Saturday, 28 June 2025

स्फूर्ती फाउंडेशन वतीने एक दिवसीय रेशनकार्ड शिबिर आयोजन !!

स्फूर्ती फाउंडेशन वतीने एक दिवसीय रेशनकार्ड शिबिर आयोजन !!

कल्याण प., प्रतिनिधी - स्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून शंकेश्वर प्रेसिडेन्सी, आर टि.ओ.जवळ, टावरीपाडा कल्याण पश्चिम येथे शुक्रवार दिनांक ४ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते दूपारी २ या वेळेत एक दिवसीय रेशन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रेशन कार्ड ही सर्वांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाच्या अशा कागदपत्रां पैकी एक असून या माध्यमातून सरकारी योजनेचा लाभ विविध शासकीय कार्यालयात रेशन कार्डचे महत्त्व आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीने पिवळ्या व केशरी रेशनकार्ड कार्ड सोबत सफेद रेशनकार्डला ही आता शासकीय आरोग्य सेवेचा फायदा होणार आहे अशी घोषणा केली आहे. त्यानुसार सर्वांना या एक दिवसीय शिबिरातून नवीन रेशनकार्ड नोंदणी,नाव वाढवणे कमी करणे, रेशन दुकान व रेशनकार्ड वर पत्ता बदल, बायोमेट्रिक अशी विविध सुविधा  स्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी परिसरातील सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान  स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष- बजरंग तांगडकर, स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख  शिल्पा तांगडकर, व ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते व मार्गदर्शक शांताराम तांगडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

वीर वाजेकर महाविद्यालय आणि केमिशिया फार्मास्युटिकल तळोजा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण अभियान !!

वीर वाजेकर महाविद्यालय आणि केमिशिया फार्मास्युटिकल तळोजा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण अभियान !!

उरण, दि २८,'(विठ्ठल ममताबादे) :
पर्यावरण संवर्धन व शाश्वत हरित उपक्रमांच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, फुंडे यांनी  केमिशिया फार्मास्युटिकल, तळोजा यांच्या सहकार्याने  वृक्षारोपण मोहीम राबवली. ही मोहीम प्राणीशास्त्र आणि रसायनशास्त्र विभाग यांच्यामार्फत समझोता करार (एमओयू ) अंतर्गत राबविण्यात आली.

या अभियानात सुमारे १३५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. मधुमालती, करंज, काजू, अर्जुन, बदाम, बहावा, फणस, तामण, वड, आणि जांम यांसारख्या लोकोपयोगी व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. हे सर्व रोपे केमिशिया फार्मास्युटिकल, तळोजा यांनी सीएसआर उपक्रमांतर्गत भेट केली होती. वृक्षारोपण स्थळांमध्ये तु. ह. वाजेकर विद्यालय (फुंडे), टाकीगाव, बापदेव मंदिराजवळील वनक्षेत्र आणि इतर नैसर्गिक परिसरांचा समावेश होता. ह्या साठी केमिशिया फार्मास्युटिकलचे संचालक दीपक पवार आणि संतोष शिंदे उपस्थितीत होते. तसेच वीर वाजेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन करताना वनसंवर्धन, जैवविविधतेचे रक्षण आणि तरुणांनी पर्यावरणासाठी जबाबदारीने काम करणे यावर भर दिला.तु. ह.वाजेकर विद्यालयाचे प्राचार्य बी बी साळुंखे, थोरात मॅडम, बाबर मॅडम, पाटील सर, सदानंद म्हात्रे, डॉ. अनिल पळवे (प्रमुख, रसायनशास्त्र विभाग) डॉ. राहुल पाटील, डॉ. जी. सी. वधवा, राम गोसावी (एन एस एस अधिकारी) व  डॉ. राजकुमार कांबळे (एन सी सी अधिकारी), एन एस एस स्वयंसेवक व एनसीसी कॅडेट्स, डॉ. संदीप घोडके, गजानन चव्हाण, फॉन सामाजिक संस्थेचे निकेतन ठाकूर, केमिशिया फार्मास्युटिकलचे सुमारे १५ कर्मचारी व महाविद्यालयातील  शिक्षकेतर कर्मचारी पंढरीनाथ घरत, आंबवकर, सौरव सकपाळ या उपक्रमात सक्रीय सहभागी झाले.

