Monday, 30 September 2024

*"वारी चुको ने दि हरि तपपूर्ती" भव्य नामयज्ञ सोहळा संपन्न !!

*"वारी चुको ने दि हरि तपपूर्ती" भव्य नामयज्ञ सोहळा संपन्न !!

नालासोपारा नगरी अवघी झाली भक्तीमय.....

मुंबई  - ( दिपक कारकर ) :

महाराष्ट्राला फार मोठी संत  परंपरा लाभली असून ती अखंडितपणे प्रवाहित आहे, "विठोबाचा धर्म जागो! त्याचे चरणी लक्ष लागो!" अशा संत परंपरेतील "वारी चुको ने दी हरि" या मंडळाचे वारीचे तप पुर्ण झाल्या निमित्ताने दि.२८ व २९ सप्टेंबर २०२४ रोजी नालासोपारा येथे दोन दिवसीय नामयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळी गणेश पुजन, विठ्ठल रुक्मिणी, जगद्गुरु तुकाराम महाराज व माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचे प्रतिमा पुजन, कलश स्थापना, विणा पुजन व दिपप्रज्वलन, करून अखंड नामयज्ञाला सुरूवात करण्यात आली, तद्नंतर सोहळ्याचे व्यासपीठ चालक ह.भ.प. योगेश बेर्डे यांनी पंचपदी केली त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे पारायण झाले. त्याचबरोबर पांडुरंग हरि भजन मंडळ यांचे श्रीमद् नारायण असे नामस्मरण, ह. भ. प.राजेंद्र महाराज तावडे यांचे प्रवचन सेवा संपन्न झाली. तदनंतर भव्य दिव्य असा हरिपाठ व सायंकाळी ह. भ. प. श्री मनोहर महाराज लांडे यांचे कीर्तन संपन्न झाले, दुसऱ्या दिवशी रविवार दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९:३० ते १२ वाजेपर्यंत वारकरी रत्न ह.भ.प. शंकर मोरे नाना यांचे काल्याचे कीर्तन झाले, या दोन्ही कीर्तन साथीला श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय अचोळे, ह.भ.प. गायनाचार्य गोपाळ कुटे, सदानंद गायकवाड राजेंद्र महाराज तावडे, यदू बुवा, योगेश बेर्डे अरूण राणे अनंत शेणॉय तसेच मृदुंगमणी ह.भ.प. नितीन भंडारी, व ह.भ.प. संदीप जाधव यांनी साथ केली.

सदर सोहळ्यास श्री संत सेवा भजन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी शिवाजी पाटील, श्री विनोद चव्हाण,जयराम पवार माऊली जनार्दन धयाळकर, ह.भ.प.शंकर माळी, जनार्दन शिंदे, प्रनव लांबाडे, चंद्रकांत गुरव, शिवाजी भानत, सुधाकर बाईत आदी  मान्यवर उपस्थित होते. हरीजागर- ह.भ.प. नितेश अंबेकर, प्रतिक माऊली व ईतर मंडळी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होती. ह्या भव्य दिव्य अशा सोहळ्याला राजकीय नेते मंडळी, स्वराज्य अभियान संस्थापक अध्यक्ष धनंजय गावडे, नगरसेवक निलेश देशमुख व इतर  मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले. या संपूर्ण सोहळ्याची धुरा अनंत शेणॉय, ह.भ.प.योगेश बेर्डे माऊली, अरूण राणे माऊली, आकाश भनगे, अरविंद मोरे, राहुल जाधव, श्रीकांत वेदक, व संपूर्ण "वारी चुको ने दी हरी" समुह मधील सर्वांचे मोलाचे योगदान लाभले. ह्या स्तुत्य अशा नियोजनबद्ध भक्तिमय सोहळ्याचे अनेक स्तरातुन कौतुक होत आहे.

दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन !!

दुःखद निधन बातमी 
-----------------------------


दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
               समाजातील दुर्बल, दुर्लक्षित आणि समाजाच्या प्रबोधनासाठी लेखणी चालविणारे सर्वांचे जवळचे मित्र ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक (मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईचे मा. कोषाध्यक्ष), ज्येष्ठ पत्रकार (महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी) नितीन शांताराम चव्हाण (वय ५३ वर्षे) यांची आज मंगळवार दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी, पहाटे ०३:३० वा. प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज (१ ऑक्टोबर रोजी) दुपारी १ वाजेपर्यंत रुग्णालयातून घरी आणण्यात येणार आहे. ( सध्या त्यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालयात ठेवले आहे.) त्यानंतर विक्रोळी (पूर्व) टागोरनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
           नितीन चव्हाण दीर्घ आजारातून बरे व्हावेत यासाठी आपण सर्व पत्रकारांनी, दानशूर व्यक्ती, महापालिकेचे काही अधिकारी वर्ग, मित्र परिवार आदींनी आपल्याकडून शक्य होईल त्या सर्व प्रकारे प्रयत्न केले. मात्र ते प्रयत्न नियतीसमोर अपुरे पडले. अनेकांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करून दुःख व्यक्त केले.

शिवसेना ( उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा आणि सामाजिक कार्यकर्ते संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर राज्यस्तरीय समाजभूष पुरस्कार -२०२४, आदर्श संस्था पुरस्कारने सन्मानित !!

शिवसेना ( उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा आणि सामाजिक कार्यकर्ते संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर राज्यस्तरीय समाजभूष पुरस्कार -२०२४, आदर्श संस्था पुरस्कारने सन्मानित !!

  मुंबई (शांताराम गुडेकर) :
                  
            आर्दश रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त यांच्या वतीने अंबरनाथ येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथील वीर बाजीप्रभू देशपांडे रोड येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती मंडळ, संस्था यांच्यासाठी राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सन्मान सोहळा -२०२४ थाटामाटात संपन्न झाला. हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संस्थापक आदर्श रायगड संपादक रमेश सणस, कार्यकारणी सदस्य शैलेश सणस आणि पदाधिकारी यांनी आयोजित केला होता. यावेळी सामाजिक शैक्षणिक, पर्यावरण, वैद्यकीय कार्यात अग्रेसर असलेल्या मुंबई मधील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा आणि सामाजिक कार्यात मदतीचा हात देणारे संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर व त्यांच्या सहकाऱ्यांना प्रमुख पाहुणे  रवींद्र मालुसरे (अध्यक्ष मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई), उमेश गुंजाळ (नगरसेवक शिवसेना उपजिल्हाप्रमुख जळगाव), कृष्णा कदम शिवसेना पोलादपूर तालुका सहसंपर्कप्रमुख, तुळशीराम चौधरी ( नगरसेवक), गुरुवर्ये उमेश महाराज शेंडगे, आदी मान्यवर उपस्थितीत सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. उत्कृष्ट संस्था पुरस्कार-२०२४ हा पुरस्कार मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर, कमेटी मेंबर सचिव संदीप चादीवडे, संचालक दौलत बेल्हेकर, कार्यालय प्रमुख वसंत घडशी, किशोर भिलारे, राजेंद्र पेडणेकर, निर्मला आवटे, स्वरा पवार, आदी मान्यवर यांनी स्वीकारला. यशवंत खोपकर आणि त्यांची संस्था यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर आणि पदाधिकारी यांना अनेकांकडून अभिनंदनसह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन !

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन !

पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, प्रतिनिधी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनप्रणालीद्वारे पुणे मेट्रोच्या टप्पा १ अंतर्गत जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ तर टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते भिडेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा स्मारकाचे भूमिपूजन, सोलापूर विमानतळाचे उद्घाटन, बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला अर्पण करण्यात आले. या अनुषंगाने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

पुण्याचा चहूबाजूनी विस्तार होत असताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, उद्योग, शैक्षणिक संस्थेचे जाळे वाढत आहेत. याचा वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असून प्रदूषणातही वाढ होत आहे, त्यामुळे पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी असून याकरीता मेट्रोसारखे प्रकल्प महत्वाचे आहेत, आगामी काळात मेट्रोचे जाळे वाढविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. 

या कार्यक्रमास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन दूरदृष्यप्रणालीद्वारे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, आश्विनी जगताप, आदी मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित होते. 

उद्योग आणि पायाभूत सुविधेत महाराष्ट्र देशात अग्रेसर
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्याच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने केंद्र शासनाच्या मदतीने विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. आज राज्यात विविध उद्योग येत असून उद्योगाला चालना देण्याकरीता राज्य शासन सहकार्य करीत आहेत. राज्यात ५२ टक्के परदेशी गुंतवणूक झाली आहे, विविध क्षेत्रातील उद्योजक राज्याकडे आकर्षित होऊन उद्योगाला चालना देत आहेत. आपले राज्य उद्योगस्नेही झाले असून उद्योग आणि पायाभूत सुविधेत देशात महाराष्ट्र अग्रेसर झाले आहे. 

