Monday, 31 March 2025

गाव विकास समितीच्या माध्यमातून नागरिकांसाठी बस स्टॉप शेडचे लोकार्पण !

गोताडवाडी फाटा,धावडेवाडी व गोताडवाडी येथे एकाच वेळी गाव विकास समितीच्या माध्यमातून नागरिकांसाठी बस स्टॉप शेडचे लोकार्पण !

कोकण, (शांताराम गुडेकर) :

          नागरिकांच्या सुविधेसाठी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या माध्यमातून अध्यक्ष उदय गोताड,उपाध्यक्ष मंगेश धावडे, राहुल यादव, मंगेश कांगणे, सुनील खंडागळे, सुरेंद्र काबदुले यांच्या सहकार्याने व ग्राम पंचायत सदस्य नितीन गोताड यांच्या पाठपुराव्यामुळे करंबेले तर्फे देवळे गावातील धावडे वाडी, गोताडवाडी फाटा, गोताड वाडी येथे एकाच वेळी प्रवासी थांबा शेड चे लोकार्पण करण्यात आले. यावेळी गावातील मान्यवर ग्रामस्थ गावकर राजेश गोताड, माजी पोलीस पाटील रामचंद्र धावडे, यांच्यासह तरुण वर्ग व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावकाराच्या जाचाला कंटाळून युवकाची आत्महत्या !

सावकाराच्या जाचाला कंटाळून युवकाची आत्महत्या !

** सर्व सावकारांवर कारवाई करण्याची कुटुंबीयांची मागणी.  

कल्याण, संदीप शेंडगे : मोहने जेतवननगर येथील युवकाने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत युवकाने सावकाराच्या अनैतिक आणि अमानवी वागणुकीचा उल्लेख केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून कुटुंबीयांनी सावकारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.  

जेतवननगर येथील रहिवाशी रिक्षाचालक विजय जीवन मोरे यांनी सावकाराच्या जाचाचा  कंटाळून आत्महत्या केली आहे कुटुंबीयांना यात दोषी धरू नये तसेच सावकारावर कडक कारवाई करण्यात यावी असे आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत उल्लेख केला आहे.

रिक्षाचालक विजय मोरे काही दिवसांपासून सावकारांच्या तगाद्यामुळे त्रस्त होता. तो प्रचंड मानसिक तणावामध्ये होता. दैनंदिन रोजची परतफेड तसेच महिन्याला 20 ते 30 टक्के दराने त्याने सावकारांकडून पैसे घेतले होते घेतलेल्या कर्जावर मोठ्या प्रमाणात व्याज आकारले जात होते. व्याजफेडीचा प्रचंड ताण सहन न झाल्याने अखेर विजय यांनी सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा  संपवली. 
युवकाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी सावकारांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. "जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही," असा ठाम निर्धार कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. दोन महिन्यांत अशा स्वरूपाची ही दुसरी घटना असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.  

प्रशासनाची भूमिका आणि पुढील कारवाई __

या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सर्व सावकारांची चौकशी करून त्यांच्या कर्जवसुली पद्धतींचा आढावा घेण्याचे आदेश खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.अमरनाथ वाघमोडे यांनी पोलिसांना दिले आहेत. रिक्षा चालक गोर गरीब यांना चढा व्याज दराने कर्ज देऊन सक्तीची वसुली करणाऱ्या सर्व सावकारांची माहिती संकलित करण्यात येईल तसेच आत्महत्येला जबाबदार असलेल्या सर्व सावकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी आपले आंदोलन मागे घेतले. कर्जवसुलीच्या अनैतिक आणि बेकायदेशीर पद्धतींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  

सावकारांच्या जाचामुळे तरुणांने जीवन संकटात येत असल्याने समाजातून संताप व्यक्त केला जात आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर नियम आणि कारवाईची मागणी सर्वत्र होत आहे. सरकार आणि प्रशासनाने अशा घटनांना गालबोट लागू नये यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

कॉस्मोग्लोबल मानवाधिकार संघटन प्रमुख नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून कार्यकर्त्याच्या भेटीला सुरुवात !!

कॉस्मोग्लोबल मानवाधिकार संघटन प्रमुख नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून कार्यकर्त्याच्या भेटीला सुरुवात !!

** मानवतावादी विचारांसह मानवी हक्कांचा प्रसार करण्याचे प्रयत्न

ठाणे, (शांताराम गुडेकर) :
               कॉस्मोग्लोबल ह्युमन राईट्स विचार संघम असोसिएशन ऑफ इंडिया संघटन प्रमुखांची अंबरनाथ शहराला विशेष भेट लाभली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला, अंबरनाथ नगर कार्यकारिणी सदस्यांच्या वतीने आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंदे यांच्या पुढाकाराने जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अंबरनाथ येथील बुद्ध विहार येथे आदरांजली वाहण्यात आली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे आणि ओळखपत्रे देण्यात आली आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब शिंदे हे देखील उपस्थित होते. श्री.डोमिनिक फ्रान्सिस, महाराष्ट्र सचिव, श्री.बंधू नागवंशी- अंबरनाथ शहराध्यक्ष, श्री.वेंकटेश गट्टेगला- उपाध्यक्ष अंबरनाथ, श्री.राजू रामप्पा म्हात्रे- तालुका अध्यक्ष, श्री.मंगल देवराम, श्री.मिश्राजी सर, श्रीमती लक्ष्मी नारायण कोळी, श्रीमती संतोकृष्ण कोळी, जागृती चंद्रशेखर गट्टेगला कॉलियर, गणपती कॉलियर शहर समितीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम चे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सचिव मच्छिंद्र मोरे यांनी केले.
            अंबरनाथच्या नागरिकांनी मोठी कामगिरी केली आहे.आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सहभागींना मार्गदर्शन करताना संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश कांबळे यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले.आज मराठी नववर्षाच्या सुरुवातीला अंबरनाथ शहराध्यक्ष श्री.बंडू नागवंशी यांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री‌बाळासाहेब शिंदे यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांना एकत्र केले आणि त्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला ओळखपत्रे आणि नियुक्तीपत्रे दिली. त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली आणि जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी विचारांसह मानवी हक्कांचा प्रसार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. लोकांमध्ये मानवता पसरावी म्हणून आम्ही भारतीय संविधानानुसार प्रत्येक गावातील लोकांपर्यंत मानवी हक्क आयोगाचे मानवी हक्क पोहोचवत आहोत. देशाच्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही लोकांना मानवाधिकार आयोगाबद्दल माहिती नाही. लोक मानवी हक्क विसरले आहेत. म्हणूनच आपण कोणाची बहीण, मुलगी किंवा सून हे ओळखत नाही. पिडीत महिलांची संख्या वाढत आहे. म्हणूनच, संस्थेच्या वतीने आम्ही संपूर्ण भारतात मानवी हक्क, सुरक्षा आणि स्वातंत्र्याचे उदाहरण पसरवण्यात सहभागी आहोत आणि लोकांना त्यात सामील होण्याचे आवाहन करतो असे सांगितले. अधिक माहितीसाठी कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संगम असोसिएशन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या बाजूला, वैष्णवी सोसायटी गेट समोर, करुणा को.आप हौ.सो, श्री हरी कॉम्प्लेक्सच्या जवळ, छत्रपती राजर्षी शाहू महाराज नगर, तिसगाव पाडा कल्याण पूर्व ४२१३०६.भ्रमणध्वनी क्रं.९९६९११७७३८ ईमेल-cgmanavadhikar022@gmail.com येथे संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रकाश कांबळे यांनी केले आहे.

Sunday, 30 March 2025

श्री कांडकरी विकास मंडळाचा शिमगोत्सव-२०२५ मोठ्या उत्साहात साजरा !

श्री कांडकरी विकास मंडळाचा शिमगोत्सव-२०२५ मोठ्या उत्साहात साजरा !

कोकण (शांताराम गुडेकर) :

            श्री कांडकरी विकास मंडळ, कासार कोळवण, ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी हे मार्लेश्वर पंचक्रोशीत गेली ३३ वर्षे निरंतर कार्यरत असलेले आणि गावच्या विकासासाठी समाजसेवेचा वसा घेतलेले एक नामांकित मंडळ आहे. शिमगोत्सव म्हणजे कोकणवासीयांसाठी भक्तीची, उत्साहाची, आनंदाची आणि परम सुखाची पर्वणी असते. श्री कांडकरी विकास मंडळाच्या उत्साही आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांच्या उत्साहाला शिमगोत्सवात उधाण येते. याही वर्षीचा श्री कांडकरी विकास मंडळाचा शिमगोत्सव अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. गेले सहा महिने कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत फलद्रूप झाली.अत्यंत विलोभनीय आकर्षक विद्युत रोषणाईत न्हावून निघालेले मनोहारी श्री कांडकरी देवाचे मंदिर आणि रंगीबेरंगी पडद्यांच्या सजावटीच्या झगमगाटाने सजलेला परिसर हे वाडीच्या शिमगोत्सवाचे मुख्य केंद्र होते.

