Tuesday, 29 October 2024

कल्याण पश्चिम महायुतीचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांचा शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल !!

कल्याण पश्चिम महायुतीचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांचा शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल !!

कल्याण, सचिन बुटाला : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रविवारी रात्री जाहीर झालेल्या उमेदवारी यादीमध्ये कल्याण पश्चिमेतून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. मंगळवार हा उमेदवारीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व आरपीआय यांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार विश्वनाथ भोईर यांनी शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

एकीकडे ढोल ताशांचा गजर साथीला ब्रास बँड आणि कोण आला रे कोण आला, विश्वनाथ भोईर आगे बढो, शिवसेना झिंदाबाद आदी घोषणांच्या निनादामध्ये विश्वनाथ भोईर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ज्यामध्ये अनेक माजी नगरसेवक, विद्यमान पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सामील झाले होते.

महायुती अभेद्य असून कोणत्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही असे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. पक्षाअंतर्गत काही वाद असतील त्यांचे म्हणून त्यांनी असे निर्णय घेतला असेल पण अर्ज परत घेण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत सर्व वाद मिटलेले असतील व आम्ही महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवणार असा ठाम विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला.

यावेळी विश्वनाथ भोईर यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव, विजया पोटे, शहरप्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक संजय पाटील, गणेश जाधव, जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, माजी नगरसेवक वैशाली विश्वनाथ भोईर, विद्याधर भोईर, मोहन उगले, छाया वाघमारे, श्रेयस समेळ नेत्रा उगले, माजी परिवहन समिती सदस्य सुनिल खारुक, चिराग आनंद, विभागप्रमुख रामदास कारभारी, युवासेनेचे सूचेत डामरे, प्रतिक पेणकर यांच्यासह कल्याण, मोहने, टिटवाळा भागातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व आरपीआयचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Monday, 28 October 2024

श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठान, ठाणे तर्फे ठाणे शहर, पालघर जिल्हातील बोंडारपाडा व वांगणपाडा आदिवासी पाड्यातील १५० मुलानं सोबत दिवाळी साजरी‌ !!

श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठान, ठाणे तर्फे ठाणे शहर, पालघर जिल्हातील बोंडारपाडा व वांगणपाडा आदिवासी पाड्यातील १५० मुलानं सोबत दिवाळी साजरी‌ !!

ठाणे , प्रतिनिधी : दिवाळीच्या पूर्व संध्याला दीपोत्सव उपक्रमा अंतर्गत २६ व २७ ऑक्टोंबर २०२४ पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळेतील व जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय बोंडारपाडा आणि वागणपाड्यातील एकूण १५० आदिवासी विद्यार्थ्यांना नवीन कपडे आणि फराळ वाटप करण्यात आले. आदिवासी पाड्यांवर कोणतेही साधन नसताना गेली ६ वर्ष सत्यात काम करीत आहे व त्यातून अनेक रंग मुलांमधून फुलताना दिसत आहे. मुख्यमंत्री सुंदर शाळे मध्ये जि.प. शाळा बोंडारपाडा शाळेचा तिसरा क्रमांक आला. जी परसबाग संस्थेने माहिती देत तेथील विध्यार्थी व शिक्षकांनी मेहेनत घुन ती निर्माण केली व त्याचे आज फलित मिळत आहे, तसेच ठाणे शहरातील वस्तीत मुलांना ग्राउंड नाही, शिक्षण नाही त्यातून उन्नतीचे ध्येय गाठण्याचे ध्येय बाळगणाऱ्या मुलांना संस्थे तर्फे दरवर्षी फराळ नवीन कपडे, मुलांची वार्षिक फी, मुलांचे शैक्षणिक वर्ग त्यातून गाणी, शैक्षणिक साहित्य असे अनेक उप्रकम आपण करीत असतो. 

सदरप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री. निखिल बुडजडे, ड्रिमलँड रिऍलिटी कंपनीचे सर्वेसर्वा श्री. दिपक मोरे, विद्या मोरे, श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रुपेश शिंदे, पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळेतील  मुख्याध्यापक अमोल पाटील, वागणंपाडा शाळेचे मुख्याध्यापक तवर सर व शिक्षक वर्ग आणि गावकरी कुटुंब उपस्थित होते तसेच संस्थेचे आरती गाढवे, पूनम सावंत, पल्लवी लंके, राजेंद्र गोसावी, किशोर म्हात्रे, अजय भोसले, उत्कर्षां पाटील, मंगेश निकम, निशांत कोळी, शुभम कांबळे, निशांत कोळी, स्नेहल गुळीक, चेतन जामगांवकर, रितिक राऊत, वसंत कुळेकर, नितीन कुळेकर, अभि कुळेकर तसेच हितचिंतक माजी शिक्षक गणेश पाटील  इत्यादी सदस्य उपस्थित होते.

शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा तर्फे अंधेरी येथील अस्मिता अनिल डिंगणकर यांना दिवाळीनिमित्त जीवनावशक साहित्याची भेट !!

शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा तर्फे अंधेरी येथील अस्मिता अनिल डिंगणकर यांना दिवाळीनिमित्त जीवनावशक साहित्याची भेट !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
             शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा तर्फे अंधेरी येथील निष्ठावंत शिवसैनिक कै.अनिल डिंगणकर यांच्या पत्नी अस्मिता अनिल डिंगणकर यांना दिवाळीचे औचित्य साधून जीवनावशक वस्तू देण्यात आल्या.यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर, सचिव संदीप चादीवडे, संचालक दौलत बेल्हेकर,कार्यालय प्रमुख वसंत घडशी,मेघा सावंत, वनिता वायकर, राजेंद्र पेडणेकर, विश्वास तेली, सुनिता घाडगे (म. शाखासंघटक उबाठा), विष्णु मोरे (कार्यालय प्रमुख), उदय यादव (उपशाखाप्रमुख), दुर्गेश घाग (उपशाखाप्रमुख), हेमंत कारेकर (गटप्रमुख-अंधेरी पश्चिम -अबवली शाखा क्रमांक -६४) आदी मान्यवर उपस्थित होते.

Sunday, 27 October 2024

प्रतिक्षा संपली !! कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी !!

प्रतिक्षा संपली !! कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी !!

कल्याण, सचिन बुटाला : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं काउंटडाऊन सुरू झालं आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत कल्याण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा विश्वनाथ भोईर यांच्या वर विश्वास दाखवत त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. 

शिवसेनेची आलेली पहिली यादी यात कल्याण पश्चिम मतदारसंघात उल्लेख नव्हता तशातच भारतीय जनता पक्षातून या मतदारसंघावर करण्यात येत असलेला दावा तसेच शिवसेना (उबठा) व मनसे यांनी त्यांचे जाहीर केलेले उमेदवार यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्ते व मतदार संघातील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था होती. पण आज शिवसेना पक्षाकडून विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साह पाहिला मिळत आहे तसेच आमदार म्हणून विश्वनाथ भोईर यांनी संपूर्ण मतदारसंघात केलेली विकासकामे यामुळे नागरिकांनी पण त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

मतदार संघातील सध्याचे वातावरण पहाता सध्या आमदार विश्वनाथ भोईर यांना तुल्यबळ असा उमेदवार कुठल्याही पक्षाने दिलेला नाही, आमदारांनी मतदारसंघात केलेली विकासकामे व कायम जनतेशी असलेला संपर्क तसेच मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर ठाणे जिल्ह्यातील जनतेचे असलेले प्रेम यामुळे कल्याण पश्चिम मधून शिवसेना पक्षाचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विजय निश्चित मानला जात आहे.





काँग्रेसला कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व मधून उमेदवारी न मिळाल्याने सचिन पोटे आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे !!

काँग्रेसला कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व मधून उमेदवारी न मिळाल्याने सचिन पोटे आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे !!

