वसुधा फाऊंडेशनचा पुस्तक प्रकाशन व बालकवि संमेलन सोहळा उत्साहात संपन्न !!
*पुणे, दि. 20 ऑगस्ट -* वसुधा फाऊंडेशन, पुणे आयोजित _'आपडी थापडी' बालकाव्यसंग्रह_ आणि _'वसुधाचे कथा वैभव'_ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा, बक्षीस वितरण आणि राज्यस्तरीय भव्य बालकवि संमेलन सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले.
आम्ही मुंबईकर वृत्तपत्राच्या उपसंपादिका आणि वसुधा फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा सौ. वसुधा वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फाऊंडेशन आयोजित कथा स्पर्धेचे परीक्षण शशिकांत सुतार, दिलीप घाटे, राजेश्वर हेंद्रे आणि रामदास तांबे यांनी केले.
*मान्यवरांची उपस्थिती आणि विचार*
सुप्रसिद्ध बालसाहित्यिका सौ. ललिता सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात दोन्ही पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती म्हणून ॲड. अब्दुल शेख, पोलीस अधिकारी आणि दिग्दर्शक पुंडलिक धुमाळ यांनी बालसाहित्य निर्मितीचे कौतुक केले. ॲड. शेख म्हणाले, अशी बालकवि संमेलने प्रत्येक गावात झाली तर गुन्हेगारी होणारच नाही. कविता करणारा माणूस संवेदनशील असतो आणि संवेदनशील माणूस माणसांवर प्रेम करतो.
प्रमुख पाहुणे म्हणून कवी व राष्ट्रपती पोलीस पदक विजेते सिताराम नरके, शिक्षक काळुराम वाघचौरे आणि निसर्गकवी लक्ष्मण शिंदे यांनी विचार मांडले. लक्ष्मण शिंदे यांच्या 'झाडाची आरती' या कवितेला रसिकांनी दाद दिली. सिताराम नरके यांच्या काव्य प्रतिभेचे आणि आवाजातील धारदारपणाचे कौतुक झाले. दिग्दर्शक पुंडलिक धुमाळ यांनी उत्तम कथानकाला न्याय देण्याचे आश्वासन दिले.
बालसाहित्यिका ललिता सबनीस यांनी कथा स्पर्धेचे कौतुक करत सर्व लिहित्या हातांना शाबासकी दिली आणि बालकवींना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी विश्वगुरू मधुसूदन घाणेकर, प्रतीक्षा इंटरनॅशनलच्या प्रिया दामले आणि सारिका उर्फ मधुकर्णिका यांचीही उपस्थिती होती.
*संस्थापिकेचा आढावा आणि बालकवींचे सादरीकरण*
स्वागताध्यक्षा व संस्थापिका सौ. वसुधा नाईक यांनी फाऊंडेशनच्या शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक कार्याचा आढावा दिला. त्यांनी सर्व बालकांना कवितेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
गजानन उफाडे यांनी बहारदार निवेदन केले. या कार्यक्रमात एकूण तीस बालकवींनी आपली कविता सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. सर्व बालकांचा मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
वीरा दरेकर, मंदार भोंडवे, श्रावणी गुरव, मृणाल ताग्हाणे, श्रेयशी कांबळे, सिद्धी बिडकर, अनुष्का लांडे, यश यादव, वेदिका सावंत, श्रीराम पवार, अस्मिता रांजणे, संस्कृती खुटवड, सारिका सोंडकर, प्रांजल मोरे, ईश्वरी खोपडे, आर्या ढोके, श्रावणी लोहार, पार्थ घडे, गायत्री रसाळ, माधुरी गिरी, युवराज मोरे, राधिका सोनवणे, मृण्मयी काळे, अजया मुळीक, ईशिका दोडमणी, रुपाली चव्हाण, दुर्वेश परदेशी आदी बालकवींनी काव्य सादरीकरण केले.
कथा स्पर्धेसाठी योगेश हरणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गौरव पुंडे यांच्या 'गौरवाचे पत्र' या लेखनाने रसिकांच्या मनात फाऊंडेशनबद्दल आदर निर्माण केला. विद्यार्थिनी गायत्री रसाळ हिने वसुधा नाईक यांच्याबद्दल केलेल्या मनोगताने अनेकांच्या डोळ्यात प्रेमळ अश्रू आले.
कार्यक्रमाचे आभार शीतल शर्मा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश हरणे, गौरव पुंडे, श्रीराम घडे, कोमल नाईक, शीतल शर्मा, सायली ढेबे, मयुरी पुंडे आणि राधिका परदेशी यांनी विशेष परिश्रम घेतले. वसुधा नाईक यांच्या वहिनी कल्पवंती, भाची अपूर्वा आणि पती वैभव नाईक यांचीही मोलाची साथ लाभली.
वृत्त - उपसंपादिका, वसुधा नाईक (सा. आम्ही मुंबईकर)
No comments:
Post a Comment