             श्री कांडकरी विकास मंडळ आयोजित तीन दिवशीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अप्रतिम होते. गुरूवार, दिनांक २० मार्च रोजी सायं. ४ ते ६ स्थानिक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, सायं. ७ ते रात्रौ ९ पुरुषांच्या विविध स्पर्धा पार पडल्या. शुक्रवार, दिनांक २१ मार्च रोजी सायं. ४ ते ६ उर्वरित क्रिकेट स्पर्धा आणि संध्या. ७ ते ९ महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शनिवार दिनांक २२ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत श्री कांडकरी मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा मोठ्या भक्तीभावाने साम्रसंगीत संपन्न झाली. दुपारी १ ते ३ भाविकांसाठी आयोजित करण्यात आलेला महाप्रसाद (भंडारा) सर्वांना भावभक्तीची आणि अन्नदानाची महती सांगणारा तसेच एकत्रित  सहभोजनाचा आनंद देणारा ठरला. 
             श्री कांडकरी देव मंदिराच्या मागे वाहणाऱ्या ओढ्यावर बंधारा बांधणे नियोजित आहे. त्या बंधाऱ्याचा भूमीपूजन सोहळा सायं. ४ वाजता आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शेखरजी निकम सर यांच्या पत्नी आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा, माजी सभापती मान. सौ. पुजा शेखर निकम मॅडम आणि सरपंच सौ. मानसी करंबेळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी गावातील बहुतांश मान्यवर मंडळी उपस्थित होती. 
              दरवर्षी होणारा हळदीकुंकू समारंभ म्हणजे मंडळाचे खास वैशिष्ट्य होय. सायं. ४.३० ते ६ या वेळेत हळदीकुंकू समारंभ पार पडला. वाडीतीलच नव्हे तर गावातील सकल महिला वर्ग तसेच माहेरवाशिणी या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सन्माननीय सौ. पुजा निकम मॅडम आपल्या महिला सहकाऱ्यांसह या हळदीकुंकू समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून आवर्जून उपस्थित होत्या. त्यामुळे या समारंभाला विशेष वलय प्राप्त झाले. मान. सौ. पुजा निकम मॅडमच्या हस्ते विजेत्या महिलांना पैठणी वाटप करण्यात आले. सरपंच सौ. मानसी करंबेळे यांच्या सौजन्याने दहा पैठणी साड्या प्राप्त झाल्या होत्या. या समारंभाला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रचंड प्रतिसाद मिळाला.सायं. ७ वाजता श्री कांडकरी देव मंदिराच्या प्रांगणात सांबा देव पालखी नाचविण्याचा नयनरम्य सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. श्री सांबा देवाची पालखी नाचवताना चाकरमानी आणि ग्रामस्थ यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. देवाची पालखी नाचवताना पाहणे हे सुद्धा आगळेवेगळे सुख अनुभवायला मिळाले.
           श्री कांडकरी विकास मंडळ आयोजित शिमगोत्सवात यावर्षीही अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी सन्मानाने उपस्थित होती. त्यांनी मंडळाच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.रात्री ९ वाजता बक्षीस वितरण आणि सत्कार समारंभ गावचे पोलीस पाटील मान. श्री. महेंद्र करंबेळे, सरपंच मान.सौ. मानसी करंबेळे आणि गावचे गावकर मान. नथुराम करंबेळे, वाडी गावकर मान. सूर्यकांत करंबेळे आणि श्री कांडकरी विकास मंडळाचे अध्यक्ष मान.श्री.संतोष करंबेळे तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.रात्री ११ वाजता करबुडे गावचे सुप्रसिध्द आणि गाजलेले अभिनय संपन्न नमन मनोरंजनाचे प्रमुख आकर्षण होते. या ग्रामीण कलेला मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता. विशेषत: गणगौळण, रावणाचे गर्वहरण हा वग वैशिष्ट्यपूर्ण होता आणि शेवटी रावणाबरोबरचे वाडीतील युवकांचे 'अनोखे युद्ध' विशेष गाजले.अशाप्रकारे श्री कांडकरी नगरीत (मावळती वाडीत) श्री कांडकरी देवालयात भक्तीमध्ये रंगलेला आणि ग्रामस्थ-मुंबईकर यांच्या उत्साहाने ओथंबलेला तीन दिवशीय महोत्सव फार सुंदररित्या पार पडला. या तीन दिवशीय महोत्सवात बालकलाकारांपासून महिला वर्गापर्यंत तसेच युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. महिलांच्या स्पर्धांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता. युवकांच्या क्रीडा स्पर्धाही गाजल्या. मोठ्या प्रमाणात साजरा झालेल्या या उत्सवात लहानथोर सगळ्यांनी हातभार लावला. युवकांचे उत्तम पाठबळ लागले तर श्री कांडकरी महिला मंडळाने खूप मेहनत घेतली. श्री कांडकरी विकास मंडळाच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि वाडीतील ग्रामस्थ यांनी मोलाचे योगदान दिल्यामुळे या वर्षीचा शिमगोत्सव अभुतपूर्व यशस्वी झाला.शिमगोत्सवाचे हे मंत्रमुग्ध करणारे दिवस पुढच्या शिमगोत्सवापर्यंत वर्षभर आनंद देत राहतील. श्री कांडकरी विकास मंडळाची देदीप्यमान कामगिरी यापुढे अशीच चालू राहिल अशी ग्वाही मंडळाचे अध्यक्ष श्री.संतोष करंबेळे यांनी दिली.

Saturday, 29 March 2025

गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी !

गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी !

पुणे, प्रतिनिधी : भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने (Ministry of Labour & Employment) गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली असून नोंदणी करून घेण्यासाठी पात्र गिग कामगारांनी http://register.eshram.gov.in/#/user/platform-worker-regitration, या अधिकृत लिंकवर जाऊन त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत प्लॅटफॉर्म इकोनॉमी भारतात आणि जागतिक स्तरावर रोजगार निर्मितीचे एक मोठे साधन बनले आहे. लाखो गिग कामगार या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांना सुरक्षित भविष्यासाठी सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून केंद्र शासनामार्फत गिग कामगारांच्या नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. 

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या गिग कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे ओला, उबेर, रॅपिडो, झोमॅटो, स्विगी, झेपटो, ब्लिंकीट, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो, अरबन क्लॅप यासारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉय, राइडर, ड्रायव्हर आणि इतर गिग कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

इंडियन रेडक्रॉस सोसायटीवर सहयोगी सदस्य म्हणून नितिन अहिरराव यांची निवड !

इंडियन रेडक्रॉस सोसायटीवर सहयोगी सदस्य म्हणून नितिन अहिरराव यांची निवड !

चोपडा वार्ताहर,
जळगांव जिल्हा इंडीयन रेडक्रॉस सोसायटीवर ३ वर्षाच्या अंतरिम कालावधीसाठी निवडलेल्या ६३ नवीन सहयोगी सदस्यांमध्ये चोपडा येथील नक्षत्र ज्वेलर्स चे संचालक तसेच रोटरी परिवारातील श्री नितिन अहिरराव यांची निवड झाली.
कालच जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद साहेब यांच्या हस्ते रेडक्रॉसचे सन्मानचिन्ह देऊन नितिन अहिरराव यांचा सत्कार करण्यात आला. नितिन अहिरराव हे रोटरी क्लब चोपडा चे माजी अध्यक्ष तसेच रोटरी 3030 सह प्रांतापाल आहेत. सामाजिक सेवेत  केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यलयातून निवड झाली आहे.

पदग्रहण सोहळ्यात रेडक्रॉस सोसायटीचे पदाधिकारी गनीजी मेनन, विनोद जी बियाणी, डॉ.प्रसन्न कुमार रेदासानी, घनश्याम जी महाजन, सुभाष जी सांखला, विजय जी पाटील, पुष्पाताई भंडारी, शांताबाई वाणी, डॉ नरेन्द्र ठाकूर यासोबत इतर पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल नितिन अहिरराव यांचे मित्र मंडळी तसेच रोटरी परिवाराकडून अभिनंदन होत आहे. 

रेडक्रॉस ही जगातील १८७ देशांमध्ये ७० लाख स्वयंसेवकांच्या सहकार्याने अखंडपणे सेवा देणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. सर हेनरी ड्यूनान्ट यांनी या आंतरराष्ट्रीय मानवतावादी सेवाभावी दृष्टीकोनातून संस्थेची स्थापना केली होती. भारतात दिल्ली येथे १९२० साली रेडक्रॉस सोसायटीची स्थापना झाली.
रेडक्रॉस दिल्ली या राष्ट्रीय पातळीवर महामहीम राष्ट्रपती, तर राज्य पातळीवर महाराष्ट्रचे राज्यपाल, जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी या संस्थेला पदसिद्ध अध्यक्ष असतात. अशा या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेवर जळगाव जिल्हा शाखेवर नितिन अहिरराव यांची सहयोगी सदस्य म्हणून निवड झाली आहे.

या संस्थेमार्फत मार्फत गरजूंना २४ तास रक्तसेवा उपलब्ध असते तसेच कॅन्सर संजीवनी मार्गदर्शन केद्र, रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्सन केंद्र, ईं सेतू सुविधा, निक्षय मित्र योजना, पर्यावरण व वृक्षारोपण संवर्धन असे अनेक उपक्रम संस्थेमार्फत चालू असतात.