** मुंबई आणि कोकण प्रांतात काँग्रेसला पुरेसं प्रतिनिधित्व नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी 

काँग्रेस पक्ष संपण्याच्या भीतीने सामूहिक राजीनामे __

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली शहरात काँग्रेसच्या वाटेला एकही जागा न आल्याने कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त सामुहिक राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात चार विधानसभा येतात कल्याण पूर्व कल्याण पश्चिम कल्याण ग्रामीण डोंबिवली शहर या चारही जागेवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकही जागा न सुटल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याची तयारी दर्शविली आहे 

येत्या दोन दिवसात पक्षाने योग्य तो निर्णय न घेतल्यास कल्याण डोंबिवली शहरातील सर्व पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देतील तसेच आगामी निवडणुकीत एकाही उमेदवाराचा प्रचार प्रचार न करता शांत राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत सचिन पोटे यांनी सांगितले. तसेच
विधानसभे पाठोपाठ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या असून या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जर स्थान नसेल तर पुढील काळात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व धोक्यात येणार असून अस्तित्वाच्या लढाई करिता हा निर्णय आम्ही घेतला असल्याचे पोटे यांनी पत्रकारांना सांगितले आहे 
महाविकास आघाडीने गुप्तपणे बैठका घेत सचिन बासरे यांना उमेदवारी जाहीर केली असून सचिन बासरे यांनी टिटवाळा येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आपल्या प्रचारास सुरुवात केली तसेच कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्याचा त्यांनी सापटा लावला आहे तर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता शिवसेनेने घाई घाईने उमेदवार घोषित केला असल्याचा काँग्रेसचा दावा आहे 

भाजपातून काँग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते राजाभाऊ पाटकर यांनी सांगितले शिवसेनेने दोन दिवसापूर्वीच सचिन बासरे. यांना उमेदवारी दिली आहे परंतु बासरी यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विचारात न घेता त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता प्रचारास सुरुवात केली असून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारीबाबत कोणतीही माहिती न देता प्रचार सुरू केल्याचा आरोप राजाभाऊ पातकर यांनी केला आहे. महायुतीतील महत्त्वाचा घटक असलेल्या काँग्रेस पक्षाने जर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्यास महायुतीचे उमेदवार सचिन बासरे यांना याचा मोठा फटका बसू शकतो तसेच महायुतीच्या उमेदवाराला याचा मोठा फायदा होऊ शकतो त्यामुळे सचिन पोटे यांनी केलेले बंड वरिष्ठ कशा पद्धतीने थंड करण्यात यशस्वी होतात ते येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.

यावेळी कल्याण डोंबिवली सरचिटणीस राकेश मुथा, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सलीम शेख, ज्येष्ठ नेते राजाभाऊ पातकर, राष्ट्रीय काँग्रेस सेवा दल अध्यक्ष लालचंद तिवारी, महिला जिल्हा अध्यक्ष कांचन कुलकर्णी, मोहने ब्लॉक अध्यक्ष राजेश वाघमारे यांसह कल्याण डोंबिवली शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठान, ठाणे तर्फे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे व फराळाचे वाटप‌ !

श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठान, ठाणे तर्फे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे व फराळाचे वाटप‌ !

ठाणे , प्रतिनिधी : दिवाळीच्या पूर्व संध्याला दीपोत्सव २०२४  उपक्रमा अंतर्गत श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठान, ठाणे तर्फे पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन कपडे आणि फराळ वाटप करण्यात आले. ही मुले ठाण्यातील प्रसिद्ध व ब्रिटिश कालीन कळवा व ठाणे शहराला जोडणारा पूल जो १५० वर्षा पूर्वी बांधण्यात आला. त्या पूला खाली वसविण्यात आलेली वस्ती ज्या वस्तीत मुलांना ग्राउंड नाही, शिक्षण नाही त्यातून उन्नतीचे ध्येय गाठण्याचे ध्येय बाळगणाऱ्या मुलांना संस्थे तर्फे दरवर्षी फराळ नवीन कपडे, मुलांची वार्षिक फी, मुलांचे शैक्षणिक वर्ग त्यातून गाणी, शैक्षणिक साहित्य असे अनेक उप्रकम आपण करीत असतो. 

सदरप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री. निखिल बुडजडे, ड्रिमलँड रिऍलिटी कंपनीचे सर्वेसर्वा श्री. दिपक मोरे, विद्या मोरे, श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रुपेश शिंदे, पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळेतील  मुख्याध्यापक अमोल पाटील, आरती गाढवे, पूनम सावंत, पल्लवी लंके, राजेंद्र गोसावी, किशोर म्हात्रे, अजय भोसले, उत्कर्षां पाटील, मंगेश निकम, निशांत कोळी, शुभम कांबळे तसेच हितचिंतक माजी शिक्षक गणेश पाटील  इत्यादी सदस्य उपस्थित होते. सदर प्रसंगी शाळेतील ५० विद्यार्थ्यांना नवीन कपडे आणि फराळ वाटप करण्यात आले अशी माहिती संस्थेचे सदस्य अजय भोसले यांनी दिली.

Saturday, 26 October 2024

निवडणुकीसाठी कुणबी समाजाचा वापर करून घेणाऱ्यांचे पितळ आता उघडे पडले - केतन भोज

निवडणुकीसाठी कुणबी समाजाचा वापर करून घेणाऱ्यांचे पितळ आता उघडे पडले - केतन भोज

लांजा,( प्रतिनिधी) - मागील २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत लांजा - राजापूर - साखरपा या मतदार संघात कुणबी समाजाने आपला उमेदवार म्हणून समाजाने एका उमेदवार व्यक्तीला पाठिंबा दिला होता.तेव्हा कुणबी समाजांच्या मतदारांची लाट या मतदारसंघात दिसत होती.पण त्या विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवाराने फक्त कुणबी समाजाला भावनिक करून त्यांचा फक्त वापरून करून घेतला.आणि त्या उमेदवाराने कुणबी समाजाला गृहीत धरून समाजाला नंतर पाठ दाखवली.तरी यंदाच्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कुणबी समाजाने भावनिक न होता विकास डोळ्यापुढे ठेवून योग्य उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केतन भोज यांनी केले आहे.आणि कुणबी  समजाचा उमेदवार म्हणून कोण घेत असेल आणि त्याच भांडवल करून कुणबी समाजाचा वापर आपल्या स्वार्थी राजकारणासाठी करत असेल तर या विधानसभेच्या निवडणुकीत अशा लोकांना कुणबी समाजाने मतदार पेटीतून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. असे मत केतन भोज यांनी व्यक्त केले.

Friday, 25 October 2024

कल्याण पश्चिममधून जिजाऊ विकास पार्टीच्या वतीने मोनिका पानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल !!

कल्याण पश्चिममधून जिजाऊ विकास पार्टीच्या वतीने मोनिका पानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल !!

कल्याण, संदीप शेंडगे, दि. 25 - जिजाऊ विकास पार्टीच्या वतीने कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मोनिका पानवे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. जिजाऊचे संस्थापक निलेश सांबरे यांच्यासह शेकडो समर्थक यावेळी उपस्थित होते. जिजाऊची रणरागिणी मैदानात उतरत असल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. 
                         जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या व जिजाऊ संघटनेच्या वतीने संपूर्ण कोकणात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमिकरण, शेती क्षेत्रात भरीव कामगिरी सुरु आहे. या सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून भिवंडी लोकसभा क्षेत्रातून अपक्ष लढून निलेश सांबरे यांना तब्बल अडीच लाखांचे मताधिक्य मिळाले. यात भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड येथून पहिल्या - दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळाले होते. त्यामुळेच या मतदारसंघांसह कोकणातील १५ ते २० जागांवर जिजाऊ विकास पार्टीच्यावतीने विधानसभेसाठी उमेदवार उभे केले जात आहेत. "जिजाऊने आतापर्यंत केलेल्या विकासकामांच्या आधारे आम्ही जनतेपर्यंत जाणार असून कल्याण पश्चिमसह कोकणातील अनेक जागांवर जिजाऊ पार्टी निश्चित विजय संपादन करेल," असा विश्वास जिजाऊचे संस्थापक निलेश सांबरे यांनी व्यक्त केला. सध्याची राजकीय परिस्थिती पहाता जनता नव्या पर्यायाच्या शोधात आहे. त्यामुळेच  जिजाऊच्या उमेदवारीने विधानसभा निवडणुकीत आता रंग भरणार आहेत.

