Sunday 23 June 2024

अभिनेते विकास वायळ यांचा" संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई" पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !!

अभिनेते विकास वायळ यांचा" संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई" पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

         दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ शिव तो निवृत्ती । विष्णू ज्ञानदेव पाही । सोपान तो ब्रह्मा । मूळ माया मुक्ताई ।। असे या भावंडांचे वर्णन संत कान्होपात्रांनी केलंय. या भावंडांच्या संतपणाची महती सांगत मुक्ताईच्या दृष्टीकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित "संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई"  हा भव्य आध्यात्मिक मराठी चित्रपट २ ऑगस्ट २०२४ ला आपल्या भेटीला येत आहे.दिव्य अनुभवाची प्रचिती देणाऱ्या या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली आहे.
        चित्रपटात बालपणीच्या संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर, मुक्ताईच्या भूमिकेत ईश्मिता जोशी तर निवृत्तीच्या भूमिकेत साहिल धर्माधिकारी आणि सोपानच्या भूमिकेत अभीर गोरे आहे. महिला संतमालिकेत मुक्ताबाई यांचा जीवनसंघर्ष आणि त्या संघर्षातून आलेली ज्ञानदृष्टी अलौकिक आहे.त्यांच्या श्रेष्ठत्वाचा गौरव सर्वच संतांनी केलेला आहे. हे श्रेष्ठत्व सहज मिळालेले नव्हते, तर त्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या दिव्यातून जावे लागले. त्यात सर्वांत लहान असलेल्या मुक्ताबाईला खूप मोठी जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागली. ‘देहरूपाने संपले तरी कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या मुक्ताबाईंच्या कार्य व विचारांचे सार ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून मांडण्यात आले आहे. 
          या चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिर छायाचित्रे प्रथमेश अवसरे यांचे आहेत.  रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीसंयोजन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.

Saturday 22 June 2024

'सावित्रीबाई सोनू तोरस्कर' यांचे निधन

'सावित्रीबाई सोनू तोरस्कर' यांचे निधन 

मुंबई (शांताराम गुडेकर) :
             रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील कासार कोळवण गावातील रहिवाशी श्री.यशवंत सोनू तोरस्कर यांच्या मातोश्री सावित्रीबाई सोनू तोरस्कर यांचे (दि.२१ जून २०२४) रोजी प्रदीर्घ आजाराने शताब्दी हॉस्पिटल कांदिवली येथे निधन झाले. त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी पांडुरंग सोनू तोरस्कर १५/९६ कुंती कृष्णा महाराष्ट्र हॉसिंग बोर्ड. दत्त पाडा, बी.एम.सी शाळेजवळ, बोरिवली पूर्व मुंबई-६६ येथे ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर दहिसर येथील दौलत नगर येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले. अंत्यविधीला कासार कोळवण गाव आणि आजू -बाजूच्या गावातील भावकी, गावकी, समाज बांधवआणि नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात यशवंत, पांडुरंग, विजय, तानाजी असे चार मुलगे व सुना, नातवंडे असा मोठा परिवार  आहे. त्यांच्या दुःखात सर्व कासार कोळवण गाव, नातेवाईक  सहभागी असून मृतदेहास चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना अशी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Friday 21 June 2024

विवा महाविद्यालयात योगसाधना ___

विवा महाविद्यालयात योगसाधना ___

वसई, प्रतिनिधी : दिनांक २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री.अंबिका योगाश्रम, विशाल नगर वसई शाखा आणि विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट विरार संचालित विवा इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबीर उत्साहात संपन्न झाले. संस्थेचे विश्वस्त श्री. संजीव पाटील तसेच श्री अंबिका योगाश्रम चे श्री. राजीव मोहिले सर, श्री.मनोज राऊत सर, श्रीमती. किरण गुप्ताजी आणि इतर सहकारी यांनी योग साधनेचे आपल्या जीवनातील असलेले  महत्व  तसेच विविध योगासनाबद्दल  माहिती, त्यांचे प्रकार ह्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन केले आणि विविध योगसने ह्यांची प्रात्यक्षिके करुन दाखवली.

विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट मधील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री समर्थ कृपा भजन मंडळाचा २३ जुन रोजी १४ वा वर्धापनदिन सोहळा व भव्य - दिव्य भजन स्पर्धेचे आयोजन !!