करंजा रेवस रेड्डी महामार्ग काम बंद यावर जनता ठाम !

करंजा रेवस रेड्डी महामार्ग काम बंद यावर जनता ठाम !

** अगोदर नुकसान भरपाई नंतरच काम सुरु करण्याची ग्रामपंचायतची व ग्रामस्थांची मागणी.

उरण, दि २८, (विठ्ठल ममताबादे) :
दिनांक २८ जून २०२५ रोजी चाणजे ग्राम पंचायत कार्यालय करंजा, ता.उरण येथे प्रशासनाचे अधिकारी, करंजा गावांतील सात पाडे व ग्रामपंचायत हद्दीतील बाधित शेतकरी व मच्छीमार यांची बैठक संपन्न झाली. करंजा रेवस रेड्डी महामार्गावरील पुलाचे सुरू केलेले काम ग्रामस्थ व महिलां यांनी बंद पाडले आहे. ते काम सुरू होण्याचे दृष्टिकोनातून तहसीलदार, वरिष्ठ पोलीस अधिकारी जितेंद्र मिसाळ, MSRDS चे कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध बोराडे तसेच चिफ इंजिनिअर यांचे उपस्थितीत त्यांचे आग्रहास्तव सरपंच अजय म्हात्रे यांनी मिटिंग बोलावली होती. सदर वेळी उपसरपंच श्रीमती कल्पना पाटील, माजी सभापती ऍड.सागर कडू, माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम नाखवा, ऍड वेदांत नाखवा, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते. सरपंचासह सर्वजण अगोदर नुकसान भरपाई नंतरच काम सुरू यावर ठाम राहिले. 

कोणत्याही परिस्थितीत नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि नंतरच काम सुरु करा अशी भूमिका बैठकीत ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी घेतली. मात्र या बैठकीत सुद्धा कोणताही सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही. शासनाच्या वतीने उपस्थित असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने मागण्या मान्य न केल्याने ग्रामस्थ, मच्छिमार बांधव नाराज झाले. ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.त्यामुळे तहसीलदार उद्धव कदम, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मिटींग आटोपती घेतली. शेवटी सरपंचानी आवाहन केले की आपली अशीच एकजूट कायम ठेऊन अन्याया विरोधात लढा आणखी तिव्र करुन आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढत राहू. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही हा लढा असाच सुरु राहिल अशी आक्रमक भूमिका सरपंच यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी घेतली.

कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !!

कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !!