स्वच्छ भारत अभियान २.० मध्ये उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाची बाजी !

स्वच्छ भारत अभियान २.० मध्ये उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाची बाजी !

विरार, पंकज चव्हाण - वसई विरार शहर महानगरपालिका आयोजित स्वच्छ भारत अभियान २.० आणि स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ अंतर्गत वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता जनजागृतीच्या संदर्भात स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेमध्ये विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. विविध आंतरमहाविद्यालयीन आणि शासकीय स्पर्धांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये या महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केलेले आहे.

महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मुग्धा लेले, श्रीमती कल्पना राऊत, उपप्राचार्य प्रा. सुभाष शिंदे, प्रा. रमेश पाटील आणि प्रा. हेमा पाटील तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील समन्वय समितीचे सदस्य यांनी अनमोल असे मार्गदर्शन केलेले होते . ‘ स्वच्छ भारत - सुंदर भारत’ ही काळाची गरज असल्याचे मत प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या सचिव अपर्णा ठाकूर आणि संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी कौतुक केले.

आंबेडकरी चळवळीतील संघर्ष नायक श्री. दादासाहेब पी. बी. खडसे यांचे योगदान व कार्य अतुलनीय - माजी नगरसेवक श्री सुरेश मेश्राम

आंबेडकरी चळवळीतील  संघर्ष नायक श्री. दादासाहेब पी. बी. खडसे यांचे योगदान व कार्य अतुलनीय -  माजी नगरसेवक श्री सुरेश मेश्राम 

अमरावती (प्रतिनिधी) : गेल्या 25 ते 30 वर्षापासून दलित पँथर,जागतिक बौद्ध महासभा, भारतीय रिपब्लिकन पॅंथर मोर्चा, प्रेस संपादक व पत्रकार संघ, आदी आंबेडकरी संघटनांचे  नेतृत्व करत सतत आंबेडकरी चळवळीमध्ये प्रामाणिकपणे कार्य करणारे आंबेडकरी चळवळीतील संघर्ष नायक श्री. दादासाहेब पी.बी. खडसे यांचे सामाजिक कार्य व योगदान अतुलनीय असेच आहे असे मनोगत माजी नगरसेवक श्री. सुरेश मेश्राम यांनी भारतीय रिपब्लिकन पॅंथर मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दादासाहेब पी. बी.खडसे यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये दिनांक 29मार्च रोजी, दुपारी 1वा. स्थानिक इर्विन चौक येथे मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री. आनंद हिवराडे गुरुजी हे होते. यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून पूज्य भन्ते मनोरथ यांनी  उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले. यावेळी निर्भीड पत्रकार तसेच   भारतीय रिपब्लिकन पॅंथर मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दादासाहेब पी. बी.खडसे  यांच्या जीवनावर  आणि कार्यावर प्रकाश टाकणारे  मनोगत उपस्थित वक्त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

आंबेडकरवादी रिपब्लिकन चळवळीचे सरसेनापती, तसेच निर्भीड पत्रकार, दैनिक लोकतंत्र नायक मुख्य संपादक, प्रेस पत्रकार संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष, झुंजार पॅंथर  श्री. दादासाहेब पी. बी. खडसे  यांच्या सामाजिक कार्याचा गुणगौरव करत त्यांना शाल व पुष्प गुच्छ देऊन  त्यांचा आंबेडकरी चळवळीतील कार्याचा गुणगौरव म्हणून कार्यकर्त्यांनी व पुढाऱ्यांनी याप्रसंगी  संघर्ष नायक श्री. दादासाहेब पी.बी. खडसे यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाला महानायक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक श्री. सुरेश मेश्राम, भारतीय रिपब्लिकन पॅंथर मोर्चाचे राष्ट्रीय सचिव श्री .मनोज ढवळे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री. आनंदराव हिवराडे गुरुजी, न्याय अधिकार सभेचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट पृथ्वीसम्राट दीपवंश, प्रसिद्ध आंबेडकरी कवी व गायक श्री. प्रकाशदीप वानखडे, दलित पॅंथरचे राष्ट्रीय सचिव श्री. प्रदीप महाजन,  सातबारा संघटनेचे विदर्भ अध्यक्ष श्री.अजय मंडपे, रवींद्र इंगळे, प्राध्यापक श्री खंडारे सर, भीमसेनेचे श्री.नंदकिशोर पाटील, दलित पॅंथर चे नेते भाऊसाहेब वाहने,श्री.दिनेश गाजवे, डॉ. नीलम रंगारकर,कास्ट ट्राईब संघटनेचे नेते श्री. व्ही. वानखडे, श्री. मिलिंद कांबळे, श्री.रंजन घरडे, श्री.प्रवीण मंडे,
 यांचे सह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते.
------------------------------------------------
 प्रेषक -
श्री. सुरेश मेश्राम
 संस्थापक अध्यक्ष- महानायक संघटना महाराष्ट्र राज्य
mob. 9022508746
-------------------------------------------

Friday, 28 March 2025

रायते येथील सुभेदार फार्म हाऊसवर जेसीबीच्या साह्याने तोडफोड ; ९४ हजार रुपयांचे नुकसान !

रायते येथील सुभेदार फार्म हाऊसवर  जेसीबीच्या साह्याने तोडफोड ; ९४ हजार रुपयांचे नुकसान !

**प्रमिला घोडबंदेसह तिघांना अटक करण्याची मागणी 

संदीप शेंडगे, टिटवाळा : गेल्या 35 वर्षापासून रायते गाव सुभेदार फार्म हाऊस येथे राहत असलेले महेंद्र सुभेदार यांच्या फार्म हाऊसवर जेसीबीच्या साहाय्याने तोडफोड करण्यात आली असून, या घटनेत पत्र्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना 26 मार्च 2025 रोजी रात्री 8.30 वाजता घडली असून या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महेंद्र सुभेदार यांनी संभाजी सुरोशी यांच्याकडून सर्वे नंबर 68, हिस्सा नंबर 13 मधील 94 गुंठे जमीन खरेदी केली होती तिचे उपनिबंधक यांच्याकडे रीतसर रजिस्टर करून घेण्यात आले आहे. या जमिनीवर गेल्या 35 वर्षापासून त्यांचा ताबा असून पत्नी सुनीता सुभेदार यांच्यासोबत ते येथे राहत आहेत मात्र, या जमिनीवर हक्क सांगत या जमिनीमध्ये माझी दहा गुंठे जमीन आली आहे असे सांगून प्रमिला विकास घोडबिंदे, उज्ज्वला यशवंत सुरोशी, यशोदा यशवंत सुरोशी आणि जयवंत यशवंत सुरोशी यांनी बेकायदेशीरपणे जेसीबीच्या साहाय्याने फार्म हाऊसचे कंपाउंड आणि पत्र्याच्या शेडची तोडफोड केली. या तोडफोडीत 94 हजार रुपयांचे नुकसान झाले असून, शेडमध्ये असलेल्या 70 ते 80 कोंबड्या पळून गेल्या आहेत. यामध्ये सुभेदार यांचे 94 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 333, 324, 352, 351(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

जेसीबीच्या साह्याने तोडफोड करतानाचे संपूर्ण व्हिडिओ चित्रण महेंद्र सुभेदार यांच्याकडे उपलब्ध असून व्हिडिओ चित्रे करण्याच्या माध्यमातून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे टिटवाळा पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सुभेदार कुटुंब भयभीत झाले आहे. तसेच आम्ही या फार्म हाऊस वर एकटे राहतो वरील आरोपींकडून आमच्या जीवाला धोका असून आम्हाला पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी महेंद्र सुभेदार यांनी केली आहे

Wednesday, 26 March 2025

पुरोहित, मनुवाद्यांच्या कब्जातून बोधगया स्थित महाबोधी बुद्ध विहार केव्हा मुक्त होणार ? - दादासाहेब पी. बी. खडसे (राष्ट्रीय अध्यक्ष - भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चा)

पुरोहित, मनुवाद्यांच्या कब्जातून बोधगया स्थित महाबोधी बुद्ध विहार  केव्हा मुक्त होणार ? - दादासाहेब पी. बी. खडसे (राष्ट्रीय अध्यक्ष - भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चा)

