Monday, 28 June 2021

आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाटसअप ग्रुप मार्फत मु.पो.वशेणी ता.उरण जि.रायगड या गावातील गरजु लोकांना धान्य वाटप !

आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाटसअप ग्रुप मार्फत मु.पो.वशेणी ता.उरण जि.रायगड या गावातील गरजु लोकांना धान्य वाटप !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
          शिवसेना ५५ वा वर्धापनदिनाचे औचित्य साधून आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाटसअप ग्रुप मार्फत मु.पो.वशेणी ता.उरण जि.रायगड या गावातील गरजु लोकांना धान्य वाटप करण्यात आले तसेच आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या ग्रुपचे सभासद श्री.लवेश म्हात्रे यांना ग्रुपच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांना या व्हाटसअप ग्रुपतर्फे एकत्र आणण्याचे काम केले ते या ग्रूपचे संस्थापक, संचालक श्री.संतोष पाटील यांचा देखील ग्रूप सदस्यांकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ग्रूपमधील सुर्यकांत कडू, रविंद्र जाधव, दिलीप गावडे, यशवंत खोपकर, वसंत सोनावणे, अनील कांबळे, गणेश काळे, दत्तात्रेय घुले, प्रविण कोरपे, अशोक कोळंबकर, हेमंत पाटील, दिलीप पाटील, प्रविण कुडेकर, जितेंद्र जैन, आप्पा कुलकर्णी यांच्यासह सदस्य व सभासद  तसेच शिव सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

मनसे उपविभाग अध्यक्ष पदी संदेश मोरे यांची निवड !

मनसे उपविभाग अध्यक्ष पदी संदेश मोरे यांची निवड !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

           महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगर पालिकेची पूर्व तयारी सुरू केली असून अनेक प्रभागात सक्रिय कार्यकर्त्यांना पदावर बढती देऊन पक्ष बळकट करण्याची संधी दिली आहे. घाटकोपर विधानसभा क्षेत्रात ही नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असून विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष संदेश पांडुरंग मोरे यांची प्रभाग क्रमांक १२६ आणि १२७ या प्रभागाकरिता उपविभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक १२६ व १२७ च्या उपविभाग अध्यक्ष पदी संदेश पांडुरंग मोरे यांची नियुक्ती करून राज ठाकरे यांनी नुकतेच कृष्णकुंज येथे संदेश मोरे यांना नियुक्ती पत्र देऊन मिळालेल्या संधीचे सोने करून पक्ष वाढवाल अशी आशा व्यक्त केली. निष्ठावंत कार्यकर्त्याची उपविभाग अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संदेश पांडुरंग मोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

संतोष अगबुल प्रतिष्ठानच्या वतीने नालासोपारा आणि विरार येथे महिलांच्या मोफक्त हिमोग्लोबिन तपासणी शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद !

संतोष अगबुल प्रतिष्ठानच्या वतीने नालासोपारा आणि विरार येथे महिलांच्या मोफक्त हिमोग्लोबिन तपासणी शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद !


नालासोपारा-विरार - (दिपक मांडवकर/शांत्ताराम गुडेकर) :

          नालासोपारा- विरार येथे संतोष अगबुल प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य आणि महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर या कार्यक्रमात ३१५ महिलांनी सहभाग घेतला. तर गेल्या दोन वर्षान पासून संतोष अगबुल प्रतिष्ठाण कोरोना काळात  अहोरात्र प्रत्येक नागरिकांना विविध सेवा पुरवत आहेत. प्रतिष्ठाणच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असताना कोरोना रुग्णांना प्लाझ्मा सुवीधा सुद्धा पुरणव्यात येत आहे. आजच्या महिलांच्या हिमोग्लोबिन तपासणी साठी विविध ठिकाणा वरून महिलांनी सहभाग घेतला तर मुलुंड येथील महिलांचा देखील मोठा प्रतिसाद लाभला.  प्रतिष्ठाणचे संस्थापक श्री. संतोषजी अगबुल यांच्या विचाराने प्रेरित होऊन आज प्रत्येक सभासद अगदी उत्सुकतेने आपले काम आणि जबाबदारी पार पाडत असताना सर्वाना पाहायला मिळाले. तर सर्व उपस्थित मान्यवर आणि हिमोग्लोबिन शिबिरात सहभागी झालेल्या भगिनींचे आणि या आयोजित शिबीर सहकार्यास सहभाग देणारे साथीया ब्लड बँकचे सर्व डॉ. आणि सहकाऱ्यांचे प्रतिष्ठाणचे संस्थापक श्री. संतोषजी अगबुल यांनी आभार मानले.

मुजोर संस्थाचालकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान ! 'फी साठी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई व्हावी' -- दिव्या ढोले

मुजोर संस्थाचालकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान !

'फी साठी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई व्हावी' -- दिव्या ढोले
 

मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
         राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या समोर काही मुजोर शिक्षणसंस्था आणि संस्थाचालकांमुळे एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोरोनामुळे खालावलेली आर्थिक किंवा इतर कारणांमुळे ज्या पाल्यांचे शालेय शुल्क बाकी आहे अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी मागील वर्षाची फी भरलेशिवाय आवश्यक असणारी कागदपत्रे देण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे अनेक तक्रारी  राज्यात उघडकीस आल्या आहेत. मागील दीड वर्षापासून राज्यात थैमान घातलेल्या कोरोनामुळे राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी शिथील करण्यात आलेल्या नियमांमुळे सगळी परिस्थिती पुन्हा एकदा सुरळीत होऊ लागली आहे अशी चिन्ह दिसत आहेत. काही संस्थांमध्ये शालेय शुल्क जमा न केल्याने विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश न देणे किंवा आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यात टाळाटाळ करणे असे काही प्रकार उघडकीस आल्यानंतर अशा खाजगी संस्थांवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी पालक वर्ग करताना दिसत आहेत.त्यामुळे याबत भाजपच्या महाराष्ट्र सचिव दिव्या ढोले यांनी आवाज उठवल्याने सरकारमधील मंत्री आणि प्रशासन जागे झाले. इयत्ता ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांना जर वरील अडचणींचा सामना करावा लागत असेल तर त्यांना राज्यातील शासकीय/महापालिका-नगरपालिका अंतर्गत शाळा किंवा अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्यात यावा असे आदेश राज्य सरकारतर्फे देण्यात आले. मात्र देर आये दुरुस्त आये या म्हणीप्रमाणे राज्य सरकारने ऊशीरा घेतलेल्या या निर्णयावर समाधान व्यक्त करतानाच राज्यातील पालकांनी यावर काही आक्षेपही नोंदवले आहेत.

"मागील वर्षीपासुन सुरु असलेल्या लॉक डाऊनमुळे आम्हाला आधीच अनेक आर्थिक संकटांंना तोंड द्यावे लागते आहे. त्यातच खासगी शाळांनी विद्यार्थ्यांकडे बाकी राहिलेले शालेय शुल्क जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांची अशा प्रकारे अडवणूक करणे चूक आहे असे संतप्त सवाल पालकांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलताना भाजपच्या प्रदेश सचिव दिव्या ढोले म्हणाल्या की, " खासगी शाळांनी प्रलंबित राहिलेल्या शालेय शुल्काबाबत संयम आणि समजुतीची भुमिका घ्यावी असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले होते, मात्र काही मुजोर खासगी शाळा पुर्णपणे दुर्लक्ष करत आपला असंवेदनशीलपणा दाखवून देत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेसोबतच आता डेल्टा प्लस या नव्या व्हायरसचा धोका दिवसागणिक बळावतो आहे, त्यामुळे शाळा सुरु न करता ऑनलाईन शिक्षणाचा अवलंब करावा लागणार आहे. मात्र जरा काही शाळा अशाप्रकारे विद्यार्थ्यांना अडचणीत आणू पाहत असतील तर ते नक्कीच खपवून घेतले जाणार नाही. सरकारने ९ वी, १० वी च्या विद्यार्थ्यांच्या निर्णय घेतला आहे, मात्र त्या निर्णयातुन पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यातून का डावलले आहे ? " असा सवालही त्यांनी सरकारला विचारला आहे.

          "खासगी शाळा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना घरातच बसवणार असतील तर राज्य सरकारने अंतर शिक्षण उपक्रमाअंतर्गत राज्य शिक्षण मंडळाच्या मदतीने ऑनलाईन शिक्षनाचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा. वंचित आणि गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ द्यायचे नसेल तर अशा मुजोर शाळा आणि संस्था चालकांची दादागिरी मोडून काढली पाहिजे" असे दिव्या ढोले यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

Sunday, 27 June 2021

शिवकन्या प्रतिष्ठान व आरंभ प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गरजूंना कपड्यांचे वाटप !

शिवकन्या प्रतिष्ठान व आरंभ प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गरजूंना कपड्यांचे वाटप !


त्रंबकेश्वर, उमेश जाधव -: समाज सेवेचा वसा घेतलेल्या शिवकन्या प्रतिष्ठान व आरंभ प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार  दि. २६ जून रोजी मु. ढोलेवडी ता. त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे अनेक गरजू ग्रामस्थांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले. 


आरंभ प्रतिष्ठान महाराष्ट्रचे कल्याण तालुका संपर्क प्रमुख ओमकार कोळी, आरंभ प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या रणरागिणी कक्ष पालघर जिल्हा अध्यक्षा सौ.माही चौधरी, आरंभ प्रतिष्ठान महाराष्ट्रचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष कु. जिज्ञासा चौधरी, आरंभ प्रतिष्ठान मुरबाड ग्रामीण संपर्क प्रमुख देवेश चौधरी या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी पालघर व नाशिक जिल्ह्यामध्ये आरंभ प्रतिष्ठानच्या कार्याला मोठ्या उत्साहात व जोरित सुरुवात झाली आहे. तसेच वाडा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला. 


यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने अनेक वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती : "आरंभ प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या रणरागिणी कक्ष पालघर जिल्हा अध्यक्षा सौ.माही चौधरी" यांनी दिली.

चोपडा येथे "रोटरी भवन" चे भूमिपूजन संपन्न "चोपडा रोटरीचे पन्नास वर्षापूर्वीचे स्वप्न साकार होणार" : मा.अरुणभाई गुजराथी

चोपडा येथे "रोटरी भवन" चे भूमिपूजन संपन्न 
"चोपडा रोटरीचे पन्नास वर्षापूर्वीचे स्वप्न साकार होणार" : मा.अरुणभाई गुजराथी


चोपडा वार्ताहर : रोटरी क्लब चोपडा हे आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. चोपडा रोटरी क्लब गेल्या पन्नास वर्षापासून अविरत निस्वार्थ सेवा करीत आली आहे. दिनांक २४ जून २०२१ रोजी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०चे प्रांतपाल मा. शब्बीर शाकीर यांनी रोटरी क्लब चोपडा ला सदिच्छा भेट दिली असता त्याचे औचित्य साधून  त्यांच्या शुभहस्ते रोटरी क्लब चोपडा व चोपडा रोटरी सेवा संस्था यांच्या रोटरी भवन चे भूमिपूजन करण्यात आले. रोटरी भवनासाठी चोपडा नगरपरिषदेने जवळपास दहा हजार स्क्वेअर फुट एवढी जागा शिरपूर रोड वरील हरेश्वर कॉलनी येथे उपलब्ध करून दिली आहे. त्याचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी कळविले आहे .
आदरणीय शब्बीर शाकीर यांनी सपत्नीक भूमिपूजन करून कोनशिलेचे अनावरण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अरुणभाई गुजराथी, माजी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या भाषणामध्ये रोटरी क्लब चोपडा चे पन्नास वर्षापूर्वी चे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे सांगितले. तर प्रांतपाल शब्बीर शाकीर यांनी चोपड्याला गौरवशाली अशी परंपरा असल्याचे सांगितले तसेच रोटरी क्लब चोपडा ने केलेल्या कार्याचे कौतुकही केले.
मा. शब्बीर शाकीर यांचा सत्कार चोपडा रोटरी सेवा संस्थेचे अध्यक्ष अशिषभाई गुजराथी यांनी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अरुणभाई गुजराथी यांचा सत्कार रोटरी क्लब चोपडा चे अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी केला.
मा. सौ मनीषाताई चौधरी- नगराध्यक्ष, चोपडा नगरपरिषद चोपडा, मा. टॉबी भगवागर- डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी, कॉन्फरन्स चेअर मा. अतुल शाह, गटनेते मा. जीवनभाऊ चौधरी, सह प्रांतपाल मा. योगेश भोळे, सुवर्ण महोत्सवी वर्षाचे  रोटरी क्लब चोपडा चे प्रेसिडेंट नितीन अहिरराव, चोपडा रोटरी सेवा संस्था चे अध्यक्ष अशिष गुजराथी, रोटरी क्लब चोपडा सेक्रेटरी ॲड. रुपेश पाटील, चोपडा रोटरी सेवा संस्था उपाध्यक्ष एम डब्ल्यू पाटील, सेक्रेटरी ॲड. अशोक जैन, सौ पुनम गुजराती, प्रफुल्ल गुजराथी, पंकज बोरोले, रमेश वाघजाळे, व्ही एस पाटील, डॉक्टर शेखर वारके, धीरेंद्र जैन, चंद्रशेखर साखरे, विलास कोष्टी, प्रदीप पाटील, अनिल अग्रवाल, ॲड. अशोक जैन, प्रसन्ना गुजराथी, दीपक लोहाणा व इतर सर्व रोटरी सदस्य उपस्थित होते.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार ! रिकव्हरी रेट ९५.९१ तर मृत्यूदर २ टक्के !

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार ! रिकव्हरी रेट ९५.९१ तर मृत्यूदर २ टक्के !

मुंबई : राज्यात आज कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाली असून मृत्यूंच्या संख्येत मात्र घट झाली आहे. याशिवाय, राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५ टक्क्यांच्यावर आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ९ हजार ९७४ नवे कोरोनाबाधित आढळले असून १४३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.० टक्के एवढा आहे. त्यामुळे राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ३६ हजार ८२१ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २१ हजार २८६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख २२ हजार २५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज ८ हजार ५६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत ५७ लाख ९० हजार ११३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.९१ टक्के एवढं झालं आहे.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...