पुरंदर विमानतळाकरीता भूसंपादनाची कार्यवाही करा
पुरंदर विमानतळाकरीता लवकरात लवकर जागा अधिग्रहित करुन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा. याबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरीता केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय आणि उद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करावे, आगामी काळात पुरंदर विमानतळाचे काम सुरु करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथील स्मारकाकरीता राज्य शासनाने पुढाकार घेतला असून याठिकाणी ऐतिहासिक स्मारक होत आहे, असेही श्री. शिंदे म्हणाले.

सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी लोककल्याणकारी योजनांची अमंलबजावणी

राज्य शासनाच्यावतीने सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आदी लोककल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या असून त्याचा नागरिकांना लाभ देण्यात येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत १ कोटी ९० लाख महिलांना लाभ देण्यात आला आहे, याकरीता वर्षभरासाठी निधीची व्यवस्था करण्यात आली आहे.  मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्यातून पहिली रेल्वे कोल्हापूर येथून आयोध्याकरीता सोडण्यात आली असून आगामी काळात राज्यासह पुण्यातून याकरीता प्रयत्न करावेत. यापुढेही विकासाचा आणि कल्याणकारी योजनांचा वेगवान व गतिमान कार्यक्रम असाच सुरु राहील, अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली. 

पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता मेट्रोच्या कामाला गती- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रोच्या कामाला सन २०१४ पासून गती मिळाली असून यासाठी महामेट्रो ही कंपनी स्थापन करुन हे काम अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आले. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा देशातील सर्वाधिक वेगाने काम पूर्ण होणारा टप्पा म्हणून ओळखला जातो. शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान टाटा कंपनीच्या मदतीने मेट्रोचे काम करण्यात येत असून ही देशातील पहिली सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील मेट्रो आहे. स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानक ‘मल्टिमॉडेल स्थानक म्हणून विकसित करण्यात येत असून अशाप्रकारचे देशातील पहिले स्थानक असणार आहे. आगामी काळात मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील विविध भागात मेट्रोने प्रवास करता येईल, असे नियोजन केले आहे, असेही ते म्हणाले.

पुणे ही समाजसुधारकांची भूमी असून येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आठवण करुन देणारे स्मारक होणे अंत्यत महत्त्वाची गोष्ट आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांच्या पाठिंब्याने भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करुन महिलांना शिक्षणाची दारे खुली करुन दिली. शिक्षणाचा आणि समाजसुधारणेचा मिळालेल्या वारसाची आठवण करुन देणारे सुंदर असे स्मारकाचे काम सुरु होत असून ते आगामी ५०० वर्ष आपल्या प्रेरणा देत राहील, श्री. फडणवीस म्हणाले. 

पुणे हे राज्याचे आर्थिक मॅग्नेट

पुणे ही सांस्कृतिक, तंत्रज्ञानाची राजधानी आहेच त्याचबरोबर पुणे हे आर्थिक 'मॅग्नेट' आहे. पुणे शहर व परिसरात सुमारे १ लाख कोटी रुपयांची कामे करीत आहोत. राज्याचे मॅन्युफॅक्चरिंग इंजिन हे पुणे जिल्हा असून दुसरे आता छत्रपती संभाजीनगर होत आहे. राज्यात विविध प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही श्री. फडणवीस म्हणाले. 

स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानकाचे काम पुणेकरांच्या नावाला साजेसे-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पुणेकरांच्या नावाला साजेसे असे स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानकाचे काम झालेले आहे. आज जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान मेट्रोच्या भूमिगत रेल्वेचे लोकार्पण होत असून स्वारगेट ते कात्रज दरम्यान मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन होत आहे. पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याकरीता मेट्रोचे विविध टप्पे पूर्ण करण्यात येत आहेत. शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान टाटा कंपनीच्या मदतीने काम करण्यात येत आहे. पुण्यात विविध सार्वजनिक विकासाची कामे सुरु असताना पुणेकरांना त्रास होत आहे, ही गोष्ट मान्य करतो. परंतु, आगामी ५० ते १०० वर्षाचा विकास या माध्यमातून होणार आहे. 

भिडेवाडा येथील या ऐतिहासिक स्मारकाकरीता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन राज्य शासनाने जागा ताब्यात घेतली आहे. जागेच्या भूसंपादनाकरीता अंदाजे २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याठिकाणच्या भूसंपादनामुळे बाधितांना योग्य तो मोबदला देण्याकरीता राज्य शासनातर्फे पुढाकार घेण्यात येईल. भिडेवाडा स्मारकाकरीता १० कोटी रुपयांची तरतूद पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. भिडेवाडा येथील स्मारकाचे काम उत्तम व दर्जेदार होईल, अशी ग्वाही श्री. पवार यांनी यावेळी दिली.

श्री. मोहोळ म्हणाले, केंद्र शासनाच्यामदतीने पुणे शहराला मेट्रो, आयुर्वेदिक महाविद्यालय, नवीन विमानतळाचे टर्मिनल, स्मार्ट सिटी, चांदणी चौकातील पूल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई-बस, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी वंदेभारत एक्सप्रेस, पुण्यात ३३ किमी मेट्रोचे मार्ग पूर्ण झाले आहेत. महिला सक्षमीकरणाकरीता बेटी-बचाव, बेटी पढाव, लखपती दीदी अशा योजना राबविण्यात येत असल्यामुळे त्या आत्मनिर्भर होत आहेत, असेही श्री. मोहोळ म्हणाले.   

प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते भिडेवाडा येथील स्मारकाचे भूमिपूजन होत असल्याचा आनंद- मंत्री छगन भुजबळ

मंत्री श्री. छगन भुजबळ म्हणाले, क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य तसेच भिडेवाडा स्मारक येथील नूतन इमारतीच्या आराखड्याबाबत माहिती देऊन मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी विविध शिक्षण, आरोग्य अशा सामाजिक सुधारणा केल्या.  भिडेवाडा येथील स्मारकाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत असल्याचा आंनद आहे, असही श्री. भूजबळ म्हणाले.  

मंत्री श्री. चंद्रकांत पाटील प्रास्ताविकात म्हणाले,  पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावर कसबा पेठ, मंडई, स्वारगेट असे रहदारीचे भाग जोडल्याने  पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासोबत व्यापारालाही चालना मिळणार आहे. स्वारगेट येथून शहरातील विविध भागात जाणे शक्य होणार आहे. भिडेवाडा येथील स्मारक हा आपल्या श्रद्धेचा विषय मार्गी लागला आहे, असेही श्री. पाटील म्हणाले. 

यावेळी  विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र चेंबर ऑफ हैसिंग इंडस्ट्रीज कल्याण डोंबिवली युनिटची १४वी वार्षिक सर्वसाधरण सभा संपन्न !!

महाराष्ट्र चेंबर ऑफ हैसिंग इंडस्ट्रीज कल्याण डोंबिवली युनिटची १४वी वार्षिक सर्वसाधरण सभा संपन्न !!

** कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ इंदुमती जाखर यांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती 

कल्याण, सचिन बुटाला : महाराष्ट्र चेंबर ऑफ हैसिंग इंडस्ट्रीज कल्याण डोंबिवली युनिटची १४वी वार्षिक सर्वसाधरण सभा दि २७-०९-२०२४ रोजी पार पडली. यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त मा. डॉ इंदुमती जाखर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. 

या समारंभात एम.सी.एच. आय कल्याण डोंबिवली युनिट चे मावळते अध्यक्ष श्री. भरत छेडा (हॅप्पी होम) यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. राजेश गुप्ता (महावीर इन्फ्रास्ट्रक्चर) यांच्या हाती सूत्रे दिली. श्री. सुनिल चव्हाण (हाऊस ऑफ चव्हाण) यांची सचिव पदावर नियुक्ती केली. संयुक्त सचिव श्री. साकेत तिवारी (साकेत ग्रुप) आणि श्री. राहुल कदम (मैत्री ग्रुप) यांची खजिनदार म्हणून नियुक्ती केली गेली. मावळते अध्यक्ष श्री. भरत छेडा यांनी त्यांच्या कारकिर्दीतील कामाचा आढावा घेतला. शहर सौंदर्यकरण अंतर्गत कल्याण डोंबिवली शहरातील २५ रस्ते दुभाजक संस्थेचे सभासद १० ते १२ वर्ष पालिकेच्या देखरेखीखाली करीत आहे. पालिकेच्या सर्व उपक्रमाला एम.सी.एच. आय कल्याण डोंबिवली युनिट हातभार लावत आलेला आहे. 