उरण, दि २८, (विठ्ठल ममताबादे) : सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी विविध शाळांना, शैक्षणिक संस्थांना, महाविद्यालयांना मोठया प्रमाणात शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधिलकी जपत कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील इयत्ता ५ वी ते १० वी त शिकत असलेल्या प्राथमिक शाळेत तसेच ११ वी व १२वीत शिकणाऱ्या फुंडे महाविद्यालयात एकूण ३००० हुन अधिक वह्यांचे वाटप करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर फुंडे प्राथमिक शाळेच्या सभागृहात वह्या वाटपचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, सरपंच कुणाल अरुण पाटील, शिवसेना नेते कमळाकर पाटील, फुंडे हायस्कुल चेअरमन कृष्णाजी कडू, फुंडे, हायस्कुलचे प्राचार्य साळुंखे बी. बी, शिक्षक प्रविण, उपशाखाप्रमुख महेश पाटील, विनय पाटील, हृषिकेश म्हात्रे, अमित पाटील, जॊतॆश तांडेल, रोशन म्हात्रे, सुरेंद्र पाटील, प्रथम तांडेल, प्रणय पाटील यांच्यासह शाळेच्या पर्यवेक्षिका बाबर एस. एम, पाटील, एस. एस, शिक्षक पाटील, एच. एन, शिक्षक पाटील, डी. डी,शिक्षक म्हात्रे, ए. आर, उपशिक्षिका पाटील, एस. व्ही तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एच एन पाटील यांनी केले तर प्रस्तावना साळुंके बी बी यांनी केले. प्रस्तावनेत प्राचार्य साळुंके यांनी कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा पुरेपूर वापर करून चांगले शिक्षण घेऊन प्रगती करण्याचा सल्ला दिला. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी पूर्वीचे शिक्षण कशा पद्धतीचे होते शिक्षण व्यवस्था कशी होती हे सांगितले. हे सांगत असतानाच कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था ही दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करते. गोर गरीब मुलांना आधार देते. गोर गरीब मुलांचे शिक्षण कुठेही अडू नये. विद्यार्थ्यांनी चांगली प्रगती करावी हा दृष्टीकोण ठेऊन शैक्षणिक साहित्य वाटपचा हा कार्यक्रम खूपच स्तुत्य आहे. अशा शब्दात त्यांनी सरपंच कुणाल पाटील व संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.जर हुशार व गुणवंत विद्यार्थी असेल व त्याची घरची परिस्थिती खराब असेल तर त्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी येऊन मला भेटावे त्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च मी स्वतः करेन. असेही आश्वासन माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उपस्थितांना दिले. शेवटी कार्यक्रमाचे आभार मानून सांगता झाली. शैक्षणिक साहित्य वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

शिवसेनेचा ठोस इशारा — विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती चालणार नाही; आता सर्व मराठी माणसांनी एकत्र येण्याची वेळ आली !!

शिवसेनेचा ठोस इशारा — विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती चालणार नाही; आता सर्व मराठी माणसांनी एकत्र येण्याची वेळ आली !!

उरण, दि २८, (विठ्ठल ममताबादे) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उरण तालुक्यात ठोस भूमिका घेतली आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका संघटक ओमकार विजय घरत व  उरण शहर संघटक  संदीप जाधव  यांच्या पुढाकारातून तालुक्यातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांना अधिकृत निवेदन देऊन इशारा देण्यात आला की, “जर विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती केली गेली, तर शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागेल.”

शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, शाळांनी विद्यार्थ्यांवर कोणतीही भाषा सक्तीने लादू नये. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या मातृभाषा, प्रादेशिक भाषा किंवा अन्य भाषांमध्ये तिसरी भाषा निवडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. हिंदी लादण्याचा कोणताही प्रयत्न घटनाविरोधी असून, अशा प्रयत्नांचा शिवसेना ठोस विरोध करेल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

ओमकार घरत यांनी म्हटले की, “आज आम्ही निवेदन सादर केले आहे. पण जर प्रशासनाने योग्य पावले उचलली नाहीत, तर उरणमध्ये तीव्र आंदोलन छेडले जाईल. हा लढा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या स्वातंत्र्यासाठी आहे. आता वेळ आली आहे — सर्व शिवसैनिकांनी एकत्र यावं, पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा उंच फडकवायचा आहे!”

हे निवेदन मा.खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले असून, त्यांच्या स्पष्ट सूचनेनुसार जिल्हास्तरावर शिवसेनेने तात्काळ पावले उचलली आहेत.

या निवेदनास शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे. मनोहरशेठ भोईर – माजी आमदार व जिल्हा प्रमुख रायगड, शशिकांत डोंगरे – जिल्हा संघटक शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, सुनील पाटील – उपजिल्हा प्रमुख शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, नरेश राहाळकर – उपजिल्हा प्रमुख रायगड, संतोष ठाकूर – तालुका प्रमुख उरण, दीपक भोईर– तालुका संपर्कप्रमुख उरण, गणेश शिंदे – माजी नगराध्यक्ष व गणनेते उरण विधानसभा हे सर्व पदाधिकारी  या लढ्यात सहभागी आहेत. त्यांचा पाठिंबा सुद्धा आहे.त्यांच्या बरोबर संदीप जाधव – उरण शहर प्रमुख शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, ओमकार विजय घरत तालुका संघटक, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष हे पदाधिकारी सुद्धा या लढायात सहभागी झाले आहेत. या सर्व घडामोडींवर समाजात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असून, शिवसेनेच्या या ठोस पावलांना लोकसमर्थन वाढत आहे. शाळा प्रशासन व शैक्षणिक अधिकारी यांनी योग्य ती कारवाई न केल्यास, शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि संघर्ष अटळ राहील असा निर्धार शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