Thursday, 24 October 2024

"सौजन्याची ऐशीतैशी"दोन अंकी धमाल विनोदी नाटक,२ नोव्हेंबरला दादरच्या श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात !!

"सौजन्याची ऐशीतैशी"दोन अंकी धमाल विनोदी नाटक,२ नोव्हेंबरला दादरच्या श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात !!

**अजरामर कलाकृती ‘‘सौजन्याची ऐशीतैशी’’ पुन्हा एकदा रंगभूमीवर !

मुंबई (शांताराम गुडेकर /दिपक कारकर) :

             वसंत सबनीस लिखित"सौजन्याची ऐशीतैशी"दोन अंकी धमाल विनोदी नाटक, पुनरुज्जीवित व्यावसायिक नाटक रंगभूमीवर येत असून या नाटकाची निर्मिती आणि दिग्दर्शन प्रदिप सुलभा अरविंद गोगटे यांनी केली आहे.शुभारंभाचा प्रयोग क्र.२ दिवाळीत होणार असून हास्याचे फटाके श्री शिवाजी मंदिर, दादर पश्चिम येथे शनिवार, २ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रौ ८-३० वा. फुटणार आहेत. कलाकार येत आहेत संपूर्ण महाराष्ट्राला हसवायला..! 

           पुन्हा एकदा चाळीतली धमाल पाहण्यासाठी दोन अंकी विनोदी नाटक वसंत सबनीस लिखित अजरामर कलाकृती ‘‘सौजन्न्याची ऐशीतैशी’’ हे नाटक रंगभूमीवर पुन्हा एकदा आले आहे.. या नाटकाचे ‍निर्मिती आणि दिग्दर्शन दिवंगत अभिनेते प्रदिप पटवर्धन यांचे भाचे प्रदिप गोगटे करीत असून सह-दिग्दर्शन यज्ञेश दौंड यांनी केले आहे. उत्कर्ष निर्मित, कल्लाकार्स प्रस्तुत, व्ही आर प्रॉडक्शन प्रकाशित या नाटकाचे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक प्रयोग करून रसिकांना १०० टक्के मनोरंजन देण्याचा प्रदिप गोगटे यांचा मानस आहे.या नाटकाचे निर्मिती सूत्रधार अनुदीप जाधव असून संगीत मंदार पाटील, गीतकार यज्ञेश दौंड, गायक नागेश मोरवेकर, प्रकाशयोजना प्रतिक मोहीते, नेपथ्य  नांदलस्कर, नेपथ्य निर्मिती उल्हास सुर्वे, वेशभूषा आणि ‍निर्मिती व्यवस्थापक जान्हवी अस्लेकर, रंगभूषा सचिन जाधव, फोटोग्राफी विजय बारसे, डिजिटल मार्केटींग साक्षी गाडे, पोस्टर डिझाईन शामल-अविनाश, नृत्य प्रकाश राणे, संगीत संयोजक अजय बो-हाडे, रंगमंच व्यवस्था नियती घोडके, विक्रांत घायतडके, कपडेपट संजय जाधव, पोस्टर डिझाईन सपोर्ट माधुरी गोगटे, विशेष सहकार्य गोट्या सावंत, सुरेश भोसले यांचे असून यात सचिन नवरे, अपेक्षा रानडे, हेमंत बडेकर, प्राची केळुसकर, मयांक सरदेशमुख,‍ अश्विनी तेंडूलकर, योगेश खांबल, नील सोनावणे, उमा शिंदे, ओमकार गावडे, रोहन कदम आणि प्रदिप गोगटे हे कलावंत भूमिका करत आहेत.

               हे नाटक पुन्हा एकदा व्यावसायिक रंगभूमीवर आले असून तोच काळ आणि तीच चाळ जपण्याचा पूर्ण प्रयत्न सर्व कलाकारांनी केला आहे. या नाटकाचे सुंदर गाणे ही तयार झालं आहे. जे रसिकांना नक्की आवडेल असे ‍निर्मिती, दिग्दर्शक प्रदिप गोगटे सांगतात. हे नाटक रंगभूमीवर आपली छाप नक्की सोडेल. प्रामाणिक प्रयत्न आणि प्रचंड कष्ट करून हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आम्ही घेऊन येत आहोत. या नाटकाला रसिकांचे प्रेम, आशिर्वाद लाभावे असे आवाहन निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांनी केले आहे.या नाटकाचा तिकीट दर-रु. ३००/-, रु. २००/-, रु. १००/-असा आहे.फोन बुकिंग करण्यासाठी  : 8087437309 या नंबरवर संपर्क साधवा. तिकीट विक्री ३० ऑक्टोबर २०२४ पासून थिएटरवर सुरु होणार असून Online Booking : bookmyshow वर करावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Wednesday, 23 October 2024

भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत कल्याण पूर्व मतदारसंघात सुलभा गायकवाड यांना उमेदवारी !!

भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत कल्याण पूर्व मतदारसंघात सुलभा गायकवाड यांना उमेदवारी !!


कल्याण, सचिन बुटाला, दि. २१ ऑक्टोबर -

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिल्या यादीत कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड  यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, आमदार गणपत गायकवाड तुरूंगात असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत सुलभा गायकवाड यांनी विकासकामांची भूमिपूजने केली. शिवाय पक्षाच्या बैठका, मेळाव्यांसह विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. जनतेसोबत असलेला जनसंपर्क कायम ठेवला तेव्हापासूनच भाजपाकडून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर रविवारी सुलभा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. 

सुलभा गायकवाड यांचा प्रचार सुरू झाल्याने कल्याण पूर्वेत निवडणुकीची चर्चा आणखी चांगलीच रंगली आहे. त्यांच्या प्रचारात विविध सामाजिक गटांच्या सहभागामुळे मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे. त्यांनी आपल्या प्रचारात स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले असून, मतदारांना त्यांच्या कार्याबद्दल माहिती देण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला आहे.


Tuesday, 22 October 2024

भिवंडी ग्रामीण विधानसभा समन्वयक पदी जयेश शेलार यांची नियुक्ती !!

भिवंडी ग्रामीण विधानसभा समन्वयक पदी जयेश शेलार यांची नियुक्ती !!

भिवंडी, सचिन बुटाला : सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून महायुती व महाविकास आघाडी यांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडी ग्रामीण विधानसभा महायुतीकडून समन्वयक नियुक्त करण्यात आले असून भाजपाकडून जितेंद्र डाकी, शिवसेना (शिंदे) यांच्याकडून देवानंद थळे तर राष्ट्रवादी (अजितदादा) कडून जयेश शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

महायुतीतील भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहावा यासाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून या विधानसभेतील प्रचाराची पुढील दिशा ठरवण्यासाठी समन्वयकांना महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. 

दरम्यान भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भाग व वाडा तालुक्यातील काही भागाचा समावेश असून या विधानसभेसाठी महायुती व महाविकास आघाडी यांच्याकडून कोण उमेदवार दिले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Monday, 21 October 2024

"कोकणचा साज,संगमेश्वरी बाज" लोकनाट्य लवकरच विलेपार्ले येथील मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात !

"कोकणचा साज,संगमेश्वरी बाज" लोकनाट्य लवकरच विलेपार्ले येथील मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात !

कुटूंबासह पहावे असे "५००" व्या प्रयोगाकडे वाटचाल करणारे लोकनाट्य "कोकणचा साज, संगमेश्वरी बाज"

मुंबई (शांताराम गुडेकर) :

          बोली भाषेमधील गोडवा आगळाच असतो. प्रमाणभाषेची गरज मान्य करूनही त्याचे सतत तुणतुणे वाजवणा-यांना बोलीभाषेचा गोडवा कळत नाही. त्यातील थेट भाव आणि व्यक्त होण्याचा रोखठोकपणा शिवाय लडिवाळपणा ही गंमत असते. ‘संगमेश्वरी बोली’ मध्ये हे सारे एकवटले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर ते खेड भागातील या बोलीभाषेला तसे दुय्यमच मानले जात होते. मात्र, आधी आनंद बोंद्रे यांच्या एकपात्री प्रयोगातून आणि आता ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाटय़ातून ही बोली प्रवाही होते आहे. याच संगमेश्वरी बोलीतून जाकडी, नमन, भजन अशा कोकणी लोककला लोकनाटय़ाच्या फॉर्ममधून सादर करणा-या ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ लोकनाटय़ाने अवघ्या तीन वर्षात ४६४ प्रयोग सादर केले आहेत.कोकणी लोककलेचा हा ख-या अर्थाने सन्मानच म्हणावा लागेल.