श्री समर्थ कृपा भजन मंडळाचा २३ जुन रोजी १४ वा वर्धापनदिन सोहळा व भव्य - दिव्य भजन स्पर्धेचे आयोजन !!

किर्तनकार ह.भ.प.श्री पंढरीनाथ महाराज आरु - ( आळंदी ) यांचं सुश्राव्य किर्तन होणार सादर...!

विरार - ( दिपक कारकर ) :

आध्यात्मिक ओढीने, वारकरी सांप्रदायिक भक्तीने प्रतिवर्षी मोठया उत्साहाने वर्धापनदिन व भव्य -दिव्य भजन स्पर्धेचे आयोजन करून स्तुत्य उपक्रम राबविणाऱ्या श्री समर्थ कृपा भजन मंडळ ( नालासोपारा - विरार ) - गाडीची वेळ स.०९. ४३ ( विरार ते चर्चगेट ) यांच्या वतीने साजरा होणारा ह्यावर्षीचा १४ वा वर्धापनदिन रविवार दि.२३ जुन २०२४ रोजी एकदिवसीय आयोजनात "जीवदानी मंगल कार्यालय",मोरेश्वर विद्यालय जवळ, मोरेगाव नाका, विरार रोड, नालासोपारा ( पूर्व ) ता. वसई, जि. पालघर- ४०१२०९ येथे संपन्न होणार आहे.

ह्या सोहळ्यानिमित्ताने "संतांची शिकवण आणि भक्तीचा सोहळा" अशा पंक्ती प्रमाणे बहारदार अशी भजन स्पर्धा नियोजित करण्यात आली आहे. अनेक बक्षिसे असणारी व युट्यूब लाईव्ह प्रसारण असणाऱ्या ह्या स्पर्धेत  संत सेवा भजन सामाजिक संस्था, संत ज्ञानेश्वर माऊली भजन सामाजिक संस्था या संस्थेतील १५० हुन अधिक भजन मंडळ उपस्थित राहणार आहेत.दरम्यान २०२३-०२४ वर्षातील भजन स्पर्धेत उत्कृष्ट डफली वादक व सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील भजन मंडळांचा गुणगौरव सोहळा देखील पार पडेल.

भक्तिमय वातावरणात दिवसभरच्या भरगच्च आयोजनात सकाळी ६ वा. श्री सत्यनारायण महापूजा,स. ८ वा., दिपप्रज्वलन, सामूहिक पालखी सोहळा, पंचपदी ह.भ.श्री सदानंद गायकवाड माऊली यांचा कार्यक्रम, शिवाय भजन स्पर्धा, स्नेह भोजन, हळदी कुंकू समारंभ व हरी किर्तनकार ह.भ.प. श्री.पंढरीनाथ आरु महाराज ( आळंदी ) यांचे श्रवणीय किर्तन सादर होईल. दरम्यान मृदूंग महामेरू ह.भ.प. श्री चंदू महाराज पांचाळ यांची उपस्थिती असेल. रात्रौ ०९ वा. मान्यवर सत्कार व भजन स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.

उपरोक्त मंडळाची कार्यकारिणी संस्थापक - ह.भ.प. श्री.विश्वनाथ बांद्रे, अध्यक्ष - अरविंद मोरे, कार्याध्यक्ष -:प्रणव लांबाडे, खजिनदार - जनार्दन शिंदे ( बापू ), सचिव - सचिन धाडवे, उपाध्यक्ष - संदीप जोशी, सहखजिनदार - गजानन जोशी, उपसचिव - विशाल शिर्के, सदस्य - सत्यवान केसरकर, राजेश येले, संदीप तावडे, राजू धाडवे, आदी मंडळाचे अनेक सभासद व हितचिंतक यांच्या अथक परिश्रमाने नियोजनाची जय्यत तयारी सुरु आहे. ह्या सोहळ्याचा उत्साह वाढविण्यासाठी वारकरी भाविक, भजनप्रेमी यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री समर्थ कृपा भजन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

भवानी कृपा हौ. सोसायटी, चारकोप, कांदिवली - मुंबई येथील सोसायटीमधील सर्व महिलांतर्फे वट पौर्णिमा साजरी !!

