Wednesday, 30 April 2025

घाटकोपर मनपा एन विभागात नालेसफाईत महाघोटाळा ?नालेसफाई नाही तर, ही तर हात सफाई ? नालेसफाईच्या कामाची चौकशी करण्याची मागणी !!

घाटकोपर मनपा एन विभागात नालेसफाईत महाघोटाळा ?नालेसफाई नाही तर, ही तर हात सफाई ? नालेसफाईच्या कामाची चौकशी करण्याची मागणी !!

नालेसफाई करणाऱ्या कामगारांची सुरक्षा देखील वाऱ्यावर, कामगाराच्या सेफ्टी किटचे पैसे देखील ठेकेदाराच्या खिशात ?

मुंबई, (केतन भोज) : मुंबईत पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचू नये, म्हणून मुंबई महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. यासाठी पालिका कोट्यावधी रुपये खर्च देखील करते. तसेच यंदा मुंबई महानगरपालिका एन विभागातील संपूर्ण परिमंडळ ६ मधील घाटकोपर मधील नालेसफाईसाठी एकूण १४ कोटींची स्वतंत्र तरतूद केली आहे. नालेसफाईचे टेंडर निघून नालेसफाई सुरू झाली असली तरीही, मनपा एन विभागातील परिमंडळ ६ संपूर्ण घाटकोपर मधील नालेसफाई अद्याप हवी झाली नसून, येथील नालेसफाईचा ठेकेदार जाणीवपूर्वक नालेसफाई मध्ये वेळकाढूपणा करताना दिसत आहे. घाटकोपर मधील सर्वच ठिकाणी नाल्यातील गाळ तसाच पडून आहे. त्यामुळे पावसाळ्याआधी नालेसफाई पूर्ण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला असून पावसाळयाआधी नालेसफाई पूर्ण होण्याची शक्यता धूसरच आहे. तसेच घाटकोपर पश्चिम मध्ये बहुतांश ठिकाणी डोंगराळ भाग आहे. त्यामुळे वेळेपूर्वी याठिकाणी नालेसफाई न झाल्यास पावसाळ्यात नाले तुंबून नागरिकांच्या घरात हे नाल्याचे सांडपाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नाल्यातील हा गाळ उद्या पावसाळ्यात रस्त्यावर येऊन याचा नाहक त्रास नागरिकांना होऊ शकतो. याशिवाय या भागात मोठ्या प्रमाणावर शाळा देखील असून पावसाळ्यात शाळकरी मुलांना रस्त्यावरून येजा करताना नाल्यातील गाळ रस्त्यावर आल्यामुळे त्रास सहन करावा लागू शकतो. तसेच योग्य प्रकारे नालेसफाई न झाल्यास पावसाळ्यात याठिकाणी रोगराईला देखील निमंत्रण मिळू शकते. नागरिकांच्या कररूपी पैशातून पालिका प्रशासन ही कामे दरवर्षी करत असते. त्यामुळे याठिकाणी संबंधित नाले सफाईचा ठेकेदार आणि पालिका प्रशासन मात्र बेजबाबदारपणे वागत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे घाटकोपर एन विभागात नालेसफाईत महाघोटाळा ? होत असून ही नालेसफाई नाही तर, ही तर हात सफाई आहे ?असा प्रश्न नागरिक विचारत आहे. तरी अशा बेजबाबदार नालेसफाईच्या कंत्राटदारावर कारवाई करून कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट मध्ये टाकावे आणि या सर्व प्रकरणाची प्रमुख अभियंता दक्षता तसेच मनपा परिमंडळ ६ चे उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी,  Ai यांनी याची सखोल चौकशी करावी अशी मागणी स्थानिक नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते करताना दिसत आहेत.

नालेसफाई करणाऱ्या कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर, कामगाराच्या सेफ्टी किटचे पैसे देखील ठेकेदाराच्या खिशात ?

घाटकोपर मध्ये नालेसफाई करणाऱ्या कामगारांची सुरक्षेची काळजी देखील ठेकेदाराकडून घेतली जात नसून, त्यांच्या सुरक्षेतेसाठी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा किट ठेकेदारकडून दिले गेले नसून, सुरक्षा किटच्या निधीवर ठेकेदाराने डल्ला मारला आहे का? मागे विक्रोळी पार्कसाईट मध्ये नालेसफाई करताना एका कामगाराचा सुरक्षा किट नसल्यामुळे मृत्यू झाला होता, तर या प्रकरणातून मनपा एन विभागाचे संबंधित अधिकारी तसेच नालेसफाईचा ठेकेदार याने कोणताही बोध घेतलेला दिसत नसून, अजून पुढे कोणत्या तरी कामगाराचा मृत्यू होण्याची वाट संबंधित मनपा एन विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार बघत आहे का? असा प्रश्न याठिकाणी निर्माण होत आहे. तरी अशा बेजबाबदार नालेसफाईच्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

कासार्डे, धुमाळवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळ, आयोजित श्री सत्यनारायण महापूजा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

कासार्डे, धुमाळवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळ, आयोजित श्री सत्यनारायण महापूजा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

कणकवली, (केतन भोज) : कासार्डे, धुमाळवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळ, आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी श्री इसवटी महापुरुष देवालय, कासार्डे (धुमाळवाडी), ता.कणकवली याठिकाणी शनिवार दि.१० मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त शनिवार दि.१० मे २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ८ ते १० वा. श्री गांगेश्वर मंदिरात अभिषेक होणार असून त्यानंतर पुन्हा सकाळी १०.३० ते १ वा. श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. तसेच दुपारी १.३० ते ३.३० वा.महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे आणि सायंकाळी ४ ते ६ वा. वाडीतील महिलांचे व मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तद्नंतर रात्री ८ वा.स्थानिक भजन होणार आहे. आणि शेवटी रात्री १० नंतर  निमंत्रित वारकरी भजने आयोजित करण्यात आली असून, (श्री गांगेश्वर प्रासा. भजन मंडळ, गडमठ) (वरचा आवाट)- बुवा श्री.विलास सुतार, (श्री कुलस्वामिनी प्रासा. भजन मंडळ. नागसावंतवाडी- बुवा श्री.अतुल सावंत), (श्री गणेशकृपा प्रासा.भजन मंडळ, पियाळी-वंजारेवाडी, बुवा श्री.संदेश वंजारे), (प्रासा. भजन मंडळ दक्षिण गांवठण) (शेट्ये आवाट)- बुवा श्री.प्रमोद शेट्ये), (श्री इसवटेश्वर प्रासा. भजन मंडळ, दाबवाडी- बुवा श्री.अशोक  पांचाळ) इत्यादी भजने होणार आहेत.तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ, कासार्डे, धुमाळवाडी /मुंबई यांनी केले आहे.

मोहने येथील व्यापारी प्रवीण गडा यांच्यावर प्राणघातक हल्ला !

मोहने येथील व्यापारी प्रवीण गडा यांच्यावर प्राणघातक हल्ला !

**व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या मुलासही केली मारहाण

मोहने (प्रतिनिधी) : मोहने परिसरातील व्यापारी प्रवीण गडा यांच्यावर जमावाने पाठीमागुन येत प्राणघातक हल्ला केला असून खाजगी प्लंबरच्या बेकायदेशीर  पाईप लाईन जोडणी बद्दल विचारणा केल्यामुळे गडा यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या प्रवीण गडा यांच्या मुलालाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना मोहने येथील जैन मंदिराजवळील रस्त्यावर घडली असून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीरपने एका खाजगी प्लंबरकडून मुख्य वाहिनीला दोन इंची जलवाहिनी जोडणीचे काम सुरु होते. शासकीय मालमत्तेस हानी पोहोचवून आणि नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीररित्या पाणीची पाईप लाईन जोडणी घेतली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रवीण गडा यांनी याबाबत येथे काम करणाऱ्या खाजगी प्लंबरला विचारणा केली. तसेच ही जागा ही आमच्या मालकीची असून परवानगी शिवाय तुम्ही येथून नळ जोडणी कशी काय घेतली अशी विचारणा केली.

यावेळी हल्ल्याच्या तयारीत असलेल्या ०८ ते १० जणांच्या जमावाने गडा यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांना दगडगोटे लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून छातीत आणि मेंदूला जबर मार लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या हल्ल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या  प्रवीण गडा यांचा मुलगा पार्थ गडा याला देखील जमावाकडून लक्ष्य करून मारहाण करण्यात आली. मोबाईल हिसकावून मोबाईल फोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला या संपूर्ण प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून खडकपाडा पोलिसांनी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी गडा कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी खडकपाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार !

महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार !

 मुंबई, (शांताराम गुडेकर) :
             महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) ने आपला लोकप्रिय MS-CIT कोर्स आता कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सुसज्ज करत ‘MS-CIT – AI Powered’ या नावाने नव्याने सुरू केला आहे. गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रासह देशभरात 1.65 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या या कोर्समध्ये आता 100 हून अधिक AI टूल्स व 400 पेक्षा अधिक कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे.

AI Divide चे नवे आव्हान, MKCL चं स्मार्ट उत्तर..!