             कोकणला मोठी सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. निसर्गसौंदर्य, आंबा, काजूसारखी फळे, अनेकविध सण, उत्सव, प्रथा यांच्यासोबत बोलीभाषा ही कोकणची वैशिष्टय़े आहेत. विशेष उल्लेख करता येईल तो ग्रामीण ढंगाच्या संगमेश्वरी बोलीचा. समर्थ कृपा प्रॉडक्शनच्या टीमने ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाटय़ाची निर्मिती करताना संगमेश्वरी भाषेला लोकमान्यता मिळवून देण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला आहे. तात्या गावकर हा या कथासूत्राचा तथा लोकनाटय़ाचा प्रमुख आहे.कोकणातील लोककला, संस्कृती जाणून घेऊन त्यावर ‘डॉक्युमेंटरी’ करण्याच्या इराद्याने येणारा मुंबैकर गावातील इरसाल पात्रांना कसा सामोरा जातो, हे पाहणे खूपच मजेशीर आहे. विविधरंगी पात्रांच्या संगतीने मुंबैकर गावातील प्रथा, परंपरा, कला, संस्कृती जाणून घेताना भारावून जातो. विनोदी संवादांतून कोकणातील लोकांच्या मनातील सलही तात्या गावकर आणि मंडळी लोकांपुढे मांडण्यात यशस्वी झाले आहेत. बक्कळ पैसा कमावण्याच्या ओढीने गावातील तरुण मंडळी मोठय़ा शहरांकडे धावतेय.

             त्यामुळे गावातील संस्कृती, कला लोप पावतेय की काय,ही प्रबोधनात्मक संवादांतून प्रखरपणे मांडलेली ही गावक-यांची मनातील भीती अंतर्मुख करून जाते. गावातील जमीनजुमला येईल त्या किमतीला विकून पैसा कमावण्याचा फंडा सध्या सर्वत्र आहे. मात्र, त्याच जमिनीवर उभ्या राहणा-या उद्योगावर मजुरी करण्याची पाळी स्वत:वर येऊ देऊ नका, ही कळकळीची विनंती करताना ही गावकर मंडळी भविष्यातील कोकणाचे भयान रूपच जणू रसिकांसमोर मांडतात आणि सगळे स्तब्ध होतात.
              ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ला मुलुंड येथे झालेल्या ९८ व्या मराठी नाटय़ संमेलनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण व्यासपीठ मिळाले. त्यावेळी उपस्थित रसिक आणि कलावंतांनी उभे राहून या टीमला दाद दिली, कौतुक केले.त्यानंतर कोकणमध्ये एका पाठोपाठ एक प्रयोगांचा सिलसिला सुरू झाला.तीन वर्षात सुमारे ३६४ प्रयोगांचा टप्पा गाठणा-या या लोकनाटय़ाचा पहिला व्यावसायिक प्रयोग परळ (मुंबई) येथील दामोदर हॉलमध्ये मुंबईकर रसिकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादात झाला. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी ४६५ वा प्रयोग सादर होणार असून त्या नंतर सतत मुंबई सह कोकण आणि अन्य भागात पुढील काही प्रयोग होणार आहेत.मुंबईकर कोकणवासीयांनी या लोकनाटय़ाचे कौतुक केले आहे.
             कोकणी लोककला टिकाव्यात.त्या नव्या पिढीकडे हस्तांतरित व्हाव्यात.बोलीभाषा टिकावी.तसेच भाषा बोलण्याचा संकोच दूर व्हावा,  हा आमचा प्रयत्न आहे. असे प्रतिपादन ह्या लोकनाट्य मधील तात्या गावकर, उत्तम गायक/कलाकार सुनील बेंडखळे यांनी केले आहे. म्हणूनच या  दर्जेदार प्रयोगाचे आयोजन साई श्रद्धा कला पथक मुंबई प्रस्तुत,श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) संकल्पित व व कलाप्रेमी व्यक्तीमत्व तसेच शक्ती -तुरा, नमन चे प्रयोग हाऊस फुल करणारे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार श्री.दिपक धोंडू कारकर आयोजित बुधवार दि २७ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रौ ०८ : ३० वा. (प्रयोग क्र. ४६५) सादर होणार आहे.

              अधिक माहितीसाठी दिपक कारकर - ९९३०५८५१५३/९६५३३२३७३३ यांच्याशी संपर्क साधून,‌ मनोरंजनाची परिपूर्ण हमी असणाऱ्या ह्या प्रयोगाला भरभरून प्रतिसाद द्या असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

कोकण सुपुत्र समाजसेवक/पाणी दूत मनोज चव्हाण (वॉटर मॅन) पुणे येथे "लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड "पुरस्काराने सन्मानित !!

कोकण सुपुत्र समाजसेवक/पाणी दूत मनोज चव्हाण (वॉटर मॅन) पुणे येथे "लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड "पुरस्काराने सन्मानित !!

मुंबई (शांताराम  गुडेकर ) :
            इंटरनॅशनल इकॉनॉमिक टाइम्स,आंतरराष्ट्रीय मानवधिकार राजदुत संघटना,युवा महाराष्ट्र फॉउंडेशन, पोलीस मित्र, माहिती अधिकार, पत्रकार संरक्षण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने "महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार -२०२४ तसेच लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार वितरण सोहळा पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घुले रोड, बालगंधर्व जवळ, पुणे येथे कोहिनुर ग्रुप चे चेअरमन /मॅनेजिंग डायरेक्ट तसेच अग्रवाल समाज फॉउंडेशन पुणे चेअरमन सन्मा. कृष्णकुमार गोयल, अविनाश संकुडे (इंटरनॅशनल सी. ई. ओ. लंडन बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड ), लायन राजेश अग्रवाल‌ (प्रेसिडेंट लायन क्लब), तृप्ती देसाई (प्रेसिडेंट भूमाता ब्रिगेड), रवी अग्रवाल (प्रेसिडेंट लायन क्लब हेल्थ डिपार्टमेंट) यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले मान्यवर प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते थाटामाटात पार पडला. 

प्रथम उद्योग रत्न, पद्मभूषण, पद्मविभुषण सन्मा. रतनजी टाटा यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कोकण सुपुत्र भांडुप मुंबई येथील रहिवाशी, मातोश्री ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त व मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनसे सरचिटणीस वॉटर मॅन (पाणी दूत) मनोज भाऊ चव्हाण  "लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार-२०२४ देऊन गौरव करण्यात आला.‌या थाटामाटात पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात भारतातील अनेक राज्यातील सामाजिक, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, पोलीस, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले पुरस्कार प्राप्त व्यक्ती उपस्थित होत्या. यामध्ये मुंबई येथील बोरिवली पश्चिम येथील माझी वसुंधरा मित्र, महाराष्ट्र हरित सेना वन विभाग महाराष्ट्र शासन सदस्य, माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना जनसंपर्क अधिकारी मुंबई जिल्हा, पत्रकार,समाजसेवक डॉ.समीर खाडिलकर, समाजसेवक संदीप परब यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि पुरस्कार प्राप्त व्यक्ती, त्यांचे नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमचे आयोजन डॉ. अविनाश धनंजय सकुंडे, राष्ट्रीय अध्यक्ष-भारतीय महा क्रांती सेना.आंतरराष्ट्रीय अध्यक्ष-आंतरराष्ट्रीय मानवधिकार राजदुत संघटना, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष -पोलीस मित्र माहिती अधिकार पत्रकार संरक्षण सेना, इंटरनॅशनल इकॉनॉमिक टाइम्स सर्व पदाधिकारी, सदस्य, सभासद यांनी केले होते. उपस्थित सर्व मान्यवर यांनी सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कोकण सुपुत्र समाजसेवक, पाणी दूत  मनोज भाऊ चव्हाण (वॉटर मॅन) पुणे येथे पुरस्काराने सन्मानित  झाल्याबद्दल मातोश्री ट्रस्टचे विश्वस्त व मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच कोकणसह मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणेमधील अनेक मंडळ, समाज शाखा, मुंबई /ग्रामीण गाव, वाडी मंडळ, रहिवाशी, मित्र परिवार आणि हितचिंतक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Wednesday, 16 October 2024

डोंबिवली येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि दिपेश म्हात्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. रतन टाटा आणि कै. कैकई घारडा (घारडा केमिकल्स) यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!

