Saturday, 1 March 2025

"के. बी. महिला महाविद्यालया"त कृत्रिम बुद्धिमतेवर राष्ट्रीय परिषद संपन्न‌ !

"के. बी. महिला महाविद्यालया"त कृत्रिम बुद्धिमतेवर राष्ट्रीय परिषद संपन्न‌ !

ठाणे, प्रतिनिधी : एक्सेलसियर एज्युकेशन सोसायटीच्या, के. बी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, ठाणे 'आय क्यू ए सी आणि बीएस सी आयटी' विभागाच्या संयुक्त विद्यमाने, तसेच संस्थेचे अध्यक्षा डॉ. हर्ष खन्ना, व्यवस्थापकीय संचालक डॉ. साई किरण व संचालक श्रीमती पुष्पा नारंग यांच्या सहकार्याने एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शनिवार, दि.१/३/२०२५ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये केले होते. या परिषदेचा विषय‌ होता, ' कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षण व संशोधनावरील परिणाम: एक जागतिक क्रांती '

संस्थेच्या प्रथेप्रमाणे परिषदेचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता, डॉ. रविंद्र भांबर्डेकर यांच्या हस्ते व प्रमुख वक्ते, एआय तज्ञ श्री. रवी अय्यर, डॉ. अनुषा‌ रामानाथन,
माजी प्राचार्या डॉ. रेणू त्रिवेदी व प्राचार्य डॉ. विनायक राजे यांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाले. ५० मिनीटाच्या या उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात प्रमुख वक्त्यांनी कृत्रीम बुद्धीमतेचे आधुनिक शिक्षण व संशोधनांवर वर होत असलेल्या चांगल्या वाईट परिणामांची अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन उपस्थित अभ्यासक, शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर केले.

त्यांनतर दिड तासाच्या महत्वाच्या दुसर्या सत्रात पॅनल डिस्कशनद्वारे निमंत्रीत वक्त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे अर्थीक व कौशल्य विकास, नोकरीच्या संधी, आव्हाने व उपाय इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली. तसेच काहींच्या प्रश्नांनाही समाधानकारक उत्तरे दिली. यामध्ये टाटा समाजशास्त्र संस्थेच्या प्राध्यापिका, डॉ. अनुषा‌ रामानाथन, एआयचे तज्ञ, श्री. रवी अय्यर व प्राचार्य डॉ. महेंद्र कनोजिया, डॉ. विलास नितनवरे व डॉ. आरती बक्षी यांचा समावेश होता.  

दुपारच्या जेवणानंतरच्या तिसर्या सत्रात सहभागी अभ्यासकांचे 'कृत्रिम बुद्धिमत्ता' विषयावरील पेपर सादरीकरण आयोजित केले होते. यामध्ये मुंबईसह मध्यप्रदेश, ओरीसा, गोवा, छत्तीसगड या राज्यातील महाविद्यालयातून सहभागी झालेल्या निवडक १२ प्रतिनीधीना संधी देण्यात आली. त्यांनीदेखील वरील विषयावरील त्यांचे अभ्यासपूर्ण प्रेझेन्टेशन केले. या सत्राचे परिक्षण डॉ. निता पाटील यांनी केले.

समारोपाच्या शेवटच्या सत्रात प्राचार्य डॉ. विनायक राजे यांनी सर्व‌ सहभागी वक्ते, अभ्यासक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले व सर्वांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. तसेच परिषद यशस्वी करण्यासाठी हातभार लावलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सदर राष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माजी प्राचार्या डॉ. रेणू त्रिवेदी, जेष्ठ प्राध्यापिका डॉ. सीमा झा व प्राचार्य डॉ. विनायक राजे यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. उषा भंडारे यांच्या नेतृत्वात प्रा. सुनंदा बसागरे, प्रा. राणी पोडीचेट्टी, प्रा. प्रज्ञा गरड व प्रा. सुवर्णा सावंत यांनी मागिल दिड  महिन्यापासून भरपूर मेहनत घेतली.

सौजन्य -
डॉ. उषा भंडारे (निमंत्रक)

रमजान का पवित्र महीना आज चांद के दीदार के साथ शुरू !!

रमजान का पवित्र महीना आज चांद के दीदार के साथ शुरू !!

 मुंबई, (प्रतिनिधि) :

मुस्लिम समुदाय में बेहद पवित्र माना जाने वाला रमजान का महीना आज शनिवार 1 मार्च से शुरू हो गया है। आज रात आठ से नौ बजे के बीच विभिन्न मस्जिदों में विशेष उराची नमाज अदा की जाएगी। यह प्रार्थना अगले चंद्रमा के दर्शन तक तीस दिनों तक की जाती है। मुस्लिम भाई अगले चंद्र दर्शन तक 29 या 30 दिन दत्त दीन से भरते हैं। फिर रमज़ान की ईद मनाई जाती है. चांद दिखने के बाद मुस्लिम भाइयों ने एक-दूसरे को पवित्र माह रमजान की मुबारकबाद दी। इस्लामिक कैलेंडर में नौवां महीना बहुत महत्वपूर्ण होता है। ऐसा माना जाता है कि मुस्लिम कैलेंडर के वर्ष 610 के नौवें महीने में बड़ी रात की रात को पैगंबर मोहम्मद को पवित्र कुरान का पता चला और उन्हें पांच ज्ञान प्राप्त हुए। ऐसे में नौवें महीने में मुस्लिम समुदाय अल्लाह के नाम पर रोजा रखता है, पहला रोजा कब रखा जाता है, यह चांद के दीदार पर निर्भर करता है. सऊदी अरब में चांद दिखने के बाद भारत में चांद दिखने के दूसरे दिन रमजान का पवित्र महीना शुरू होता है और दूसरे दिन भारत में पहला रोजा रखा जाता है. ऐसे में लोग उत्सुकता से चांद को देखते हैं और एक-दूसरे को चांद देखने की बधाई देते हैं।

पत्रकार भीमराव धुळप श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज पुरस्काराने सन्मानित !!

पत्रकार भीमराव धुळप श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज पुरस्काराने सन्मानित !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

       मौजे घोगाव,तालुका कराड येथील श्री संत रोहिदास मित्र मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री संत रोहिदास छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मंडळाचे यंदाचे दहावे वर्ष होते. यावेळी समाजासाठी बहुमौल्य योगदान देणाऱ्या समाज बांधवांचा श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यामध्ये धगधगती मुंबईचे संपादक आणि पत्रकार भीमराव धुळप यांच्यासह काही समाज बांधवांचा समावेश होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते अभिजित कदम,शिवसेना (उबाठा)गटाचे माहीम विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक यशवंत विचले,कराड मलकापूर नगरपरिषदेचे नगरसेवक वसीम मुल्ला, समाजसेवक दयानंद पाटील, मंडळाचे अध्यक्ष सुभाष धुळप यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम मौजे घोगाव ता. कराड येथे संपन्न झाला.
                       श्री.भीमराव धुळप यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन या अगोदर देखील पत्रकार धुळप यांना आजपर्यंत २१ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा स्वतःच्या गावच्या समाजाने दिलेला श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री धुळप यांनी मंडळाचे आभार मानले आहेत. या कार्यक्रमाला घोगाव गावचे सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित व्यक्ती शंकर हरी पाटील, महादेव भेदाटे, नारायण साळुंखे, ग्रामसेवक शिवाजी जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी प्राचार्य वसंत धुळप, प्रा.जालिंदर धुळप, आरोग्यसेविका सौ लीला जालिंदर धुळप, शिक्षिका नीता महेंद्र धुळप, प्रवीण धुळप, प्रदीप धुळप, दिलीप धुळप यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

चौकट _
आजपर्यंत  माझ्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन मला विविध संस्थांनी आतापर्यंत २१ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. मात्र माझ्या समाजाने श्री संत रोहिदास मित्र मंडळाने केलेला सन्मान हा बहुमूल्य असा आहे. माझ्या मातीत माझ्या जन्मगावी माझ्या समाज बांधवांनी केलेला सन्मान हा मला इतर पुरस्कारापेक्षा मोठा असल्याचे वाटते, सदर पुरस्कार मी माझी आई कै. बाळकाबाई हिंदुराव धुळप हिला समर्पित करत आहे.

"के. बी. महिला महाविद्यालया"त कृत्रिम बुद्धिमतेवर राष्ट्रीय परिषद संपन्न‌ !

"के. बी. महिला महाविद्यालया"त कृत्रिम बुद्धिमतेवर राष्ट्रीय परिषद संपन्न‌ ! ठाणे, प्रतिनिधी : एक्सेलसियर एज्युकेशन सोस...