत्रीवाडी, वढाव/ रायगड) व मित्र परिवार यांच्या वतीने रविवारी १८ मे २०२५ रोजी पंचक्रोशीतील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. 
या गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून वाहतुकीची सुविधा नसल्याने कित्येक मैल पायी प्रवास करून आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर उत्तीर्ण झालेल्या इयत्ता दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मंत्री वाडी या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. सदर गणगौरव सोहळ्यामध्ये पंचक्रोशीतील एकूण ५० पेक्षा जास्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गुणगौरव करण्यात आला.यावेळी पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह तसेव भेटवस्तू देऊन सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना दहावी व बारावी नंतर आपण कोणते क्षेत्र निवडावे, करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत या संदर्भात प्रमुख मार्गदर्शक म्हणून M.D. कॉलेज रूपारेल चे प्राध्यापक तसेच जर्मनी येथे व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून काम करत असलेले सन्मा. डॉ. अनिरुद्ध पाटील यांनी विद्यार्थी व पालक यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सुभाष म्हात्रे ( PhD), डॉक्टर आशीर्वाद मोकल, सत्यविजय ठाकूर यांनी विविध क्षेत्रातील करिअर संदर्भात तसेच ITI शिक्षक श्री.मनोज पाटील सर यांनी आयटीआय मध्ये करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे निवेदन श्री सुहास म्हात्रे, स्मिता लोंढे व स्वतः आयोजक दत्ता म्हात्रे यांनी केले .अशा प्रकारचा कार्यक्रम संपूर्ण वाशी विभागामध्ये प्रथमच झाल्याने आयोजकांचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Thursday, 22 May 2025

सिंधुदुर्गच्या सुपुत्राचे दातृत्व; मुख्यमंत्र्यांकडे वीस लाखांचा निधी सुपूर्द !

सिंधुदुर्गच्या सुपुत्राचे दातृत्व; मुख्यमंत्र्यांकडे वीस लाखांचा निधी सुपूर्द !

मुंबई, कविराज चव्हाण : डोंबिवलीतून लोकलने व पुढे बसचा प्रवास करुन ते मंत्रालयात आले… आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा लाखांचे दोन धनादेश सुपूर्द केले. पंतप्रधान निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी वीस लाखांची रक्कम समर्पित केली. सदानंद विष्णू करंदीकर असे या दानशूर सिंधु पुत्राचे नाव. श्री. करंदीकर मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील.

आयुष्यभराची कमाई समाजासाठी समर्पित करताना करंदीकर यांनी ना कुठला गाजावाजा केला, न कुठली अपेक्षा ठेवली. त्यांच्या या दातृत्वाला मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाद दिली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कृतज्ञतापूर्वक हे धनादेश स्वीकारले. तसेच श्री. करंदीकर यांच्या संवेदनशीलता आणि दातृत्वाला नमन केले.

Wednesday, 21 May 2025

जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) तर्फे कोकण सुपुत्र शांताराम गुडेकर यांची "आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५" साठी निवड !!

जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) तर्फे कोकण सुपुत्र शांताराम गुडेकर यांची "आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५" साठी निवड !!

मुंबई, (उत्कर्ष गुडेकर) :
         रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या सह्याद्रीचा प्रतिकैलास श्रीक्षेत्र मार्लेश्वर परिसरातील आंगवली -रेवाळेवाडीचे सुपुत्र विक्रोळी पश्चिम पार्क साईट येथील रहिवासी वृत्तपत्रलेखक /पत्रकार--शांत्ताराम लक्ष्मण गुडेकर ( Ex.S.E.O) यांची जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) तर्फे "आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५" साठी निवड करण्यात आली आहे. गुडेकर यांना हा पुरस्कार शनिवार दि. ७ जून २०२५ रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत जोगेश्वरी पूर्व येथील अस्मिता भवन राजपुरिया हॉल, पहिला माळा, जोगेश्वरी पूर्व मेट्रो स्टेशन जवळ, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ट्रॉमा हॉस्पिटल जवळ, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई -६० येथे प्रमुख पाहुणे सन्मा.डॉ एम डी वळंजू (जोगेश्वरी भूषण ), प्रदीप जोशी (शिक्षकेतर कर्मचारी नेते), अविनाश दौंड (कामगार नेते), अँड. सि. रुषिला रिबेलो (कौन्सिलर मार्गदर्शक ), जगदीश जायले (वकील उच्च न्यायालय मुंबई ), वसंत ढोबळे (Ex ACP Mumbai), फादर निकी डीकोस्टा ( प्रिन्सिपॉल STHS) यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती यांना जीवनगौरव पुरस्कार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
 
