Friday, 2 July 2021

रोटरी क्लब चोपडा तर्फे जि.प.शाळा साखर कारखाना चहार्डी येथे ट्यूबवेल करून देण्यात आली.!

रोटरी क्लब चोपडा तर्फे जि.प.शाळा साखर कारखाना चहार्डी येथे ट्यूबवेल करून देण्यात आली.!


चोपडा, वार्ताहर : जिल्हा परिषद जि प शाळा साखर कारखाना चहार्डी येथे चार वर्षापासून साखर कारखाना बंद असल्याने वीज आणि पाण्याची अजिबात सुविधा नव्हती अशा परिस्थितीत पिण्यासाठी, शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी तसेच वृक्षरोपण इत्यादी कामासाठी पाण्याअभावी खूप हाल होते.


जल मिशन अंतर्गत देखील जवळपास ग्रामपंचायतीची पाईपलाईन उपलब्ध नसल्याने पाण्याची व्यवस्था झाली नाही ही व्यथा माननीय गटविकास अधिकारी, माननीय गटशिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य यांना वेळोवेळी सांगितले शेवटी त्यांनी  दिलेल्या आश्वासना प्रमाणे रोटरी क्लब चोपडा चे अध्यक्ष नितीन अहिरराव यांच्याशी संपर्क साधून या शाळेसाठी कूपनलिका साठी उपलब्ध करून दिली व त्यानुसार आज दिनांक 29 जून 2019 रोजी रोटरी क्लब चोपडा तर्फे शाळेत बोरिंग करण्यात आली. साधारपणे ३०० ते ४६५ फुटावर पाणी लागले आहे. मुख्याध्यापक श्री तुषार पाटील यांनी रोटरी मार्फत झालेल्या या मदतीमुळे शाळेला पाण्याची सोय होऊन शाळेचा कायम स्वरुपी पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे त्यांनी रोटरी क्लब चोपडा व त्यांचे सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले.


सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. श्री घनश्याम निंबाजी पाटील माजी चेअरमन चो.सा.का. यांनी पूजन व फलकाचे अनावरण करून कामाची सुरवात् केली, आपल्या भाषणात रोटरी करीत असलेल्या सेवा कार्याचे कौतुक केले. 

प्रमुख पाहुणे सौ. प्रतिभा बाबूराव पाटिल सभापति पं. स. चोपडा, श्री सूर्यकांत गोविंद खैरनार उपसभापति पं. स. चोपडा,श्री अतुल नाना ठाकरे चेअरमन चो.सा.का., प्रा सौ. डॉ नीलम पाटिल जी.प. सदस्या, सौ. मालुताई रायसिंग प. स. सदस्या, सौ कल्पना पाटिल प. स.सदस्या, श्री भरत कोसोदे बी.डि.ओ. प. स. चोपडा, सौ. भावना भोसले मॅडम गट शिक्षण अधिकारी प. स. चोपडा. आदी उपस्थित होते. रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव या यांनी आपल्या प्रस्तावनेत प्रकल्पाबाबत माहिती दिली तर सूत्रसंचालन मा.सचिव रुपेश पाटिल यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी रोटरीचे महेंद्र बोरसे, प्रफुल्ल भाई गुजराथी, संजीव भाई गुजराथी, अर्प्रित अग्रवाल, चेतन टाटिया, चंद्रशेखर साखरे, विलास कोष्टी, तसेच शाळेचे मुख्याध्यापक तुषार पाटील व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र माणगांव यांच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात वृक्ष लागवड व संवर्धनाची भरीव व उल्लेखनीय कामगिरी !

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र माणगांव यांच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात वृक्ष लागवड व संवर्धनाची भरीव व उल्लेखनीय कामगिरी !


     बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : शासन निर्णयान्वये मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संदर्भीय पत्रकानुसार वृक्षांची "जोपासना हीच निसर्गाची उपासना " या योजने अंतर्गत सामाजिक वनीकरण परिक्षेत्र माणगांव वनपरिक्षेत्र अधिकारी माननीय श्री. संजय पांढरकामे, वनपाल बी टी पवार तळा, एस सी धायगुडे वनपाल माणगांव, कल्पना गायकवाड वनरक्षक माणगांव, एन एम कामत, एम आर मुढे आणि टीम यांच्या उत्तम नियोजनातून तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात रोपांचे वाटप, वृक्षारोपण तथा वृक्ष लागवड, मार्गदर्शन आणि संवर्धन करण्याची कामगिरी हाती घेतली आहे.
      उपरोक्त योजनेच्या माध्यमातून शुभेच्छा वृक्ष, शुभमंगल वृक्ष, आनंद वृक्ष, आनंद वृक्ष, माहेरची साडी, स्मृती वृक्ष या नव संकल्पनेवर आधारित १ जुलै २०२१ रोजी अर्थात महाराष्ट्र कृषी दिन आणि हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव जी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून माणगांव व तळा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत क्षेत्रात रोप वाटप, वृक्ष लागवड आणि वृक्ष जोपासना तथा संवर्धन मार्गदर्शन कार्यक्रम त्या त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, ग्रामस्थ, युवक, युवती, महिला मंडळ यांच्या उपस्थितीत कोविड १९ पार्श्वभूमीवरील शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन तळा तालुक्यातील ग्रामपंचायत निगुडशेत कार्यक्षेत्रातील गाव महागाव, वाशी, ग्रामपंचायत वांजळोशी कार्यक्षेत्रातील गाव चोरवली, वांजळोशी, माणगांव तालुक्यातील ग्रामपंचायत पेण तर्फे तळे कार्यक्षेत्रातील गाव बोरघर, ग्रामपंचायत पन्हळघर खुर्द, ग्रामपंचायत पन्हळघर बुद्रुक, ग्रामपंचायत वारक कार्यक्षेत्रातील गाव वारक आणि विघवली या ठिकाणी करण्यात आले होते. 
      सामाजिक वनीकरण परिक्षेत्र माणगांव यांच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाचे नियोजन माणगांव तालुक्यातील उपरोक्त ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गाव या नंतर तळा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील उपरोल्लेखित गावात नियोजनबद्ध पद्धतीने करून सदर कार्यक्रमात उपस्थितीत मान्यवरांचे स्वागत सामाजिक वनीकरण परिक्षेत्र माणगांव यांच्या माध्यमातून सन्मान पुर्वक गुलाब पुष आणि विविध प्रकारची फळ झाडे आणि वनस्पतींची दर्जेदार रोपे देऊन करण्यात आले. 
      सामाजिक वनीकरण परिक्षेत्र माणगांव चे कर्तव्य दक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी माननीय श्री संजय पांढरकामे, माणगांव वनपाल एस सी धायगुडे, तळा वनपाल बी टी पवार, वनरक्षक कल्पना गायकवाड, कामत आणि मुढे यांच्या प्रमुख उपस्थितीतील  सदर नियोजनबद्ध कार्यक्रमातील माणगांव तालुक्याच्या पेण तर्फे तळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बोरघर गावातील कार्यक्रमाला ग्रामपंचायत पेण तर्फे तळे च्या सरपंच रसिका कळंबे, बोरघर गावचे अध्यक्ष सुभाष मोहे, उपाध्यक्ष पत्रकार विश्वास गायकवाड, शाहिर राजाराम जाधव, रामदास जाधव, दिलीप कळंबे तसेच बोरघर ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच माणगांव तालुक्यातील पन्हळघर खुर्द आणि बुद्रुक ग्रामपंचायत कार्यक्रमाला सरपंच सुजाता जाधव, वारक येथील कार्यक्रमाला सरपंच संगिता शेकुंडे व ग्रामस्थ उपस्थित होते, तर तळा तालुक्यातील कार्यक्रमाला तळा  पंचायत समितीच्या सभापती अक्षरा कदम, गटविकास अधिकारी व्ही बी यादव, तालुका कृषी अधिकारी वाडकर, विस्तार अधिकारी कानेकर, पंचायत समिती सदस्य देवकी लासे, रविंद्र मांडवकर उपसरपंच निगुडशेत, ग्रामपंचायत वांजळोशी सरपंच एस एस सोलकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रम अंतर्गत कन्या समृद्धी च्या माध्यमातून ३४० रोपे व १९३ अशी एकूण ५३३ रोपांचे वितरण करण्यात आले.

