Saturday, 22 August 2026

*सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांचे निलंबन मागे घ्या; कोकण विभागीय पत्रकार संघाची मागणी*

*सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांचे निलंबन मागे घ्या; कोकण विभागीय पत्रकार संघाची मागणी*

कल्याण, संदीप शेंडगे : प्रतिनिधी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्यावर अनधिकृत बांधकाम प्रकरणी करण्यात आलेली निलंबनाची बेकायदेशीर केलेली कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी कोकण विभागीय पत्रकार संघाचे कल्याण शहर अध्यक्ष संदीप शेंडगे यांनी केली आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापालिकेत पालिका अधिकारी असलेल्या एका क्लास-वन अधिकाऱ्यावर अशा पद्धतीने निलंबनाची कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या ‘अ’ प्रभागात भविष्यात अधिकारी जबाबदारी स्वीकारण्यास धजावतील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

जयवंत चौधरी यांनी ‘अ’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून सुमारे दहा ते अकरा महिन्यांच्या कार्यकाळात अनधिकृत बांधकामांविरोधात सातत्याने कारवाई केली आहे विशेषतः बल्याणी विभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करत शेकडो खोल्या, गाळे आणि जोते जमीनदोस्त करण्यात आले आहेत.

चौधरी यांच्या कार्यकाळात अ प्रभाग क्षेत्रात सर्वच प्रभागात ४०० हून अधिक अनधिकृत घरगुती खोल्या व गाळे तसेच ८०० हून अधिक जोत्यांवर कारवाई करण्यात आली असून अनेक व्यावसायिक आणि घरगुती खोल्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी स्वतः पत्रकार परिषदेत आपली पाठ थोपटून घेतली होती.

*अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती कारवाईची भीती*

‘अ’ प्रभागातील विविध भागांमध्ये अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौधरी यांनी तात्काळ प्रभाग पातळीवर कारवाई केल्याचे सातत्याने पाहावयास मिळाले आहे. बल्ल्यानी टिटवाळा मांडा मोहने अटाळी वडवली आदी भागात सातत्याने कारवाई करण्यात आली होती त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये चौधरी यांच्या कारवाईची भीती निर्माण झाली होती,

यापूर्वी अटाळी-वडवली परिसरात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. अशा संवेदनशील परिस्थितीतही चौधरी यांनी आपली जबाबदारी पार पाडत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे सत्र सुरूच ठेवले होते. 
पालिका कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांना संरक्षण पुरवून अनेक ठिकाणी त्यांनी धाडसी कारवाई केल्याचे पहावयास मिळते.

अनधिकृत बांधकामाची जबाबदारी केवळ सहाय्यक आयुक्तांचीच का?

दरम्यान, ‘अ’ प्रभागातील अनधिकृत बांधकामांसाठी केवळ सहाय्यक आयुक्तांनाच जबाबदार धरणे योग्य आहे का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेच्या मुख्यालयात बसून अनधिकृत बांधकाम नियंत्रणाचे काम पाहणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन कारवाई करणे अपेक्षित आहे. सहाय्यक आयुक्तांकडून कारवाई अपेक्षित असेल, तर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांच्या अधिकारक्षेत्रातील जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे, केवळ खालच्या अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवणे योग्य नाही मग अनधिकृत बांधकाम उपयुक्त पदाचा उपयोग काय असा सवाल संदीप शेंडगे यांनी उपस्थित केला आहे.

शुक्रवारी कारवाई, सोमवारी पुन्हा बांधकाम?

‘अ’ प्रभागातील अनधिकृत बांधकामांबाबत आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेकडून शुक्रवारी एखाद्या बांधकामावर कारवाई केली जाते; मात्र त्यानंतर काही तासांतच त्याच ठिकाणी पुन्हा खोल्या अथवा गाळ्यांचे बांधकाम उभे राहत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसते.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्येक नवीन बांधकामावर सतत लक्ष ठेवायचे का? त्यांच्यावर इतर प्रशासकीय कामांची जबाबदारी नाही का? असा सवाल करत अनधिकृत बांधकाम पुन्हा उभे राहण्यामागील यंत्रणेचीही चौकशी करण्याची गरज असल्याचे पत्रकार संघाने म्हटले आहे. अनधिकृत फेलेवाल्यांचा प्रश्न अतिशय बिकट असताना मांडा टिटवाळ्यातील बल्यानी येथील मोहने विभागातील फेरीवाल्यांचा प्रश्न त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळून फेरीवाल्यांना रस्त्याच्या मागे बसण्यास आदेशित केले होते.

निवडणूक काळातही चौधरी यांच्या कामाचे कौतुक

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या (२०२५- २६) या काळातही ‘अ’ प्रभागात सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडला असून निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि प्रभागातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे सर्वांनी पाहिले आहे त्याचप्रमाणे एस आय आर (SIR) योजनेतही त्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन संपूर्ण प्रभाग क्षेत्रात नागरिकांची गणना करून घेतली आहे. याच कामात त्यांचा बहुतांश वेळ गेल्याने काही प्रमाणात अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी वाढल्याचे पहावयास मिळाले आहे

निवडणुकीनंतरही नवनिर्वाचित नगरसेवकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेत अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त घेऊन मोठ्या प्रमाणावर खोल्या जमीनदोस्त करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. जयवंत चौधरी यांनी बल्यानी मांडा टिटवाळा परिसरात धाडसी कारवाई करत अनेक दिग्गज राजकीय वरदहत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केलेली आहे.

‘कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला संरक्षण मिळाले पाहिजे’

अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यालाच निलंबित केल्यास भविष्यात इतर अधिकारी अनधिकृत बांधकाम सहाय्यक आयुक्त या पदावर काम करण्यास घाबरतील अशी भीती पत्रकार संघाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी कोकण विभागीय पत्रकार संघाचे कल्याण शहर अध्यक्ष संदीप शेंडगे केली आहे. तसेच याबाबत सोमवारी पालिका आयुक्त उपयुक्त यांना पत्र देऊन निलंबन मागे घेण्याची विनंती करणार आहे.

दरम्यान, निलंबनाची नेमकी कारणे, चौधरी यांच्यावरील आरोप आणि महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका याबाबत स्वतंत्रपणे स्पष्टता होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्यांची बाजू ऐकूनच अंतिम निष्कर्ष काढला जावा, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.‘अ’ प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावरच कारवाई का? त्यांना कारणे दाखवा नोटीस द्या 
त्यांच्याकडून खुलासा मागून घ्या त्यांना बोलण्याची संधी तरी द्या.
अशी मागणी कोकण विभागीय पत्रकार संघाचे कल्याण शहर अध्यक्ष संदीप शेंडगे यांनी केली आहे

No comments:

Post a Comment

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न !!

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न !! डोंबिवली, दि. २१ ऑगस्ट २०२६ : डोंबिवली शिक्...