डोंबिवली येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  आणि दिपेश म्हात्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. रतन टाटा आणि कै. कैकई घारडा (घारडा केमिकल्स) यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!

डोंबिवली, सचिन बुटाला : भारतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व तसेच जागतिक पातळीवरील सन्मानिय उद्योगपती माननीय श्री रतन टाटा व डोंबिवली शहरातील उद्योजक माननीय कै. कैकई घारडा (घारडा केमिकल्स) यांना १६ ऑक्टोबर २०२४ रोजी, सायंकाळी ६ वाजता, सर्वेश हॉल, डोंबिवली (पूर्व) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि दिपेश म्हात्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली अर्पण करण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात डोंबिवलीतील विविध मान्यवरांची उपस्थिती होती आणि सर्वांनी एकत्र येऊन या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाचे आयोजन सर्वेश हॉल, डोंबिवली (पूर्व) येथे करण्यात आले. श्री. दिपेश म्हात्रे, माजी स्थायी समिती अध्यक्ष, डोंबिवली, आणि श्री. माधव जोशी, जे टाटा टेलीसर्व्हिसेसचे माजी अध्यक्ष होते, यांनी आपले विचार मांडले आणि टाटा जी आणि घारडा जी यांच्या जीवनातील घटनांचा उल्लेख करत त्यांना आदरांजली वाहिली.

दिपेश म्हात्रे यांनी आपल्या भाषणात म्हटले, "रतन टाटा जी हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी महानता आणि व्यावसायिक कौशल्य यांचे आदर्श उदाहरण प्रस्थापित केले. त्यांच्या दूरदृष्टीने केवळ औद्योगिक प्रगतीच नव्हे, तर समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, आणि गरिबांच्या सेवेतही मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे लाखो लोकांचे जीवन सुधारले आहे. श्री. रतन टाटा यांनी दाखवले की व्यावसायिक यश आणि मानवतेची सेवा हे एकाच वेळी साध्य करता येते."
त्यानंतर, श्री. माधव जोशी यांनी टाटा जी यांच्याशी संबंधित अनेक आठवणी सांगितल्या, ज्यांनी उपस्थित सर्वांना भावूक केले. जोशी म्हणाले, "टाटा जी यांच्यासोबत काम करताना त्यांच्या नेतृत्वगुणांचा आणि साधेपणाचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळाली. टाटा टेलीसर्व्हिसेसमध्ये काम करताना मला त्यांच्यासोबत घालवलेले अनेक क्षण अविस्मरणीय होते."
कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित सर्वांनी श्री. रतन टाटा यांना भारत रत्न सन्मान प्रदान करण्यात यावा, अशी एकमुखी मागणी केली. टाटा जींचे देशासाठी केलेले अद्वितीय योगदान पाहता, हा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना मिळावा, असा आग्रह सर्वांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला आयोजक  श्री. दिपेश म्हात्रे (माजी स्थायी समिती अध्यक्ष) तसेच श्री. माधव जोशी (माजी अध्यक्ष, टाटा टेलीसर्व्हिसेस), KAMA संघटना आणि MIDC उद्योजकांचे प्रतिनिधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते, डोंबिवलीतील समाजसेवक व उद्योगपती उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून टाटा जी आणि घारडा जी यांच्या कार्याचे महत्त्व आणि त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

Tuesday, 15 October 2024

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला होणारं मतदान,तर लगेच २३ तारखेला होणार मतमोजणी !

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला होणारं मतदान,तर लगेच २३ तारखेला होणार मतमोजणी !

भिवंडी, दिं,१६,अरुण पाटील (कोपर)
         महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ तारखेला लगेच मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल. २३ ते २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारीसाठी अर्ज करता येणार आहे. ३० ऑक्टोबरला अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारिख असणार आहे. आजपासून ३५ दिवसांनी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. नांदेडमध्ये पोटनिवडणूकीसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
            महाराष्ट्रात एकूण ९ कोटी ६३ लाख मतदार आहेत. एकूण मतदार केंद्र १ लाख १८६ मतदान केंद्र आहेत. ग्रामीण भागातील ५७ हजार ६०१ मतदान केंद्र आणि शहरी भागातील ४२ हजार ५६२ मतदान केंद्र इतके आहेत. महाराष्ट्रात एकूण नवमतदारांची संख्या १८ लाख ६७ हजार आहे. युवा मतादारांची संख्या १ कोटी ८५ लाख आहे. पुर्णपणे महिला संचलित बूथ असणार आहेत. सर्व बूथवर रांगेत बसायची सुविधा असणार आहे. तसेच बुथवर सर्व सुविधा असण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असणार आहे अशी माहिती यावेळी राजीव कुमार यांनी दिली आहे. व्होटर अॅपवर मतदार उमेदवारांची माहिती तपासू शकतात. ८५ पेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी विशेष सोय करण्यात येणार आहे त्यांना घरातून मतदान करता येणार आहे.
          राष्ट्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील निवडणुकीची तारिख जाहीर करण्यात आली. हरियाणा आणि जम्मू-कश्मिरच्या मतदारांचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आभार मानले आहेत.२६ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत संपणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्याआधी नवं सरकार स्थापन होणार आहे.

कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन !!

कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन !!


कल्याण, सचिन बुटाला : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कार्य अहवालाचा प्रकाशन आज (15 ऑक्टोबर) करण्यात आलं. कार्य अहवाल जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्या हस्ते प्रकाशित केला.यावेळी बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की आमदार म्हणून निवडून आल्यानंतरची सुरुवातीची अडीच वर्षे ही कोवीडशी लढण्यातच गेली. मात्र त्याकाळातही कोवीड रुग्णालय असो, ऑक्सिजन प्लांट असो, इतर वैद्यकीय साधन सामुग्री असो या सर्वांसाठी आमदार निधी उपलब्ध करून दिला. तर कोवीडनंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि मग खऱ्या अर्थाने कल्याण पश्चिमे कडील विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार निधी, एमएमआरडीए, स्मार्ट सिटी, एमएसआरडीसी अशा विभागांतील तब्बल 2 हजार 38 कोटींची विकासकामे सुरू असल्याची माहिती दिली तसेच आमदारकीच्या कार्यकाळात मतदारसंघातील आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांसह केडीएमसीला स्वतंत्र धरण असावे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले.


यावेळी आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, माजी नगरसेवक संजय पाटील, शिवसेना महिला पदाधिकारी विजया पोटे, छाया वाघमारे, नेत्रा उगले इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा कल्याण पश्चिम या मतदारसंघावर दावा केला. तसेच याबाबत बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी सावध पवित्र घेतला. तर शिवसेना शिंदे गटाकडून देखील अनेक इच्छुक असल्याचे प्रश्नाला उत्तर देताना भोईर यांनी इच्छुक असणं गैर नाही इच्छुक असणे, म्हणजे त्या पक्षाचा चढता आलेख आहे. महायुती जो उमेदवार देईल एकनाथ शिंदेचे आदेश देतील त्याप्रमाणे काम करणार असल्याचे सांगितले.

Monday, 14 October 2024

उद्योजकांना उद्योजकांकरीता उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना !!

उद्योजकांना उद्योजकांकरीता उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना !!