                शांत्ताराम गुडेकर यांना महाराष्ट्र शासनाने "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून २०१२ ते २०१७ या काळावधीसाठी नियुक्त केले होते. त्यांना डाँ.बाबासाहेब आंबेडकर फँलोशिप पुरस्कार -दिल्ली प्राप्त झालेला आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दल-एन विभाग-क्षेत्र-३ मध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. शिवाय महाराष्ट्र शासन अनुदानित नशाबंदी मंडळ- महाराष्ट्र राज्य या मंडळतर्फे नशाबंदी चे काम करतात. कोकण विभाग पत्रकार संघ मुंबई जिल्हा सचिव म्हणून ते काम पाहिले असून त्यांना नगर मित्र, आदर्श समाजसेवक, समाजरत्न, दक्ष नागरिक, कोकण भूषण, वृत्तदिप पुरस्कार, महापौर गौरवपत्र तसेच सोनी टि.व्ही वरील सी.आय.डी मालीकेला वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शांत्ताराम  गुडेकर यांना "स्थानिक हिरो" सी.आय.डी मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे.

          शांताराम गुडेकर महाराष्ट्र हरित सेना, वन विभाग, महाराष्ट्र शासन चे सदस्य, माझी वसुंधरा, महाराष्ट्र शासन चे सदस्य आहेत. शिवाय माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना चे मुंबई जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आहेत. अखिल भारतीय पत्रकार हक्क संसद समिती चे मुंबई उपनगर सचिव आहेत. शांत्ताराम गुडेकर यांची आदर्श पत्रकार -२०२५ साठी निवड झाल्याबद्दल स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे अध्यक्ष श्री. संजय कोकरे आणि मुंबई/कोकण पदाधिकारी, सदस्य तसेच अनेक संस्था, प्रतिष्ठान, संघ व शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, वृत्तपत्रलेखक संघटना, पत्रकार मंडळीच्या वतीने अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

          जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) सामाजिक उपक्रम साजरे करण्यासाठी मुंबई सह कोकण विभागात अग्रेसर आहे. त्यांच्या व्हाट्सअप ग्रुप मधील अनेकजण सढळ हस्ते मदत करण्यास पुढे येतात व यामुळे नक्कीच समाजातील गोर-गरीब, वंचित घटकांना आम्ही सहकार्य करू शकतो व या सेवेचा आनंद ग्रुपमधील सर्वजण घेत असतात.. जॉय ऑफ गिविंग म्हणजेच दुसऱ्याला देण्यातला आनंद हा ग्रुपचा जो उद्देश आहे, तो यामुळे सफल होत असल्याचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे सर यांनी सांगितले. विविध पुरस्कार देऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचा गौरव करणे हा सुद्धा वर्धापन दिनानिमित्त त्याचाच एक भाग आहे. तरी या पुरस्कार सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक -श्री.गणेश हिरवे (संस्थापकअध्यक्ष), शीला येरागी (उपाध्यक्षा), असुंता डिसोझा (कार्याध्यक्ष), छाया राणे (सचिव), समीर परब (कोषाध्यक्ष) यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

लांजा तालुक्यातील गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनतर्फे कोकण कन्या सृष्टी कुळये यांचा सत्कार !!

लांजा तालुक्यातील गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनतर्फे कोकण कन्या सृष्टी कुळये यांचा सत्कार !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

           सृष्टी कुळये ही मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील शिरवली (पलीकडचीवाडी )येथील राहणारी, सध्या ती मुंबईत राहते. तिचे वडील सुरेश कुळये हे मुंबईत एका प्रिंटिंग प्रेसमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून काम करतात, तर आई गृहिणी आहे. सृष्टी हिला दोन भावंडे असून, ती या सर्वात मोठी आहे. घरची परिस्थिती बेताची आहे, तरीही सृष्टी हिने केवळ जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर सृष्टी हिने यूपीएससीमध्ये यश संपादन करत देशात ८३१ रँक मिळवली.

            लेकीने (सृष्टी) मिळविलेल्या यशानंतर आई-वडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कु.सृष्टी कुळये हिचे तिच्या मानखुर्द येथे राहत्या घरी जाऊन लांजा तालुक्यातील शिक्षण, समाजसेवा, ग्रामसेवा, तंटामुक्त, कृषीसेवा, शेती विकास, कामगार, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, ग्रंथपालन, पर्यावरण आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक डॉ.श्री. चंद्रकांत शिवराम करंबळे, वकील श्री. मनोहर मांडवकर, गुरुमाऊली फाउंडेशनच्या सदस्य सौ. दिपाली करंबळे, कुमारी निशा मांडवकर व सृष्टीचे आई वडील यांच्याकडून पुष्पगुछ, शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तिच्याशी आणि तिच्या परिवाराशी सुसंवाद साधण्यात आला. तिच्या UPSC स्पर्धा परीक्षेबद्दलचा प्रवास, तिने केलेली मेहनत इ. गोष्टीची माहिती घेऊन उपस्थित सभासदांनी तिला मंडळातर्फे अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या.

           हा कार्यक्रम श्री.चंद्रकांत करंबळे यांच्या माध्यमातून पार पडला. त्यामुळे उपस्थित सभासद यांचे यानिमित्ताने आभार व्यक्त करण्यात आले. सृष्टीला यश, कीर्ती आणि दीर्घ आयुष्य देवो हीच प्रार्थनाही या सत्कार दरम्यान करण्यात आली. समाजाची मुलगी म्हणून समाजसेवक चंद्रकांत करंबळे यांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते.

              सध्या सृष्टी मुंबईतील मानखुर्द शिवनेरीनगर येथील झोपडपट्टीत राहत असल्याने या ठिकाणी तिचा अभ्यास होत नव्हता. त्यामुळे तिने सन २०२२ मध्ये गोवंडी येथील एम.पॉवर लायब्ररीत प्रवेश घेतला. घरात कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक वातावरण नाही. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे कोणतीही शिकवणी नाही. अशा परिस्थितीतही सृष्टी हिने केवळ इच्छाशक्ती आणि अभ्यासाच्या जोरावर गरुडझेप घेतली. तिने मिळविलेल्या या यशानंतर त्याच्या परिवारातर्फे आणि अनेक ग्राम मंडळ, मुंबई मंडळ यांच्यातर्फे तिचा सत्कार करण्यात आला.

            घरच्या परिस्थितीची कल्पना होती. आई-वडिलांचे कष्ट पाहत होते. त्यामुळे चांगले शिकायचे आणि मोठे व्हायचे हे मनाशी ठरविले होते. त्यासाठी आई- वडील, माझे मार्गदर्शक शिक्षक, मला प्रोत्साहन देणारे हितचिंतक यांचे पाठबळ मिळाले. या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे मी हे यश मिळवू शकले असे सृष्टी कुळये यांनी सत्कारला उत्तर देताना स्पष्ट केले. या यशा बद्दल लांजा तालुका मधील अनेक मंडळ, समाज शाखा यांच्या तर्फे सृष्टी यांना अनेकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

महेंद्र उर्फ अण्णा पंडित "भीमयोद्धा" पुरस्काराने सन्मानित...

महेंद्र उर्फ अण्णा पंडित "भीमयोद्धा"  पुरस्काराने सन्मानित...

उल्हासनगर, प्रतिनिधी - स्वराज्य संघटनेच्या वतीने महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव नुकताच साजरा करण्यात आला जयंती उत्सवाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा *भीम रत्न* व *भीम योद्धा* पुरस्कार देऊन त्यांना सदर कार्यक्रमात गौरविण्यात आले. महेंद्र उर्फ अण्णा पंडित यांनी सामाजिक अत्याचाराच्या विरोधात निर्भिडपणे आवाज उठवुन शोषीत पिडीतांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत सामाजिक जबाबदारी पार पाडल्याबद्दल या अभ्यासु समाजसेवकाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भीमयोद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला. महेंद्र उर्फ अण्णा पंडीत हे श्रमिक मुक्त पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष असुन अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत. पिडीत, शोषितांच्या मदतीला रात्री बेरात्री धावुन जाणारा, त्यांना कायदेशीर मार्गदर्शन व मदत करणारा एक अभ्यासू सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असुन त्यांच्या कार्याची महती पंचक्रोशीत लपुन राहीलेली नाही. 

अण्णा पंडीत यांच्या सामाजिक कार्याची दखल स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.जय गायकवाड यांनी घेतली असून ज्येष्ठ विचारवंत, संपादक, पत्रकार आणि ८४ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा.उत्तम कांबळे आणि पत्रकार व्याख्याते किरण सोनावणे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व स्मृतिपदक देवुन *भीम योद्धा* पुरस्काराने अण्णा पंडीत यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी  विचारमंचावर धम्म अभ्यासिका शीलाताई जाधव, लताबाई पडघान, कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.गोपाळ भगत स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.जय गायकवाड इत्यादी मान्यवर  उपस्थित होते.

अण्णा पंडीत यांना भीमयोद्धा पुरस्कार प्राप्त झाल्याने समाजातील प्रत्येक स्तरातुन त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Monday, 19 May 2025

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला (प), मुंबई या शाळेचा निकाल 87.5% टक्के !!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला (प), मुंबई या शाळेचा निकाल 87.5% टक्के !!

मुंबई, प्रतिनिधी - पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचालित - *संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल,* बैल बाजार, कुर्ला पश्चिम, मुंबई -400070 या रात्र शाळेचा फेब्रुवारी-2025  एस.एस.सी. परीक्षेचा निकाल 87.5% लागला असून विद्यार्थी पालक व शिक्षक वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते. 

या रात्र शाळेची स्थापना 1971 ची असून शासन अनुदानित मान्यता आहे. रात्र शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत रात्र शाळेचे शैक्षणिक कार्य यशस्वीपणे राबवले जात आहे. आज रात्र शाळा परिसरामध्ये नावारूपाला येत आहे. मराठी माध्यमाची रात्र शाळा ही ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण आहे किंवा नोकरी मध्ये प्रमोशन घेण्यासाठी अधिक शिक्षणाची आवश्यकता लागत आहे असे विद्यार्थी व नियमित विद्यार्थी रात्र शाळेत येऊन आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. रात्र शाळेत वयाची अट नसल्याकारणाने 14 वयोगटाच्या पुढील कितीही वयापर्यंतचा विद्यार्थी रात्र शाळेत प्रवेशित होऊ शकतो व त्याचे शिक्षणाचे राहिलेले स्वप्न तो पूर्ण करू शकतो. 
 
रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत व सहकारी शिक्षक श्री समाधान खैरनार सर तसेच मासूम संस्थेकडून इंग्रजी विषय शिकविण्यासाठी देण्यात आलेले श्री शहाजी ओव्हाळ सर गणित विज्ञान विषयासाठी श्री योगेश विरकर सर यांनी एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के कसा लावता येईल त्यासाठी खूप प्रयत्न केले. मागील पाच वर्ष रात्र शाळेचा निकाल शंभर टक्के देण्यात आलेला आहे. परंतु या शैक्षणिक वर्षात एसएससी परीक्षेचा निकाल *87.5%* देण्यात आला आहे. 
 
एसएससी परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त झालेला विद्यार्थी प्रवीण सुधाकर साळवे -61.8% द्वितीय क्रमांक स्वप्निल संतोष साळवे- 60 %, तृतीय क्रमांक साक्षी दीपक मानकर -53.4% गुण प्राप्त करून यश संपादित केले आहे.* पास झालेले सर्व विद्यार्थी आपले पुढील शिक्षण चालू ठेवणार आहे. 
 
रात्र शाळेला सपोर्ट करणारी मासूम संस्था रात्र शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे करिअर घडवण्यासाठी मदत करत असते. त्याबद्दल मासूम संस्थेच्या संस्थापिका माननीय निकिता केतकर मॅडम व त्यांचे कार्य सांभाळणारी संपूर्ण टीम यांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत व संस्थेने मानले आहेत.* पास झालेल्या प्रत्येक विद्यार्थी यापुढे चांगलं कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा विचार करत आहे. 

आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच आठवी, नववी व दहावीच्या वर्गात प्रवेश घेण्याचे आवाहन मुख्याध्यापक राऊत सर यांनी केले आहे.

अनुसूचित कल्याण समितीच्या माध्यमातून मागासलेल्या जनतेच्या विकासासाठी काम करणार - आमदार दौलतजी दरोडा !!

अनुसूचित कल्याण समितीच्या माध्यमातून मागासलेल्या जनतेच्या विकासासाठी काम करणार - आमदार दौलतजी दरोडा !!

* वाडा येथे राष्ट्रवादी जिल्हा बैठक व आमदार दरोडा यांचा सन्मान सोहळा संपन्न

शहापूर, प्रतिनिधी : राज्यातील मागास जनतेच्या अनेक समस्या प्रलंबित असून अनुसूचित कल्याण समितीच्या माध्यमातून त्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्य अनुसूचित कल्याण समितीचे अध्यक्ष तथा शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा यांनी केले आहे. 

वाडा येथे रविवारी (18 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पालघर जिल्हा बैठक व अनुसूचित कल्याण समितीच्या अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्याबद्दल आमदार दरोडा यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आमदार दरोडा यांनी पुढे सांगितले की, राज्य सरकारकडून आदिवासी समाजासाठी विविध योजनांसाठी भरीव निधी देण्यात येत असून त्या निधीचा योग्यप्रकारे विनियोग झाला पाहिजे, तरच त्याचा खरा फायदा मागास भागातील जनतेला होईल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष आनंदभाई ठाकूर, ज्येष्ठ नेते संदीप वैद्य, प्रदेश सचिव संतोष मराठे, महिला जिल्हा अध्यक्षा रोहिणी शेलार, जिल्हा सरचिटणीस मुकणे सर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष नितीन जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश कासट, शैलेश कर्मोडा यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी केले.

-------------------------------
या कार्यक्रमात जव्हार येथील बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांच्या समवेत तालुक्यातही सरपंच - उपसरपंच व अन्य कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणात राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
-------------------------------
या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या वाडा तालुका महिला अध्यक्ष पदावर जान्हवी जगदीश पाटील (आबिटघर) यांची नियुक्ती करण्यात आली असून महिला जिल्हा उपाध्यक्ष पदावर चित्रा पाटील व तालुका सरचिटणीस पदावर रंजना भागडे यांची नियुक्ती करण्यात आली.

आमदार दौलतजी दरोडा यांनी अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला‌ !!

आमदार दौलतजी दरोडा यांनी अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला‌ !!

मुंबई, प्रतिनिधी : शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलत जी दरोडा यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष पदाची पदभार सोमवारी (दि.19) रोजी विधानभवन मुंबई येथे स्वीकारला.

आमदार दौलत दरोडा हे ज्येष्ठ विधानसभा सदस्य असून तब्बल पाच वेळा शहापूर विधानसभा मतदारसंघात निवडून आले असून उच्चशिक्षित व अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या ते अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये कार्यरत असून अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्षपद देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांना न्याय दिल्याची भावना व्यक्त होत आहे.

विधानसभा अधिनियम 235 अन्वये स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार दौलतजी दरोडा यांची नियुक्ती करण्यात आली असून या समितीत आमदार हरिचंद्र भोये, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, आमदार केवलराम काळे, आमदार  राजू तोडसाम, आमदार राजेश पाडवी,  आमदार शांताराम मोरे, आमदार मंजुळा गावित, आमदार हिरामण खोसकर, आमदार आदित्य ठाकरे, आमदार रामदास मसराम, आमदार विनोद निकोले आदी आमदारांचा समावेश आहे.

Sunday, 18 May 2025

१०० दिवसांच्या उपक्रमात अमळनेर प्रांत कार्यालय नाशिक विभागात प्रथम !!

१०० दिवसांच्या उपक्रमात अमळनेर प्रांत कार्यालय नाशिक विभागात प्रथम !!

मुंबई (शांताराम गुडेकर) : मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या उपक्रमात अमळनेर उपविभागीय कार्यालयाने नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

भौतिक सुविधांसह जनतेला तत्पर सेवा, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, कर्मचाऱ्यांची वागणूक असे काही निष्कर्ष देण्यात आलेले होते. यात उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी पिण्याचे शुद्ध पाणी, रेकॉर्ड रूम अद्ययावत करून त्याचे संगणकीकरण करणे, जेष्ठ नागरिकांची प्रकरणाचा तात्काळ निपटारा केल्याने आणि जनहिताच्या निर्णय घेतल्याने अमळनेर उपविभाग नाशिक विभागात प्रथम आला आहे. 

उपविभागीय कार्यालय नाशिक विभागात प्रथम आल्याने प्रांत नितीनकुमार मुंडावरे यांच्यासह कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्वतंत्र कोकण राज्याची ३१ मे रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद !!

स्वतंत्र कोकण राज्याची ३१ मे रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

            स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वतंत्र कोकण राज्याची मागणी विषय असणारी पत्रकार परिषद शनिवार दिनांक ३१ मे २०२५ रोजी दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत मुंबई मराठी पत्रकार संघ (नोंदणीकृत) पहिला मजला पत्रकार भवन, आझाद मैदान, बाळशास्त्री जांभेकर चौक, महापालिका मार्ग, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या पहिल्याच ऐतिहासिक पत्रकार परिषदेकडे अनेक राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. तसेच अनेक जणांची उत्सुकता वाढली आहे. कोकणातील जनतेच्या आशा- आकांशा, स्वप्ने, निराशा या सगळ्यांचा सामूहिक उध्दार म्हणजे स्वतंत्र कोकण राज्य अभियान असुन कोकणची वैचारिक परंपरा, सहिष्णुतेची उदरतेची असली तरी कोकणचे सर्वच क्षेत्रात अधः पतन झाले आहे. जोपर्यंत कोकण प्रांत महाराष्ट्रात अंतर्भूत आहे तोपर्यंत कोकणचा विकास होणार नाही. तसेच अविकसित काळ हा काळ गुलामगिरीचा काळ म्हणून भविष्यात ओळखला जाईल. त्यासाठी स्वतंत्र कोकणराज्याचा एल्गार पुकारला आहे. यासाठी कोकणातील अनेक सामाजिक संघटना, विविध समवैचारिक प्रतिष्ठित व्यक्ती एकत्र येऊन व अनेक उद्योजकांनी या अभियानाचे स्वागत करून पाठिंबा दिला आहे. या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

अपना बाजार आर.सी.एफ. शाखा चेंबूरचा ५९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा !!

अपना बाजार आर.सी.एफ. शाखा चेंबूरचा ५९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा !! मुंबई (शांताराम गुडेकर) :             अपना बाजार आर.सी.एफ...