          Digital Divide कमी होत असतानाच आता AI जाणणारे आणि न जाणणारे अशी नवी दरी तयार होत आहे. ही दरी भरून काढण्यासाठी MKCL ने हा कोर्स नव्याने तयार केला आहे. ChatGPT, Google Gemini, Microsoft Copilot यांसारख्या टूल्सचा वापर, सायबर सुरक्षा, डेटा विश्लेषण, डिजिटल व्यवहार, आणि AI वापरून अभ्यासात किंवा कामात कशी मदत मिळवता येईल, याचे प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जात आहे.राज्यातील 4500 हून अधिक अधिकृत केंद्रांमधून हा कोर्स शहरी आणि ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. संगणक साक्षरतेबरोबरच नवयुगातील तंत्रज्ञान कौशल्ये देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

           शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, गृहिणी, शिक्षक, व्यावसायिक, स्टार्टअप सुरू करणारे तरुण तसेच नोकरीच्या शोधात असलेले युवक/युवती यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे. 10वी व 12वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनीही ही संधी न गमावता नव्या युगातील पहिलं स्मार्ट पाऊल उचलावे, असे आवाहन MKCL कडून महाव्यवस्थापक नटराज कटकधोंड, मुंबई विभाग समन्वयक इंद्रनील मयेकर यांच्याकडून मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद मध्ये करण्यात आले आहे. यावेळी mkcl चे विविध पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Tuesday, 29 April 2025

बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न !!

बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न !!

** मा.आ.श्री.किरण पावसकर (शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन

मुंबई (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर) :
           शासकीय वसाहत, बांद्रा (पूर्व) येथे शनिवार, दि. २६ एप्रिल २०२५ रोजी गव्हर्नमेंट कॉटर रेसिडेन्शियल असोसिएशन यांनी  सरकारचे आभार मानण्यासाठी तसेच सन्मा. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  साहेबांचे आभार मानण्यासाठी मोठ्या उत्साहात  कर्मचाऱ्यांची सभा पार पडली.

        या सभेला मा.आ.श्री.किरण पावसकर (शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. गेल्या दोन पिढ्या येथे कर्मचारी राहत असून सरकारची सेवा करत आहेत. येथील कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा उपोषणे ही केली होती, अनेक वर्षापासून येथील कर्मचारी स्वतःच्या मालकीची घरे मिळण्यासाठी लढा देत आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या समवेत अनेक बैठका करण्यात आल्या होत्या. कॅबिनेटमध्ये हा मुद्दा घेण्यात आला आणि बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना भूखंड देण्यात येत आहे, यावर शिक्कामोर्तब झाला व शासन निर्णय काढण्यात आला. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी येथील कर्मचाऱ्यांना शब्द दिला होता की, येथील कर्मचाऱ्याने शासकीय वसाहत बांद्रा येथेच स्वतःची मालकीचे घर मिळतील आणि हे काम एका बाळासाहेबांच्या शिवसैनिकांने पूर्णत्वास नेण्याचे काम केले, असे पावसकर यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले तसेच महाराष्ट्र राज्याचे सन्मा. उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेबांचा आपल्याला निरोप आहे, हे काम करून पूर्णत्वास न्यायचे आहे. त्यासाठी एकजूटीने रहा, काम करा. अर्हता व निकषासाठी गठीत होणाऱ्या या समितीत चर्चेच्या अनुषंगाने आपले आतापर्यंत कार्यरत अधिकारी/कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी व वारसाहक्क यांची प्रतवारीनुसार माहिती तयार करा. याच अनुषंगाने जेवढे लाभ घेता येतील त्याचा अभ्यास करा.

        असोसिएशनच्या अध्यक्षांनी श्री.एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना बांद्रा वसाहतीतील कर्मचाऱ्यांना स्वतःच्या मालकीची घरे मिळवून देण्यासाठी कामाला चालना व गती दिल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाकडून साहेबांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. या सभेला सन्मा.पावसकर साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार साहेबांचे सर्व कर्मचाऱ्यांकडून आभार मानण्यात आले. या सभेला कर्मचारी मोठ्या संख्येने कुटुंबासहित उत्साहाने उपस्थित होते.

देवरुख येथे जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा !

देवरुख येथे जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा !

** लोकनिर्माणचे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण

कोकण (शांताराम गुडेकर) :

          १ मे हा महाराष्ट्र आणि कामगार दिन, यादिवशी लोकनिर्माण वृत्तपत्र गेली दहा वर्षे देवरुख येथे जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिकपणे साजरा करत आहे. यावेळी कर्तृत्ववान महिला आणि गुणवंत विशेष अधिकारी यांना लोकनिर्माण सन्मान  हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असतो.
       यावर्षी लोकनिर्माण प्रतिष्ठान या राष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लोकनिर्माण सन्मान २०२५ हा पुरस्कार महिला आणि कामगार क्षेत्रातील विशेष अधिकारी यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. लोकनिर्माण प्रतिष्ठानची घोषणा १ मे २०२४ रोजी  सामाजिक कार्यकर्ते आणि सहसंपादक युयुत्सु आर्ते यांनी केली होती.वर्षभरात या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. आणि याच दिवशी हे पुरस्कार वितरण लोकनिर्माण प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून गुरुवार दिनांक १/५/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता हाॅटेल पार्वती पॅलेस सभागृह, देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे होणार आहे. याच कार्यक्रमात लोकनिर्माण वृत्तपत्राच्या माध्यमातून डिजिटल लोकनिर्माण मिडिया या नावाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिला आणि पुरुष यांनी उपस्थित राहावे असे आवाहन साप्ता. लोकनिर्माण संपादक बाळकृष्ण कासार,लोकनिर्माण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष युयुत्सु आर्ते यांनी केले आहे.

Monday, 28 April 2025

सिद्धार्थ महाविद्यालयात व्यवसाय संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न‌ !

सिद्धार्थ महाविद्यालयात व्यवसाय संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न‌ !

मुंबई, (पंकजकुमार पाटील) : पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या, सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व मुंबई विद्यापिठाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शनिवार दि .२६ एप्रिल रोजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये केले होते. या परिषदेचा विषय‌ होता, *'व्यवसाय संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान'* (Innovation & Research in Business and Modern Technology).

  या परिषदेचे उद्घाटन प्रमुख पाहूणे, सावित्रीबाई फूले पुणे विद्यापिठाचे माजी कुलगूरू डॉ. वासूदेव गाडे यांच्या हस्ते, विशेष निमंत्रीत जेष्ठ प्राध्यापक डॉ. संजयकुमार फड व प्राचार्य डॉ. उमाजी मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी दहा वाजता झाले. ६० मिनीटांच्या या उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात प्रमुख पाहूण्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे‌ शेती, उद्योग व संशोधनांवर वर होत असलेल्या चांगल्या वाईट परिणामांची अत्यंत अभ्यासपूर्ण व चिकित्सक पद्धतिने सहभागी अभ्यासक, शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर मांडणी केली.

     त्यांनतर दिड तासाच्या महत्वाच्या दुसऱ्या सत्रात पॅनल डिस्कशनद्वारे निमंत्रीत तज्ञ वक्त्यांनी AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अर्थीक व कौशल्य विकास, नोकरीच्या संधी, व्यावसायिक नितीमत्ता, आव्हाने व उपाय इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली. तसेच काहींच्या प्रश्नांनाही समाधानकारक उत्तरे दिली.  यामध्ये पॉन्डेचेरी येथील पदवीत्तर शासकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. लक्षमनपथी तसेच पूणे येथिल मॉर्डन कॉलेजचे प्राध्यापक डॉ. संदीप सानप व आमचे उपप्राचार्य डॉ. समीर ठाकूर‌ यांचा समावेश होता.  

    दुपारच्या जेवणानंतरच्या तिसऱ्या सत्रात सहभागी अभ्यासक व पदवीत्तर विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रीम बुद्धिमत्ता, नाविण्यपूर्ण संशोधन इत्यादी विषयावरील शोधनिबंधाचे सादरीकरण आयोजित केले होते. यामध्ये मुंबई व पुणे येथिल विविध महाविद्यालयातून सहभागी झालेल्या निवडक १० प्रतिनीधीना संधी देण्यात आली. त्यांनीदेखील वरील विषयावरील त्यांचे अभ्यासपूर्ण प्रेझेन्टेशन केले. या सत्राचे परिक्षण डॉ. विष्णू भंडारे व डॉ. समिर ठाकूर यांनी केले.

   समारोपाच्या शेवटच्या सत्रात प्राचार्य डॉ. उमाजी म्हस्के यांनी सर्व‌ सहभागी वक्ते, अभ्यासक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले व सर्वांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. तसेच परिषद यशस्वी करण्यासाठी हातभार लावलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व‌ विद्यार्थ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

   सदर राष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. उमाजी म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. शशिकांत मुंडे यांच्या नेतृत्वात प्रा. विशाल करंजवकर, प्रा. राधा कनकामल्ला, यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व निवडक विद्यार्थ्यानी भरपूर मेहनत घेतली.

प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते यांच्या उपस्थितीत आर्यारवी एंटरटेनमेंटचा तिसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा संपन्न..!

प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते यांच्या उपस्थितीत आर्यारवी एंटरटेनमेंटचा तिसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा संपन्न..!
                                    