माननीय. श्री. रवी पाटील यांनी संघटनेतील सर्व सभासदांना बांधकाम करताना पर्यावरणाच्या समतोल कसा राखावा. यावर मार्गदर्शन केले. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. राजेश गुप्ता यांनी अध्यक्षीय भाषणात बांधकाम व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्या सोडवण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे सांगून सभासदांनी निःसंकोचपणे आपल्या अडचणी सांगण्यात एम.सी.एच. आय युनिट त्या सोडवण्यास कटिबंध आहे असे आश्वासन दिले. अल्ट्राटेक कंपनीतर्फे इमारत बांधकाम साहित्याचे प्रदर्शन आणि माहितीचे प्रदर्शित करण्यात आली.

समारंभाची सांगता सहसचिव श्री. साकेत तिवारी यांनी सर्व सभासदांचे आणि उपस्थितांचे आभार मानून केले.

पर्यावरण, भु-गर्भ व भु-जल समिती स्थापन करून अहवाल मागवावा !

पर्यावरण, भु-गर्भ व भु-जल समिती स्थापन करून अहवाल मागवावा !

(विकासक प्रशांत शर्मा यांच्या बांधकाम प्रकरणी डॉ. माकणीकर यांची मागणी.)

मुंबई दि (प्रतिनिधी) : पवई पासपोली परिसरारात निसर्गरम्य वातावरणात शेकडोची वृक्षतोड करून निसर्गाचा ऱ्हास करू पाहणाऱ्या विकासक प्रशांत शर्मा यांचे शासनाला गाफिल ठेवून होत असलेले बांधकाम बंद करावे व पून्हा त्याच तोडलेल्या वृक्षाची नवीन झाडे लावून लागवड करावी. अशी मागणी विद्रोही पत्रकार समाजभूषण पॅन्थर डॉ राजन माकणीकर यांनी केली आहे.

देशव्यापी संविधान जनजागृती व साक्षरता अभियानचे राष्ट्रीय आयोजक पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी विविध विभागाला दिलेल्या तक्रारी अर्जात असे म्हटले आहे की, पासपोली गाव पवई येथील विहार सरोवर शेजारील परिसरात प्रशांत शर्मा यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून वृक्ष तोड केली असून वृक्ष तोड करण्याची परवानगी दिलेल्या अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करून प्रशांत शर्मा यांच्या अर्जाची पुनर् तपासणी होऊन कोणत्या बेसवर वृक्षतोडीची परवानगी देण्यात आली याची चौकशी करण्यात यावी.

विहार सरोवर परिसरात खोदकाम केल्याने भू-गर्भ पातळी व भु - जल साठा धोक्यात येण्याची संभावना असून या ठिकाणी बांधकाम किंवा खोदकाम करण्याची परवानगी प्रशांत शर्मा यांना मिळतेच कशी? सदर परिसराची पाहणी व भुजल भु गर्भाचे सर्वेक्षण होणे महत्वाचे असतांना ज्या अधिकाऱ्याने परवानगी दिली त्याही अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे. 

खोदकाम केल्यानंतर _
परिसरातील माती व दगड गोटे कोणत्या जागी जमा करण्याची, वाहण्याची परवानगी तसेच किती मालवाहू गाड्या ने आन करण्याची परवानगी दिली आहे. हजारो च्या संख्येने हजारो टन माती या प्रशांत शर्माने विकली असून प्रशासनाची रॉयल्टी सुद्धा चोरली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास व्हावा. 

असेही कळते की, स्थानिक शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाचा प्रशांत शर्मा यांना सपोर्ट असून पालिका व अन्य संबंधित प्रशासनाला आर्थिक योगदान करून प्रकरण दाबू पाहण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. मा. मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांचा या प्रकरणात प्रामुख्याने सहभाग असून जे कोणी स्वीय सहायक अश्या प्रकरणी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून पर्यावरनाला घातक ठरत आहेत त्यांची तसेच त्यांच्याकडे शिफारस करणाऱ्या भ्रस्टाचारी नालायक राजकारण्याची सुद्धा वरिष्ठ स्थरावरून चौकशी होऊन कडक कारवाई व्हावी.

सदरील ठिकाणी बांधकाम होऊन निसर्गाचा समतोल तर ढासाळणार नाही ना? यासाठी पर्यावरन समिती द्वारे निरीक्षण व्हावे प्राथमिक अहवाल मागवावा भु-गर्भ व भु-जल समिती द्वारे त्यांची मार्गदर्शक सूचना घ्याव्यात. तसेच सुरु असलेले बांधकाम जोपर्यंत निवडलेल्या त्या-त्या समित्याचा अहवाल येत नाही तोपर्यंत तात्काळ बंद करण्यात यावे, शेकडो सजीव झाडांच्या कत्तली त्याऐवजी कुठे नवीन झाडांची लागवड व संगोपन होत आहे याची माहिती घ्यावे कसुरवार अधिकारी, राजकारणी तसेच विकासक प्रशांत शर्मा यांचेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन तर करूच प्रसंगी मा. न्यायालयाचा दरवाजा थोठावू अशी भीमप्रतिज्ञा डॉ. माकणीकर यांनी घेतली असल्याचे प्रसिद्धी माध्यमान्ना सांगितले आहे.

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४२१ निरंकारी भक्तांचे रक्तदान !!

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४२१ निरंकारी भक्तांचे रक्तदान !!

धायरी येथे २५१ आणि हडपसर येथे १७० निरंकारी भक्तांनी केले रक्तदान - रक्तदान ही सर्वश्रेष्ठ मानवसेवा.

पुणे २९ सप्टेंबर २०२४ :
             सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पवित्र आशीर्वादाने रविवार, २९ सप्टेंबर २०२४ रोजी संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिरांचे आयोजन शाखा धायरी व शाखा हडपसर, झोन पुणे येथे करण्यात आले होते. यामध्ये शाखा धायरी येथे  २५१ आणि शाखा हडपसर येथे १७० संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी निस्वार्थीपणे रक्तदान केले. रक्त संकलनासाठी संत निरंकारी रक्तपेढी मुंबई, वाय.सी.एम. हॉस्पिटल रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी  आणि ससून हॉस्पिटल रक्तपेढी यांनी आपले योगदान दिले.
या शिबिराचे उद्घाटन आदरणीय ताराचंद करमचंदानी जी (झोनल इन्चार्ज-पूना झोन) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले की, रक्ताला पर्याय नाही, रक्तदान हीच सर्वात मोठी मानव सेवा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी पुणे झोन मध्ये मिशनद्वारा दर महिन्याला तीन ते चार रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात, ज्यामध्ये अनेक रक्तदाते सहभागी होत असतात.

बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि 'रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे'. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे. 

संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे योगदान लाभले.

Sunday, 29 September 2024

वर्ल्ड वाईड (जागतिक मानवाधिकार) ह्यूमनराइट्स ए.एफ.या संघटनेतर्फे कु.जेष्ठा शशांक पवार चा सत्कार !

वर्ल्ड वाईड (जागतिक मानवाधिकार) ह्यूमनराइट्स ए.एफ.या संघटनेतर्फे  कु.जेष्ठा शशांक पवार चा सत्कार !

११ देशांच्या इंडोरन्स वर्ल्ड फेडरेशन इंटरनॅशनल चॅम्पियन्सशिप स्पर्धेत ३ सुवर्णपदकाची जेष्ठा ठरली मानकरी 
 

मुंबई (शांताराम गुडेकर) :

           वर्ल्ड वाईड (जागतिक मानवाधिकार) ह्यूमनराइट्स ए.एफ.या संघटनेच्यावतीने वर्ल्ड वाईड ह्यूमनराइट्स ए.एफ. चे संस्थापक/अध्यक्ष डॉ.अविनाश जी सकुंडे यांच्या आदेशानुसार शनिवार  दि.२९/९/२०२४ रोजी WHRAF चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेच्यावतीने लोवर परळ मुंबई येथील सामान्य कुटुंबातील कु. जेष्ठा शशांक पवार (वय ६ वर्ष) स्केटिंग या खेळात थायलंड येथे संपन्न झालेल्या ११ देशांच्या इंडोरन्स वर्ल्ड फेडरेशन इंटरनॅशनल चॅम्पियन्सशिप स्पर्धेत ३ सुवर्णपदक मिळवून तिने भारताकडून झालेली तिची निवड सार्थ ठरविली. स्केटिंग स्पर्धेच्या ०.२०, १.०, २.० मिनिट अशा तिन्ही प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करून भारताला ३ सुवर्णपदके मिळवून दिली व भारत देशाची शान राखली. त्याबद्दल संघटनेकडून तिचा शाल, पुष्पगुच्छ व खाऊचा डबा देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठाचे आई वडील श्री व सौ.शशांक पवार, WHRAF चे महाराष्ट्र सचिव सौ.ज्योती ताई भोसले, मुंबई महासचिव सौ.प्रमिला अडसूळ, मुंबई सचिव श्री.महेश आंब्रे, श्री. नंदकुमार बागवे, श्री.साई गोपाळ चील्का, अध्यक्ष मीरा भाईंदर श्री. स्टिव्हन कार्डोझा, मीरा भाईंदर युवासेनेचे श्री. मोरेश्वर कुंडले, हिंदुस्तान माथाडी कामगार सेनेचे मुंबई सचिव श्री. लितेश केरकर, श्री. प्रदीप अडसूळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Friday, 27 September 2024

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेमुळे महिलांना रोजगार निर्मितीस चालना मिळण्यासोबतच त्या स्वावलंबी, आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे. विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित, अनाथ युवती, अनुरक्षणगृह, बालगृहातील आजी, माजी प्रवेशित तसेच दारिद्रय रेषेखालील महिलांना लाभाकरीता प्राधान्य देण्यात येणार आहे. 

या योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना बँकेकडून ई-रिक्षा किंमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यशासन २० टक्के आर्थिक भार उचलणार असून लाभार्थी महिलांवर १० टक्के आर्थिक भार असणार आहे.  

या योजनेचा लाभ घेण्याकरीता २० ते ४० वयोगटातील ३ लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न नसलेल्या महिलांनी नारीशक्ती दूत ॲपवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. योजनेअंतर्गत करावयाचा अर्जाचा नमुना तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे.

Thursday, 26 September 2024

मोफत प्रशिक्षणातुन स्वराज अभियान संघटना ठरत आहे महिलांसाठी मोठा आधार.....

मोफत प्रशिक्षणातुन स्वराज अभियान संघटना ठरत आहे महिलांसाठी मोठा आधार.....

*मोफत शिवणकाम, ब्युटी पार्लर, मेहंदी, हॉटेल मॅनेजमेंट, बँकीग कोर्सेस प्रशिक्षणाचे शुभारंभ*

नालासोपारा, प्रतिनिधी :- समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षम असणे, अत्यंत महत्त्वाचे असते. शिक्षण, आरोग्य, कला व रोजगार अशा विविध माध्यमातून महिला सक्षमीकरण व महिला सबलीकरण व्हावे, या उध्दिष्ठाने स्वराज अभियान संघटनेचे अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या संयुक्त विद्यमाने नालासोपाऱ्यात युवती व महिलांसाठी मोफत शिवणकाम, ब्युटी पार्लर व मेहंदी, हॉटेल मॅनेजमेंट, बँकीग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. नालासोपारामधील होतकरू महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांनी केले.

महिला फक्त चुल, मुल,घर या चौकटीत न राहता तीच्या  कलागुणांना वाव  मिळावा. महिलांच्या हाताला काम मिळणे गरजेचे आहे त्यांना घरबसल्या चार पैसे कमावता यावे या हेतूने स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे  यांच्या वतिने 
युवती व महिलांसाठी मोफत शिवण (टेलरींग) प्रशिक्षण, मेहंदी प्रशिक्षण व ब्युटी पार्लर प्रशिक्षण हॉटेल मॅनेजमेंट बँकींग कोर्सचे उध्दघाटन पत्रकार भालचंद्र होलम यांच्या हस्ते करण्यात आले.

महिलांच्या कौटुंबिक आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी यातुन उपलब्ध होणार आहेत. महिनाभर प्रशिक्षण असणार आहे प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या महिला व युवतींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्वराज अभियान चा माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व सशक्त करून महिलांच्या एकत्रीकरणासाठी  स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे पुढाकार घेत आहेत.
स्वराज अभियान संघटनेच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचा घेतलेला संकल्प पुढे नेण्यासाठी सर्व महिलांना सहभागी होण्याचे आव्हान रूचिता नाईक यांच्या वतिने करण्यात आले. महिला शक्ती एकत्रित करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी पत्रकार भालचंद्र होलम, सदानंद सावंत, महिला तालुका संघटक अश्विनी चव्हाण, रोहन चव्हान, नरेंद्र अचरेकर, रूचिदा माने, वंदना ढगे, आशा सातपुते, प्रियंका धनगर, फरमान शेख, हबीब खान, अदनान डाबरे, रेश्मा शेख प्रशिक्षक हार्दी बुदियाल, मनिषा गोहिल, भरत गोहिल, अमित नाईक उपस्थित होते.

पोलीस दलाच्या कामगीरीचे सर्वस्तरावरुन कौतुक !

पोलीस दलाच्या कामगीरीचे सर्वस्तरावरुन कौतुक !

प्रतिनिधि : अंबरनाथ
खंडणीसाठी अपहरण केलेल्या एका नामांकित बिल्डर च्या 20 वर्षिय मुलाची सुखरूप सुटका करून आरोपीनां बेड्या ठोकणाऱ्या अंबरनाथ शहरातील पोलीस दलाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे, यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी यांनी नामांकित बिल्डरच्या मुलाचे गाडी आडवी लावून खंडणीसाठी अपहरण केले व 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. वरीष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू करूण गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेत एका बाजूला तपास व दुसऱ्या बाजूला वाटाघाटी करण्याचे ठरविले गेले. आरोपीं सोबतच्या वाटाघाटीतून रूपये 2 कोटी खंडणीची रक्कम देण्याचे ठरले व आरोपी यांचे सांगितल्याप्रमाणे ओला कारमधून खंडणीची रकम पाठविण्यात आली, इकडे पोलीस दलाच्या समन्वयातून तांत्रीक तपासा द्वारे लोकेशन ट्रेस करण्यात आले परंतु सततच्या लोकेशन बदलण्यामुळे ओला कारचालक व आरोपीं मध्ये भेटीचे ठिकाण नक्की झालेच नाही, तसेच आरोपी यांनी तुमचा मुलगा घरी येऊन जाईल आम्हाला खंडणी नको असे सांगून फोन बंद करण्यात आला. वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेगार काही बरेवाईट तर करणार नाही असा गांभीर्य पूर्वक विचार करून आलेल्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास करत लोकेशन वर पोहचण्यात पोलीस अधिकारी यशस्वी झाले, घटनास्थळावरून 20 वर्षीय तरुणाची सुखरूप सुटका करून आरोपी यानां जेरबंद करून अटक करण्यात आली. 

या तपासामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे साहेब,अंबरनाथ पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळसकर साहेब, पोलीस उपनिरीक्षक दराडे साहेब व इतर पोलीस अधिकारी तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत साहेब व इतर पोलीस अधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले. 
सदर कामगिरीबद्दल ठाणे जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त पोलीस असोसिएशन व भटके विमुक्त सामाजिक संस्था यांचे वतीने विलास गायकवाड, वसंत पाटील व सुंदर डांगे यांनी पोलिस अधिकारी यांचे सत्कार केला.

Wednesday, 25 September 2024

घाटकोपर येथील यशवंत खोपकर याना समाजभूषण पुरस्कार, तर मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार -२०२४ जाहीर !!

घाटकोपर येथील यशवंत खोपकर याना समाजभूषण पुरस्कार, तर मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार -२०२४ जाहीर !!

मुंबई (शांताराम  गुडेकर) :

         ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू व्यक्ती, विद्यार्थी, रुग्णांना, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना सातत्याने मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारसाठी सहकार्य करणाऱ्या विक्रोळी पार्क साईट येथील समाजसेवक, मुक्त पत्रकार याना यंदाचा २०२४ वर्षाचा  समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.पाक्षिक आदर्श रायगड यांच्या वतीने आयोजित पुरस्कार समारंभात यशवंत खोपकर यांना समाजभूषण पुरस्कार तर  विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या त्यांच्या शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार -२०२४ देऊन गौरविण्यात येणार असल्याचे आयोजक रमेश सणस, अविनाश म्हात्रे, शैलेश सणस यांनी सांगितले. पक्षिकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी सांय ५ वाजता स्वामी समर्थ मंगल कार्यालय, रोटरी हॉल समोर, वीर बाजीप्रभू देशपांडे, वडवली विभाग, अंबरनाथ पूर्व येथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.या पुरस्कार साठी संस्थेने सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्य, वैद्यकीय, क्रीडा आदींचा समावेश केला आहे. सामाजिक कार्य क्षेत्रातून यशवंत खोपकर यांना समाजभूषण तर त्यांच्या संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गेली अनेक वर्ष यशवंत खोपकर आणि त्यांची संस्था पदाधिकारी, सदस्य, सभासद आणि हितचिंतक मुंबई सह मुंबई पूर्व -पश्चिम उपनगर, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना, दिव्यांग, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, विविध रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी सेवाकार्य करत आहेत. तसेच दिव्यांग रुग्णांना कृत्रिम हात पाय देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. यशवंत खोपकर आणि मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्था याना या सेवा कार्यासाठी यापूर्वीही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या याच कार्याचे  कौतुक म्हणून रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांना समाजभूषण पुरस्कारआणि उत्कृष्ट संस्था पुरस्कार -२०२४  देऊन गौरविण्यात येईल असे आयोजकांकडून सांगण्यात आले.