सरकारी माती चोरी उघडकीस आणणाऱ्या पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी; फेसबुक लाईव्हवर थेट इशारा !!

सरकारी माती चोरी उघडकीस आणणाऱ्या पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी; फेसबुक लाईव्हवर थेट इशारा !!

टिटवाळा, वार्ताहर :
मांडा टिटवाळा वासुन्द्री रोड या होत असलेल्या रस्त्याच्या कामातील  सरकारी माती चोरी प्रकरण बातमीच्या माध्यमातून उघडकीस आणणाऱ्या स्थानिक पत्रकाराला खुलेआम जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. येथील स्थानिक पत्रकार अजय शेलार या पत्रकाराने काही दिवसांपूर्वी सरकारी मालमत्तेच्या गैरव्यवहारावर आधारित एक गंभीर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर, या प्रकरणाची चौकशी प्रशासन स्तरावर सुरु झाली. मात्र, याचा राग मनात धरून संबंधित माफियांनी सोशल मीडियावरून पत्रकाराविरुद्ध आक्षेपार्ह आणि धमकीजनक वक्तव्य केल्याचे निदर्शनास आले आहे.

२७ जून २०२५ रोजी संध्याकाळी ७:५७ वाजता, संदीप नाईक नामक इसमाने फेसबुक लाईव्हवर येत पत्रकाराचे नाव घेऊन थेट धमकी दिली. “पुन्हा बातमी केलीस तर बघून घेईन,” असा थेट इशारा करत, जर पुढे पुन्हा काही प्रसिद्ध झालं, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा स्वरूपाचे वक्तव्य करण्यात आले.

या प्रकरणामुळे पत्रकाराच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, सामाजिक माध्यमांवर त्यांची बदनामी करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. संबंधित पत्रकाराने आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, संदीप नाईक व त्याचे इतर तीन साथीदार हे स्थानिक माफियांच्या सांगण्यावरून कारवाई करत आहेत.

या घटनेनंतर, पत्रकाराने कल्याण तालुका पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करत पत्रकार संरक्षण कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, या धमक्यांमागे कोणते प्रभावशाली माती माफिया आहेत, याचा तपास करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
तक्रारीची प्रत गृह राज्यमंत्री, ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडेही पाठवण्यात आली आहे. हे प्रकरण केवळ एका पत्रकाराच्या सुरक्षेचे नसून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर होत असलेला हल्ला आहे. पत्रकार संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Friday, 27 June 2025

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे च्या दणक्याने जे एम बक्षी पोर्ट नमले - गुजरातला काढलेली जाहिरात रद्द !!

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे च्या दणक्याने जे एम बक्षी पोर्ट नमले - गुजरातला काढलेली जाहिरात रद्द !!

*** नोकर भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य देण्याचे लेखी स्वरूपात आश्वसन. 

उरण, दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील जेएनपीटी पोर्ट मधील न्हावाशेवा फ्रीपोर्ट  टर्मिनल (NSFT) जे एम बक्षी & सी एम ए टर्मिनल्स या पोर्टने इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. ती जाहिरात रद्द करून यापुढे स्थानिक वुत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करुन पोर्ट मध्ये होणाऱ्या नोकर भरती प्रक्रियेत मराठी तरुणांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आश्वासन जेएनपीए बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी दिले आहे. त्यामुळे हा विजय हा मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या विचारांचा विजय असणार आहे. असे प्रतिपादन मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केले. 