भवानी कृपा हौ. सोसायटी, चारकोप, कांदिवली - मुंबई येथील सोसायटीमधील सर्व महिलांतर्फे वट पौर्णिमा साजरी !!

** साई परिवारतर्फे दिवसाला एक झाड अशी ३६५ झाडे लावण्याचा संकल्प

** २०२३ मध्ये वर्षभरात चक्क ५२२ लावण्यात आली झाडे

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

            हिदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. यादिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही.

         भवानी कृपा हौ. सोसायटी, चारकोप, कांदिवली - मुंबई येथील सोसायटीमधील सर्व महिलांनी वट पौर्णिमा साजरी करत वट वृक्षाची पूजा करून एक नवा पायंडा पाडला. निसर्ग प्रकोप टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावणे गरजेचे आहे. साई परिवारतर्फे गेल्यावर्षी दिवसाला एक झाड अशी ३६५ झाडे लावण्याचा संकल्प केला आणि त्याला चांगला प्रतिसाद लाभला. वर्षभरात चक्क ५२२ लावण्यात आली.यावर्षीही प्रत्येक दिवस एक झाड लावण्याचा पुन्हा संकल्प केला आहे. गेली पाच वर्ष हा उपक्रम राबविण्यात आला. एक वडाचे रोपटे घेऊन वर्षभर त्याचे संगोपन करून त्याची वट पौर्णिमा दिवशी यथासांग पूजा करून ते वट झाड योग्य ठिकाणी लावले जाते. या उपक्रममध्ये सौ.मनीषा रासम, सौ.मीनल सावंत, सौ. भक्ती सावंत,सौ.दीपाली महाडिक, सौ. सुजाता गावडे, सौ. नेहा सुर्वे, सौ.मेघना बाईत, सौ.मृणाल लवंगारे, सौ. नम्रता राऊळ, श्रुती राणे यांनी पर्यावरण सेवेत सहभाग घेऊन आज २१ जून रोजी 'वट सावित्री पौर्णिमा' साजरी केली. करवा चौथ प्रमाणेच वट सावित्री व्रत हे पतीचे दीर्घायुष्य आणि वैवाहिक जीवनाचे रक्षण करण्यासाठी पाळले जाते. या सणाला वट पौर्णिमा व्रत किंवा वट सावित्री व्रत किंवा वटपौर्णिमा असेही म्हणतात. हा एक हिंदू उत्सव आहे जो प्रामुख्याने विवाहित महिलांनी साजरा केला जातो. हा वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. दरवर्षी वट पौर्णिमा मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जाते. हा विशेष दिवस आहे जेव्हा महिला उपवास ठेवतात आणि त्यांच्या पतीच्या आशीर्वाद आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वट पौर्णिमा सहसा विवाहित स्त्रिया साजरी करतात.याच निमित्ताने तुमच्या प्रिय व्यक्तीला या खास दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात.आला आला सण सौभाग्याचा, सवाष्णी मिळून वडाला पूजण्याचा, लेवूनी लेण मांगल्याच, दीर्घायुष्य मागू नवरोबाच, मारू सात फेऱ्या वडाला, मागू  सात जन्म ह्याच नवरोबाला...!

Thursday 20 June 2024

ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महिला बचत गटांनी शिवलेले शालेय गणवेश !!

ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महिला बचत गटांनी शिवलेले शालेय गणवेश !!

** ठाणे जिल्ह्यातील बचत गटांमार्फत 1,04,703 गणवेश होणार तयार

ठाणे, प्रतिनिधी :
 – समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावाणी सुरू झाली आहे. याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील गणवेश शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत ठाणे जिल्ह्यातील बचत गटांना मिळाले आहे. जिल्ह्यातील बालकांच्या अंगावर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी शिवलेले गणवेश दिसणार आहेत. जिल्ह्यासाठी एकूण सुमारे 1,04,703 गणवेश शिलाई करण्यात येणार असून शाळेच्या पहिल्या दिवशी 15 जून रोजी ग्रामीण भागातील 1201 विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे.