विशेष लेख __

राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील वडार समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने राजे उमाजी नाईक  आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची उपकंपनी आहे.  तसेच समाजातील विमुक्त जाती, भटक्या जमातीतील रामोशी प्रवर्ग यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगाराकरीता रु. 1.00 लक्ष ची थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज नाही) व 25 टक्के बीज भांडवल योजना तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10 लक्ष पर्यंत), गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10 लक्ष ते 50 लक्ष पर्यंत) या योजनांचा समावेश आहे. सन 2024-25 या वित्तीय वर्षाकरीता विविध कर्ज योजनांचे जिल्हा कार्यालयांस उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. थेट कर्ज योजना व 25 टक्के बीज भांडवल योजना या योजनाचे अर्ज जिल्हा कार्यालयांत सशुल्क उपलब्ध आहेत.

 रु. 1.00 लक्ष थेट कर्ज योजना : लाभार्थीना हे कर्ज महामंडळातर्फे दिले जाते. कर्ज परत फेडीचा कालावधी 4 वर्ष आहे. अर्जदाराचे वयाची मर्यादा 18 ते 55 वर्षे आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज आकारण्यात येणार नाही. मासिक हप्ता रु. 2085.

25 टक्के बीज भांडवल योजना :- कर्जाची उच्चतम मर्यादा रु. 5 लक्ष पर्यंत. कर्ज परत फेडीचा कालावधी 5 वर्षे आहे. अर्जदाराचे वयाची मर्यादा 18 ते 50 वर्ष आहे. बँकेमार्फत लाभार्थींना 75 टक्के कर्ज उपलब्ध केले जाते. यामध्ये महामंडळाचा सहभाग 25 टक्के,  बँकेचा सहभाग 75 टक्के महामंडळाच्या रक्कमेवर व्याजाचा दर 4 टक्के असतो.

या योजनांसाठी लागणारी सर्वसाधारण कागदपत्रे :- पासपोर्ट साईज 2 फोटो, तहसिलदार/नायब तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा मूळ (ग्रामीण व शहरी भागासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष), सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र (विजाभज व वि.म.प्र), दरपत्रक (कोटेशन), प्रकल्प अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र व शिधापत्रिकेची झेरॉक्स, स्थानिक स्वराज्य संस्थेचे (ग्रामपंचायत/नगरपालिका) व्यवसाय करण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, डोमिसाईल, रहिवासी दाखला, आधारकार्ड लिंक केलेल्या पासबुकची झेरॉक्स, वयाच्या पुराव्यासाठी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र/जन्मतारखेचा दाखला, भाडेकरार किंवा संबंधित जागामालकाचे संमतीपत्र व व्यवसायाच्या जागेचा असेसमेंट उतारा इ. कागदपत्रे लागतात.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना या योजनांकरीता महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळाला भेट देवून ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10 लक्ष पर्यंत) :- ही योजना संपूर्णपणे संगणीकृत आहे. या योजनेमध्ये बँकेने रु. 10 लाखापर्यंतच्या मर्यादित कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादित) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. या योजनेचा कालावधी 5 वर्ष असेल. या योजनेसाठी अर्जदाराचे वय 18 ते 50 असावे, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 8 लक्ष पर्यंत (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणानुसार), कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराचे आधार संलग्न बँक खाते असणे अनिवार्य महामंडळाच्या www.vint.in_ (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतुपत्र (Letter of Intent) दिले जाईल. अर्जदारास या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर घ्यावे लागेल.

गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.10 लक्ष ते 50 लक्ष पर्यंत) :- विमुक्त जाती, भटक्या जमाती व  विशेष मागास प्रवर्गतील महामंडळाच्या निकषांनुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत), LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेमार्फत स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.

कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 8 लक्ष पर्यंत असलेल्या उमेदवारांच्या गटास बँकेकडून रु. 10 लक्ष ते रु. 50 लक्ष पर्यंत मंजूर उद्योग उभारणीकरीता कर्ज उपलब्ध केले जाईल. गटातील सदस्यांचे वय 18 ते 45 पर्यंत असावे. गटातील सर्व सदस्यांचा सिबिल क्रेडीट स्कोअर किमान 500 इतका असावा. परतफेडीचा कालावधी- मंजूर कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कालावधी यापैकी जो कमी असेल तो.  कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर (जास्तीत जास्त 12 टक्के व्याजदराच्या आणि रु.15 लाखाच्या मर्यादेत) त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. महामंडळाच्या www.vjnt.in (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलद्वारे गटाचा ऑनलाईन पध्दतीन कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतुपत्र (Letter of Intent) दिले जाईल. गटास या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे लागेल.

तरी इच्छुक, गरजू विजभज व विमप्र प्रवर्गातील व्यक्तींनी योजनेच्या अधिक माहितीकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या), जिल्हा कार्यालय,  येथे संपर्क साधावा व तसेच अधिक माहितीसाठी www.vjnt.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.


कंडोमपा शिक्षण विभागात आर टी ई प्रवेश प्रक्रियेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार !!

कंडोमपा शिक्षण विभागात आर टी ई प्रवेश प्रक्रियेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार !!

**आर टी ई प्रवेश प्रक्रियेत गोरगरिबांना डावलून धनदांड्यांना प्रवेश __

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शिक्षण विभागामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचारात शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे आणि एका लिपिकाचा समावेश असल्याचा आरोप पालक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सचिन बोराडे यांनी केला आहे. यामुळे शिक्षण मंडळाची कार्यप्रणालीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एससी आणि एसटी तसेच आर्थिक दुर्बल प्रवर्गातील इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळते तसेच आर टी ई प्रवेशाकरिता २५% जागा राखीव ठेवण्यात येतात या जागांवर राज्य सरकार ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवत असते. नुकत्याच पार पडलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर निवड झालेल्या पालकांना कागदपत्रांचे मूळ नकल पत्र घेऊन शिक्षण विभागात नोंद करावी लागते. याच नियमाच्या आधारे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण मंडळातील एक लिपिक यांनी मिळून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यास सुरुवात केली आहे. नामांकित आणि प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या खाजगी शाळा भरलेल्या फॉर्मची चौकशी केली जाते पालकांनी भरलेल्या फॉर्मची फेर तपासणीच्या नावाने ते राहत असलेल्या पत्त्यावर त्यांच्या घरी जाऊन त्यांची संपूर्ण पाहणी करून घेतात.

पाहणी केल्यानंतर तुमच्या मुलाचे प्रवेश आरटीई अंतर्गत प्रवेश होऊ शकत नाही. तुम्ही आर्थिक संपन्न गटामध्ये मोडता तुमचे उत्पन्न जास्त आहे तुम्ही चांगल्या ठिकाणी चांगल्या पगारावर काम करतात असे त्यांना सांगून घाबरविले जाते. श्रीमंत पालक तसेच आर्थिक संपन्न पालक आरटीई अंतर्गत झालेला प्रवेश रद्द होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांना विनवणी करतात. काहीतरी करा त्यावेळी शिक्षणाधिकारी यांचा लिपिक पालकांकडे 50 हजार ते एक लाख रुपये मागितले जातात. या शाळेची फी दीड ते दोन लाख रुपये आहे. तूमचे आता पैसे जातील परंतु दहा वर्षे तुमचे पैसे वाचतील असे सांगून त्यांच्याकडून 50 हजार ते एक लाख रुपये उकळले जातात.
खाजगी शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांनी जोडलेली कागदपत्रांची माहिती शिक्षण मंडळाकडे मागितल्यास एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे या खाजगी शाळेत ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांची नावे तसेच त्यांनी जोडलेले कागदपत्रांची माहिती शिक्षण विभागाकडे नाही.

त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून शिक्षण मंडळाच्या संपूर्ण कारभाराची एसआयटी मार्फत चौकशी करून आर्थिक व्यवहार करून घेतलेले आर टी प्रवेशाची पुनर चौकशी करण्याची मागणी बोराडे यांनी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.

दयाशंकर शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेरील शेडवर कारवाई झाल्याने संतप्त शिवसैनिकांचा अ प्रभाग कार्यालयावर मोर्चा !!

दयाशंकर शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेरील शेडवर कारवाई झाल्याने संतप्त शिवसैनिकांचा अ प्रभाग कार्यालयावर मोर्चा !!

**** सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्यापुढे वाचला अनधिकृत बांधकामांचा पाढा 

मोहने, संदीप शेंडगे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दया शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेरील शेडवर कारवाई झाल्याने संतप्त शिवसैनिकांनी अ प्रभाग  कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. यावेळी सैनिकांनी अ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी केलेल्या कारवाईचा निषेध करीत अ प्रभाग क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा त्यांच्यापुढे पाढाच  वाचला. तसेच आम्ही लेखी तक्रार देतो बघू किती अनाधिकृत बांधकामावर कारवाई होते असा प्रश्न विभाग प्रमुख सुरेश सोनार यांनी उपस्थित केला.

पालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात शहाड बंदरपाडा अटाळी वडवली मानी आंबिवली मोहने यादव नगर विकास कॉलनी गाळेगाव मोहिली टिटवाळा आदी भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून पालिकेचे भ्रष्ट कर्मचारी व अधिकारी यांच्या आशीर्वादाने राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही मात्र ऊन वाऱ्यापासून पावसापासून नागरिकांचा बचाव व्हावा म्हणून कार्यालयाबाहेर वाहतुकीला कोणताही अडथळा नसलेले पत्र्याचे शेड पालिका अधिकाऱ्यांनी राजकीय दबाव आणून पाडल्याचा आरोप दया शेट्टी यांनी केला आहे.
कारवाई बाबत सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना विचारले असता कारवाईदरम्यान आपण पालिका मुख्यालयात मीटिंग करिता उपस्थित होतो तक्रार असल्याने कर्मचाऱ्यांनी त्या शेडवर कारवाई केली असे रोकडे यांनी सांगितले.

यावेळी काशिनाथ तरे मार्केटचे अध्यक्ष लक्ष्मण तरे यांनी  सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्याकडे अधिकृत बांधकामांच्या तक्रारींचे निवेदन दिले तसेच या तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. अनेक अनधिकृत बांधकामे आदिवासी वनविभागाच्या तसेच गुरु चरण जमिनीवर सुरू आहेत या सर्व अनाधिकृत बांधकामावर आपण कारवाई करणार का असा सवाल माजी नगरसेवक विजय आप्पा काटकर यांनी रोकडे यांना विचारला. मोर्चा झाल्यानंतर काही वेळातच अ प्रभाग क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम विभागातील तसेच फेरीवाला पथकातील 15 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश आल्याने दया शेट्टी यांच्या कार्यालयावरील कारवाई कर्मचाऱ्यांना भोवली असे काही कर्मचारी तबक्या आवाजात बोलत होते.

या संतप्त मोर्चा मध्ये एन आर सी कामगारांनी सहभाग घेतला होता. यावेळी विभाग प्रमुख सुरेश सोनार माजी नगरसेवक विजय आप्पा काटकर स्व. काशिनाथ तरे मार्केटचे अध्यक्ष लक्ष्मण तरे, संघटक शत्रुघ्न तरे, त्रिपाठी यांसह शेकडो शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता.

श्री व सौ.कोमल प्रदिप टोंपे यांच्या त्रिवेणी नगर, मालाड (पूर्व) येथील घरी सप्तश्रृंगी आईच्या दर्शनाने भाविक आनंदी !!

श्री व सौ.कोमल प्रदिप टोंपे यांच्या त्रिवेणी नगर, मालाड (पूर्व) येथील घरी सप्तश्रृंगी आईच्या दर्शनाने भाविक आनंदी !!

"पत्रकार व समाजसेविका सौ.वेदिका विजय आलिम" यांच्या 'परिवारा'नेही घेतले दर्शन 

मुंबई (सौ. वेदिका आलिम) :
          हिंदू प्रथेनुसार शक्तीच्या साधनेसाठी नवरात्रीच्या ९ दिवसाला सर्वाधिक शुभ आणि पुण्यदायी मानलं जाते. नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या ९ रूपांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते. आणि त्यानंतर संपूर्ण ९ दिवस दुर्गेच्या ९ वेगवेगळ्या रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. नवरात्रीत ९ दिवस अखंड ज्योतही प्रज्वलित केली जाते. दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी बरेच जण ९ दिवस उपासही करतात. त्यांची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकट दूर होतात असं मानलं जातं. या नऊ दिवसात विधी-विधानानुसार व्रत, जप-तप केलं जातं. त्यामुळे वर्षभर भगवती मातेची कृपा भक्तांवर होते." 

         श्री व सौ.कोमल प्रदिप टोंपे यांच्या त्रिवेणी नगर, मालाड (पूर्व) यांच्या राहत्या घरी सप्तश्रृंगी आई चा देखावा आणि स्थापना केली होती. श्री सप्तश्रृंगी गड नाशिक पासुन ६० कि.मी अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे. देवीचे मंदिर ७ शिखरांनी वेढलेले असुन समुद्रसपाटीपासुन ४६५९ फुट उंचीवर आहे. यास महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी ‘’अर्ध शक्तीपीठ’’ मानले जाते. देवीची आठ फुट उंचीची मुर्ती पाषाणात कोरलेली असुन दोन्ही बाजुस ९ असे एकुण १८ हात व त्यात विविध आयुधे असलेली आहे. या ठिकाणी माता भगवती निवास करते. ‘’सप्तश्रृंग’’ हया शब्दाचा अर्थ ‘’सातशिखरे’’ असा आहे. गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे. गडाच्या शिखरावर विविध औषधी वनस्पती आढळतात. गडावर कालीकुंड, सुर्यकुंड, दत्तात्राय कुंड अशी कुंड आहेत. गडाच्या पुर्वीस खोल दरीने विभागला गेलेला ‘’मार्कंडेय डोंगर’’ आहे. हया ठिकाणी ऋषी मार्कंडेय यांचे वास्तव्य होते, असे मानले जाते. या ठिकाणी त्यांनी दुर्गासप्तशतीची रचना केली चैत्र व अश्विन नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते. 

      सगळ्यांना तेथे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे श्री व सौ.कोमल प्रदिप टोंपे यांच्या त्रिवेणी नगर, मालाड (पूर्व) यांच्या राहत्या घरी सप्तश्रृंगी आईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होती. देवीला पारंपरिक पद्धतीने दागिने, आभूषणाने शृंगार केला होता. फुलांच्या सजावटीने सगळीकडे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण दिसत आहे. देवीच्या दर्शनासाठी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार व समाजसेविका सौ.वेदिका विजय आलिम यांच्या परिवाराने भेट दिली. यावेळी सौ.सरिता रांबाडे, सौ.रूपा मेदगे, सौ. कोमल टोंपे, कु.श्रेया टोंपे, कु.वेदश्री आलिम, श्री.हरिश्चंद्र कळंबाटे, श्री.अनंत रांबाडे, श्री.विजय आलिम, श्री.दत्तात्रय मेदगे, श्री. प्रदीप टोंपे, कु.मुकेश कळंबाटे, कु.हितेश कळंबाटे आदी मान्यवर उपस्थित होते. सप्तश्रृंगी आईचा देखावा व सजावट कु. हितेश, मुकेश कळंबाटे, दत्तात्रय, आदित्य मेदगे व श्री टोंपे यांनी केली होती. यानिमित्ताने सौ.वेदिका आलिम यांनी महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत यासाठि शक्ती दे, असं साकडं देवीला घातले आहे.

Sunday, 13 October 2024

"येक नंबर" सिनेमाचा मोफत शो; मनसेचे प्रमोद गांधी यांची गुहागर जनतेसाठी आगळीक भेट !!

"येक नंबर" सिनेमाचा मोफत शो; मनसेचे प्रमोद गांधी यांची गुहागर जनतेसाठी आगळीक भेट !!

गुहागर : उदय दणदणे
दि.१३/१०/२०२४

मराठी चित्रपट सृष्टीसह अवघ्या मराठीजनांच लक्ष लागून राहिलेला राजेश मापुस्कर  दिग्दर्शित " येक नंबर"  या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा अधिकृत टीझर रिलीज होऊन १० ऑक्टोबर २०२४ रोजी हा चित्रपट सिनेमागृहातही प्रदर्शित झाला आहे.