जेएनपीटी पोर्ट मधील न्हावाशेवा फ्रीपोर्ट  टर्मिनल (NSFT) जे एम बक्षी & सी एम ए टर्मिनल्स या पोर्टने दहा दिवसापूर्वी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून मुलाखती( इंटरव्यू ) ह्या गुजरात राज्यातील मुद्रा या ठिकाणी घेऊन संबंधित व्यवस्थापनाने कामाचा पत्ता हा  जेएनपीटी उरण नवी मुंबई म्हणून प्रसिद्ध केले होते. एकंदरीत व्यवसाय महाराष्ट्र मध्ये करायचा आणि नोकर भरती मुलाखती या गुजरात राज्यात घ्यायच्या यासंदर्भात कोणीच आवाज उठवित नसल्याने स्थानिकांच्या अस्तित्वासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर व उरण तालुका अध्यक्ष अँड सत्यवान भगत यांनी आवाज उठविण्याचा निर्णय घेतला असता या नोकर भरती प्रक्रियेची दखल मनसेचे नेते राज ठाकरे यांनी घेऊन प्रसारमाध्यमांतून आवाज उठविला. यांची दखल जेएनपीए बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी घेऊन शुक्रवारी( दि २७) बंदर प्रशासनाच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मनसेचे नेते अविनाश जाधव, मनसेचे सरचिटणीस संजय नाईक, मनसेचे सरचिटणीस संदिप दळवी यांनी मराठी माणसावर पोर्ट टर्मिनल कशा प्रकारे अन्याय करत आहे. ही बाब बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांच्या निदर्शनास आणून दिली. 

यावेळी जेएनपीटी पोर्ट मधील न्हावाशेवा फ्रीपोर्ट टर्मिनल (NSFT) जे एम बक्षी & सी एम ए टर्मिनल्स या पोर्टने इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये नोकर भरतीची जी जाहिरात प्रसिद्ध केली होती ती जाहिरात रद्द करून यापुढे स्थानिक वुत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करुन पोर्ट मध्ये होणाऱ्या नोकर भरती प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्र व मराठी तरुणांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आश्वासन जेएनपीए बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी मनसेच्या शिष्टमंडळाना दिले. यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव, मनसेचे सरचिटणीस संजय नाईक, मनसेचे सरचिटणीस संदिप दळवी यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या वतीने बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांचे आभार व्यक्त केले. तसेच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मनसे यापुढे ही आवाज उठविणार असल्याचे सांगितले. 

याप्रसंगी जे एम बक्षी & सी एम ए टर्मिनल्स या पोर्टचे व्यवस्थापन अधिकारी अनिरुद्ध लेले, बीएमसीटी पोर्ट चे व्यवसायिक अधिकारी मनोज गावंड, जेएनपीए बंदराच्या अधिकारी मनिषा जाधव, जेएनपीए बंदराचे ट्रस्टी दिनेश पाटील, जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, तालुका अध्यक्ष अँड सत्यवान भगत, महिला जिल्हाध्यक्षा आदिती सोनार, प्रविण दळवी, मनसे प्रवक्ते योगेश चिले, उपजिल्हा अध्यक्ष दिपक कांबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहूल आणि न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बापू तुळशीराम ओवे, तालुका सचिव अल्पेश कडू, राकेश भोईर, द्रोणागिरी शहराध्यक्ष रितेश पाटील, कविता म्हात्रे महिला तालुकाध्यक्ष, उरण शहर महिला अध्यक्ष सुप्रिया सरफरे, उपतालुका अध्यक्ष दीपक पाटील, विभागीय अध्यक्ष बबन ठाकूर, जनहित पक्षाच्या मालती म्हात्रे, शेवा शाखाध्यक्ष भालचंद्र म्हात्रे आदिंसह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मनसे मुळे मराठी तरुणांना यामुळे न्याय मिळणार असल्याने तमाम जनतेने मनसेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !             कल्याण डों...