कल्याण तालुका वारकरी संप्रदायचे माझी अध्यक्ष हरिभाऊ म्हात्रे यांचे निधन !

कल्याण तालुका वारकरी संप्रदायचे माझी अध्यक्ष हरिभाऊ म्हात्रे यांचे निधन !                           


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या आणि श्रींमत समजल्या जाणा-या म्हारळ ग्रामपंचायतीचे सरपंच आणि तालुका वारकरी सांप्रदायचे कल्याण तालुका अध्यक्ष हरिभाऊ विठू म्हात्रे यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८०वर्षे होते.


कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायतीची स्थापना १९९४/९५/ मध्ये झाली, पहिल्या  सरपंच म्हणून सुमनताई खरात तर उपसरपंच पदी हरिभाऊ विठू म्हात्रे हे विराजमान झाले, यांनतर सरपंचावर अविश्वास दाखल झाल्याने उपसरपंच हरिभाऊ म्हात्रे हे सरपंच पदी विराजमान झाले, पहिल्यापासून भक्तीमार्गाकडे कल असलेले सरपंच हरिभाऊ म्हात्रे यांना सर्व 'नाना'म्हणत ,सरपंच कार्यकाळात अनेक विकासात्मक कामे केल्यानंतर ते राजकारणातून वेगळे झाले व पुर्णवेळ 'हरी'च्या भक्तीत वाहून गेले. त्यांच्या नावापुढे सरपंच ऐवजी हभप असे लावले जाऊ लागले. या काळात ते कल्याण तालुका वारकरी संप्रदायचे अध्यक्ष झाले.


म्हारळ गावात म्हात्रे कुंटूंब अंत्यत मोठे असून भाऊ, मुले नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा पांडूरंग हरिभाऊ म्हात्रे यांनी कल्याण पंचायत समितीचे उपसभापती पद भूषविले आहे, तर त्यांची सून म्हारळ ग्रामपंचायतीची सदस्या आहे. अशा या मोठ्या परिवारातील 'नाना'हे सर्वांना पितृतूल्य असेच होते, नुकतेच दु:खद निधन झाले, मृत्यूसमयी त्यांचे वय ८० वर्षे इतके होते, त्यांच्या निधनाने म्हारळ गावावर शोककळा पसरली असून कल्याण तालुका वारकरी सांप्रदायचे देखील खूप मोठे नुकसान झाले आहे असे वारक-यांनी भावना व्यक्त केली आहे.

Thursday, 1 July 2021

राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत चढ-उतार कायम ! मृत्यूचा दर नियंत्रित होणे अपेक्षित !

राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत चढ-उतार कायम ! मृत्यूचा दर नियंत्रित होणे अपेक्षित !



मुंबई : राज्यात गेल्या चोवीस तासांत राज्यांत ९ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर साडेआठ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत ९ हजार १९५ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून ८ हजार ६३४ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ५८,२८,५३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

तर दुसरीकडे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६.०१ टक्के इतका झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात २५२ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्याचा मृत्यूदर 2. 01 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 667 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

तिडे तळेघर गृप ग्रामपंचायतच्या मागणीवरून मंडणगड तिडे तळेघर नालासोपारा हि बससेवा कोविड प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुनश्च सुरू !

तिडे तळेघर गृप ग्रामपंचायतच्या मागणीवरून मंडणगड तिडे तळेघर नालासोपारा हि बससेवा कोविड प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुनश्च सुरू !


नालासीयारा : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले होते त्यावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन, जिल्हाबंदी, असे अनेक उपाय अंमलात आणले. त्यामुळेच सर्व जिल्ह्याअंतर्गत एसटी सेवा बंद करण्यात आली. हळूहळू महाराष्ट्र सरकारच्या उपाययोजनांमुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला व नियम शिथिल करण्यात आले. याचमुळे मध्यंतरी बंद केलेली मंडणगड नालासोपाऱा बससेवा पून्हा सुरू करण्यात आली.

