Monday, 25 May 2026

जनगणनेमध्ये ओबीसी प्रवर्गाला कोणतेही स्थान नसल्याने शिवसेना नेते जगजीवन भोईर यांनी केला निषेध !

जनगणनेमध्ये ओबीसी प्रवर्गाला कोणतेही स्थान नसल्याने शिवसेना नेते जगजीवन भोईर यांनी केला निषेध.

सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना.

जणगणनेत फक्त एस सी,एस टी प्रवर्गाचा उल्लेख. इतर जातीचा उल्लेख नाही.

ओबीसी नेते नाराज ; ओबीसी समाजात तीव्र संताप.

उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे) : सध्या सर्वत्र जणगणना सुरु आहे. मात्र या जणगनणेत एस सी, एस टी प्रवर्गचा उल्लेख आहे मात्र ओबीसी प्रवर्गाचा उल्लेख नसल्याने शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख श्री जगजीवन भोईर यांनी तीव्र संताप व्यक्त करत या गोष्टीचा सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला आहे.त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बिहार निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने जनगणना करताना ओबीसींची स्वतंत्र गणना केली जाईल, असे जाहीर केले होते. बिहार निवडणुकीत ओबीसींना खुश करण्यासाठी केंद्र सरकारने ही घोषणा केली होती. आता त्या नंतर मात्र प्रत्यक्षात जनगणना सुरू झाल्यानंतर जनगणना फॉर्ममध्ये ओबीसीचा (0) ओ देखील उच्चारला जात नाही किंवा तशा चौकशाही प्रगणकाकडून केल्या जात नाहीत. मग जणगणना कोणासाठी व कशासाठी केली जात आहे असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) नेते जगजीवन भोईर यांनी उपस्थित केला आहे.


इतर मागासवर्गीयांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्न या जनगणनेच्या माध्यमातून केला जात आहे. असेही भोईर यांनी म्हटले आहे. जर ही ओबीसींची स्वतंत्र गणना झाली नाही तर विश्वनाथ प्रताप सिंग, महाराष्ट्रातील नेते ओबीसीचे आणि आगरी समाजाचे नेते दिवंगत  दि. बा. पाटील साहेब यांनी रुजवलेली ओबीसी चळवळ मातीत गाडली जाईल आणि ओबीसींचे आरक्षण नष्ट केले जाईल.बहुजन नेते कांशीराम यांनी जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी  असे म्हटले होते. त्यांची ही घोषणा पुढे न्यावीच लागेल. जर ओबीसींची गणना करायची नसेल तर ही जनगणनाच करू नका ! ओबीसींची. स्वतंत्र गणना झालीच पाहिजे !! अशी मागणी जगजीवन भोईर यांनी केली आहे.केंद्र सरकारने इतर मागासवर्गीय समाजाला फसवण्याचे धंदे बंद करावेत. असे शिवसेना नेते जगजीवन भोईर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला ठणकावले आहे.

 जगजीवन भोईर यांनी सांगितले की कालच जनगणना अधिकाऱ्याला फोनवर मी एक प्रश्न विचारला . त्यांना विचारलं की मी ओबीसी - आगरी आहे . तर ह्या जनगणना पत्रकात माझ्या ह्या संविधानिक प्रवर्गाचा उल्लेख आहे का ? तर त्यांनी सांगितलं की एस्सी व एस्टी ह्या दोनच प्रवर्गाचा उल्लेख आहे आणी जे अन्य प्रवर्ग किंवा जातीचे प्रवर्ग अर्थात ओबीसी वगैरे आहेत , त्यांचा " इतर " म्हणून उल्लेख आहे , ओबीसी म्हणून उल्लेख नाही . 
 
तेव्हा सदर अधिकारी मला म्हणाला की साहेब , ओबीसी समाज अक्षरशः झोपलेला आहे , त्याला ह्या महत्वपूर्ण मुद्द्याशी काहीच घेणदेण नाही . आज मला बरेच दिवस झालेत , मात्र ओबीसी सामाजाइतका सुस्त आणी मस्त समाज मी कधीच बघितला नाही . 

जनगणनेत जर ५२% असणाऱ्या ओबीसी समाजाचा उल्लेखच नाही , तर मग तुम्ही आम्हा ओबीसीला कुठ गृहीत धरत आहात ? आमचा काय म्हणून वापर करून घेत आहात ? आमचे मूर्ख नेते काय करत आहेत ? 

फक्त २२. ५ % एस्सी एस्टी समाजाचा उल्लेख जनगणनेत होतोय व आमचा नाही , ही किती भयंकर आणी निंदनीय बाब आहे . ज्या देशाचा प्रधानमंत्री स्वतःला ओबीसी म्हणतो , त्या प्रधानमंत्र्याच्या प्रवर्गाचा जनगणनेत उल्लेखच नसणे ही सामान्य बाब नाही . ह्याचा नाही ओबीसीचा फक्त आणी फक्त जातीय ध्रुवीकरणासाठी वापर केला जातो , कधी मुसलमानाच्या विरोधात , कधी एसीच्या तर कधी एस्टीच्या विरोधात . 

आमची जर जातनिहाय जनगणना होतच नाही , तर मग आमच्या समस्या कुठल्या , आमच्यात शिक्षणाच प्रमाण किती , आमच्यात नोकऱ्यांच प्रमाण किती , आमचा आर्थिक स्तर काय आहे ? ह्यासारख्या प्रश्नांच उत्तर कधी मिळणार ? 

बर , ह्या संविधानिक मुद्द्यावर कोणीही एक चकार शब्दही काढत नाही . आणी मग आमच्या मुलांना १२ वी नंतर ऍडमिशनचे प्रॉब्लेम झाले की आम्ही आमच्या अपयशाच खापर एस्सी एस्टी समाजावर फोडायला मोकळे होतो . काय ? तर त्यांना देऊन ठेवलय , आम्हाला नाही . पण तुम्हांला सुद्धा आहे , मात्र तुमचा हक्क मिळवण्यासाठी कधी तुम्ही रस्त्यावर येता का ? कधी सरकारला जाब विचारता का ? त्यासाठी कधी एकत्र येता का ? 

इतका निर्बुद्धपणा जगात कुठे शोधून सापडणार नाही . आतापर्यंत व्यवस्थेचे "अनपेड पोलीस " म्हणून आम्ही ओबीसीनी आमची जबाबादारी मोठ्या इमानेइतबारे पार पाडली , आणी ह्यापुढेही पार पाडू ! अशा भावना शिवसेना नेते जगजीवन भोईर यांनी व्यक्त केल्या आहेत

No comments:

Post a Comment

फोर्टिस हॉस्पिटल कल्याणतर्फे अत्याधुनिक आपत्कालीन विभागाचे उद्घाटन !!

फोर्टिस हॉस्पिटल कल्याणतर्फे अत्याधुनिक आपत्कालीन विभागाचे उद्घाटन !! *२० वर्षांच्या आरोग्यसेवेचा मानाचा टप्पा; ‘Code QRT 2.0’ उपक्रमाची घोष...