राज्य शासनाने समग्र शिक्षा कार्यक्रम अंतर्गत एक राज्य एक गणवेश योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत वाटप करावयाच्या मोफत गणवेशाच्या शिलाई करण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या बचत गटातील महिलांना मिळाले असून यातून बचत गटाच्या महिलांना रोजगारची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात एकूण 104703 गणवेश शिवणकाम बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून पूर्ण होत आह
यंदाच्या वर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दि. 15 जून 2024 रोजी मोफत गणवेश योजनेअंतर्गत भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड व अंबरनाथ या 6 तालुक्यामधील एकूण 6 केंद्र शाळेतील 1201 विद्यार्थ्यांचे गणवेश पोहोच करण्यात आले. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रथम दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून देऊन आनंदाची भेट देण्यात आली. यावेळी गट शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग तसेच माविम जिल्हा प्रतिनिधी व सीएमआरसीचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
गणवेश शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या बचत गटांतील महिलांना मिळावे यासाठी शासन स्तरावर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच मुख्यालय स्तरावरून या उपक्रमाची अंमलबजावणी योग्यरित्या होऊन विहित वेळेत शिवणकाम पूर्ण होण्यासाठी प्रकल्प संचालक कुसुम बाळसराफ, महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन) रविंद्र सावंत, महाव्यवस्थापक (प्रकल्प) महेंद्र गमरे मेहनत घेतली. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यात या प्रकल्पाची अंलबजवणी होऊन विद्यार्थ्यांना विहित वेळेत गणवेश पुरवठा व्हावा यासाठी कार्यक्रम व्यवस्थापक रूपा मेस्त्री, गौरी दोंदे, वित्त व लेखा अधिकारी राखी मिराशी व व्हॅल्यु चेन सल्लागार महेश कोकरे यांनी जिल्ह्यांना मार्गदर्शन केले.
गणवेश शिलाईचे कामकाज वेळेत पूर्ण करून शाळेत पोहच करण्यासाठी सर्व सीएमआरसीतील गारमेंट युनिट मोठ्या जोमाने काम करीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील सीएमआरसी मार्फत कुशल महिलांना रोजगार मिळावा यासाठी महिलांची निवड करणे, त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हावा यासाठी माविमचे विभागीय सल्लागार मंगेश सूर्यवंशी, माविमच्या ठाणे जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती अस्मिता मोहिते यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून हे कामकाज यशस्वीरित्या पूर्ण करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी सेनेच्या कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष पदी राज कोयते यांची नियुक्ती !!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी सेनेच्या कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष पदी राज कोयते यांची नियुक्ती !!

** कल्याण शहराध्यक्ष पदी निलेश कोनकर यांची नियुक्ती

कल्याण, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष पदी राज कोयते तसेच कल्याण शहराध्यक्ष पदी निलेश कोनकर यांची नियुक्ती माननीय मा. कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष राज कोयते यांचे वडिल बाळाराम कोयते हे राष्ट्रवादी काँग्रेस स्थापने पासून माननीय शरदचंद्रजी पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून काम करत आले आहेत. कल्याण डोंबिवलीत बाळाराम कोयते यांची साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता तसेच त्यांचे शहरातील सामाजिक कार्य यामुळे त्यांची ओळख आहे. तसेच त्यांचे सुपुत्र राज कोयते यांना सुध्दा सामाजिक कार्याची आवड असून ते विद्यार्थी दशेपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत आले आहेत. 

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी सुध्दा त्याच्या कामाचे कौतुक केले असून आज त्यांची निवड झाली यासाठी अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी विद्यार्थी सेनेचे कोकण विभाग अध्यक्ष किरण गोरक्षनाथ शिखरे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती माननीय मा. कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कल्याण अध्यक्ष संदीप देसाई, निष्ठावंत कार्यकर्ते बाळाराम कोयते, विनोद काळे, संजय भोईर, कल्याण डोंबिवली येथील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Wednesday 19 June 2024

गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन वाढ द्या !!.

गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन वाढ द्या !!. 