Tuesday, 24 September 2024

प्रधानमंत्री उन्नत ग्राम अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील ११३ गावांचा होणार कायापालट !!

प्रधानमंत्री उन्नत ग्राम अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील ११३ गावांचा होणार कायापालट !!

आदिवासी बांधवांच्या विकासाच्या वाटचालीत मुख्य प्रवाहासोबत आणण्याच्या व त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा या उद्देशाने प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ११३ गावांचा समावेश आहे. या अभियानाचा शुभारंभ ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.

प्रधानमंत्री उन्नत ग्राम अभियानात १७ मंत्रालयांद्वारे राबविण्यात येणा-या विविध २५ उपक्रमांचा समावेश असणार आहे. प्रत्येक मंत्रालय / विभाग पुढील ५ वर्षात उद्दीष्टे निश्चीत करून त्यांची कालबध्द पध्दतीने अंमलबजावणी करेल.

या अभियाना अंतर्गत आदिवासी बांधवांसाठी सक्षम पायाभूत सुविधा विकसित करण्याचे ध्येय सामाविष्ट आहे. त्यासाठी आदिवासी बांधवांना पक्के घर देणे, बारमाही रस्ते बांधणे, जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरामध्ये नळाची सुविधा उपलब्ध करून देणे, प्रत्येक आदिवासी वाड्या-पाड्या पर्यंत वीज सुविधा उपलब्ध करून देणे, जेथे जेथे शक्य आहे तेथे सौर विद्युत ऊर्जेद्वारे वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, प्रत्येक वाडीतील प्रत्येक घरात LPG गॅस जोडणी उपलब्ध करून देणे तसेच अंगणवाडी केंद्र उभारून याद्वारे पोषण अभियान राबविणे या व यासारख्या अनेक सुविधांचा सामावेश करण्यात आला आहे.

आदिवासी भागातील पर्यटन क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आणि आदिवासी समुदायाला पर्यायी उपजिवीकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी, पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून ट्रायबल होम स्टे (आदिवासी कुटुंबाबरोवर राहणे) यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. तसेच, वनक्षेत्रात राहणाऱ्या FRA पट्टाधारकांकडे मिशन अंतर्गत विशेष लक्ष पुरविले जाईल. या अभियानांतर्गत जिल्हयातील शासकीय आणि वसतीगृहांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच सिकलसेल आजाराच्या निदानासाठी अत्याधुनिक सुविधा असलेले क्षमता केंद्र स्थापन करण्यात येईल.

या अभियानांतर्गत आदिवासी उत्पादनांच्या प्रभावी विपणनासाठी आणि विपणन पायाभूत सुविधा, जागरूकता, ब्रेडींग, पॅकेजिंग आणि वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी आदिवासींकडून थेट खरेदी करता यावी यासाठी टीएमएमसी केंद्रांची स्थापना केली जाईल.

हे अभियान जिल्ह्यातील असुरक्षित समुदायाच्या कल्याणासाठी त्यांच्या पर्यंत पोहोचणारी सहकारी संघराज्य व्यवस्था आणि संपूर्ण सरकार या दृष्टीकोनाचे आगळे वेगळे उदाहरण ठरेल.

शशी मेडिकलचे अनधिकृत बांधकाम? - नियमबाह्य बांधकामावर पडणार हातोडा !!

शशी मेडिकलचे अनधिकृत बांधकाम? - नियमबाह्य बांधकामावर पडणार हातोडा !!

मुंबई दि (प्रतिनिधी) : एमआयडीसी पारिसरात ओम साई को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी मध्ये असलेल्या तळ मजल्यावरील 14 आणि 15 क्रमांकाच्या सदनिकांचे प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियंमबाह्या बांधकाम केले असून लवकरात लवकर अनधिकृत बांधकामावर हातोडा पडणार आहे.

अंधेरी परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा च्या माध्यमातून झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत प्रकल्प राबवण्यात येऊन 225 चौरस फूट चटई क्षेत्र आकाराच्या सदनिकेचे वितरण झाले. मात्र: काही जातं व धन दान्डग्यानी पैशाच्या जोरावर प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून  नियम व अटी धाब्यावर टांगून शासकीय नियमांचे उल्लंघणं केले आहे.

यामध्ये प्रामुख्यान्ने शशी मेडिकल च्या मालकाने सोसायटीच्या पॅसेज चा वापर तसेच परस्पर विरोधी असलेल्या 2 सदनिकांना सलग एकत्र करून 450 चौरस फूट जागे ऐवजी 150 ते 200 चौरस फूट अतिरिक्त जागा अवैद्यरित्या कब्जा केली आहे. तसेच पदपथा वरील 150 चौरस फूट जागा सुद्धा चोरली आहे. 

एमआयडीसी व बृहनमुंबई वॉर्ड के (पूर्व) विभाग मुंबई प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनही अधिकारी शशी मेडिकल च्या मालकाकडून कडून पैसे घेऊन प्रकरण दाबत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप समाजभूषण विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमासमोर केला आहे.

परप्रांतीय असेच आर्थिक बळाच्या जोरावर अतिक्रमण करून नियमांचे उल्लंघणं करून कायदा व सुव्यवस्था बाधित करत असतील तर अश्या वृत्ती आणि प्रवृत्तीचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्ष जाहीर निषेध करत असून लवकरात लवकर अवैद्य पद्धतीने केलेल्या बांधकामावर हातोडा नाही चालवल्यास वरिष्ठाकडे दाद मागण्यात येईल असेही युवा समाजसुधारक डॉ. माकणीकर यांनी सांगितले.

चिपळूण-संगमेश्वरचा विकास.... रोजगार निर्मिती हाच ध्यास - प्रशांत यादव

चिपळूण-संगमेश्वरचा विकास.... रोजगार निर्मिती हाच ध्यास - प्रशांत यादव

** आश्वासक नेतृत्व

राजकीय क्षेत्रात अल्पावधीतच  यशोशिखरावर पोहोचलेले नेतृत्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पक्षाचे सरचिटणीस प्रशांत यादव यांचा नामोल्लेख होतो. सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावरत असतांना दृष्टी आणि दूरदृष्टी असणे महत्त्वाचे आहे. या दोन्ही बाबींसह नेता- उद्योजक होण्यासाठी लागणारे सर्व गुण प्रशांत यादव यांच्याकडे आहेत. शांत, संयमी, अभ्यासू नेतृत्व म्हणून अल्पावधीतच यादव यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम, प्रदेश सरचिटणीस व रत्नागिरी जिल्हा निरीक्षक बबन कनावजे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश बने आदींच्या पुढाकाराने काही महिन्यांपूर्वी प्रशांत यादव यांनी राजकारणातील 'दैवत' शरद पवार साहेबांना मानून  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. याचवेळी पक्षाकडून चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी प्रशांत यादव यांच्या उमेदवारीचे संकेत देण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकारणात असे पहिल्यांदाच पक्ष प्रवेशावेळी पक्षाकडून उमेदवारी घोषित होण्याचे  भाग्य यादव यांना मिळाले. यातच प्रशांत यादव यांना राजकारणात मोठी संधी मिळण्याचे संकेत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यानंतर यादव यांचे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेने उत्स्फूर्तपणे स्वागत केले. यानंतर  अल्पावधीतच हा मतदारसंघ पिंजून काढत या मतदारसंघावर पकड मिळवली आहे. 'चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचा विकास...रोजगार निर्मिती हाच आपला ध्यास' आहे, अशी भावना प्रशांत यादव यांनी  व्यक्त केली असून आता तर प्रशांत यादव यांना आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे जाणते राजे खुद्द शरद पवार साहेब प्रशांत यादव यांना आशीर्वाद देण्यासाठी चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. पवार साहेबांच्या या दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या राजकीय वाटचालीचा घेतलेला थोडक्यात आढावा...