ही बससेवा मंडणगड येथून सं १३.२९ वा सुटून  केळवत, कुंबळे, तिडे, तळेघर, सडे, आतखोल, शेनाळे, म्हाप्रळ, चिंबाव, तुडील, महाड, टोळ फाटा, लोणेरे, माणगांव, ईंदापुर, कोलाड, नागोठणे, वडखल, रामवाडी, पनवेल, कोकणभवन, नेरूळ जुईनगर, कळवा नाका, ठाणे, खोपट, घोडबंदर, वसई फाटा, नालासोपारा येथे ९.३० वा पोचणार आहे परतीच्या प्रवासाकरीता नालासोपारा येथुन स. ०६:२९ वा सुटणार आहे. 
      या बसचे संगणकीय आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.या बससेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक सुनिल भोकरे साहेब, यंत्र अभियंता प्रमोद जगताप, विभागिय वहातुक अधिकारी अनिल मेहत्तर, अनंत जाधव, सचिन सुर्वे, मंडणगड आगारव्यवस्थापक हनुमंत फडतरे, विभागिय सहायक कार्यशाळा अधिक्षक वासुदेव पवार, ग्रामपंचायत तिडे तळेघर उपसरपंच दादा पांढरे, मोहला अध्यक्ष बशिर खलफे, तंटामुक्त अध्यक्ष दिलावर  वलेले, कल्याण  सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती,पुणे कल्याण सावंतवाडी समन्वय समिती कल्याण गृपचे  संपर्कप्रमुख तथा तालुकाध्यक्ष  श्री वैभव बहुतुले, शिवसेना तालुकाप्रमुख, ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक, नोकरदार वर्ग, आदी मान्यवरांनी केले आहे.

रोटरी क्लब चिपळूणच्या अध्यक्षपदी प्रसाद सागवेकर ! *"सेक्रेटरीपदी अविनाश पालशेतकर तर खजिनदारपदी डॉ. निनाद साडविलकर"*

रोटरी क्लब चिपळूणच्या अध्यक्षपदी प्रसाद सागवेकर !

 *"सेक्रेटरीपदी अविनाश पालशेतकर तर खजिनदारपदी डॉ. निनाद साडविलकर"*


चिपळूण - विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब चिपळूणच्या अध्यक्षपदी प्रसाद सागवेकर यांची तर सेक्रेटरी पदी अविनाश पालशेतकर आणि खजिनदारपदी डॉ. निनाद साडविलकर यांची नुकतीच अभिनंदनीय निवड करण्यात आली.
          व्यवसायाने सुवर्णकार असलेले श्री प्रसाद अनंत सागवेकर हे बीकॉम असून चिपळूण तालुका सुवर्णकार नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक आहेत. गेले अनेक वर्षे ते विविध क्षेत्रात सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असून गेली अकरा वर्षे रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. सेक्रेटरी पदी निवड झालेले श्री. अविनाश शंकर पालशेतकर हे एमकॉम असून डीबीजे महाविद्यालयामध्ये गेली अठरा वर्षे लेक्चरर म्हणून काम करीत आहेत. सामाजिक कार्याची आवड असलेले श्री.अविनाश पालशेतकर पाच वर्षांपूर्वीपासून रोटरी क्लबमध्ये सक्रिय झाले. गरीब मुलांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी ते विशेष प्रयत्नशील असतात. खजिनदारपदी निवड झालेले डॉ. निनाद नयन साडविलकर हे एमडी (आयुर्वेद) असून आयुर्वेद चिकित्सक व अध्यापक म्हणून गेली दहा वर्षे चिपळूणमध्ये कार्यरत आहेत. शहरातील चिंचनाका येथे त्यांचे आरोग्यवर्धन आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय असून एमईएस आयुर्वेद महाविद्यालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत.  आजपर्यंत त्यांनी 25 पेक्षा अधिक आयुर्वेद जनप्रबोधन व्याख्याने दिली असून त्यांचे सहा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर्स प्रसिद्ध झाले आहेत. रोटरी क्लबचे ते मेंबर असून ओएमजी अमेझिंग आयुर्वेद या ब्लॉग वर त्यांचे लिखाण चालू आहे.
          लोटे येथील असिस्टंट गव्हर्नर श्री. पद्माकर सुतार यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.  यावेळी रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.  या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. प्रसाद सागवेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून आपल्या सर्वांच्या सहकार्याने या वर्षामध्ये भरीव काम करून रोटरी क्लबची सामाजिक जबाबदारीची परंपरा आम्ही कायम ठेवू,  कोरोनाच्या या महासंकटामध्ये आलेली ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू, कोरोना महामारीमध्ये हतबल झालेल्या नागरिकांना दिलासा देतानाच आरोग्यविषयक आणि शैक्षणिक उपक्रमांवर भर देऊ अशी ग्वाही दिली.  यावेळी मावळते अध्यक्ष श्री.प्रशांत देवळेकर यांनी आपल्या कार्यकाळातील उपक्रमांचा आढावा घेऊन सर्वांचे आभार मानले तर नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
       रोटरी क्लब चिपळूणच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या निवडीमुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे फोनद्वारे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या..

पंचायत समिती माणगांव आणि कृषी विभाग माणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती माणगांव येथे कृषी दिन साजरा !!

पंचायत समिती माणगांव आणि कृषी विभाग माणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती माणगांव येथे कृषी दिन साजरा !! 


      बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : महाराष्ट्र शासन तालुका कृषी विभाग माणगांव व पंचायत समिती माणगांव यांच्या संयुक्त विद्यमानाने १ जुलै रोजी कृषी दिन पंचायत समिती माणगांव येथे साजरा करण्यात आला. 
      या वेळी तालुक्यातील सन २०२०-२१ या वर्षातील भात पीक स्पर्धेतील विजेते श्री. चिंतामण सत्वे, शिरसाड किसन गोगरेकर, दीपक तवटे, विळे या गावातील शेतकरी यांना मा. सभापती सौ. अलकाताई जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व फळझाड देऊन सत्कार करण्यात आला. 
    तसेच तालुक्यातील महिला शेतकरी गट यांना परसबागेतील भाजीपाला लागवड करण्यासाठी भाजीपाला व तूर बियाणे यांचे वाटप करण्यात आले. तसेच तालुक्यांमध्ये बॉयोगॅस योजना ग्रामपंचायत स्थरावर उत्कृष्टपणे राबविणारे ग्रामसेवक श्री, राहुल ठाकूर व नरेश तरडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.     
     यावेळी श्री. लवटे कृषी विस्तारा अधिकारी यांनी वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल मार्गदर्शन केले. श्री. बी. व्ही. काप कृषि अधिकारी यांनी उपस्थितास कृषि दिनाचे महत्व व पंचायत समिती अंतर्गत कृषि विभागाचे विविध योजना याबद्दल माहिती दिली,  तसेच श्री. आर डी पवार तालुका कृषी अधिकारी माणगाव यांनी दिनांक २१ जून ते १ जुलै रोजी कृषी संजीवनी या मोहिमे अंतर्गत तालुक्यांमध्ये १५० गावांमध्ये १४५० शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन तसेच दहा टक्के खतांची बचत आणि खताचा वापर भात लागवडीच्या पद्धती, फळबाग लागवड इत्यादी उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले. कृषी संजीवनी मोहिमेचे समारोपावेळी माननीय सभापती अलकाताई जाधव यांच्या हस्ते पंचायत समितीचे आवारामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. 
      यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सौ. नाखले मॅडम, कृषी विस्तार अधिकारी बी. व्ही. काप, अशोक मार्कड विस्ताराधिकारी,  श्री.  पडवळकर मंडळ कृषी अधिकारी गोरेगाव, श्री ससाने कृषी पर्यवेक्षक व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...