** 2 जुलैस पावसाळी अधिवेशनावर धडक देणारा.. आयटक चा इशारा
जळगाव, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात सुमारे ३५०० पेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत, आशा गटप्रवर्तक यांच्यासाठी दिनांक 14 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासन नाने मानधन वाढीच्या निर्गमित केलेल्या जीआर मध्ये गटप्रवर्तकांना फक्त 1000 रुपये एवढीच अत्यल्प वाढ केलेली आहे. त्यामुळे सुमारे 25000 लोकसंख्येत काम करणाऱ्या उच्चशिक्षित  गटप्रवर्तक महाराष्ट्र शासनावर नाराज झाल्या आहेत, राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये गट प्रवर्तक या सुपरवायझिंग चे काम गेल्या पंधरा वर्षापासून काम करीत आहेत. या गटप्रवर्तकांना संप काळात म आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना चार महिन्यापूर्वी त्यांच्या झालेल्या संपर्क काळात 6200 रू व मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार 3800 रुपयाची भर घालून एकूण 10000 रुपये मानधन वाढ देण्याचे कबूल केले होते. परंतु प्रत्यक्षात मानधनात 1000 रू ची वाढ करून शासनाने चेष्टा केल्याची भावना त्यांच्यात निर्माण झालेली आहे. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे 25 आशा स्वयंसेविकांचे कामाचे परिवरक्षण करावे लागते त्यांच्या रिपोर्ट तयार करावा लागतो तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात महिन्याला 25 दिवस दौरे करून आशांना भेटी देऊन मार्गदर्शन करावे लागते. त्यांच्या सर्व अपडेट रेकार्ड ठेवावे लागते आणि दरमहा  वरिष्ठांना सादर करावे लागते.. या व्यतिरिक्त मोबदला नसलेली सात आठ काम सुद्धा त्यांना करावी.. जागतिक कोविड साथीचे काळात त्यांनी फार मोठ्या प्रमाणात काम केले आहे  असे असताना त्यांना मासिक वेतन न देता त्यांना टी ए डी ए पोटी  मिळणारे  रकमेवरच संसार चालवावा महाराष्ट्र शासनाचे म्हनने आहे. आणि ते चूक आहे म्हणून गटप्रवर्तकांच्या मानधनात किमान 10000रु ची भरघोस वाढ करावी.. 

त्यांना गटप्रवर्तक ऐवजी सुपरवायझर म्हणावे कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे हक्क मिळावेत संप काळातील कपात केलेले मानधन देणे व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये गटप्रवर्तकांचा समावेश करणे या मागण्या मंजूर होण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गटप्रवर्तकांचा येत्या 2 जुलै या मोर्चात जळगाव जिल्ह्यातील गटप्रवर्तक सहभागी राहतील व शासनाने या प्रशनी लक्ष घालावे म्हणून महाराष्ट्र राज्य आयटक चे राज्य उपाध्यक्ष काँ अमृतराव महाजन यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले त्यावेळी जळगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव ,भुसावल, बोदवड या तालुक्यातील 50 चे वर गटप्रवर्तक िनी सहभागी झाल्या होत्या त्यात सर्व श्रीमती ज्योती पाटील राधा धनगर रूपाली माळी छाया मोरे सुरेखा साळुंखे कविता सरोदे मीनाक्षी पाटील प्रतीक्षा क्षीरसागर वनिता बारी हर्षदा पाखले वर्षा भंडारकर शीला कोळी रूपाली महाजन जयश्री सूर्यवंशी अपेक्षा माळी शोभा पाटील संगीता पाटील आशा पाटील.. आदी 50 गटप्रवर्तक हजर होत्या मुक्ताईनगर चे आमदार श्री चंद्रकांत पाटील हे कलेक्टर कचेरीत आले असता गटप्रवर्तकांनी यांनी निवेदन दिले आहे व विधानसभेत या प्रश्न आवाज उठवावा अशी विनंती केली आहे जिल्ह्यातील अनेक आमदारांना या प्रश्न आवाज उठवा म्हणून विनंती केली जाणार आहे. दोन जुलै मोर्चासाठी जिल्ह्यातील गटप्रवर्तकांनी एक जुलै रोजी जळगाव रेल्वे स्टेशनला जमावे आवाहन कॉ. अमृतराव महाजन यांनी केले आहे

महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !!

महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवा भावी  संस्था (रजि.) तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
            
         विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवा भावी  संस्था ( रजि.) तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप तसेच कलर प्रिंटर उदघाट्न सोहळा नुकताच पार पडला.संस्थेच्या माध्यमातून मागील १० वर्षे पासून कोकण विभागातील अति दुर्गम भागात शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. याही वर्षीही  संस्थेच्या माध्यमातुन पालघर विभागातील दुर्गम गावातील जि.प. शाळा, दिवेकर पाडा  या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप(रविवार दि.१६ जून) करण्यात आले. त्याच बरोबर आजू -बाजूच्या परीसरातील शाळांना मिळून संस्थेच्या माध्यमातून १ नविन कलर प्रिंटर देखील देण्यात आला.