प्रशांत यादव हे एका सामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व आहे. शिक्षणाने आर्किटेक्ट इंजिनिअर असलेले व बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करत त्यांनी आपल्या व्यवसायासह सामाजिक व राजकीय दृष्टीकोन ठेवून त्या क्षेत्रातदेखील आपली पाऊले उमटवली. 

राजकीय पटलावर आपले नाव कोरले

प्रशांत यादव यांची राजकीय वाटचाल पाहता सुरुवातीच्या काळात खेर्डी ग्रामपंचायतच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण केले. खेर्डी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच यासारखी संविधानात्मक पदे भूषवून खेर्डी गावच्या विकासात मोठे योगदान दिले. याचवेळी यादव यांचे राजकीय क्षेत्रात नाव पटलावर आले. यानंतर यादव यांनी मागे वळून पाहिले नाही.  काँग्रेसने त्यांच्यावर चिपळूण तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. तब्बल पाच वर्ष (सन २०१८ ते सन २०२३ ) हे पद सांभाळताना काँग्रेस पक्ष तळागाळात रुजवण्यासाठी व भक्कम करण्यासाठी तालुक्यात प्रामाणिकपणे प्रयत्न केले. यातून यादव यांनी मोठा जनसंपर्क वाढवला. यामुळे ते खेडोपाड्यात पोहोचले. इतकेच नव्हे तर सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रशांत यादव यांचे नाव आदराने येऊ लागले. कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली आहे. या कार्यकर्त्यांना मानसन्मान दिला. शिवाय सर्वसामान्य लोक यादव यांच्याकडे गेल्यास त्यांचे समाधान केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. यातूनच यादव यांचे नाव राजकीय पटलावर अग्रक्रमाने येऊ लागले. या राजकीय वाटचालीत यादव यांना अनेकांचे मार्गदर्शन व भक्कम पाठबळ मिळाले. विशेष म्हणजे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सासरे सुभाषराव चव्हाण, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, चिपळूण नागरीच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण,  या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, सुविद्य पत्नी सौ. स्वप्ना यादव यांची खंबीर साथ मिळाली आहे. 

वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची रोवली मुहूर्तमेढ

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी कोकणातील शेतकऱ्यांना शेतीपूरक दुग्ध व्यवसायासाठी पाठबळ मिळाले पाहिजे, ही भावना जपली होती. तसेच ते नेहमीच आपल्या भाषणातून बोलून दाखवत असत. यातूनच साहेबांची प्रेरणा घेऊन कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सबळ करण्याच्या हेतूने यादव यांनी  दुग्ध व्यवसायाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. यासाठी महाराष्ट्रातील मोठ-मोठे दुग्ध प्रकल्प पाहिले. कोकणात दुग्ध व्यवसाय यशस्वी होत नाही, अशी नकारात्मक भावना होती. मात्र, या भावनेला छेद देण्याचा निर्णय घेत कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना आर्थिक समृद्धी मिळवून द्यावी. इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा हे स्वप्न उराशी बाळगून वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या दुग्ध प्रकल्पाची ६ सप्टेंबर २०२१ रोजी चिपळूण पिंपळी खुर्द येथे मुहूर्तमेढ रोवली. या प्रकल्पाचे भूमिपूजन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. नियोजनबद्ध कामामुळे अतिशय कमी कालावधीत आधुनिक दृष्ट्या वाशिष्ठी दुग्ध प्रकल्प अवघ्या दोन वर्षात उभा राहिला आणि या प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन तर राज्याचे उद्योग मंत्री ना.  उदय सामंत यांच्या हस्ते प्रत्यक्षपणे शानदार उद्घाटन झाले. यासाठी यादव यांच्या सुविद्य पत्नी व चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.  स्वप्ना यादव यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. हा प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांसाठी व सुशिक्षित तरुणांसाठी राजमार्ग ठरला आहे.

वाशिष्ठी डेअरीचे कृषी महोत्सव

कोकणातील शेतीपूरक दुग्ध व्यवसायासाठी वाशिष्ठी डेअरी प्रकल्प शेतकऱ्यांसाठी सुरू करून तसेच शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी. यासाठी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे ५ ते ७ जानेवारी २०२४ या दरम्यान कृषी महोत्सव आयोजित करण्यात आले होते.  या कृषी महोत्सवात चिपळूण मधील १००  महिला बचतगटांसाठी मोफत स्टॉल्स देखील देण्यात आले होते.  तर १ जुलै २०२४  रोजी कृषी प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी कृषी मेळाव्याचे आयोजन करून या मेळाव्यात दापोली कृषी विद्यापीठातील तज्ञांनी भाजीपाला लागवडी संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे व खत वाटप केले. यावेळी या कृषी मेळाव्यातून आम्हाला शेती प्रक्रियेसाठी दिशा मिळाली असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. तर यावर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे महिला बचतगटांसाठी महिला समृद्धी महोत्सव शहरातील कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात आयोजित करून महिला बचतगट व महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला.  या महोत्सवाबद्दल महिलांनी प्रशांत यादव व सौ. स्वप्ना यादव यांना धन्यवाद दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

प्रशांत यादव यांचे वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योजक म्हणून नाव पुढे येत असतानाच महाराष्ट्रात झालेल्या राजकीय स्थित्यंतरे पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम प्रदेश सरचिटणीस व जिल्हा निरीक्षक बबन कनावजे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेठ बने आदींच्या पुढाकाराने यादव यांचा गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार पक्षात शरद पवार साहेबांना 'दैवत' मानून प्रवेश झाला. पक्ष प्रवेशावेळीच पक्षाकडून यादव यांच्या उमेदवारीची घोषणा झाली.  महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रथमच असे घडले असावे. यातून यादव यांचे राजकीय अस्तित्व सिद्ध होत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघ काढला पिंजून

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात यादव यांनी प्रवेश केल्यानंतर ते चिपळूणमध्ये जेव्हा आले  तेव्हा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेने उत्स्फूर्तपणे स्वागत केले व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर यादव यांनी चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढताना मतदारांच्या गाठीभेटी घेत गाव भेट दौरा करीत मतदारसंघावर पकड मिळवली. विशेष म्हणजे नुसती भाषणे न ठोकता येथील शेतकऱ्यांना दुग्ध व कृषी व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन व्हावे, यासाठी शेतकरी मेळावे देखील घेतले. यातून रोजगार निर्मितीच्या प्रश्नाला यादव यांनी हात घातला आणि हाच विषय शेतकऱ्यांसह सुशिक्षित तरुणांना भावला आहे. नांगरणी व  पालखी नृत्य स्पर्धा आयोजित करण्याबरोबरच वारकऱ्यांना टाळ वाटप, दहीहंडी पथक टी-शर्ट करून या सर्वांना प्रोत्साहित करण्याचे काम यादव यांनी केले आहे. विशेष म्हणजे वादळग्रस्तांना आर्थिक मदत देऊन मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. 

मोफत अस्थि रुग्ण व रक्तदान शिबिरे

तत्पूर्वी प्रशांत यादव मित्र मंडळ व वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून मोफत अस्थि रुग्ण उपचार व रक्तदान शिबिर यासारखे शिबिर राबवून रुग्णांचा आधार दूर करण्यास हातभार लावला. यासारखे उपक्रम यापूर्वी कधीही झाले नाहीत. तसा कोणीही पुढाकार घेतल्याचे ऐकिवात नाही. या शिबिरातून यादव यांनी सामाजिक दायित्व सिद्ध केले आहे.

सहकार्याचा हात

पावसाळ्यात छोटे- छोटे व्यवसायिकांची मोठ्या छत्र्या नसल्यामुळे परवड होते. ही बाब लक्षात घेऊन प्रशांत यादव मित्र मंडळ व वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे चिपळूण बाजारपेठेतील भाजीपाला व फळ विक्रेत्यांना छत्र्या वाटप करून या छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला. तसेच चिपळूण संगमेश्वर तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करून सहकार्याचा हात दिला आहे.  याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील गरजवंत महिलांना रेनकोटचे वितरण केले आहे. एकंदरीत प्रशांत यादव यांना परिस्थितीची जाणीव आहे. 