एका राजकीय सभेने टीझरची सुरुवात होते, “एकत्र झालेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांना, भगिनींना आणि मातांना.” असा  आवाज ऐकू आला की हा चित्रपट राज ठाकरेंच्या जीवनावर आधारित असू शकतो असे संकेत देतो,नव्हे तर समोर आलेल्या टीझर,पोस्टरमधून  राज ठाकरे हे व्यक्तिमत्त्व ह्या चित्रपटाचे काहीतरी अंग आहे हे अधोरेखित होते. 

सिनेमागृहात हा चित्रपट तुफानी गर्दी खेचत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर "येक नंबर" हा चित्रपट जास्तीतजास्त जनतेने पहावा यासाठी मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी सोमवार दि १४  ऑक्टोबर २०२४ रोजी "राजलक्ष्मी सिनेमा" शृंगारतळी येथे दुपारी १२ ते ०३ आणि ०३ ते ०६  ह्या वेळेत मोफत शो चे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त जनतेला हा चित्रपट पाहता यावा यासाठी  गुहागर मनसेच्या वतीने जोरदार नियोजन करण्यात येत आहे, अधिक माहिती साठी  ९३७३०९९३९८/ ७२१८१७८७७७/ ८९८३१७८७७७ या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा असे आवाहन मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी केले आहे.

भिवंडी तालुक्यातील कोपर गाव येथील ७ गोदामाना लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान, जीवित हानी टळली !

भिवंडी तालुक्यातील कोपर गाव येथील ७ गोदामाना लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान, जीवित हानी टळली !

भिवंडी, दिं,१२,अरुण पाटील (कोपर) :

भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात आगी लागण्याच्या घटना या वारंवार घडत असून यात काही आगी या विमा (इन्शुरन्स) वसूल करण्यासाठी लावल्या जात असल्याचे बोलले जाते तर काही आगी या दुर्दैवाने लागून लाखोंचे आर्थिक नुकसान होतना दिसत आहे .अश्याच प्रकारे भिवंडी तालुक्यातील कोपर ग्रामपंचायत हद्दीतील श्री अरीहंत कॉर्पोरेशन येथील बिल्डिंग नंबर एच -२, पहिला मजला येथील ७ गोदामांना भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे.या लागलेल्या आगी दरम्यान कामगारांनी योग्यवेळी बाहेर निघाल्याने जीवित हानी टळली आहे. 

ही भीषण आग शनिवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लागली होती.ही आग विझवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते मात्र प्रचंड वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दलास वेळेवर पोहचता आले नाही. मात्र पोहचले नंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास दलास यश आले .मात्र तो पर्यंत सर्व वस्तू भक्ष्य स्थानी पडल्या होत्या. या ठिकाणी बक्षीस देणाऱ्या "ट्रॉफी "बनवण्याचा कारखाना होता.त्या साठी लागणारे "प्लाय वूड"चा साठा या ठिकाणी करण्यात आला होता. तसेच लगत झुंबर व इलेक्ट्रॉनिक वस्तूनचां साठा देखील होता, तोही जाळून खाक झाला आहे.यदा कदाचित सदर आग ही समोरील बिल्डिंग नं.एच-१ मध्ये पसरली असती तर या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहात असलेल्या रहिवाशांना धोका निर्माण झाला असता. 

सदर आगीची माहिती देताना या ठिकाणी काम करणाऱ्या कामगाराने सांगितले की, काम करत असताना छताच्या पांख्यामधून (सीलिंग फॅन) धूर निघून पंख्याला आग लागली व त्या आगीची टिपके खाली पडले व बाजूलाच "प्लाय वुड " असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. ही आग विजवण्याचा तेथील कामगारांनी प्रयत्न केला होता मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नसल्याने हा गंभीर प्रकार घडला.अश्या घटना घडू नये म्हणून गोदाम चालक --, मालकांनी देखील सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करणे गरजेचे आहे. 

अशा घटना घडू नये म्हणून गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच श्री.हेमंत सूर्यकांत घरत यांनी देखील पुढाकार घेऊन आपल्या हद्दीतील गोदामांमध्ये  कोणत्या मालाची साठवणुक केली आहे , त्यांनी "ना हरकत" दाखला घेतला आहे का नाही? याची प्रत्यक्षात जावून तपासणी करावी, व योग्य असल्यास त्यांना निःशुल्क (फुकट) देऊन त्यांना सुरक्षतेविषयी योग्य मार्गदर्शन करावे, नाहीतर काही ग्रामपंचायत कार्यालयाकडून आर्थिक व्यवहार केला जात असल्याचे बोलले जात आहे.

Friday, 11 October 2024

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !!

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी  येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !!

चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार प्रशांत यादव यांना स्थानिक ग्रामस्थांचा जाहीर पाठींबा 

मुंबई (शांताराम गुडेकर) :
          रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील वांझोळे गवळीवाडी जुगाई देवी मंदिर सभामंडपाचे व  सुशोभीकरणाचे भूमिपूजन समारंभ काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन मान.प्रशांत यादव यांच्या आदेशाने निशिकांत भोजने व पश्चिम विभाग गवळी समाज मंडळाचे अध्यक्ष अनंत भालेकर यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.कारण यादव साहेब यांचे नियोजित विविध कार्यक्रम आणि महत्वाचं काम मुंबई मध्ये असल्यामुळे ते तातडीने मुंबईला जाण्यासाठी निघाले.आश्वासनपूर्ती केल्याबद्दल ग्रामस्थांनी यानिमित्ताने यादव आणि संपूर्ण कार्यकारणी यांना धन्यवाद देत चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार प्रशांत यादव यांना जाहीर पाठींबा असल्याचे जाहीर केले.यावेळी अनेक मान्यवरांसह स्थानिक ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          वांझोळे गवळीवाडी (ता.संगमेश्वर) जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी येथील जुगाई देवी मंदिर  व  सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन समारंभाला मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड संदीप गायकर, अनंत खेडेकर, गणपत पंदेरे, सिताराम खेडेकर, प्रकाश भोजने, शिवराम वाजे, राजेश पवार, मुरलीधर चौगुले, ऍड.राकेश चाचे, महेश महाडिक, राजू पवार, सुरेश गोपाळ, अविनाश गोपाळ, महेंद्र बडद आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रशांत यादव आणि इतर मान्यवरांचा ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी यादव साहेब, आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीशी आहोत असं आश्वासन दिले. आई जुगाई देवी मंदिराच्या सभोवताली सुशोभीकरण काम आपण लवकरच मार्गी लावू असे आश्वासन प्रशांत यादव यांनी गणेशोत्सवाच्या भेटीदरम्यान ग्रामस्थांना दिले होते. या आश्वासनाची आज खऱ्या अर्थाने पूर्ती झाली. यादव यांनी आपले वचन पाळले. त्यामुळे आता वचन द्यायची वेळ आमची आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही शंभर टक्के आपल्यासोबत राहू असे ग्रामस्थांच्या वतीने यनिमित्ताने सांगण्यात आले.

ॲटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी धारकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना !!

ॲटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी धारकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना !!

मुंबई, प्रतिनिधी  : राज्यातील ॲटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी धारकांसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ॲटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक’ कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ॲटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालकांनी मंडळाकडे नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे करण्यात आले आहे.

एका कुटूंबातील एकूण चार व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराकडे अनुज्ञप्ती व बॅज असणे आवश्यक राहील. योजनेचा निधी संकलन मंडळाच्या कार्यालयात केवळ डिजीटल, ऑनलाईन पद्धतीने केले जातील. कोणत्याही परिस्थितीमध्ये रोखीने निधी संकलन केले जाणार नाही. योजनेसंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधावा. याठिकाणी अर्ज निशुल्क वितरीत करण्यात येत असून तात्पुरत्या स्वरुपात अर्जही स्विकारले जात आहेत, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

आमच्या जाई 'भाल बाई प्रतिभा प्रभाकर भालेराव मंडग आजही आईबी ओळख आहे ती मुळे आणि शाळाही ऑफखली जाते ती भालेराव बाईची शाळा म्हणूनच. शाळा व आ...