              जम्बूद्वीपामध्ये अडीच हजार वर्षांपूर्वी शाक्य वंशातील सिद्धार्थ गौतम या राजपुत्राला बोधगया येथील पिंपळाच्या वृक्षाखाली संबोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झाले. शाक्यमुनी सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले, ते संम्यक सम्बुद्ध अहर्त  झाले.
               सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग करून बोधीअर्थात ज्ञान प्राप्त करण्यासाठी, ज्ञान मिळविण्यासाठी नानाविध प्रकारचे  प्रयत्न केले. सिद्धार्थ गौतमाचा सत्य शोधण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. सिद्धार्थ गौतमाला दुःख मुक्तीचा मार्ग कळाला आणि सिद्धार्थ गौतम हे बुद्ध झाले. सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले ते फक्त स्वतःच्या प्रयत्नाने, स्वतःच्या त्याग बलिदानाने, स्वतःच्या तपश्चर्याने, स्वश्रमाणे, स्वप्रयत्नाने. सिद्धार्थ गौतम यांनी बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, अन्न त्याग केले, साधना केली आणि मार सेना अर्थात तृष्णेवर विजय प्राप्त करून  शाक्य कुळ वंशाचा राजपुत्र  सिद्धार्थ गौतम हे बुद्ध झाले.
              भगवान, सम्यक, सम्बुद्ध, अहर्त, तथागत बुद्धाने जे ज्ञान मिळविले, जो दुःख मुक्तीचा मार्ग शोधून काढला, जो धम्म शोधून काढला तो बुद्धाचा स्वतंत्र शोध होता.
              संपूर्ण विश्वातील अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धा, दुःख दूर करण्यासाठी भगवान बुद्धाने पंचवर्गीय भिक्षुंना धम्माची पहिली धम्मदेशना देऊन धम्मचक्र प्रवर्तन केले आणि  बुद्धाने आपला धम्म  जनजनांपर्यंत जावा तसेच इतरांना दुःख मुक्तीचा मार्ग  कळावा, निब्बानाचा साक्षात्कार व्हावा यासाठी भिख्खु, भिक्षु  संघ बनविला, भगवान बुद्धाने त्यांच्या भिख्खु संघात स्त्री आणि पुरुष यांना सामावून घेतले. गृहत्याग करून निब्बाण अर्थात निर्वाण, बोधी अर्थात ज्ञान  प्राप्त करण्याचा मार्ग सिद्धार्थ गौतम बुद्धाने सर्वांसाठी प्रशस्त केला, खुला केला. बुद्धाने प्रत्येक  प्राणीमात्रांवर, मनुष्यमात्रांवर करुणा केली आणि त्यांचा धम्म हा,महाकारुनिक बुद्धाने शेवटच्या क्षणापर्यंत आणि श्वासापर्यंत मांडण्याचा, सांगण्याचा, उपदेशीत करण्याचा प्रयत्न केला. सिद्धार्थ गौतम बुद्ध  यांनी दुःखमुक्तीचा मार्ग शोधला, ज्ञान शोधून काढले, निर्वाणाचा मार्ग शोधला.
              सिद्धार्थ गौतम बुद्धाने या विश्वाला तीन शरण, अर्थात त्रिशरण म्हणजे मी बुद्धाला शरण जातो  हे पहिले शरण, मी बुद्धाच्या धम्माला शरण जातो हे दुसरे शरण, आणि मी बुद्धाच्या संघाला शरण जातो हे तिसरे शरण दिले, तथागत भगवान बुद्धाने  उपासक अनुयायांसाठी पाच शील  अर्थात पंचशील दिले. संघातील भिक्खूंसाठी दहा शील दिले. आणि  नियम दिलेत. प्रज्ञा,शील,करुणा चा उपदेश भगवान बुद्धांनी जगाला दिला आहे. सिद्धार्थ गौतम  बुद्धांने स्वतःला मार्गदर्शक म्हणून संबोधलेले आहे.                
             सिद्धार्थ गौतम बुद्ध हे या विश्वाला मिळालेली  अनमोल देणगी आहे. बुद्धाचा जन्म, बुद्धाला ज्ञान प्राप्ती आणि बुध्दाचे महापरिनिर्वाण या  भारत वर्षामध्ये, जम्मूद्वीपामध्ये  झाले. भारत ही बुद्धाची भूमी आहे. भगवान बुद्धाचा धम्म,धम्ममार्ग  भारताच्या भूमी बाहेर अनेक राष्ट्रांनी अंगीकारला,स्वीकारला. या  विश्वातील अनेक राष्ट्र हे बुद्धाचे अनुयायी झालेले आहेत.
            सिध्दार्थ गौतम बुद्धाला ज्या  बोधगया  येथील पिंपळ वृक्षाखाली  ज्ञान प्राप्त झाले त्या ठिकाणची, सत्याची साक्ष तेथील बोधीवृक्ष आजही  देत आहे. प्रियदर्शी सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर बोधगया स्थित महाबोधी बुद्ध विहार बांधले. प्रियदर्शी सम्राट अशोकाने त्याच्या शासन काळात 84 हजार स्तूप, बुद्ध विहार सुद्धा बांधले,  84 हजार बुद्ध विहार आजही भारत वर्ष अर्थात भारतात, वेगवेगळ्या विहार मंदिरा च्या स्वरूपात अस्तित्वात आहे, अनेक ठिकाणी बुद्ध मूर्तीला भट पुरोहितानी पोटा पाण्याच्या साधनासाठी वैदिकवादी कथित देवी देवता बनवून, बुद्ध संपदेला विद्रुप करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे पण भट ब्राम्हण, पुरोहिताना बुद्ध लपवून ठेवता आला नाही, बुद्ध सूर्या प्रमाणे वास्तविकतेला, इतिहासाला सत्याला प्रतिबिंबित करत आहे.बुध्दाचे अस्तित्व, बुध्दाचे सत्य, बुद्धाचा धम्म आजही सूर्य प्रकाशाप्रमाणे झळझळत आहे, दिपवत आहे.
              प्रियदर्शी सम्राट अशोकाने बांधलेले बोधगया स्थित महाबोधी बुद्ध विहार हे आजही जगाला सम्यक, सम्बुद्ध, अहर्त  सिद्धार्थ गौतम बुद्धाचा धम्म, बुद्ध विचार, बुद्ध तत्त्वज्ञान, धम्ममार्ग, बुद्ध इतिहास  यांची ग्वाही देत जगातील बुद्ध अनुयायांना, बौद्ध धम्म बांधवांना  आकर्षित करीत आहे. भारतातील बिहार  राज्यातील गया स्थित महाबोधी बुद्ध विहार  हे धम्म  प्रेरणेचे आणि जगातील बौद्ध अनुयायांचे पवित्र श्रद्धास्थान आहे. असे असताना भारतातील वैदिकवादी भट, ब्राह्मण, पुरोहित, मनुवाद्यांनी चोरट्या मार्गाने, कपटनीती आणि षडयंत्राने  बुद्धाच्या धम्मामध्ये, बुद्ध साहित्यामध्ये    घुसखोरी करण्याचा प्रयत्न भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ते अद्याप पर्यंत सुरू ठेवलेला आहे. हे मनुवाद्यांचे बुद्ध धम्म आणि बुद्धाच्या संघा विरोधी कृत्य आहे.
प्रियदर्शी सम्राट अशोकाने बांधलेल्या बोधगया स्थित  महाबोधी बुद्ध विहार  या बुद्ध मंदिर वास्तु शिल्पाशी, वैदिक भट ब्राह्मण पुरोहितांचा कुठलाच संबंध नाही. बोधगया स्थित महाबोधी बुद्ध विहार हे  भारतातील आणि विश्वातील बौद्ध अनुयायांची धरोवर आहे. धम्माची धरोवर आहे.
              तेव्हा वैदिकवादी भट ब्राह्मण पूर्रोहितांनी बोधगया येथील महाबोधी बुद्ध विहार  येथे घुसखोरी करू नये.  भगवान बुद्ध यांच्या  बुद्ध धम्म धरोवरेला विद्रूप करू नये.
               विद्यमान भारत सरकारने तसेच विद्यमान बिहार राज्य सरकारने बोधगया टेम्पल ऍक्ट 1949  कायमस्वरूपी रद्द करून बोधगया स्थित महाबोधी बुद्ध विहार हे बौद्ध धर्मीय अनुयायांच्या, बौद्ध भिक्षूंच्या  विना विलंब ताब्यात द्यावे.
भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे एवढा अफाट काळ लोटून गेलेला आहे.
              विश्वरत्न,महामानव, बोधिसत्व, भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  या स्वतंत्र भारत देशाला भारताचे संविधान बहाल केले.  भारतीय संविधानाने  भारतातील प्रत्येकाला उपासनेचे धर्म स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. भट ब्राह्मण  पुरोहितांचा कुठलाही संबंध बुद्धगया स्थित महाबोधी बुद्ध विहाराशीं नसताना  बोधगया टेम्पल ऍक्ट 1949  तातडीने रद्द होणे गरजेचे आहे.
              स्वातंत्र्यानंतर भारतातील करोडो बौद्ध अनुयायी हे  मनुवाद्यांच्या, जातीयवाद्यांच्या अन्याय, अत्याचार, शोषण, अंधश्रद्धेला बळी ठरत आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
भट,ब्राह्मण पुरोहित मनुवाद्यांच्या जाखडातून महाबोधी बुद्ध विहार केव्हा मुक्त होणार? असा भीषण प्रश्न भारतातीलच नव्हे तर विश्वातील बौद्ध अनुयायांना पडला आहे. जर महाबोधी बुद्ध विहार तातडीने मुक्त झाले नाही तर, बुद्धगया स्थित महाबोधी बुद्ध विहार बौद्ध अनुयायांच्या ताब्यात त्वरीत मिळाले नाही तर  विशाल, विराट स्वरूपामध्ये  विश्वातील बौद्ध अनुयायांची जनआंदोलना ची मशाल पेटतच राहील यात दुमत नाही.

            आता तात्काळ भारत सरकारने आणि बिहार राज्य सरकारने बुद्धगया टेम्पल ऍक्ट 1949 कायदा  तातडीने रद्द करून बोधगया स्थित महाबोधी बुद्ध विहार बौद्ध अनुयायांच्या आणि बौद्ध भिक्षूंच्या विनाविलंब ताब्यात द्यावे. आणि या पुढे  निरंतर, बुद्ध धम्माच्या मार्गावर चालण्यातच, बुद्ध धम्माला अनुसरण्यातच समस्त मनुष्यमात्राचे राष्ट्राचे तसेच विश्वाचे कल्याण आहे.

लेख __
____________________________________
श्री.दादासाहेब  पी. बी. खडसे
राष्ट्रीय अध्यक्ष-भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चा,
रा. अमरावती, महाराष्ट्र
mob. 9960888011
ई-मेल-irp.morcha@gmail.com


 

कल्याण पूर्व येथे राणी दुर्गावती आदिवासी मंडळ व‌* *स्फूर्ती फाउंडेशन, मी मंत्रा संयुक्त विद्यमाने महिला सन्मान सोहळा संपन्न !

कल्याण पूर्व येथे राणी दुर्गावती आदिवासी मंडळ व‌* *स्फूर्ती फाउंडेशन, मी मंत्रा संयुक्त विद्यमाने महिला सन्मान सोहळा संपन्न !

कल्याण, प्रतिनिधी :
 कल्याण पूर्व गौराई बॅंक्वेट हाॅल येथे राणी दुर्गावती आदिवासी मंडळ व‌ स्फूर्ती फाउंडेशन,मी मंत्रा संयुक्त विद्यमाने  येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिला सन्मान सोहळा शितल मंढारी अध्यक्षा - राणी दुर्गावती आदिवासी मंडळ,  शिल्पा बजरंग तांगडकर स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख, श्रृती बाविस्कर मी मंत्रा प्रमुख यांच्या संकल्पनेतून आयोजन करण्यात आला होता. विविध क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रीडा, उद्योजक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला यामध्ये  नेहा  गायकवाड, रेश्मा  खरात,रिना जयस्वाल, निलम  व्यवहारे, गीता काळे, चारुशिला पाटील, अमृता सावंत ,भावना आरोटे, हिरा आवारी, मनिषा मोरे, मिनाक्षी पाटील, पूनम जगताप, प्रतिभा वाघचौरे, पुष्पा रत्नपारखी, सुनिता राजपूत, गौतमी माने, रूपिंदर कौर, सागर घेगडमल,संगिता विसपुते,श्रृती बाविस्कर,सिमा सिंग , स्मिता गायकवाड,वैशाली पाटील, वंदना कबाडे,वंदना श्रीवास्तव,वृंदा खरडीकर,विजया जाधव, सुवर्णा राजपुत या मान्यवर महिलांचा महिलांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कल्याण पूर्व आमदार सुलभा गायकवाड, मा.नगरसेवक महेश गायकवाड, मा. नगरसेवक आनंद गायकवाड, स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर, उद्योजक रविंद्र कोठावदे, आशिष घोडके नृत्यदिग्दर्शक ,पत्रकार चारूशीला पाटील, अॅडव्होकेट भरत पाटील,आम्ही नगरकर प्रतिष्ठान अध्यक्ष मंगेश शेळके,पी डब्लू अधिकारी शिंदे ,रुपिंदर कौर ,शिक्षिका विनिषा सदडेकर, स्फूर्ती फाउंडेशन पदाधिकारी गणेश कंडू, आराधना देशपांडे,सोनाली माने ,जानव्ही शर्मा ,उपस्थित होते यावेळी जेष्ठ पत्रकार व शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करत महिलांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाची सुरुवात दिप  प्रज्वलन करून करण्यात आले, विविध सांस्कृतिक नृत्य, गायन, मनोरंजन कार्यक्रम स्पर्धा,लकी ड्रॉ,  करस्ना  लॅब कडून मोफत रक्त तपासणी, महिलांसाठी ईशा नेत्रालय व  स्प्रिंग टाईम कल्ब कल्याण तसेच विविध ब्युटी सलून कडून महिलांसाठी मोफत कुपन व  बक्षिसांची वितरण आयोजकांकडून करण्यात आली, यावेळी दररोजच्या जीवनातून वेळ काढत महिलांनी  गाण्यांचा तालावर नाच करत आनंद लूटला व विविध सांस्कृतिक नृत्य करत महिलांनी आपल्या कलेचे प्रदर्शन करत सर्वांची मने जिंकली 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक शितल मंढारी , शिल्पा तांगडकर, श्रृती बाविस्कर यांनी विशेष मेहनत घेतली व शेवटी उपस्थितांचे आभार मानले

Tuesday, 25 March 2025

डॉ. किरण राम गावंड यांचा सन्मान व पुस्तक प्रकाशन सोहळा !

डॉ. किरण राम गावंड यांचा सन्मान व पुस्तक प्रकाशन सोहळा !

 ठाणे, (पंकजकुमार पाटील) : रविवारी २३ मार्च रोजी  "काशीबाई माधवराव गावंड संग्रहालय" च्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि पुस्तकाचे लेखक डॉ. किरण राम गावंड यांना भारताच्या इतिहास आणि संस्कृतीच्या जतनासाठी "डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी" ही पदवी प्रदान केल्याबद्दलचा अभिनंदन सोहळा आमदार श्री. गणेशजी नाईक साहेब (वनमंत्री - महाराष्ट्र, पालकमंत्री पालघर व संपर्क मंत्री ठाणे), मा. खासदार संजीवजी नाईक साहेब, मा. आमदार संदीपजी नाईक साहेब व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल एक्सोटिका रिट्रीट, रॉयल एक्सोटिका, येऊर हिल्स, ठाणे येथे पार पडला.

       इतिहास व संस्कृतीच्या जतनासाठी गेली ३५ ते ४० वर्षे डॉ. किरण राम गावंड समर्पित भावनेने कार्यरत आहेत. भारतीय तत्त्वज्ञान या विषयावर हजारो व्याख्यान आजवर घेऊन त्यांनी लाखो व्यक्तींच्या जीवनामध्ये आत्मविश्वासाची पेरणी करून यशस्वी जीवन जगण्यासाठी त्यांना दिशा दिलेली आहे.
      डॉक्टर किरण गावंड यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘Prowess University, Delaware, USA’ कडून ‘Doctor of Philosophy’ ही सन्मानित पदवी प्रदान करण्यात आली आहे. Prowess University ने डॉक्टर किरण गावंड यांच्या जीवन कार्यावर आधारित इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित करून जागतिक स्तरावर त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. तुमच्या आमच्यासाठी आणि सर्व भारतीयांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
      डॉक्टर किरण गावंड यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले काशीबाई माधवराव गावंड संग्रहालय हे पुस्तक भारतीय संस्कृती, परंपरा, जीवन शैली, वारसा आणि ऐतिहासिक वस्तूंचे गौरवपूर्ण दर्शन घडविणारे पुस्तक आहे.परमपूज्य दादाजी यांच्या प्रेरणेने सुरू झालेले सातारा येथील काशीबाई गावंड संग्रहालयामध्ये भारताच्या दीडशे वर्षाच्या संपन्न वारशाचे दर्शन घडते.
     हजारो इतिहास प्रेमी आणि पर्यटक या संग्रहालयाला भेट देत असतात यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. या संग्रहालयाच्या माध्यमातून आपला गौरवशाली इतिहास डॉक्टर किरण गावंड भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवत आहेत.या संग्रहालयातून माहिती घेऊन जुन्या भांड्यांवरील हस्त नक्षी या विषयावर दोन विद्यार्थी पीएचडी देखील करीत आहेत.
       डॉक्टर किरण गावंड यांनी आयुष्यभर समाजाला देण्याचेच काम केलं. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून समाजातील वाईट प्रवृत्तींवर प्रहार करतानाच पूर, भूकंप अशा संकटकालीन परिस्थितीत धाडसाने त्यांनी केलेलं मदत कार्य आजही लोकांच्या स्मरणात आहे.
      काही मंडळी फक्त बोलतात तर काही मंडळी बोलण्याबरोबर कृतीही करतात. डॉक्टर किरण गावंड यांनी आपल्या लेखणीतून समाजाला जागृत तर केलेच पण त्याचबरोबर तत्त्वज्ञानावर व्याख्याने, उत्तम आरोग्यासाठी भारतीय योगाचा प्रचार आणि प्रसार असे हजारोंच्या संख्येने कार्यक्रमही घेतले आहेत. समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी एड्सच्या विळख्यात हे त्यांनी लिहिलेल्या पहिल्या पुस्तकाच्या दहा हजारांपेक्षा अधिक प्रति छापून रोटरी इंटरनॅशनलने त्या जगभर वितरित केल्या होत्या.
      भारतीय आपत्ती व्यवस्थापन, भारतीय सर्प विज्ञान, भारतीय आध्यात्मिक मुद्रा महत्त्व आणि उपयोग डॉक्टर किरण गावंड यांची ही काही आगामी पुस्तके लवकरच प्रसिद्ध होणार असून आपल्या सर्वांना या पुस्तकांची उत्सुकता असेल.