शरद पवार साहेबांचा मिळणार आशीर्वाद

आता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे जाणते राजे शरद पवार चिपळूण दौऱ्यावर  आले आणि या दौऱ्यात  नागरिकांशी संवाद साधण्याबरोबरच प्रकल्पांना गाठीभेटी तसेच जाहीर सभा घेत  या सभेतून पवार साहेब यांनी यादव यांना आशीर्वाद देत वाशिष्ठी मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट चे संस्थापक मा.प्रशांत बबन यादव यांच्यावर पवार साहेबांनी विश्वास दाखवून उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची जाहीर घोषणा केली आहे.यादव यांनी संगमेश्वर चिपळूण येथील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी श्वेत क्रांतीचे स्वप्न दाखवले.ओस पडलेले गोठे दुभत्या जनावरांनी पुन्हा भरू लागले आहेत. युवक, महिला, पुरुष शेतकरी हा सुखद अनुभव अनुभवत आहेत.ही सभा राजकीय नेते,कार्यकर्ते, विरोधक सगळ्यांची उत्कंठा वाढवीत आहे.उमेदवार म्हणून नाव घोषित होताच ही बाब यादवांसाठी आनंदाची ठरली.एकंदरीत प्रशांत यादव यांची राजकीय वाटचाल वृद्धिंगत होणार असून यादव यांच्या राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

लेखन -संतोष सावर्डेकर (चिपळूण)
संकलन - शांताराम गुडेकर (मुंबई)

मनसेचे प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन !

मनसेचे प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन !

कोकण - ( दिपक कारकर ) 

अल्पवधीत सामाजिक क्षेत्रासोबत राजकीय वर्तळात आगळीक ओळख निर्माण करणारे, गुहागर विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे उद्योजक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी गुहागर मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिपळूण यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. 

या शिबिरात कान, नाक, घसा, डोळे, रक्त गट अशी मोफत आरोग्य तपासणी सह मोफत औषधे, मोफत चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा-मुंढर (शिरबाडवाडी) येथे गुरुवार दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ०२ वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी पुढील ७०२०४२१९०२ ह्या भ्रमणध्वनी वरती संपर्क साधावा असे आवाहन गुहागर मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रशांत यादव यांच्या सारख्या कर्तृत्ववान नेतृत्वा च्या पाठीशी ठामपणे उभे रहा - शरद पवार यांचे सभेतून कार्यकर्त्यांना आवाहन

प्रशांत यादव यांच्या सारख्या कर्तृत्ववान नेतृत्वा च्या पाठीशी ठामपणे उभे रहा - शरद पवार यांचे सभेतून कार्यकर्त्यांना आवाहन 

** शरद पवार यांच्याकडून प्रशांत यादव यांचे विशेष कौतुक; कर्तृत्ववान नेतृत्व असा केला उल्लेख

तरूण नेतृत्वाला संधी मिळणे गरजेचे- शरद पवार

मुंबई (शांताराम गुडेकर) :

निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत कोकणातही
सध्या पवारांच्या सभेने वातावरण तापवल आहे.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची शनिवारी चिपळूण येथे सभा
झाल्यानंतर पाठोपाठ सोमवारी झालेल्या थोरल्या
पवारांच्या सभेने गर्दीचा उच्चांक मोडला आहे. त्यामुळे
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच कोकणात पवारांच्या सभेने वारे फिरले आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांना घेरण्यासाठी दस्त्रखुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. 

शरद पवार यांच्या सोमवारी चिपळूण येथील सभेने कोकणातले वारं फिरलं आहे. मतदारसंघाचे संभाव्य
उमेदवार प्रशांत यादव यांच्यासाठी शरद पवार यांनी
सभा घेतली. मात्र या सभेत थेट उमेदवारीची घोषणा करण्यात आली नसली तरी प्रशांत यादव हेच या विधानसभा निवडणुकीत चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघातून उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत थोरल्या पवारांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभा सुरु झाल्या असून चिपळूणमधील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सभेत शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सभेत बोलताना त्यांनी बऱ्याच वर्षांनी चिपळूण मध्ये आल्याचा आनंद होत असल्याचा आवर्जून उल्लेख करत प्रशांत यादव यांच्यासारखे कर्तृत्ववान तरूण नेतृत्व चिपळूणमध्ये उदयास येत आहे. अशा तरूण नेतृत्वाला संधी मिळणे गरजेचे आहे. असा खास उल्लेख करत शरद पवार यांनी प्रशांत यादव यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. त्याचबरोबर प्रशांत यादव यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे रहा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. सत्तेचा वापर योग्यरित्या केला गेला पाहिजे. देशात परिवर्तनाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले.

Monday, 23 September 2024

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !!

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !!

*कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही*
        *-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

 ठाणे प्रतिनिधी : कोळी बांधव हा मनमोकळ्या स्वभावाचा आहे. त्याच्या मनात एक अन् पोटात एक असं कधीचं नसतं. कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात. कोळी भवन पुन्हा पुन्हा बांधता येत नाही, यांच्यासाठी भव्य दिव्य वास्तू उभी करा. पैशाची चिंता करण्याची आवश्यकता नाही, निधी कमी पडू देणार नाही, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले.

     ऐरोली नवी मुंबईतील  येथील भूमीपुत्र - प्रकल्पग्रस्त, कोळी - आगरी आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बांधवांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

     यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नरेश म्हस्के, आमदार मंदा म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, माजी आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश दादा पाटील, गणेश नाईक, संदीप नाईक,तसेच स्थानिक कार्यकर्ते विजय चौगुले, पंढरीनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोळी हा दर्याचा राजा आणि मुंबईचा भूमीपूत्र आहे. या वास्तूचा वापर राज्यातील कोळी भूमीपूत्र घेतील. जी-20 चा मुंबईत कार्यक्रम होता तेव्हा जगभरातून लोक आले होते, त्यांनी कोळी गीतांना प्राधान्य दिले होते. कोळी बांधवांची गाणी त्यांचा नाच आणि त्यांचे संस्कृती पाहून परदेशातून आलेले पाहुणे खूष झाले होते .
  
   मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले, भूमीपूत्रांना न्याय मिळाला पाहिजे. आपल्या सरकारचे एकच सूत्र नोकरीत पहिला भूमीपूत्र. जे प्रकल्प होत आहेत त्यामध्ये कोळी बांधवाचे मोठे योगदान आहे. राज्यात एकाच वेळी विकास आणि कल्याणकारी योजनाही सुरू आहेत. म्हणून हे शासन कमी वेळेत अत्यंत लोकप्रिय झाले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. हे सरकार लोकांच्या मागण्या मान्य करते, म्हणून लोक प्रश्न घेवून आमच्याकडे हक्काने येतात.शासन सर्वसामान्याच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी असते. प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी असते. कोळी बांधवाच्या दाखल्याच्या प्रश्नासाठी एक अभ्यास गट तयार करण्यात आला आहे. काही अडचणी आम्ही दूर केल्या आहेत. उर्वरित अडचणीही दूर केल्या जातील. हे सरकार खोटं बोलून दिशाभूल करणारे नाही. जे होणार आहे तेच आम्ही बोलतो आणि आम्ही जे बोलतो तेच करतो.

हे अहोरात्र काम करणारे, लोकहिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी, भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी सरकार हात आखडता घेणार नाही. सर्व प्रकल्प व वास्तू लवकरच पूर्ण होतील. गरजेपोटी बांधलेली घरे अनधिकृत होती, त्या घरांना आता कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या हक्काची घरे आहेत.आपण अतिक्रमण म्हणतो पण ती घरे आता कायम होणार आहेत. तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल. मालकी हक्काने ही घरे आपण कायमस्वरुपी करीत आहोत. लवकरच त्याबाबत शासन निर्णय निघेल.

     यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले की, अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर कोळी भवनाचे भूमीपूजन आज संपन्न झाले आहे. हा भूखंड मिळण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. कोळी भवन उभे राहत आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. नवी मुंबईतील सर्वांत सुंदर कोळी भवन झाले पाहिजे. निधी कमी पडू दिला जाणार नाही. महाराष्ट्रात अटल सेतू तयार केला तेव्हा मासेमारी करता येत नाही, त्याच्यासाठी आपण  कॅपेक्शन देतो म्हणून आपण 25 कोटी रुपये देण्याची तरतूद केली आहे. कोस्टल रोड तयार करतानासुध्दा अशीच अडचण आली होती. कोळी लोकांच्या होड्या समुद्रात जाणे शक्य नव्हते. तेव्हासुध्दा आलेल्या अडचणी आपण दूर केल्या. आपले सरकार कोळी बांधवाच्या बाजूनी खंबीरपणे उभे आहे.

     ते म्हणाले, अठरा हजार कोळी बांधवाना जातपडताळणी नसल्यामुळे नोकरीवरुन काढून टाकण्यात  येणार होते. त्यांना अधिसंख्य पदावर घेतले.आम्ही त्यांना कायमस्वरुपी कर्मचारी केले. इतर कर्मचारी जे लाभ घेतात ते सर्व लाभ त्यांना आपण दिले. श्री. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर कोळी बांधवाचा साकल्याने विचार झाला. केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रीपद तयार केले. स्वतंत्र खाते तयार केले. मस्यसंपदा योजना सुरू केली.