मुंबई, पंकजकुमार पाटील : आर्यारवी एंटरटेनमेंटचा तिसरा राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सोहळा नुकताच शिशुविकास हॉल, बेस्ट वसाहत, राजकमल स्टुडिओ जवळ, परेल येथे सिने-नाट्य क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी सर्व विजेत्या लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले. प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते, दिग्दर्शक प्रदीप कबरे, सही रे सही नाटक फेम विनोदी अभिनेते जयराज नायर, प्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक, अभिनेते खलील शिरगांवकर, शिर्के प्रतिष्ठानचे अँड सुनिल शिर्के, जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, प्रसिद्ध समाजसेविका सीमाताई पाटील, प्रसिद्ध विनोदी अभिनेते जयवंत भालेकर, कांचन पगारे आदी मान्यवर यांच्या हस्ते सोहळ्याचे दीपप्रज्वलन करून काश्मीरमधिल दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तवनाने झाली. आर्यारवी एंटरटेनमेंटचे महेश्वर तेटांबे यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक अनिल सुतार आणि प्रसिद्ध अभिनेता सागर सातपुते यांच्या अस्खलित सूत्रसंचालनाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्याचबरोबर सिनेसृष्टीत अलौकिक कार्य करणाऱ्या सर्वश्री अरुण होर्णेकर, मनोहर आचरेकर, निलांबरी खामकर, प्रदीप कबरे, लक्ष्मण गुरव आणि जयंत घाटे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण, कलाभूषण, रंगकर्मी, समाजरत्न, युवा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. निवेदक अनिल सुतार आणि सागर सातपुते यांनी लघुपट स्पर्धेचा निकाल जाहीर केला या निकालात  कै.भिकाजी महादेव तेटांबे कै.मनोरमा भिकाजी तेटांबे यांच्या स्मरणार्थ  "शाश्वत" (प्रथम विजेता) रोख रक्कम 25 हजार,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह,  लोकनेते कै.विठ्ठलदादा खाडे आणि कै. सुनीताताई विठ्ठलराव खाडे यांच्या स्मरणार्थ "शूलेस" (द्वितीय विजेता) रोख रक्कम 15 हजार, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह,  "प्रपोजल" (तृतीय विजेता) रोख रक्कम 10 हजार, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह, "चटका" (उत्तेजनार्थ विजेता) रोख रक्कम 5 हजार,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह तसेच इतर काही उत्तेजनार्थ आणि वैयक्तिक पारितोषिके कै.शामराव नारायण व्हटकर, कै. हौसाबाई शामराव व्हटकर, कै गीता आनंदा जाधव यांच्या स्मरणार्थ  प्रदान करण्यात आली. तसेच संस्थापक -अध्यक्ष श्री गुरुनाथ तिरपनकर यांच्या जनजागृती सेवा संस्थेच्या माध्यमातून, खलील शिरगांवकर, आणि अँड.सुनिल शिर्के, प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मी मनिष गुप्ता यांच्या माध्यमातून अनेक पुरस्कार प्रदान करण्यात करण्यात आले. या सर्व कार्यक्रमासाठी प्रसिद्ध संकलक आणि दिग्दर्शक राजवीर आनंदा जाधव यांनी विशेष मेहनत घेऊन आपलं मोलाचं योगदान दिले. सिने ग्राफिक डिझायनर मनिष व्हटकर, अभिनेता सुरेश डाळे, निर्माते, दिग्दर्शक आनंद खाडे, प्रनेश लोगडे आणि अभिनेत्री लक्ष्मी मनिष गुप्ता, प्रसिद्ध अभिनेते रवी मोरे, बाळा चौकेकर, निलेश घाडी तसेच सिनेरामा प्रॉडक्शन चे राम माळी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. शिरोडकर हायस्कूल 1988 दुपार अधिवेशन च्या मित्रपरिवार यांनी (देवेंद्र पेडणेकर, अजीत साकरे सुरेश गुरव, श्रीकांत आयरे, संजय गवाणकर, मिनार अनिल म्हापणकर, विनायक हळदणकर आणि संदिप चव्हाण) यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आनंद खाडे यांनी उपस्थित रसिक आणि मान्यवरांचे आभार मानले.

ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र कांबळे यांची विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड !

ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र कांबळे यांची विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड !

मुंबई,:(प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिला जाणारा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 कामगार मंत्री अँड आकाश  फुंडकर यांनी जाहीर केले विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी संपूर्ण राज्यभरातून 51 सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांमध्ये श्री .राजेंद्र ज्ञानदेव कांबळे भूषवलेली पद कवी, गायक, वार्ताहर, होमगार्ड कमांडर अधिपदावर काम करत असताना. आज पर्यंत राज्यस्तरीय व इतर संस्थांकडून अर्धशतक होऊन जास्त पुरस्काराचे मानकरी दि. कराड अर्बन को. ऑफ बँक कराड, मस्जिद बंदर शाखा, मुंबई येथे सध्या कार्यरत असून सर्वसामान्य व तळागाळातील जनतेसाठी अडचणी सोडवण्यात सिंहाचा वाटा असून अनेक सामाजिक संस्था व फाउंडेशन तसेच होमगार्डमध्ये निष्काम सेवा करत होमगार्ड अधिकारी पदापर्यंत काम केले आहे एसटी महामंडळात उरलेल्या वेळेत भारतीय विकास परिषद यामध्ये सचिवपदी, मिलिंद सहकारी संस्था विक्रोळी सचिव पदे चांगल्या प्रकारे काम केले असून अन्यायाविरोधात लढा सामाजिक परिवर्तन होमगार्ड अधिकारी कायदा व सुव्यवस्था राखण्या कामे निस्वार्थीपणे सेवा देत 500, एकराचा चारा वाचविण्यासाठी प्रामुख्याने यश संपादन केले, अपंग बंधू सहकार्य सक्रिय योगदान दीपावली भाऊबीज दिवशी राज्य परिवहन महामंडळात फायदा केला एसटी स्टँडवर केळीच्या सालीवरून पडलेले प्रवासी होनमाने यांना त्वरित रिक्षा करून  दवाखान्यात घेऊन गेले त्यांना जीवदान मिळाले, इंधन बचत ही काळाची गरज आहे हे सिद्ध केले, प्रकाश चांगण यांचे हरवलेले पैसे परत मिळवून दिले प्रमाणितपणा, पोलीस कर्मचारी पाचपुते यांना झटका आल्याने त्यांना शासकीय दवाखान्यात घेऊन गेले, वृक्षारोपण स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पार पाडले, मांढरदेवी येथे भाविकांना मोकळ्या मनाने भरीव मदत केली, दलित पीडित विधवा बेकारांना अर्थसहाय्य मिळवून दिले, आरोग्य शिबिर दुर्बल घटकांना विकासासाठी प्रयत्नशील समाजसेवा, वृक्षारोपण, रक्तदान, नेत्रदान शिबिरास स्वतःहून सहकार्य गृहरक्षक दलामध्ये चांगल्या प्रकारे कार्य कौतुकास्पद वृक्षारोपण निष्काम सेवा बद्दल गौरव भारतीय विकास परिषदेच्या माध्यमातून भ्रष्टाचार अन्यायविरुद्ध लढा सामाजिक परिवर्तन अशा अनेक कार्यातून सामाजिक मोठी प्रतिष्ठा निर्माण केली यावरील कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली यांच्या कार्याची दखल  घेऊन विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली कामगार मंत्री अँड. आकाश फुंडकर कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी सर्व  पुरस्कारांचे अभिनंदन केले, महात्मा बाबू गेनू मुंबई, गिरणी कामगार क्रीडा भवन प्रभादेवी, मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात येत्या 13 मे रोजी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र कांबळे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात असून त्यांना मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर व वनिता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सौजन्य _
पंकजकुमार पाटील, मुंबई 

Sunday, 27 April 2025

शिक्षण स्वाभिमानी संघटना आणि श्रमिक (मु.) पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम...

शिक्षण स्वाभिमानी संघटना आणि श्रमिक (मु.) पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम...

मुरबाड- (योगेश्वरी मणी) 
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला 'शिक्षण स्वाभिमानी संस्था' आणि श्रमिक (मु.) पत्रकार संघाचे वतीने इन्व्हर्टर भेट देण्यात आला. शिक्षण स्वाभिमानी संघटना खेड्यापाड्यातील अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहचुन त्यांच्या अडीअडचणी समजून घेते.विद्यार्थ्यांच्या गरजा व त्याची परिपुर्ती करण्याची जबाबदारीही आपल्या कुवतीनुसार घेत असते. मुरबाड तालुक्यातील एकलहरे गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा येथे अधुनमधून विद्युतपुरवठा खंडीत होत असतो. त्यामुळे शिक्षकांना अडचण होवुन विद्यार्थ्यांची ही गैरसोय होते.ही बातमी शिक्षण स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय गायकवाड यांना समजताच शाळेसाठी एक इन्व्हर्टर ची सोय करून द्यावी हा निश्चय त्यांनी केला.श्रमिक (मु.) पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष आणि जेष्ठ समाजसेवक महेंद्र उर्फ अण्णासाहेब पंडित यांचेशी संजय गायकवाड यांनी चर्चा करून आज रोजी एकलहरे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष म्हाडसे, शिक्षण कमिटी अध्यक्ष सुनील निचीते तसेच कमिटी सदस्या, चंदनाताई निचीते, सौ.रहीमा शेख, वैशाली निचीते, निशा निचीते आयोजीत छोटेखानी कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी शिक्षण स्वाभिमानी संघटना व श्रमिक (मु.) पत्रकार संघाच्या माध्यमातून शाळेसाठी मान्यवरांच्या हस्ते इन्व्हर्टर भेट करण्यात आला. 

सदर कार्यक्रमास जेष्ठ समाजसेवक *मा.अण्णासाहेब पंडित, मा.संजय गायकवाड* यांचेसह ठाणे जिल्ह्यातील युवा उद्योजक आणि अखिल भारतीय मातंग सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष, *मा.रवी गवळी,* लहुजी शक्ती सेना युवा ठाणे जिल्हाध्यक्ष, *मा.श्रावण बनसोडे.* अखिल भारतीय मातंग सेना कल्याण शहर जिल्हाध्यक्ष  *मा.मोहन गवळी* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सन्मानिय पदाधिकारी *मा.सौ.उज्वलाताई महेंद्र पंडित.* समाजसेविका ‌ *सौ.नितु गायकवाड,* *श्रीमती.हिरल भट* इत्यादी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी *बियॉंड दि फेम* संस्थेचे कु.कैवल्य गायकवाड आणि कु.स्मायली भट. युवकांना मार्गदर्शन करणारी त्यांचे कलागुणांना वाव देणारी, त्यांच्यातील सुप्त गुण ओळखुन त्यांना विकसित करण्यासंदर्भात प्रयत्नशील असलेल्या *बियॉंड दि फेम* संस्थेबाबत माहिती देवुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शाळेचे मुख्याध्यापक *संतोष म्हाडसे यांनी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.तसेच शाळेला केलेल्या इन्व्हर्टर रुपी मदतीबद्दल शिक्षण स्वाभिमानी संघटना व श्रमिक (मु.) पत्रकार संघटनेचे विशेष आभार मानले. शाळेमध्ये नुतनीकरण केलेल्या सभागृहामध्ये माईक आणि लाऊड स्पीकरची आवश्यकता असल्याने युवा उद्योजक रवी गवळी यांनी शाळेला सदर वस्तू भेट देणार असल्याचे सांगितले तसेच सौ.उज्वलाताई महेंद्र पंडीत.यां देखील शाळेला फिरता पंखा भेट देणार आहेत. मान्यवरांच्या दानशुर वृत्तीचे कौतुक करुन शिक्षकवृंदांनी व ग्रामस्थांनी समाधानाची भावना व्यक्त केली.

दाखल जनहित याचिका हायकोर्टाने सुद्धा कायमस्वरूपी निकाली काढली आणि पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनाच दिले चौकशीचे आदेश !!

दाखल जनहित याचिका हायकोर्टाने सुद्धा कायमस्वरूपी निकाली काढली आणि पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनाच दिले चौकशीचे आदेश !!
भारतीय संविधानामध्ये नागरिकांना बोलण्याचा, तक्रार करण्याचा पूर्णपणे अधिकार असतो आणि डावखर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या अधिकाराचा आदरच करते. याच अधिकाराचा वापर करून दोन व्यक्तींनी स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी वारंवार जिल्हाधिकारी आणि आयुक्तांकडे तक्रार केली होती की डावखर एलिगन्स ज्या मध्ये 200 कुटुंब राहत आहेत ज्याची 2023 ला ओसी मिळालेली आहे अशी बिल्डिंग संरक्षण जमिनीवर बांधली गेली आहे.

सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी आणि आयुक्त दोघांनीही पहिल्याच सुनावणीमध्ये एक लेखी आदेश जारी केला होता ज्यामध्ये ही मालमत्ता खाजगी मालकीची असल्याची पुष्टी करण्यात आली होती आणि असा अहवाल 5 नोव्हेंबर 2020 रोजी डिफेन्स डिपार्टमेंटला देखील पाठवण्यात आला होता. तसेच आमदारांनी देखील अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता ज्याला महसूल विभागाने उत्तर देखील त्यावेळी दिले होते. या अहवालानुसार परिसरातील 220 हुन अधिक भूखंड आणि 72 वरून अधिक इमारतींचा समावेश आहे. तरी देखील त्या व्यक्तींनी माननीय उच्च न्यायालयात जाणीवपूर्वक डावखर एलिगन्स प्रकल्पालाच लक्ष करून जनहित याचिका (पीआयएल) दाखल करून प्रकरण आणखी वाढवले. हायकोर्टाकडून ही जनहित याचिका देखील कायमची रद्द करण्यात आली असून न्यायालयाने जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना तांत्रिक बाबी लक्षात घेऊन जमिनीची सविस्तर पुनर तपासणी करण्याचे आणि तक्रारदार आणि संबंधित पक्षांना अंतिम निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत.

आम्ही सर्व रहिवाशी, भागधारक आणि जनतेला आवाहन करतो की निकाल लागेपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नये. योग्य मार्गाने प्रक्रिया सुरू आहे. सत्य लवकरच समोर येईल. आपण सर्व सार्वजनिक माध्यमांवर प्रचंड विश्वास ठेवतो. सर्व पत्रकारितेची प्रामाणिकता राखतातच. परंतु दुर्दैवाने काही वेळा सनसनाटी बातमी देण्याच्या नादात लोकांची दिशाभूल होऊ शकते. सर्व माध्यमांना अशा वेळी सावधगिरी आणि निष्पक्षता बाळगण्याचे आवाहन करू इच्छितो.

आमच्या रहिवाशांना, भागीदारांना आणि जनतेला खात्री देतो की डावखर एलिगन्स संबंधित 1928 पासून जमिनीच्या सर्व नोंदी पडताळणीसाठी उपलब्ध आहेत. सरकारने जारी केलेल्या 97 वर्षाच्या नोंदीप्रमाणे आमची स्पष्ट आणि निर्विवाद मालकी दिसून येते. तरीदेखील या कागदपत्रांची तपासणी करण्यास इच्छुक असलेले कोणीही श्री वैभव कोल्हे यांच्याशी वेळ निश्चित करून भेटू शकतात.

माध्यमांद्वारे हे देखील स्पष्ट करू इच्छितो की जमिनीचे हक्क निश्चित करण्याचा अधिकार केवळ महसूल विभागाकडे आहे, ज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा देखील समावेश असतो. तसेच पूर्वी जे भूखंड भाडेतत्त्वावर दिले गेले होते तो निर्णय देखील आता रद्द करण्यात आला आहे.

शिवाय डावखर ग्रुप विरुद्ध जाणीवपूर्वक खोटे आरोप करणाऱ्या दोन व्यक्तींच्या विरोधात कल्याण न्यायालयात ₹7 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कायदेशीर पद्धतीनेच उत्तर दिलं जाईल.

सर्वांना विनंती करतो की त्यांनी तक्रारदारांच्या बाजारपेठेतील प्रतिष्ठेचा काळजीपूर्वक विचार करावा. विशिष्ट माननीय न्यायालयात सहसा अशा जनहित याचिका प्रकरणांमध्ये तक्रारदारांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आणि देशाच्या जीडीपी मध्ये त्यांचे योगदान तपासले जाते.

योग्य प्रक्रिया पूर्ण होत असताना तुम्ही दाखवलेल्या संयमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, लवकरच सत्य सर्वांसमोर असेल असा डावखर ग्रुपला विश्वास आहे.

अधिक चौकशीसाठी किंवा जमिनीच्या नोंदी पडताळणीसाठी कृपया संपर्क साधा : *श्री वैभव कोल्हे (सायंकाळी 4 ते 6 या वेळेत) +91 8652277703*


सादर __
व्यवस्थापन,
*डावखर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.*

Saturday, 26 April 2025

सिद्धार्थ महाविद्यालयात व्यवसाय संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न‌" !!

"सिद्धार्थ महाविद्यालयात व्यवसाय संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न‌" !!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या, सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व मुंबई विद्यापिठाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शनिवार, दि.२६/४/२०२५ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये केले होते. या परिषदेचा विषय‌ होता, *'व्यवसाय संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान'* (Innovation & Research in Business and Modern Technology)

या परिषदेचे उद्घाटन प्रमुख पाहूणे, सावित्रीबाई फूले पुणे विद्यापिठाचे माजी कुलगूरू डॉ. वासूदेव गाडे यांच्या हस्ते, विशेष निमंत्रीत जेष्ठ प्राध्यापक डॉ. संजयकुमार फड व प्राचार्य डॉ. उमाजी मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी दहा वाजता झाले. ६० मिनीटांच्या या उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात प्रमुख पाहूण्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे‌ शेती, उद्योग व संशोधनांवर वर होत असलेल्या चांगल्या वाईट परिणामांची अत्यंत अभ्यासपूर्ण व चिकित्सक पद्धतिने सहभागी अभ्यासक, शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर मांडणी केली.

त्यांनतर दिड तासाच्या महत्वाच्या दुसर्या सत्रात पॅनल डिस्कशनद्वारे निमंत्रीत तज्ञ वक्त्यांनी AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अर्थीक व कौशल्य विकास, नोकरीच्या संधी, व्यावसायिक नितीमत्ता, आव्हाने व उपाय इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली. तसेच काहींच्या प्रश्नांनाही समाधानकारक उत्तरे दिली.  यामध्ये पॉन्डेचेरी येथील पदवीत्तर शासकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. लक्षमनपथी तसेच पूणे येथिल मॉर्डन कॉलेजचे प्राध्यापक डॉ. संदीप सानप व आमचे उपप्राचार्य डॉ. समीर ठाकूर‌ यांचा समावेश होता.  

दुपारच्या जेवणानंतरच्या तिसर्या सत्रात सहभागी अभ्यासक व पदवीत्तर विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रीम बुद्धिमत्ता, नाविण्यपूर्ण संशोधन इत्यादी विषयावरील शोधनिबंधाचे सादरीकरण आयोजित केले होते. यामध्ये मुंबई व पुणे येथिल विविध महाविद्यालयातून सहभागी झालेल्या निवडक १० प्रतिनीधीना संधी देण्यात आली. त्यांनीदेखील वरील विषयावरील त्यांचे अभ्यासपूर्ण प्रेझेन्टेशन केले. या सत्राचे परिक्षण डॉ. विष्णू भंडारे व डॉ. समिर ठाकूर यांनी केले.

समारोपाच्या शेवटच्या सत्रात प्राचार्य डॉ. उमाजी म्हस्के यांनी सर्व‌ सहभागी वक्ते, अभ्यासक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले व सर्वांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. तसेच परिषद यशस्वी करण्यासाठी हातभार लावलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व‌ विद्यार्थ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सदर राष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. उमाजी म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. शशिकांत मुंडे यांच्या नेतृत्वात प्रा. विशाल करंजवकर, प्रा. राधा कनकामल्ला, यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व निवडक विद्यार्थ्यानी भरपूर मेहनत घेतली.

*-डॉ. विष्णू भंडारे (मुंबई प्रतिनिधी )*

Tuesday, 22 April 2025

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथसंप्रदायातील श्री.गोरक्षनाथ महाराजांचा जन्मोत्सव सोहळा गुरुवार दि.२४ एप्रिल रोजी चैत्र-वरूथिनी एकादशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने अन् उत्साहात साजरा होत आहे .
    मंगळवार दिनांक २२एप्रिल  ते २३ एप्रिल दरम्यान अभिषेक व कलश पूजन,  श्रींची महाआरती नंतर भजन , हरिपाठ कार्यक्रम, रात्रौ  महाप्रसाद, त्यानंतर ह.भ. प प्राची मंदार व्यास यांचे कीर्तन अशा प्रकारची कार्यक्रमाची रूपरेषा आहे.
     तर गुरुवारी उत्सवाच्या मुख्य दिवशी सकाळी ०९:३० वाजता श्रींच्या जन्माचे ह.भ. प प्राची मंदार व्यास यांच्याकडून कीर्तन होऊन जन्मसोहळा साजरा होईल .जन्मसोहळ्यानंतर महाप्रसाद, दुपारी १ वा. भजन तसेच रात्रौ १२ वाजता श्रींच्या प्रदक्षिणा होतील.
   उत्सवासाठी विठ्ठलनगर, घोडाबंदर, मंत्रीवाडी, मलेघरवाडी, ठाकुरबेडी, जनवली बेडी, तामशीबंदर, बोरकर वाडी, पैरणकर वाडी, बहिराम कोटक लाखोले, म्हात्रे ठाकूर वाडी व इतर बेडेकरी मंडळींचे सहकार्य लाभणार आहे. तरी या श्री गोरक्षनाथ उत्सव सोहळ्याचा पंचक्रोशीतील सर्व भाविक, बंधु -भगिनी अशा सर्वांनी लाभ घ्यावा.

दी.हायकोर्ट एम्प्लॉईज को.ऑप. क्रेडिट सोसा (लि.) मुंबई यांच्यातर्फे कोकण सुपुत्र, उच्च न्यायालयाचे कर्मचारी समाजसेवक श्री.चंद्रकांत करंबळे यांचा सत्कार !

दी.हायकोर्ट एम्प्लॉईज को.ऑप. क्रेडिट सोसा (लि.) मुंबई यांच्यातर्फे कोकण सुपुत्र, उच्च न्यायालयाचे कर्मचारी समाजसेवक श्री.चंद्रकांत करंबळे यांचा सत्कार !

मुंबई (शांताराम गुडेकर )
          दी.हायकोर्ट एम्प्लॉईज को.ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या वतीने के.सी.कॉलेज ऑडीटोरियम विद्यासागर प्रिन्सिपल चर्चगेट मुंबई येथे सभासद व विद्यार्थी गुणीजनांचा गौरव समारंभ नुकताच पार पडला. या समारंभामध्ये कोकण सुपुत्र, उच्च न्यायालयाचे कर्मचारी समाजसेवक श्री. चंद्रकांत चंद्रभागा शिवराम करंबळे यांना पुणे येथे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार मिळाल्याबद्दल व दिल्ली येथे अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी त्यांच्या वतीने मिळालेल्या मानद डॉक्टरेट पदवी पुरस्कारबद्दल दि हायकोर्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्यावतीने प्रमुख पाहुणे उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती श्री.जितेंद्र जैन साहेब मा.न्यायमूर्ती श्री. सोमशेखर सुंदरेसन साहेब मा. न्यायमूर्ती श्री. अव्दवैत एम.सेठना साहेब यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी संस्थेचे संचालक मंडळ श्री.सनी सुरेंद्र हौसलमल -(अध्यक्ष), श्री.चंद्रकांत सरवणकर(उपाध्यक्ष), सौ.अनघा करकंडे (सहकार्यवाह), श्री.विनोद भोसले (खजिनदार ), श्री.अमोल शिंदे (सहखजिनदार) 'सदस्य - श्री दीपक धुमाळ, श्री.राहुल कदम, सौ.मुक्ता नागणे- कदम, डॉ.श्री अमोल राऊत, श्री रवी पवार, श्री राजेंद्र खिल्लारी तसेच संस्थेचे व्यवस्थापक श्री.संजय बेलोसे, सहाय्यक श्री.विजय पवार, लिपिक सौ.मुसळे मॅडम व उच्च न्यायालयाचे अधिकारी व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
         लांजा तालुका मधील गवाणे गावचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी तसेच गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत चंद्रभागा शिवराम करंबळे यांना आजवर विविध संस्था, मंडळ, समाज शाखा, मीडिया यांच्यातर्फे विविध पुरस्कार, सन्मान पत्र प्राप्त झालेली आहेत.
        उच्च न्यायालयाचे कर्मचारी,समाजसेवक श्री.चंद्रकांत चंद्रभागा शिवराम करंबळे हे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत, याशिवाय जेष्ठ नागरिक समूहाला पाणी, बिस्कीट वाटप केले जाते. गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे आणि परिवार व पदाधिकारी, सदस्य, सभासद, हितचिंतक यांच्यातर्फे कोकणात दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. शिक्षण,समाजसेवा, ग्रामसेवा, तंटामुक्त, कृषीसेवा, शेती विकास, कामगार, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, ग्रंथपालन, पर्यावरण आदी क्षेत्रात गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. फळाची अपेक्षा न ठेवता सतत कार्य करत रहाणे हे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे यांचा मूळ उद्देश आहे. गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत करंबळे अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हरसिटी (AIU)ची मानद डॉक्टरेट पदवी पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल दी. हायकोर्ट एम्प्लॉईज को.ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या वतीने के.सी.कॉलेज ऑडीटोरियम विद्यासागर प्रिन्सिपल चर्चगेट मुंबई येथे सत्कार झाल्याबद्दल उच्च न्यायालयाचे कर्मचारी समाजसेवक श्री. चंद्रकांत चंद्रभागा शिवराम करंबळे यांचे मुंबई /ग्रामीण भागातील नागरिक यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Thursday, 17 April 2025

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

** ३१ तास चाललेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेत हजारो भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
  
         महाराष्ट्राला तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे. या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत त्यापैकी जे. एन. पी. टी बंदर घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. गावदेवीची यात्रा चैत्र शुद्ध कृष्ण पक्ष-१ रविवार दि.१३ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झाली. तर पालखी सोहळा सोमवार दि. १४ एप्रिल २०२५ रोजी थाटामाटात पार पडला. अनेक गावामधील ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेतले व हजारो भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला. पालखी सोहळा यावर्षी ३१ तास चालला होता. ग्रामस्थांनी जत्रेची विशेष तयारी केली होती. तसेच हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी  ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

              ग्रामसुधारक मंडळ न्हावे कमिटीचे श्री. विजेंद्र गणेश पाटील (सरपंच), शैलेश विठ्ठल पाटील (उपसरपंच), योगेश कुंडलीक पाटील (अध्यक्ष), जयेंद्र जनार्दन पाटील (उपाध्यक्ष), निलेश हरिश्चंद्र भोईर (उपाध्यक्ष), विनोद एकनाथ पाटील (उपाध्यक्ष), सतीष दत्ताराम भोईर (उपाध्यक्ष), प्रेमनाथ नामदेव म्हात्रे (खजिनदार), अनंत लहु म्हात्रे (सहखजिनदार), चंद्रकांत बालाराम पाटील (सहखजिनदार), सदानंद पाटील - (सहखजिनदार), मनोरथ लक्ष्मण कडू - (सहखजिनदार) आणि सदस्य, सभासद तसेच संबंधित अन्य पदाधिकारी, हिरालाल हरि पाटील, दीपक पाटील, सुहास पाटील, रामनाथ पाटील आणि ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच पालखी सोहळ्यांसाठी मुंबई, ठाणे व पनवेल तसेच उरण तालुक्यातील आगरी-कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहीले होते. गावदेवीचे देऊळ गावकऱ्यांच्या सहभागाने बांधण्यात आले आहे. ही देवी नवसाला पावते म्हणून महाराष्ट्र व परराज्यातूनही अनेक भाविक येथे दर्शनाला येतात. गावदेवीची प्रसन्न व लोभसवाने रुप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळे भरून पाहावे. सर्व भक्तांनी आरोग्य, सुख, शांती प्रदान करण्याची विनंती देवीला केली असे सदर गावचे सुपुत्र अशोक दामू भोईर यांनी बोलताना सांगितले.

Sunday, 13 April 2025

कल्याण मध्ये रंगला नगरकर प्रिमियर क्रिकेट लिग स्पर्धचा थरार !

कल्याण मध्ये रंगला नगरकर  प्रिमियर  क्रिकेट लिग स्पर्धचा  थरार !

कल्याण, प्रतिनिधी - कल्याण मध्ये आम्ही नगरकर प्रतिष्ठान आयोजित नगरकर प्रिमियर क्रिकेट लिग २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आम्ही नगरकर मुंबई संघ (कर्णधार - बजरंग तांगडकर),‌ आम्ही नगरकर राजस्थान रॉयल्स (कर्णधार -मंगेश शेळके), आम्ही नगरकर चेन्नई सुपर किंग (कर्णधार-नितिन भराट), आम्ही नगरकर कोलकत्ता नाईट रायडर (कर्णधार-विक्की फापाळे), आम्ही नगरकर हैदराबाद किंग्ज (कर्णधार-अमोल शिंगोटे) संघांनी सहभाग घेतला असा एकूण आठ टीम ने सहभाग नोंदविला होता.

आम्ही नगरकर दिल्ली कॅपिटल प्रथम विजेता (विरेंद्र जाधव कर्णधार), सुशील खरे, धीरेंद्र जाधव, मिलिंद रोकडे, सचिन घुले, विशाल मोरे, संतोष सोनवणे तर दुसरे विजेता आम्ही नगरकर पंजाब किंग (प्रशांत आहेर कर्णधार), करण कुऱ्हाडे, अजिंक्य गायकर, अमित आहेर, निलेश गायकर, विकास काळे, संदेश भोर आणि तृतीय विजेता आम्ही नगरकर राॅयल चॅलेंज बॅंग्लोर  (शांताराम झावरे कर्णधार), प्रवीण सोमवंशी, सुनील  तांगडकर, प्रदीप सोमवंशी, राहुल वाढवणे, साई फापाले, श्याम जाधव हे संघ विजेते ठरले.

उत्कृष्ट फलंदाजी मध्ये प्रवीण सोमवंशी, प्रदीप सोमवंशी बंधुना संयुक्त पारितोषिक, उत्कृष्ट गोलंदाज सुशिल खरे तर 
मालिकावीर अजिंक्य गायकर यांनी पारितोषिक पटकावले
अतिशय थरारक व रोमांचक क्रिकेट सामने पार पडले.

जेष्ठ पत्रकार व शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर  व आम्ही नगरकर प्रतिष्ठान संचालक मंडळ मंगेश शेळके, बजरंग तांगडकर, शांताराम झावरे, तानाजी करपे, प्रशांत आहेर, विक्की फापाळे, विरेंद्र जाधव, नितिन भराट यांच्या शुभहस्ते नारळ फोडून स्पर्धा शुभारंभ झाला, स्पर्धाला स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख व व्हि एस फॅमिली सलून रौनक सिटी कल्याण च्या प्रोपायटर शिल्पा तांगडकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहत पहिल्या सामन्याचे नाणेफेक उडवत सर्व नगरकर खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

आम्ही नगरकर मुंबई संघ चे मंगेश शेळके, बजरंग तांगडकर, शांताराम झावरे, प्रशांत आहेर, विरेंद्र जाधव, विक्की फापाळे, तानाजी करपे, हिरा आवारी, रामनाथ भोजने, अमोल वाकळे, नितिन भराट, वतीने विविध मान्यवरांचे स्वागत व विजेता टिम पारितोषिक वितरण करण्यात आले कार्यक्रमाला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे अनाथ शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू तसेच जिवनावश्यक वस्तूंचे वाटप !

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे अनाथ शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू तसेच जिवनावश्यक वस्तूंचे वाटप !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
             सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक, पर्यावरण आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवसेना हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख मा.श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनाप्रमुख अदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुढी पाडवा हिंदू नवीन वर्ष, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक, पर्यावरण आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवसेना प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा (महाराष्ट्र राज्य) परिवार यांच्यावतीने ३५ वा उपक्रम पुणतांबा येथील मेथडिस्ट होमचे अनाथ शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू तसेच वॉशिंग मशीन, जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, गोंडेगावचे लोकप्रिय माजी सरपंच संभाजीराजे बढे उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते मुलांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते सुहास वहाडणे, पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी उपस्थित होते. मायेची सावली परिवार संस्थापक अध्यक्ष कटृर निष्ठावंत शिवसैनिक यशवंत विठ्ठल खोपकर व त्यांचे सर्व सहकारी कट्टर निष्ठावंत शिवसैनिक बंधु भगिनी यांच्या अथक प्रयत्नातुन अशा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. पुणतांबा येथील मेथडिस्ट चर्च‌ मधील फादर जॉन प्रिंटर यांच्या उपस्थितीत बाल गोपाल अनाथ आश्रम येथे वरील सर्व वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी खा.वाकचौरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुणतांबा शहर शिवसेनेचे व मायेची सावली परिवाराचे कौतुक करत आपण भविष्यात या अशा प्रकारचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करु. या सेवेत मी सदैव आपले पाठीशी तत्पर उपलब्ध राहील असे सांगितले. यशवंत खोपकर (मायेची सावली एक हात कर्तव्याचा (संस्थापक अध्यक्ष), संदिप चादिवडे (सचिव), दौलत बेल्हेकर (संचालक), वसंत घडशी (कार्यालय प्रमुख), विश्वनाथ जाधव, वैभव डोके, मेघा सावंत, निर्मला आवटे, रूपाली डोके, अपूर्वा पारकर, राजेंद्र पेडणेकर, राजेंद्र मणसुख,दत्तात्रय काशीद, अर्णव सावंत, अर्णव खोपकर, लिखित डोके यांच्यासह अन्य मायेची सावली सावलीचे पदाधिकारी, सदस्य, सभासद, हितचिंतक उपस्थित होते. तसेच मायेची सावली पदाधिकारी या सर्वांचा खा.वाकचौरे साहेब यांच्या हस्ते  संस्थेचे संस्थापक यशवंत खोपकर तसेच पदाधिकारी या सर्वांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

नेमेचि येतो मग उन्हाळा, पर्यावरणाचा उमाळा !!

नेमेचि येतो मग उन्हाळा, पर्यावरणाचा उमाळा !!

दरवर्षी उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या झळा सहन करत पर्यावरणाच्या गप्पा मारतो. वृक्ष तोड आणि वृक्षांची कमी होणारी संख्या याबाबत तावातावाने चर्चा करतो. लेख लिहितो, वाचतो. परंतु याचे मूळ काय याकडे बहुतेकांचे दुर्लक्षच असते. त्यानंतर

५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा (?) करतो.  या दिवशी आपण पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ घेतो.  त्यासाठी विविध कार्यक्रमांचं नियोजन करतो. परंतु पर्यावरण रक्षण ही गोष्ट मूळ कशावर अवलंबून आहे आणि ते टाळता येणे शक्य आहे का याचा विचार जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा विचारांचा पूर्ण गोंधळ उडालेला असतो. 

आपल्या भारताचाच विचार करू भारताची लोकसंख्या जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तेहेतीस कोटी होती आणि आज ती जवळपास १३३+ कोटी झाली. म्हणजे शंभर कोटीची भर पडली. फक्त सत्तर वर्षात. परंतू आताही भारताची जमीन १९४७ साली जेवढी  होती तेवढीच  आहे. जेवढं पाणी होतं तेवढंच पाणी आहे. पण लोक मात्र १०० कोटीने वाढले. या सर्व १०० कोटी लोकांची राहण्या-खाण्याची सोय त्यांना सुख सोयी देण्याची व्यवस्था आपल्याला करणे भाग आहे.  लोकसंख्या तर आपण काही कमी करू शकत नाही. तैहेतीस कोटी लोकांचे ऐवजी १३३ (आता म्हणे १४० कोटीच्या वर झाली) कोटी लोकांची सोय करण्यासाठी तेवढी घरे, रस्ते, तेवढी मार्केट, इतर सुखसोयी एकूण संपूर्ण पायाभूत सुविधा उभ्या करायच्या आहेतच. त्यासाठी आपण उपलब्ध असलेली जमिनच वापरणार.  उपलब्ध असलेला पाणीसाठाच वापरणार. उपलब्ध असलेली खनिजे वापरणार.वगैरे वगैरे.  म्हणजे तेवढ्या संख्येने झाडे कमी होणार, जंगले कमी होणार, पाणीसाठे कमी होणार. एक चादर एका माणसांसाठी वापरायच्या ऐवजी जर चार माणसांसाठी वापरायची ठरवली तर ओढाताण  होणारच. चादर फाटणारच. त्याला पर्याय काय ? सध्या आणखी नवीन नवीन शोध लागत आहेत. नवीन नवीन उत्पादने निर्माण होतायत. त्या सगळ्यासाठी नैसर्गिक शक्तींचा वापर होणारच आहे. तसेच नवीन नवीन औषधांचे शोध लागतात नवीन नवीन आरोग्य सुविधा निर्माण होत आहेत गेल्या शंभर वर्षांमध्ये असे म्हटले जाते की माणसाचे वयोमान सरासरी ६० वर्षावरून ८० वर्षापर्यंत जात आहे. बालमृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे लोकसंख्येची भर सतत पडणारच आहे. त्यासाठी कोणताही उपाय किंवा कोणतीही उपाययोजना माणसांच्यावर लादता येत नाही.  लोकसंख्या वाढ कमी करता येत नाही. त्यासाठी कुणी समाज प्रबोधन करतानाही दिसत नाही. फक्त पर्यावरण रक्षणाचा कंठशोष करून पर्यावरणाचे रक्षण होणे शक्य आहे का ?   

मृत्यूचे प्रमाण कमी झाल्यामुळे व लोकसंख्या वाढीचा वेग जास्त असल्यामुळे त्याबाबत आपण काहीही उपाय योजना करण्यास असमर्थ आहोत. माझ्याच आयुष्याचा प्रवास पाहिला तर ५० वर्षापूर्वी मी पाहिलेली मुंबई आणि पुणे आणि आज मी पहात असलेलं मुंबई व पुणे तसेच पन्नास वर्षांपूर्वीची त्याहीपेक्षा लहान शहरे आणि खेडेगावे सुद्धा. त्याचप्रमाणे शहराच्या आजूबाजूला असलेल्या खेडेगावाच्या कमी होत असलेल्या पिकाऊ जमिनी आणि उत्पादन वाढ व माणसांच्या सवयीमुळे होणारे प्रदूषणाचे प्रमाण खूपच वाढत चालले आहे. पर्यावरण रक्षणाचे प्रमाण व प्रयत्न पाहिल्यानंतर फक्त एवढेच जाणवते की आज पासून एक हजार वर्षांनी पृथ्वीचा विनाश होणार असेल तर फक्त तो ५-६ वर्षांनी पुढे ढकलता येईल यापेक्षा त्या प्रयत्नांना फार यश येणार नाही. हे क्षीण प्रयत्न ही सुद्धा चिंतेची बाब आहेच. आपण लोकसंख्येची वाढ कमी करू शकत नाही. प्रदूषणाचे प्रमाण कमी करू शकत नाही. पाण्याचा वापर कमी करू शकत नाही.  माणसांच्या सवयी बदलू शकत नाही. जंगले वाचवू शकत नाही. प्राणीजीवन वाचवू शकत नाही. वनस्पती संवर्धन ज्या प्रमाणात होत आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त वनस्पतींचे नष्टचर्य सुरू आहे. माणसाच्या कोणत्याही सवयींना अमुलाग्र बदलणे हे अशक्य आहे. आपल्याला विकास पाहिजे आणि हा विकास वरील नष्टचर्य चालू ठेवूनच होऊ शकला पाहिजे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार केल्यास पर्यावरण नष्ट करून पृथ्वी नष्ट करणे व संपूर्ण मानवजातीचे नष्टचर्य याचा वेळ वाढवणे यावर आपण काहीही करू शकत नाही. 

तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे. याशिवाय आपल्या हातात काय आहे. फक्त आपण मनातल्या मनात म्हणत राहायचे 'बुडते हे जन देखवेना डोळा' !

—-- सुनील देशपांडे ९६५७७०९६४०.

भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती चिंतन

असाध्य ते साध्य, करिता सायास ।
कारण अभ्यास ! तुका म्हणे ।। 

**भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती चिंतन 

या विश्वगुरू संत तुकाराम महाराजांच्या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ! 

विद्यार्थीदशे पासूनच शिक्षणासाठी किती अभ्यास केला आणि त्या अभ्यासासाठी किती सायास केले हे त्यांच्या चरित्रावरून साऱ्यांनाच माहिती आहे. आपल्याजवळ कोणतीही साधने असोत किंवा नसोत. कोणाचेही पाठबळ असो किंवा नसो. प्रत्यक्ष शिकवणारा असो किंवा नसो. ग्रंथ हेच गुरु मानून आणि अभ्यासाचा प्रचंड सायास करून त्यांनी जे करून दाखवले ते खरोखरच असाध्य होते परंतु ते साध्य करून दाखवले. 
विशेषतः त्यांच्या घटना समितीच्या शब्दांकन विभागाच्या प्रमुख पदाच्या कामगिरीबद्दल हे मोठेपण विशेष करून जाणवते. 

वकील झाल्यानंतर त्यांनी विशेष आवड म्हणून अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करणे हा छंद म्हणून जोपासला होता. त्यामुळे घटना समितीमध्ये त्यांना सामावून घेताना त्यांच्या या अभ्यासाचा मान राखून त्यांना या शब्दांकन उपसमितीचे प्रमुख बनवले. 

तरीसुद्धा त्यांचे खरे मोठेपण पुढेच आहे __

या शब्दांकन उपसमिती मध्ये त्यांचे शिवाय आणखी काही सदस्य होते. परंतु वेगवेगळ्या कारणाने ते सदस्य ही उपसमिती सोडून गेले. शेवटी शब्दांकन समितीचे ते एकमेव सदस्य त्या समितीत शिल्लक राहिले. तरीसुद्धा त्यांनी या समितीमध्ये माझ्या मदतीसाठी आणखी कोणी सदस्य मला द्या. सोडून गेलेल्या सदस्यांबद्दल कोणी पर्यायी सदस्य माझ्या मदतीला हवेत. अशी कोणतीही मागणी न करता. नेटाने एकट्याने रात्रंदिवस खपून आणि अभ्यास करून घटना समितीच्या शब्दांकन उपसमितीची जबाबदारी सर्वोत्कृष्ट पद्धतीने आणि वेळेवर पूर्ण केली. हे त्यांचे कार्य हे एकमेवाद्वितीयच आहे. 
आज त्यांच्या जयंतीदिनी या सर्व सायासातून घडलेल्या आणि आपल्या देशाची घटना घडवलेल्या या महान तपस्वी अभ्यास विभूतीला माझा साष्टांग प्रणिपात! 

परंतु या व्यक्तीच्या या सर्व सायासांचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे हे मात्र आज कुणाच्याही खिजगणतीतही नाही. 

स्व. भारतरत्न बाबासाहेबांनी राज्यघटनेनुसार आम्हाला एखाद्या न्याय्य मागणीसाठी किंवा हक्कासाठी आंदोलन करायचा अधिकार दिलेला आहे एवढेच आमच्या लक्षात आहे. परंतु ते आंदोलन करताना त्यातून हिंसात्मक उद्रेक किंवा बेकायदेशीर नुकसानकारक कृत्य किंवा राष्ट्रीय संपत्तीचा नाश करण्याची राष्ट्र विघातक कृती घडू नये यासाठी जे नियम आहेत ते मात्र आम्ही पाळणार नाही. अशा पद्धतीने आम्ही जर वागू लागलो तर त्यात स्व. बाबासाहेबांच्या सायासांचे आम्ही विडंबन करतो आहोत असे नाही का वाटत? 

ज्या जातीअंताची लढाई स्व. बाबासाहेबांनी आरंभली आहे त्या जातींअंताकडे आमचा प्रवास चालू आहे की त्या विरुद्ध दिशेने चालू आहे याचा कोणी विचार करतो आहे का? व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून सामाजिक समतेकडे वाटचाल करण्यासाठी कटिबद्ध असलेले किती कार्यकर्ते समाजात दिसतात? 

कोणत्याही चांगल्या कृतीमध्ये कालांतराने विकृती घुसत जातात हे जगात सगळीकडेच दिसून येते. परंतु लोकशाही सारख्या चांगल्या विचारांमध्ये घुसलेल्या सामाजिक विकृती विरोधात कार्य करण्यासाठी सायास करणारे व स्व. बाबासाहेब यांच्या मूळ विचारधारेशी प्रामाणिक राहून कार्य करणारे कार्यकर्ते जास्तीत जास्त संख्येने निर्माण होतील का? या प्रश्नाचिन्हावर भविष्याकडून काही आशादायक घडावे एवढी प्रार्थना करून आज स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम!!!

—----- सुनील देशपांडे (९६५७७०९६४०)

सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले जवान नंदन रघुनाथ जाधव यांचा चांबळे ग्रामस्थांच्यावतीने कृतज्ञता सन्मान...

सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले जवान नंदन रघुनाथ जाधव यांचा चांबळे ग्रामस्थांच्यावतीने कृतज्ञता सन्मान...

वाडा, प्रतिनिधी : वाडा तालुक्यातील चांबळे येथील सैन्यदलातील जवान नंदन रघुनाथ जाधव हे भारतीय सैन्य दलात 20 वर्षे सेवानिवृत्त झाले असून त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता सन्मान सोहळा करण्यात आला. 

नंदन जाधव हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून ते जून 2005 साली  सेवेत रुजू झाले होते. जून 2006 पर्यंत हैद्राबाद ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्यांची  पहिली पोस्टिंग पठाणकोट (पंजाब) येथे देण्यात आली होती. तर  2007 ते 2015 पर्यंत त्यांची सलग 8 वर्षे  जम्मु काश्मीर येथे पोस्टिंग होती. त्यानंतर 2015 ते  2022 पर्यंत संभाजी नगर (औरंगाबाद) येथे पोस्टिंग होती. तर 2022 ते 2025 पर्यंत त्यांची चीन सीमेवर दुर्गम ठिकाणी  त्यांनी काम केले. अशाप्रकारे भारतीय सैन्यदलातील गौरवास्पद व निष्कलंक सेवा बजावून  ते 31 मार्च 2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

नंदन जाधव यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा हनुमान जयंतीच्या दिवशी (12 एप्रिल) रोजी आयोजित करण्यात आला होता. सैन्यदलातील सेवेबद्दल ग्रामस्थांच्यावतीने नंदन जाधव यांना कृतज्ञता सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष जयेश शेलार, गोऱ्हे उपसरपंच व तेली समाज युवक अध्यक्ष अनिल खिलारे, मिठाराम बोंद्रे सर, ग्रामस्थ धनेश पाटील, रमेश पाटील, xxx यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास कासार सर यांनी केले.

सैन्य दलात सेवा करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, जास्तीजास्त तरुणांनी सैन्य दलात जाऊन देशाची सेवा करावी. 
नंदन रघुनाथ जाधव
(सेवानिवृत्त जवान)

सौजन्य -
श्री. जयेश शेलार
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष, वाडा 

Saturday, 12 April 2025

हवामान बदल व त्याचे परिणाम या विषयावर युसुफ मेहेरअली सेंटर तारा येथे कार्यशाळा संपन्न !!

हवामान बदल व त्याचे परिणाम या विषयावर युसुफ मेहेरअली सेंटर तारा येथे कार्यशाळा संपन्न !!

हवामान बदल व त्याचे परिणाम  या विषयावर जेष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सौम्या दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच एक कार्यशाळा रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ तारा येथील युसुफ मेहेरअली सेंटर येथे पार पडली. सदर कार्यशाळा 8 आणि 9 एप्रिल 2025 रोजी जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (NAPM) च्या National Alliance of Climate and Ecological Justice (NACEJ) या राष्ट्रीय मंचाच्या महाराष्ट्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. हवामान संकट आणि त्याचे परिणाम या विषयावरील या कार्यशाळेत NACEJच्या कामात सहभाग देऊ इच्छिणारे महाराष्ट्रभरातील पर्यावरणीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. हवामान बदलाबद्दल कार्यकर्त्यांत जागरुकता निर्माण करणे व या क्षेत्रात काम करण्यासाठी क्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केलेली होती.

NACEJच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या या कार्यशाळेत हवामान संकटात पर्यावरण व सामाजिक न्यायासाठी वैज्ञानिक हस्तक्षेपाची क्षमता कार्यकर्त्यांत निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. हवामान आणि वातावरण या वैज्ञानिक संज्ञाच्या मूलभूत संकल्पनेपासून ते या संज्ञा मोजण्याच्या प्रात्यक्षिकापर्यंत या प्रशिक्षणात समावेश होता. विविध जनआंदोलनात व पर्यावरणीय लढ्यात सामिल असलेले सामाजिक कार्यकर्ते या मूलभूत संकल्पना समजून घेत होते व हवामान बदलातील विविध घटक विविध उपकरणांच्याद्वारा मोजून पहात होते हे या कार्यशाळेचे महत्वाचे वैशिष्ट्य.  

दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत गंभीर हवामान स्थिती समजून घेणे, हवा, पाणी, ध्वनी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडियेशन, आयोनाइजिंग रेडियेशन इत्यादी संपूर्ण पर्यावरणीय प्रदूषणाचे निरीक्षण व मोजमाप करणे, त्यासाठीचे सरकारी निकष, वापरण्यात येणारी मानकांची माहिती, दस्तऐवजीकरण आणि प्रदूषण स्रोत आणि दायित्व स्थापित करण्यासाठीची पद्धती, वेगाने उदयास येणारे प्रदूषण धोके जसे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडियेशन प्रदूषण यांची माहिती प्रशिक्षणार्थींना मिळाली. हवामान बदलाच्या संकटाचा परिणाम उपेक्षित समाजाच्या उपजिविकेवर आणि तब्येतीवर कशा प्रकारे होतो आहे याचीही चर्चा झाली. त्याचबरोबर असुरक्षित समुदायांना जोखीम कमी करण्यात आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी तसेच हवामान बदलाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी साधे सोपे उपाय कसे योजता येतील ह्यासाठी मार्गदर्शन केले गेले. हवामान बदल, पर्यावरण व सामाजिक न्याय याचा परस्पर संबंध या चर्चेतून समजावून देण्यात आला. या विषयातील तज्ञ डॉ. सौम्या दत्ता यांनी या कार्यशाळेत मुख्यत्वे मार्गदर्शन केले.  

NACEJ चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संतोष ललवाणी यांनी हवामान बदलाबाबतचा तेरी या संस्थेने बनवलेला *'महाराष्ट्र स्टेट ॲक्शन प्लॅन ऑन क्लाइमेट चेंज'* हा रिपोर्ट संक्षेपात सादर करुन प्रशिक्षणार्थिंना  अशा प्रकारच्या अभ्यासाबाबत अवगत केले व NACEJ च्या वतीने गरज असेल तिथे भविष्यात अशा प्रकारचा अभ्यास अहवाल तयार करण्यासाठी संशोधक टीम तयार करण्याची गरज अधोरेखीत केली. 
 
कार्यशाळेचा समारोप NACEJ-महाराष्ट्र द्वारे पुढील स्तरावरील राज्यव्यापी कृतींच्या नियोजनाची कालबद्ध आखणी करुन करण्यात आला. हवामान बदलाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी तळागाळातील उपेक्षित समाजात काम करण्यासाठी व जनआंदोलनांना वैज्ञानिक डेटा पुरवणाऱ्या सजग कार्यकर्त्यांची फळी उभारण्याची गरज प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी समारोप प्रसंगी बोलताना व्यक्त केली. त्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा महाराष्ट्रातील विविध विभागांत आयोजित करण्याचे नियोजनही उपस्थित प्रतिनिधींच्या मदतीने करण्यात आले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य समन्वयक सुजय मोरे यांनी विशेष मेहनत घेतली.

सौजन्य‌ -
NACEJ, महाराष्ट्र 
लेखन : सिरत सातपुते

भव्य 'रक्तदान शिबिरां'द्वारे महात्मा फुलें व बाबासाहेबांना अभिवादन !!

भव्य 'रक्तदान शिबिरां'द्वारे महात्मा फुलें व बाबासाहेबांना अभिवादन !!

महात्मा ज्योतिबा फूले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने प्रथमच  पिपल्स एज्यूकेशन सोसायटीच्या मुंबईतील ३ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांनी संयुक्तिक 'भव्य रक्तदान शिबीराचे' आयोजन शुक्रवार, दि. ११/४/२०२५ रोजी तीन वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर (दादर, चर्चगेट व सिएसएमटी) केले होते. 

तिन्ही शिबिरातून १५०+ युनिट्स रक्त जमा झाले. यामध्ये दादर रेल्वे स्थानकातील आंबेडकर कॉलेजच्या शिबीरातून सर्वात जास्त (७५) रक्त युनिट्स जमा झाले. फोर्ट येथिल दोन्ही सिद्धार्थ महाविद्यालयाच्या सिएसटी व चर्चगेट रेल्वे स्थानकातील शिबिरातून एकून ८० रक्त युनिट्स जमा झाले. 
तिनही ठिकाणी ७० पेक्षा जास्त रक्तदात्यांची इच्छा असूनदेखील त्यांचे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे ते रक्तदान करू शकले नाहीत. 


अत्यंत कडक उन्हाळ्याच्या गरम वातावरणात व परिक्षा चालू असताना देखिल तिन्ही महाविद्यालयाच्या एन एस एस कार्यक्रम अधिकार्यांच्या नेतृत्वात, जवळजवळ ५० विद्यार्थ्यांनी प्रवाशी रक्तदाते मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. या शिबिराला काही माजी विद्यार्थी व शिक्षकांनी देखील भेट देऊन रक्तदानही केले व विद्यार्थ्यांचे कौतूक केले.‌ सर्व शिबिरांसाठी लायन्स क्लब मुंबई महानगर यांनी सर्वांचे नास्ता पाणी व जेवणासह पेंडालचा खर्च करून उत्तम सहकार्य केले.

या शिबिराच्या योग्य नियोजनासाठी शिबीर समन्वयक श्री. अनिल गरेंच्या नेतृत्वात तीनही कॉलेजचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन खडतर, डॉ. धनंजय चंदनशिवे, प्रा. विशाल करंजवकर व डॉ. विष्णू भंडारे यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच नायर रक्तपेढीचे समाज विकास‌ अधिकारी कांतीलाल पवार, सायन रक्तपेढीचे शुभम भोईर व जगजीवनराम रेल्वे रक्तपेढीचे प्रथमेश सकपाळ यांनीही उत्तम सहकार्य‌ केले. मुंबई विद्यापिठ, रासेयोचे संचालक प्रा. सुशिल शिंदे व जिल्हा समन्वयक, प्रा. क्रांती उके यांनीदेखिल आमच्या या संयुक्त रक्तदान मोहीम उपक्रमाला पाठींबा देऊन सर्वांचे  कौतूक केले. 
 
*-डॉ. विष्णू भंडारे, मुंबई प्रतिनिधी*

Friday, 11 April 2025

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !

 *शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाची कारवाई ची मागणी*

नालासोपारा, प्रतिनिधी :- नामांकीत लॉरेल कंपनीच्या औषधे व वस्तुवर असलेले लेबल बदलवुन त्याची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 
नालासोपारा येथिल वि केअर मेडिकल येथुन व्यक्तीने लॉरेल कंपनीच्या वस्तुचे खरेदी केली असता बाहेरील बॉक्स वर मुदत २०२७ व आतील वस्तुंवर मुदत तारीख २०२४ असल्याचा प्रकार समोर आला याबाबत त्वरीत औषध विक्रेता ला  प्रकार सांगताच त्यांनी लॉरेल कंपनीचे चुक असल्याचे सांगितले.
संबधित व्यक्तीने शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार करताच शिवसेना उपनेते व अध्यक्ष अँड अरून जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख रूचिता नाईक यांनी अन्न व औषध प्रशासनाची भेट घेत नागरीकांच्या जीवाशी खे॓ळ सुरू असल्याचा धक्कादायक  प्रकार उघडकीस आणला.
तक्रारीची दखल घेत अन्न सुरक्षा मानक कायद्याची पायमल्ली केल्याचे आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाकडुन उत्पादने सील करून अधिक तपास सुरू केला. मुदत संपलेल्या औषधांची विक्री करणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे, म्हणून यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
या लॉरेल कंपनीवर फौजदारी गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तर्फे जिल्हाप्रमुख रूचिता नाईक यांनी केली....

मिरॅकल फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्राचे, क्षयरोग मुक्त भारत अभियानासाठी मोलाचे सहकार्य !!

मिरॅकल फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्राचे, क्षयरोग मुक्त भारत अभियानासाठी मोलाचे सहकार्य !! ठाणे, (पी. डी. पाटील) : राष्ट्रीय क्षयरो...