Saturday, 26 June 2021
झपुर्झा : हसले मनी चांदणे - वर्ष 9 !! "पहाता येणार डॉ. क्षितिज कुळकर्णी यांनी लिहिलेली १२ नाटके"
मुरबाड मध्ये ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपाचे रास्तारोको आंदोलन !!
एक दिवसाच्या कस्टडीत इक्बाल कासकरची NCBकडून 7 तास चौकशी; ड्रग्स आणि टेरर फंडिंगबाबत महत्त्वाचे खुलासे आले समोर.!
रोटरी क्लब चोपडा तर्फे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांच्याहस्ते ८ शिलाई मशीनचे गरजू महिलांना वाटप !
Friday, 25 June 2021
चिंताजनक ! राज्यात नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी दहा हजाराच्या घरात !
चिंताजनक ! राज्यात नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी दहा हजाराच्या घरात !
मुंबई : राज्यात आज 9,677 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10,138 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,72,799 इतकी झाली आहे. आज 156 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.94 टक्के एवढे झाले असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,05,96,965 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,17,035 (14.82 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,33,748 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,248 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1,20,715 अॅक्टिव्ह केसेस आहेत.
राज्यात पुन्हा निर्बंध लागू ! सर्वच जिल्हे व महानगरपालिका यांचा तिसऱ्या टप्प्यात समावेश !!
राज्यात पुन्हा निर्बंध लागू ! सर्वच जिल्हे व महानगरपालिका यांचा तिसऱ्या टप्प्यात समावेश !!
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर राज्य सरकारनं पाच टप्प्यांमध्ये राज्यातील निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून आता राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात केला आहे
आज राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता पॉझिटिव्हिटी रेट किंवा बेड ऑक्युपन्सीचं प्रमाण कितीही कमी असलं, तरी राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगर पालिका पुढील आदेश येईपर्यंत या तिसऱ्या गटाच्या वरच असणार आहेत.
आता निर्बंध कमी करायचे असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून २ आठवड्यांच्या आकडेवारीचा आढावा घेतला जाईल. त्यानुसार निर्णय घेतले जातील. मात्र, निर्बंध वाढवायचे असल्यास दोन आठवड्यांच्या आकडेवारीची वाट पाहण्याची गरज नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
नवीन नियमावली नुसार तिसऱ्या स्तरावरील निर्बंधात रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे. विकेंड दिवशी हॉटेल सुरू राहणार नाहीत. त्यावेळी होम डिलिव्हरी करण्यास परवानगी असेल. त्याचसोबत आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल. जीम, सलून आणि स्पा दुकानं ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील.
मंदिरे कधी खुली करणार भक्तांचा टाहो ....सगळ्यांवरचे निर्बंध शिथिल मग देऊळे का बंद? भाविक भक्तांची प्रशासनास आर्त साद
गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....
गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...
-
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिस्टर निवेदिता स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भव्य ग्रंथ दिंडी उत्साहात !! *डोंबिवली शिक्षण प...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !! विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण 'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं...