         शाळेचा पहिला दिवस असल्या कारणामुळे सर्व आंगणवाडी, शाळेच्या विद्याथ्यांचे संस्थेच्या माध्यमातून गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात आले. या शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम आणि कलर प्रिंटर विद्यार्थीयांसाठी अर्पण उपक्रम यशस्वी करण्यात जिल्हा परिषद दिवेकर पाडा या शाळेतील शिक्षक आदेश भोईर सर, बहाडोली केंद्राचे केंद्र प्रमुख विलास घरत सर, अंगणवाडी सेविका नयना पाटील, मंगेश पाटील सर, तसेच ज्यांनी कलर प्रिंटर घेण्यास संस्थेस आर्थिक सहकार्य केले ते अनिल खिल्लारी, पूनम खिल्लारी, कु. अमुल्य खिल्लारी आणि शैक्षणिक साहित्य घेण्यास ज्यांनी आर्थिक , वस्तू स्वरूपाची मदत केली ते सर्व देणगीदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचे यनिमित्ताने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.
         या कार्यक्रम प्रसंगी दिवेकर पाड्यातील ग्रामस्थ, पालकवर्ग, विद्यार्थी, शिक्षक वर्ग, संस्थेचे सदस्य, पदाधिकारी -प्रसाद मांडवकर, स्वाती  गावडे, निलेश कुडतरकर, गौतम बनसोडे, रंजिता सावंत, संगीता सावकारे, लक्ष्मी गुडिलू, आयुष बनसोडे, विक्रम नागांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपरोक्त संस्थेचा कोणताही  उपक्रम यशस्वी होणे या मान्यवर व्यक्ती शिवाय अशक्य आहे.जे निस्वार्थपणे संस्थेच्या पाठिशी ठाम पणे उभे असतात ते संस्थेचे सर्व देणगीदार, कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांचे मन पूर्वक यानिमित्ताने आभार व्यक्त करण्यात आले.असाच विश्वास आणि प्रेम संस्थेवर यापुढेही दाखवाल असा विश्वास महात्मा ज्योतिबा फुले बहुुउद्देशिय सेवा भावी संस्था ( रजि ) तर्फे व्यक्त करून कार्यक्रमची सांगता करण्यात आली.

कडोंमनपा स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर कमावतात महिन्यात पाच लाख रुपये - माहिती अधिकार कार्यकर्ते मेढेकर

कडोंमनपा स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर कमावतात महिन्यात पाच लाख रुपये - माहिती अधिकार कार्यकर्ते मेढेकर 

*** आयुक्तांचे यांच्यावर नाही नियंत्रण म्हणून स्वच्छता अधिकारी करतात अशा प्रकारचे गैरव्यवहार

कल्याण, प्रतिनिधी :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका 'ब' प्रभागक्षेत्र येथे कार्यरत असलेले स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर यांनी अनेक गैर-मार्गाने आर्थिक देवाण-घेवाण करीत असून याबाबत अधिक माहिती अशी की या प्रभागामध्ये कचरा उचलण्याचे काम आर.अ‍ॅन्ड बी. कंपनीला दिलेले असून हे काम या कंपनीकडून करून घेण्यासाठी येथे स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. यांनी नियमित कचरा उचलण्याच्या कामात दिरंगाई केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिले आहेत. वरिष्ठांच्या आदेशाला यांनी केराची-टोपली दाखवून उपायुक्त घकव्य यांची दिशाभूल करून वरिष्ठांच्या आदेशाला पाने पुसले आहेत. 

                    स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर 

या प्रभागामध्ये शून्य कचरा मोहीम किंवा कचरा वर्गीकरणाचा फज्जा उडाला असून अनेक ठिकाणी मिक्स कचरा घेतला जातो दुसरीकडे मुख्यालय येथून मनपाची यंत्रणा घेऊन तिचा दुरुपयोग केला आहे ती यंत्रणा वापरण्याऐवजी ती यंत्रणा हप्त्यावर ठेवून त्यामधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मालमत्ता जमा केली आहेत. त्यापैकी काही यंत्रणा यांनी परस्पर इतरत्र पाठवण्याचे काम केले आहेत. 