     देशातील सर्वात मोठे पॅकेज आपण "वाढवण" च्या प्रकल्पग्रस्त कोळी बांधवाना देणार आहोत, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस पुढे म्हणाले की, मासेमारी करण्यासाठी चांगली व्यवस्था देणार आहोत. मच्छीमार बांधवाच्या बाजूनी उभे राहणारे आपले सरकार आहे. शेवटी या समाजाला नेता रमेश दादा पाटील यांच्यासारखा असावा, या शब्दात त्यांनी माजी आमदार रमेश पाटील यांच्या कामाचे कौतुक केले.

     या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार गणेश नाईक, माजी आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश दादा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

      यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शितपेटीचे वाटप करण्यात आले तसेच प्रधानमंत्री मत्ससंपदा योजनेतून "फिश ऑन व्हिल्स" वाहनाच्या चाव्या देण्यात आल्या.

संत निरंकारी मिशनचा महिला संत समागम भक्तिमय वातावरणात संपन्न !!

संत निरंकारी मिशनचा महिला संत समागम भक्तिमय वातावरणात संपन्न !!

गंगाधाम, मार्केटयार्ड  22 सप्टेंबर २०२४ : निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने देशभरात महिला संत समागमांचे आयोजन करण्यात येत आहे. या शृंखलेत पुणे झोन गंगाधाम स्थित निरंकारी सत्संग भवनात भव्य महिला संत समागम आयोजित करण्यात आला होता.या संत समागमात पुणे झोनमधील मिशनच्या सर्व शाखांतील हजारो महिला उपस्थित होत्या.

सत्संगाच्या मुख्य मंचावरून संबोधित करताना भगिनी सरबजीत शौक जी (मुंबई) म्हणाल्या की, केवळ भगवंताचे दर्शनच आनंददायी आहे. या निरंकार परमात्म्याचे आपल्या सद्गुरूंकडून दर्शन घेतलेल्या भक्ताची एक असीम, आनंदमय अवस्था, हा प्रत्येक ब्रह्मज्ञानी व्यक्ती चा वेगळा अनुभव पाहायला मिळतो. देवाचे दर्शन झाल्यावर तो आनंदाने नाचू लागल्याचे पाहायला मिळते. 

त्यांनी पुढे समजावले कि, गृहस्थ जीवन जगताना भक्तीमार्गावर चालावे.आपल्या गृहस्थी जबाबदाऱ्या पार पाडताना भक्तीही करावी लागते. जिथे संपूर्ण कुटुंब मिळून निरंकार परमात्म्याचे स्मरण करते, त्या घरात सदोदित आनंद असतो. ब्रह्मज्ञानानेच आपण कुटुंबातील प्रत्येक सदस्या मध्ये ईश्वराचे दर्शन करू शकतो आणि त्यातूनच आपले परस्पर प्रेम वाढते. जेव्हा आपल्या जीवनात प्रेमाची भावना येते तेव्हा ते जीवन सहज सोपे होते आणि ही अवस्था या परमपिता निरंकाराशी जोडल्यानेच शक्य होते. शेवटी त्या म्हणाल्या की देवाच्या मर्जीमध्ये जगताना प्रत्येक क्षणी त्याचे आभार मानले पाहिजेत. अशा भावनेनेच भक्तीने परिपूर्ण जीवन जगता येते.
या महिला संत समागमात वक्त्यांनी प्रेम, दया, सहिष्णुता, श्रद्धा, करुणा आणि एकता या मूल्यांवर आपले विचार, गीते, नाटिका, भक्ती रचना आदींद्वारे प्रकाश टाकला. महिला सत्संग इन्चार्ज सुलभा काबुगडे आणि पुष्पा करमचंदानी यांनी प्रमुख अतिथी सरबजीत शौक जी यांचे स्वागत केले.झोनल प्रभारी श्री ताराचंद करमचंदानी यांनी पुणे झोन मधून आलेल्या सर्व शाखांच्या संतांचे आणि महिला संत समागमातील व्यवस्थेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सेवादारांचे आभार व्यक्त केले.

टिटवाळा शिवसेना शहर शाखेकडून खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांचा भव्य सत्कार !!

टिटवाळा शिवसेना शहर शाखेकडून खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांचा भव्य सत्कार !!

** ३५ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा खासदारांनी सन्मानचिन्ह देऊन केला गुणगौरव

टिटवाळा, संदीप शेंडगे : टिटवाळ्यात प्रथमच शिवसेना शहर शाखेकडून खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांचा भव्य दिव्य सत्कार शिवसेनेचे कल्याण विधानसभा संघटक किशोर भाई शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आला.

     मागील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार सुरेश म्हात्रे यांना कल्याण पश्चिम तसेच टिटवाळा विभागातून मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडून प्रचंड मतांची आघाडी मिळवून दिली होती. रविवारी टिटवाळा शहर शाखेत किशोर भाई शुक्ला यांच्या हस्ते भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला.

      यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास शिवसेना उपनेते अल्ताफ भाई शेख शहर प्रमुख सचिन बासरे शिवसेना प्रवक्ते जयेश वाणी रवींद्र कपोते श्रीधर किस्मतराव ज्ञानेश्वर मडवी राजेश दीक्षित दिनेश भोर शिवसैनिक संभाजी मोरे नंदुरबार संपर्कप्रमुख संजय उकिरडे दिलीप पातकर यांचं मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

       या सत्कार सोहळ्यानिमित्त शिवसेना शहर शाखेतर्फे ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये ज्येष्ठ शिवसैनिक नाना पिसाट रामकृष्ण बहिरे दिलीप दलाल सुभाष पाठक संजय खांडपे अशोक कोठारे भाई दीक्षित सुधीर पंडित संजय खांडपे बाबा पाटील गझलकार प्रशांत वैद्य व्यंगचित्रकार महेंद्र पंडित त्याचप्रमाणे गोवेली शासकीय रुग्णालयाच्या डॉ. अनुराधा मिश्रा सचिन कदम यांचा सन्मान चिन्ह देऊन खासदार सुरेश म्हात्रे यांनी सन्मान केला.

        तसेच बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका केंद्रात स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या तसेच प्रशासकीय सेवेत दाखल झालेल्या ३५ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा खा. सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते यथोचित सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये संकेत घायवट, राजमनी विश्वकर्मा, स्नेहल शेळके, प्रिन्स रजत, तीपन्ना राठोड, मयूर पवार, राहुल भांगरे, जयेश कोळी, अमरदीप धनविजय, पंकज शेलार, विराज तांबे, सागर पाटोळे, अविनाश घाणे विशाल पाटील, दिलीप कोळेकर, प्रकाश खांडे, मनीषा सांगळे, विद्या गांगुर्डे, प्रणाली तारमाळे, अजिंक्य पाटील, शुभांगी भाऊ, दर्शन भगत, श्रीकृष्ण खरात, लेखन राठोड, चैतन्य साबळे, अंकिता नलावडे, अशा ३५ शासकीय सेवेत दाखल असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा तसेच दहावी आणि बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार खा. सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला.

        यावेळी कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे म्हणाले - टिटवाळ्याच्या सर्वांगीण विकास जर कोणी केला असेल तर तो केवळ किशोर शुक्ला यांनी केला आहे. 

         उपस्थितांना मार्गदर्शन करताना - शिवसेना उपनेते अल्ताफ भाई शेख म्हणाले शिवसेना ही कडवट शिवसैनिकांची सेना आहे शिवसेना कधीही संपणार नसून शिवसेना निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळेच आजही भक्कम उभी आहे. 

          यावेळी खासदार सुरेश मात्रे यांनी नागरिकांचे आभार व्यक्त केले टिटवाळा शहर शाखेने एक रुपयाचीही अपेक्षा न करता मला कल्याण पश्चिम विभागामधून तसेच टिटवाळा शहरात प्रचंड मताची आघाडी मिळवून दिल्याने माझा विजय झाला आहे शिवसेनेने मला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले असून जास्तीत जास्त निधी मी टिटवाळ्याला मिळवून देण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन उपस्थितांना दिले. तसेच आपले भव्य स्वागत केल्याबद्दल टिटवाळा नागरिकांच्या आणि खास करून कल्याण विधानसभा संघटक किशोर भाई शुक्ला यांचे आभार व्यक्त केले.

प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा प्रा. वसंत कानेटकर लिखित "इथे ओशाळला मृत्यू रंगमंचावर" !!

प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा प्रा. वसंत कानेटकर लिखित "इथे ओशाळला मृत्यू रंगमंचावर" !! दादरच्या छ. शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे ...