Tuesday, 26 May 2026

मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.!!

मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.!!

शासनाने ग्रामपंचायतीच्या कार्याचा गौरव करत केला दुसरा क्रमांक देऊन केला सन्मान.

ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांवर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव.

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जासईने केलेल्या सर्वच लोककल्याण कारी कार्याची व जनतेच्या सर्वांगीण विकासाची कार्ये लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत जासईला उरण तालुक्यातून दुसरा क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनाने ग्रुप ग्रामपंचायत जासईच्या कार्याचा गौरव करत दुसरा क्रमांक देऊन त्यांचा सन्मान केला आहे.ग्रुप ग्रामपंचायत जासईने सर्वच घटकासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविले आहेत. अनेक विकासकामे केली आहेत त्यामुळे त्यांना हा उरण तालुक्या मध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे.अभियान अंतर्गत दुसरा क्रमांक मिळाल्याने ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांवर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


अभिमानास्पद व गौरवास्पद कामगिरी ग्रुप ग्रामपंचायत जासईच्या माध्यमातून झाली असून जासईचे सरपंच  संतोष रामचंद्र घरत यांचा नेतृत्वाखाली जासई ग्रुप ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासन अंतर्गत राबविण्यात आलेल्या "मूख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान "मध्ये उरण तालूक्यात दूसरा क्रमांक पटकविला आहे.बक्षिसपात्र रक्कम-१२ लाख ग्रामपंचायतला मिळणार आहे. ग्रामपंचायत जासई चे व्याप्ती व कारभार मोठा असलं तरी या अभियान मध्ये सर्व घटक परिपूर्ण करून अभियान यशस्वी करण्यासाठी महत्वाचे योगदान देणाऱ्या सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचे सर्व स्तरातुन कौतुक केले जात आहे.


मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाद्वारे ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी राबविण्यात येणारे एक महत्त्वाकांक्षी अभियान आहे。 स्थानिक स्वराज्य संस्थांना (जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती) कार्यक्षम बनवणे आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हा याचा मुख्य उद्देश आहे.या अभियानांतर्गत स्थानिक संस्थांच्या कामाचे मूल्यमापन केले जाते.ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभाग वाढवणे, कर वसुली, आणि डिजिटल सेवांचा वापर यांसारख्या निकषांवर आधारित उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा गौरव केला जातो. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे, प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि ग्रामीण नागरिकांना सुलभ व गतिमान सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांचा विकास करणे, कोणतेही समस्या निर्माण झाल्यास ते त्वरित सोडविणे आदी विविध कार्य उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायतच्या माध्यमातून नेहमी करण्यात येते.हे सर्व ग्रामपंचायतचे कार्य लक्षात घेऊन त्यांच्या कार्याची पोहोच पावती म्हणून शासनाने ग्रुप ग्रामपंचायत जासईला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुका स्तरीय दुसरा क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे

No comments:

Post a Comment

नालासोपारात शिवसेना- भाजपला धक्का ; खिंडार रुचिता नाईक, वैभव पवार यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश.....

नालासोपारात शिवसेना- भाजपला धक्का ; खिंडार रुचिता नाईक, वैभव पवार यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश..... *"शेकडो कार्यकर्ते तीन नवीन रुग्...