मुंबई मित्र आयोजित राज्यस्तरीय स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा थाटात संपन्न !

मुंबई मित्र आयोजित राज्यस्तरीय स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा थाटात संपन्न !

मुंबई, (पंकजकुमार पाटील) : मुंबई मित्रचे समूह संपादक श्री. अभिजीत राणे साहेब आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मुंबईत गोरेगाव येथील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे आयोजित करण्यात आला. 

कार्यक्रमाची सुरुवात "क्षितिजाच्या पलीकडे" या धमाल बालनाट्याने झाली. वर्षा राणे दिग्दर्शित आणि लेखक धनंजय सरदेशपांडे यांच्या या नाटकात अनन्या पोवळे, मेधांश गुजराथी, पार्थ चोडणकर, ध्रुव दळवी, हार्दिका मिरकर, हर्षित वेंगुर्लेकर बालकलाकारांनी छान अभिनय करून कार्यक्रमाची शोभा अजून वाढविली. या नंतर मुंबई मित्र आयोजित निबंध लेखन स्पर्धा, कथालेखन स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, गणेश दर्शन स्पर्धा २०२४ आदी स्पर्धांमधील विजेत्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कमेची पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये मुंबईच्या कवी भूषण तांबे यांना राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेसाठी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मराठी साहित्य क्षेत्रातील दिग्गज साहित्यिक, पत्रकार मंडळी वैभव पाटील, भारती भाईक, पल्लवी येवले, रोहिणी हस्तक, पल्लवी उमरे, भारती सावंत, प्राजक्ता बोवलेकर आणि इतर संस्थांचे पदाधिकारी या मान्यवरांना देखील पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यासाठी वर्सोव्ह्याच्या माजी आमदार भारतीताई लवेकर, माजी नगरसेवक योगीराजजी, श्री गणेश खांडकर, आयपीएस अधिकारी श्री रामराव पवार, श्री विनोद शेलार, दै हिंदी सामनाचे कार्यकारी संपादक अनिल तिवारी, श्री अमोल कीर्तिकर, श्रीमती गीताताई संजय निरुपम, सौ अनघा राणे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निनाद व जेष्ठ पत्रकार राजेश विक्रांत यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ अनघा राणे यांनी करून कार्यक्रम संपन्न झाला.

आधार कार्ड शिबिराचे आयोजन !

आधार कार्ड शिबिराचे आयोजन !

मुंबई (पंकजकुमार पाटील) : भाजपच्या वतीने आधार कार्ड शिबिराचे आयोजन कांजुरमार्ग ( पुर्व) मुंबई याठिकाणी करण्यात येणार आहे.
    दिनांक १ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या शिबिरासाठी पुर्व नोंदणी आवश्यक असून सदर शिबिर डी/१०,  उमंग ट्रस्ट लॅबोरेटरी, शहा कॉलनी, जसमीन स्टोर जवळ, कांजूरमार्ग (पूर्व) येथे सुरू होणार असून या शिबिरात नवीन आधारकार्ड, फोटो बदलणे, आधारकार्ड दुरुस्ती, पत्ता बदलणे इत्यादींसह यावेळी सिनिअर सिटीझन कार्ड देखील काढून देण्यात येणार आहे.
       अधिक माहितीसाठी सौ. अश्विनी कराडे (जिल्हा सचिव भाजप) यांच्याशी संपर्क साधावा. मो.9870347547

Thursday, 20 March 2025

डॉ. दयानंद वासुदेव राणे यांना डॉक्टर ऑफ फिलोसोफी (पी.एच.डी.) उपाधी प्रदान !

डॉ. दयानंद वासुदेव राणे यांना डॉक्टर ऑफ फिलोसोफी (पी.एच.डी.) उपाधी प्रदान !

मुंबई, (पंकजकुमार पाटील) : वॉशिंग्टन डीसी ( यु.एस ) येथील नामांकित cederbrook university कडून वैदिक वास्तुशास्त्र या विषयातील विशेष संशोधन कार्यासाठी डॉ. दयानंद वासुदेव राणे ( डॉ. आनंदसर ) यांना डॉक्टर ऑफ फिलोसोफी (पी.एच.डी. ) उपाधी नुकतीच प्रदान करण्यात आली.

   डॉ. दयानंद व्ही. राणे गेली २३ वर्षांपासून वैदिक वास्तुशास्त्र व वैदिक साहित्य क्षेत्र, संशोधन व प्रशिक्षण यामध्ये कार्यरत आहेत. वैद्यक विषयातील पदवीधर असलेले प्रा.डॉ. दयानंद राणे (आनंदसर) "भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संशोधन संस्था मुंबई®" या संशोधन प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष असून वैदिक वास्तुशास्त्र व डाउझिंग विषयात हजारो विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत आहेत.

    त्यांनी सूक्ष्म स्पंदन विज्ञान व वनस्पती विज्ञान या विषयातील "गंधपरमानू एन इफेक्ट ऑफ ह्युमन बॉडी अँड वास्तु" हा संशोधन प्रबंध लिहिला आहे व त्यासाठी त्यांना सदर पी.एच.डी.मिळाली आहे.

Wednesday, 19 March 2025

कल्याण येथे भव्य शिवजयंती मिरवणूक उत्साहात साजरी ; शिवभक्तांची अलोट गर्दी‌ !!

कल्याण येथे भव्य शिवजयंती मिरवणूक उत्साहात साजरी ; शिवभक्तांची अलोट गर्दी‌ !!


कल्याण, सचिन बुटाला : कल्याण येथे सालाबादप्रमाणे यंदाही कल्याण शहर शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून त्यांनी सुरू केलेला तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मिरवणुकीत शिवभक्तांनी मोठी गर्दी केली.


हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करत त्यांनी सुरू केलेल्या तिथीनुसार शिवजयंती उत्सव परंपरेनुसार शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आला.


यावेळी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना स्मरण करून, शिवसेना मुख्य नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने तसेच शहरप्रमुख रवी पाटील यांच्या संकल्पनेतून शिवसेना कल्याण शहर शाखा आयोजित शोभायात्रा, भव्य मिरवणूक कार्यक्रमात शिवरायांच्या विचारांचे देखावे, लेझीम, ढोल-ताशे, टाळ मृदुंग, आदिवासी समाजातील पारंपारिक पोशाख, त्यांच्या वाद्य सामग्री, तारपा नृत्य यांच्या साथीने शोभायात्रेत अनेक शिवरायांची, मावळ्यांची वेशभूषा केलेले मुले-मुली, शिवगर्जनाचा नाद यामुळे मिरवणुकीतील वातावरण हे शिवमय झाले होते.


यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे साहेब,आमदार विश्वनाथ भोईर साहेब, उपनेत्या विजयाताई पोटे, माजी महापौर वैजयंतीताई घोलप, महिला कल्याण जिल्हा संघटक छायाताई वाघमारे, उपजिल्हा संघटक नितूताई कोटक, शहर संघटक नेत्राताई उगले, विधानसभा संघटक संजय पाटील, मयुर पाटील, विधानसभा सहसंघटक गणेश जाधव, विधानसभा सल्लागार समीर देशमुख, विधानसभा समन्वयक,प्रशांत भामरे, उपशहरप्रमुख मोहन उगले, विद्याधर भोईर, नितीन माने, नरेंद्र कामत, विनोद गायकवाड, प्रभाकर भोईर, नितीन जाधव, माजी नगरसेविका वैशाली भोईर, वीणा जाधव, रजनी मिरकुटे, महिला उपशहर संघटक अंजली भोईर, उजवल्ला मलबरी, रजनी भोईर, अनघा देवळेकर, गीता पूजारी, सुनिता मोरे, सुनीता बोंबले, विभाग प्रमुख सुरेखा दिघे, शाखा संघटक सुनंदा व्यवहारे, उपशाखा संघटक वंदना जळवी, अस्मिता नाईक, गीता मोहिले, शांताबाई बच्छाव, वैशाली बच्छाव, युवती सेना स्वाती पाटील, विभाग प्रमुख संजय राजपूत सर, अंकुश केणे, अरूण कदम, संजोग गायकवाड, मधुकर सातवे, रूपेश सकपाळ, अनंता पगार, रमण तरे, मनोहर व्यवहारे, उपविभाग प्रमुख दिपक धनावडे, कुणाल कुलकर्णी, भरत भोईर, दिनेश शिंदे, सतिश भोसले, सोमनाथ सावंत, भारत भोईर, रमेश पाटील, बबलेश पाटील, दिगंबर ठाणगे, नरेंद्र नांगरे, शाखा प्रमुख पंढरीनाथ राऊळ, गणेश कोते, संतोष घोलप, प्रतिक चौधरी, महेश पाटील, भावेश आवसारे, दिनेश अभंग, चेतन म्हामुणकर, प्रशांत पाटील, संदिप पवार, अजय लिंगसे, अभय कामल्य, संदिप सांगळे, महेश जाधव, उपशाखा प्रमुख दिलिप सातारकर, प्रतापराव चव्हाण, प्रमोद म्हात्रे, राजेश पाचकळे, संतोष गडकरी, संदिप वेदपाठक, हितेश भंडारी, प्रमोद चव्हाण, महेश जाधव, सचिन आखाडे, गटप्रमुख सुनील वाघ, युवासेना सहसचिव प्रतिक पेणकर, भिवंडी लोकसभा विस्तारक सूचेत डामरे, जिल्हा सचिव योगेश पाटील, जिल्हा चिटणीस सूरज खानविलकर, विधानसभा समन्वयक किशोर पाटील, शहर प्रमुख सुजित रोकडे, शहर समन्वयक राम मुसळे, उपशहरप्रमुख मेघन सल्पी, अनिरुद्ध पाटील, श्रेयस जाधव, अमेय आमले, विभाग प्रमुख प्रथमेश पाटील, उपविभाग प्रमुख स्वप्नील ओंबळे, प्रसाद शिंदे, प्रथमेश आव्हाड, मयुर मोरे, शाखा प्रमुख ओमकार हारवडे, ताहिर सलमानी, मंदार बेलोटे, गौरव शिंदे, उपशाखाप्रमुख राजन चौघुले, साहिल चौथे, दुर्गेश पाटील, संकेत वाघ, तनुज सकपाळ यांच्यासह कल्याण पश्चिम विभागाच्या सर्व प्रभागातील सन्माननीय पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक, युवासैनिक, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 17 March 2025

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा ! 

** अवघे वातावरण झाले शिवमय

घाटकोपर, (केतन भोज) : माजी नगरसेवक शिवभक्त संजय दादा भालेराव यांनी गनिमी कावा करत घाटकोपर पश्चिम अमृत नगर सर्कल याठिकाणी २७ मार्च २०१६ रोजी शिवजयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वरूढ मूर्तीची स्थापना केली. तसेच शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या संकल्पनेतून तसेच निधीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या ठिकाणी सुशोभीकरण करून शिवस्मारक बांधण्यात आले. तेव्हा पासून याठिकाणाला एक वेगळी ओळख व वेगळे महत्त्व मिळाले असून याठिकाणाला छत्रपती शिवाजी महाराज चौक, अमृत नगर असे नाव देण्यात आले. याचे सर्व श्रेय शिवभक्त संजय दादा भालेराव यांचे असून तेव्हा पासून दरवर्षी शिवस्मारक समितीचे संस्थापक/अध्यक्ष तथा माजी नगरसेवक शिवभक्त संजय दादा भालेराव हे याठिकाणी तिथी दिवशी मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करतात. घाटकोपर मधीलच नाही तर मुंबई मधील सर्वात मोठा शिवजन्मोत्सव सोहळा हा फक्त घाटकोपर मध्ये शिवभक्त संजय दादा भालेराव हे साजरा करतात. तेव्हापासून हे शिवस्मारक घाटकोपर मधील हजारो तरुणांचे शक्तिस्थान बनले आहे.

       यावेळी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या आदल्या रात्री म्हणजे रविवार दि.१६ मार्च रोजी मध्यरात्री ठिक बारा वाजता शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे व शिवसेना युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ईशान्य मुंबई लोकसभेचे खासदार संजय दिना पाटील, युवासेना कार्यकारिणी सदस्य राजोल संजय पाटील, माजी नगरसेविका डॉ.अर्चना संजय भालेराव यांच्या हस्ते हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची शिव महाआरती करण्यात आली. यावेळी 'जय भवानी, जय शिवराय' असा जयघोषात अवघे वातावरण शिवमय झाले होते. तसेच फाल्गुन तृतीया दि.१७ मार्च रोजी तिथी प्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळा २०२५ साजरा करण्यात आला असून सकाळी ठिक ८.वा.शिव अभिषेक, शिव वंदना, आरती व पुजा करण्यात आली, त्यानंतर सायंकाळी पुन्हा ६.वा.हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शिव महाआरती करण्यात आली.     

         यावेळी शिव स्मारकाला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. तसेच शिवस्मारकाला केलेल्या आकर्षक रोषणाई तसेच लेझर शो मुळे शिवस्मारकाचे तेज डोळ्याचे पारणे फेडत होते. शिवजन्मोत्सव दिवशी दिवसभर याठिकाणी साहसी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि ढोल - ताशा पथकांचे स्फूर्तिदायक वादन, पारंपारिक वेशभूषेत नटलेले आबालवृद्ध ... 'जय भवानी, जय शिवाजी' असा जयघोष.. अग्रभागी असणारी शिवज्योत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वरूढ पुतळा अशा स्फूर्तिदायी आणि शिवमय वातावरणात शिवस्मारक समितीचे संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली तसेच सर्व हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवछत्रपतींना मानवंदना देण्यात आली. यावेळी घाटकोपर मधूनच नाही तर मुंबईच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त या शिवजन्मोत्सव सुवर्ण सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. त्यामुळे हा शिवजन्मोत्सव सोहळा घाटकोपर मधीलच नाही तर मुंबई मधील सर्वात मोठा शिवजन्मोत्सव नावाजला जातो.

        यावेळी शिवस्मारक समिती- शिव आरती संघ, घाटकोपरच्या सर्व शिवभक्तांनी या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी कठोर परिश्रम घेतले.

शिवस्मारक समिती घाटकोपरतर्फे घाटकोपर (प.) अमृत नगर सर्कल येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न !

शिवस्मारक समिती घाटकोपरतर्फे घाटकोपर (प.) अमृत नगर सर्कल येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
        बृहन्मुंबई महानगर पालिका एन विभागात कार्यरत असलेल्या शिवस्मारक समिती घाटकोपरचे संस्थापक अध्यक्ष शिवभक्त श्री.संजय दत्तात्रय भालेराव यांच्या तर्फे घाटकोपर पश्चिम येथील अमृत नगर सर्कल येथे शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला शिव आरती करिता शिवसेना नेते आ.आदित्यसाहेब ठाकरे, शिवसेना सचिव आ.वरूणजी सरदेसाई, ईशान्य मुंबईचे खा.संजयभाऊ दिना पाटील व ईशान्य मुंबई ०८ विभाग प्रमुख सुरेश पाटील, १२६ स्थानिक मा. नगरसेविका अर्चना संजय भालेराव, समन्वयक ईम्रान शेख, ग्राहक संरक्षण कक्ष वार्ड संघटक १२६ रतन ताजणे, १२३ वार्ड संघटक राजेंद्र पेडणेकर, १२४ वार्ड संघटक यशवंत खोपकर व शिवभक्त पदाधिकारी शिव आरतीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, 14 March 2025

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

मुंबई (शांताराम गुडेकर) :
            करमाळा जिल्हा सोलापूर येथील रहिवाशी श्री.अप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक (Gold Medal) दि. ११ मार्चचे शासन निर्णयाद्वारे जाहीर केले आहे.

            वन संपतीचे संरक्षण, संवर्धन व वन विस्ताराचे काम प्रभावी पणे करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना सर्वोत्तम कार्यासाठी राज्य स्तरावरून पुरस्कार व पदके महाराष्ट्र शासनाकडून दिली जातात. सदर पदक जाहीर करताना शासनाने संबधीत अधिकारी यांचे गोपनीय अहवाल,सचोटी, चारित्र्य,तांत्रिक कार्यक्षमता, बुद्धिमत्ता व नावीन्यपूर्ण कामाचे स्वरूप पाहून राज्यस्तरीय पदक निवड समितीने वन व संरक्षण, वन व्यवस्थापन, वनविस्तार व नावीन्य पूर्ण कामासाठी श्री.अप्पासाहेब निकत भारतीय वन सेवेतील अधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार व पदक जाहीर करून गौरवण्यात येणार आहे.
              श्री.अप्पासाहेब निकत हे रायगड जिल्ह्यात जिल्हा वन अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी ५० लक्ष नवीन वृक्ष लागवड, १ कोटी रोपे निर्मिती, नवीन आधुनिक रोपवाटिका, जैवविविधता वन उद्यान, निसर्ग पर्यटन केंद्र निर्मिती केले. त्याच बरोबर वन प्रचार प्रसिद्धी, वन वणवा रोखणे, समुद्री कासव, गिधाड व दुर्मिळ वन्यप्राणी संरक्षण व संवर्धन यासाठी विशेष प्रयत्न केले. विविध गुन्ह्यामध्ये वन तस्कर व वन्यजीव तस्कर यांना अटक करून वाहनेही जप्त करून शासन जमा केली. रायगड व रोहा संवर्धन क्षेत्राची नवीन निर्मिती केली. तसेच जंगलात मृद व जल संधारणाची कामे मोठया प्रमाणात करून भूगर्भ जल पातळी वाढविणे आणि वन्य प्राण्यासाठी पाणवठे तयार करुन जल, जंगल व प्राण्यांचे संवर्धनाचे महत्वपूर्ण कार्य केले.
             श्री.निकत यांनी "अटल आनंदवन घनवन" हे पुस्तक लिहून वन विस्तारासाठी मोलाचे कार्य केले आहे. या पूर्वीही सन २०२० मध्ये महाराष्ट्र शासनाने श्री.अप्पासाहेब निकत यांना राज्यस्तरीय रजत पदक देऊन सन्मान केलेला आहे. तसेच विविध संस्थानी श्री.निकत यांना पुरस्कार  देऊन गौरविले आहे. सन मार्च २०२५ मध्ये जाहीर केलेल्या राज्यस्तरीय सुवर्णं पदकासाठी विविध स्तरावरून श्री. अप्पासाहेब निकत यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Wednesday, 12 March 2025

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती !

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
             पुणे येथील डॉ.अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि. आणि ए. आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. हा सन्मान जपानची राजधानी टोकियो येथे एका विशेष समारंभामध्ये जपानचे पंतप्रधान यांचे सल्लागार तथा माझी मंत्री कझुयुकि हमाडा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांची ही नियुक्ती जागतिक स्तरावरील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. भारताचे पंतप्रधान मान. नरेंद्र मोदी यांनी नुकताच फ्रान्समध्ये पार पडलेल्या ए.आय. समिटमध्ये भाग घेतला होता. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने फ्रान्स आणि भारताच्या ए. आय. आणि डिजिटल इनोवेशन सहयोगा बाबत नुकतेच निरनिराळ्या बाबींच्या सहयोगावर ठराव केले  गेले होते. या ठरावाच्या करारावर मोदींनी मान्यतेच्या करारावर सह्या केल्या होत्या. पंतप्रधान मोदींनी या फ्रान्सच्या भेटीत ए..आय, सायबर क्राईम सुरक्षा, डिजिटल गव्हर्नन्स याबद्दल भारताला सशक्त बनवण्याच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचे पाऊल मानले जाते. 
            विविध क्षेत्रात डॉ.अविनाश सकुंडे यांचे नेतृत्व कौशल्य तसेच दूरदृष्टी व इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स फेडरेशनच्या माध्यमातून अनेक नव उद्योजकांना केलेल्या मदतीचे तसेच मार्गदर्शनाचे आंतरराष्ट्रीय आढावा घेत ही ए.आय. तसेच ई.व्हि.चेंबर्स ऑफ कॉमर्स या संस्थेचा  प्रचार आणि प्रसार भारताकरता एका नवीन उंची वरती नेऊन ठेवतील यात शंका नाही. नवीन अध्यक्षांना जपान पंतप्रधानांचे सल्लागार तथा माजी मंत्री कझुयुकि हमाडा यांनी शुभेच्छा दिल्या. भविष्यकाळात संस्थेचे ध्येयधोरण जास्तीत जास्त नवीन उद्योजकांना यात सहभागी करून संस्थेचे नाव उज्वल्य करावे ही आशा व्यक्त केली. संबंधित नियुक्ती करताना जपानमध्ये विविध उद्योजकांनी डॉ. संकुडे यांना शुभेच्छा दिल्या.

अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा !

अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा !

नवी मुंबई, पंकजकुमार पाटील : तू मातृत्व, तू नेतृत्व, तू
कर्तृत्व अशी थोरवी असणाऱ्या समस्त महिला वर्गाला अभिवादन करण्यासाठी अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन वतीने तुर्भे विज्ञान केंद्र नवी मुंबई येथे दिनांक ८ मार्च रोजी महिला दिनाचे आयोजन करण्यात आलें होते.

अगस्त्या फौंडेशन ही एक अशी संस्था आहे की जेथे संपूर्ण भारतभर मोठया संख्येने महिला छानप्रकारे काम करतात. अगस्त्या फौंडेशन हे महिलासाठी एक सुरक्षित व आंनददायी वातावरण असणारे ठिकाण आहे. यासाठी विविध उपक्रम वर्षभर राबवले जातात. पॉश तसेच पास्को कायदा प्रशिक्षण, तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन व्यख्याने, कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा घेतल्या जातात. यावेळी महिला दिन कार्यक्रम सादर करत असताना ज्ञान माहिती, मनोरंजन, खेळ स्व अनुभव असा विविधरंगीं कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सर्व महिला इग्नेटर यांना मा.विक्रांत सोळंकी, मा.पराग सावंत यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आली. प्रास्ताविक पराग सावंत सर यांनी केले. यांनतर  सिनियर इग्नेटर प्रदीप कासुर्डे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा पीपीटी द्वारे घेतला. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तिमत्वातील  माहित नसलेले विविध पैलू समोर आलें. नंतर विविध ग्रुप खेळ घेण्यात आलें. यात गाण्यावरून वस्तू ओळखणे, अभिनय करून सिनेमाचे नाव ओळखणे, अंताक्षरी घेण्यात आली. तसेच आपल्या जीवनात प्रेरणा स्थान असलेल्या महिलांबद्दल अनुभव सादर करण्यात आलें. यावेळी अनेकांनी आपले हृदयस्पर्शी अनुभव सांगितले. या कार्यक्रमात सारथी यांनीही उस्फुर्त सहभाग घेऊन सुंदर सुंदर गाणी सादर केली. या कार्यक्रमासाठी  कौस्तुभ दीक्षित, सार्थक सपकाळ, समीर मुळे, शुभांगी लोंढे, प्राची जाणवलेकर, रेश्मा सोमवंशी, प्रियांका भोपी, आकांक्षा चौधरी, पल्लवी जाधव, पल्लवी पट्टेबहादूर, प्रियांका पाटील, रिंकू पडवळ, तेजस्विता माळी, हर्षदा शिर्के, हर्षला चौधरी, दिपाली हरणे, कल्याणी उगळे, पूनम मस्कर, अश्विनी कोंडाळकर, संतोषी दोंडे,प्रेरणा पडवळ, सरिता चव्हाण, प्राजक्ता राजपुरे, ऋतुजा माने, वैष्णवी जाधव, श्रेया रावराणे, मोहमद जावेद, विशाल सातुपे, आदेश बिल्ले चित्तरंजन कुंभार, तेजस पवार, कुणाल मोरे, हरीश सूर्यवंशी, अनिल चासकर उपस्थित होते. अतिशय सुंदर रित्या कार्यक्रम पार पडला असून आपण सर्व मिळून ही अगस्त्या चळवळ पुढे नेऊ या अशा अपेक्षा  सर्वांनी व्यक्त केल्या.

Monday, 10 March 2025

पंचरत्न मित्र मंडळ चेंबुर तर्फे जागतिक महिला दिन चेंबुर येथे उत्साहात साजरा !

पंचरत्न मित्र मंडळ, चेंबुर तर्फे जागतिक महिला दिन चेंबुर येथे उत्साहात साजरा !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
        समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत. या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अनेक प्रकारे साहाय्य करतात. अन्नधान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तू, औषधे, वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी. एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड, खजिनदार सचिन साळूखे, उपाध्यक्ष रमेश पाटील, सहसचिव वैभव घरत, सौ. स्नेहा नानीवडेकर, सल्लागार हनुमंता चव्हाण, सदस्य नीलम गावंड आणि सर्व महिला पुरुष कार्यकर्ते, सदस्य आणि सभासद यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड व परिसरात आपल्या कार्याचे जाळे विणणाऱ्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित पंचरत्न मित्र मंडळ व स्वामिनी, भवानी, शिवानी महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश मंदिर सभागृह, वाशीगांव, चेंबुर येथे जागतिक महिला दिन मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला.


                या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा.श्री.निरंजन सोनक (संचालक विपणन आर.सी.एफ), मा. श्रीमती नंदा कुलकर्णी मॅडम (मुख्य कार्यकारी संचालक-आर.सी.एफ) उपस्थित होते. तसेच विशेष पाहुणे कु.धनश्री दळवी (सिनेनाट्य अभिनेत्री), श्री. प्रकाश भोसले (शाखा प्रबंधक- सारस्वत को ऑप बँक), डॉ. विनित गायकवाड  (टाटा पॉवर कंपनी) आदी मान्यवर लाभले होते. या कार्यक्रमात सौ.सुरक्षा घोसाळकर (संचालिका - फोकस फॅसिलिटी सर्व्हिसेस) यांनी सुजाण पालकत्व तसेच सौ. कविता शिकतोडे (संचालिका - प्रमिला विठ्ठलदास पॉलिटेक्निक) यांनी १०वी, १२ वीच्या विद्यार्थांकरिता करिअर गाईडन्स या विषयावर सर्व उपस्थित महिलांना मोलाचे असे मार्गदर्शन केले. पंचरत्न मित्र मंडळातर्फे सर्व महिला भगिनींसाठी विविध खेळांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. सुमारे २०० महिलांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. उपस्थित सर्व महिलांना मंडळातर्फे भेट वस्तुही देण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा, सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.अशोक भोईर, सचिव श्री.प्रदिप गावंड, रमेश पाटील, मंदार भोपी, डी.एम.मिश्रा, वैभव भाटिया, आर. भगत, विलास कुंभार, रमाकांत गावंड, मॅथ्यू डिसोझा, संदीप पाटील, सौ.निलम गावंड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री.वैभव घरत यांनी तर आभार प्रदर्शन सौ.स्नेहा नानिवडेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचरत्न मित्र मंडळाला सहकार्य करणारे सर्व देणगीदार, हितचिंतक तसेच आर.सी.एफ प्रशासन यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत यापुढेही तुम्हां सर्वांचे असेच सहकार्य मंडळाला लाभेल या अपेक्षेसह कार्यक्रमाची सांगता केली.

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !! ** ३१ तास चाललेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेत हजारो भाव...