पेस्ट-कंट्रोल (फवारणी) विभागात काम करणाऱ्यां कामगारांची मांजरेकर यांच्याकडे कोणतीही काम केल्याची नोंद नाही. किती कामगार आहेत किती हजर आहेत किंवा किती गैरहजर त्यांचे कामाचे वेळापत्रक काय आहेत. याबाबत नोंद नसावी दुसरीकडे आर.अँड बी. या कंपनीवर दंडात्मक किती रक्कम रुपये कारवाई पोटी जमा केली याचाही यांच्याकडे कोणतीही लेखी माहिती नसावी. म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते मेढेकर यांना आजपर्यंत माहिती देण्यात आलेली नाही. 

माहिती दिलेली नाही म्हणून मेढेकर यांनी अपील दाखल केले. त्यावरही आजपर्यंत येथील सहाय्यक आयुक्तांनी कारवाई केली नाही हे आयुक्त कायद्यापेक्षा मोठे झाले असावे म्हणून यांना माहिती दिली गेली नसावी किंवा मांजरेकर महिन्याला जे ५ लाख रुपये कमावतात किंवा कमवत असतील त्यामध्ये सहाय्यक आयुक्तांचाही काही प्रमाणावर हिस्सा असावा म्हणून माहिती दिली गेली नाही. विशेष म्हणजे मांजरेकर हे कित्येक वर्षापासून या प्रभागात ठाण मांडून बसले आहेत म्हणून यांची या प्रभागात मोठ्या प्रमाणावर दादागिरी सुद्धा सुरू आहेत. यांची बदली का झाली नाही. असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत राज्य सरकारकडून येणारे उपायुक्त सहाय्यक आयुक्त हे डोळे मिटवून बसले आहेत का किंवा मांजरेकर यांच्या गैरव्यवहारात सामील आहेत का असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ता यांनी याबाबत दुसरे अपील आयोगाकडे दाखल केले असून वेळ भासल्यास उच्च न्यायालयात जाण्याची तयारी देखील केली आहेत. मांजरेकर यांना तात्काळ सेवेतून कार्यमुक्त करावे आणि मांजरेकर सारखे अजून किती अधिकारी आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे करणार आहेत असे यासंबंधी मीडियाला प्रतिक्रिया नोंदविले आहेत.

आबिटगावची सुकन्या अनन्या खेराडे हिची स्टार प्रवाह वरील "लिटिल चॅॅम्प्स" कार्यक्रमात निवड !!

आबिटगावची सुकन्या अनन्या खेराडे हिची स्टार प्रवाह वरील "लिटिल चॅॅम्प्स" कार्यक्रमात निवड !!

चिपळूण - ( दिपक कारकर  )

प्रत्येक व्यक्तीच्या अंगी विविध कलात्मक गुण असतात.मात्र आवड,जिद्द चिकाटी असेल तर अशी अनेक व्यक्तिमत्वे जगासमोर येतात, ह्याचे ताजे उदाहरण चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागातील आबिटगाव ( खालचीवाडी ) येथील अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील कु.अनन्या विजय खेराडे हिच्या बाबतीत प्रत्येयाला आले आहे.नुकतीच तिची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणार्या, 

आणि आपल्या स्वरांनी अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणाऱ्या स्टार प्रवाह ह्या टेलिव्हिजन चॅनेल वरील प्रेक्षकांच्या आवडत्या "लिटिल चम्प" कार्यक्रमात निवड झाली आहे.अंगीकृत कला सादर करण्याची अनमोल संधी तिला प्राप्त झाली आहे.आबिटगाव येथील जिल्हा परिषदेच्या ४ थी इयत्तेत शिक्षण घेणारी अनन्या होय.लहानपणीच गायन, नृत्य कलेची प्रचंड आवड असणारी अनन्या सावर्डे येथील शारदा संगीत साहित्य,कला, क्रीडा अकादमीच्या संगीत विद्यालयात गुरुवर्य वरद केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे.

अनन्याने श्री चंडिका नाट्य नमन मंडळ,आबिटगाव उपरोक्त मंडळाच्या नमन कलेत देखील गायन करून रसिक मनावर वेगळीच थाप पाडली होती.अशा हुशार,संयमी गोड आवाज असणाऱ्या अनन्याचे तालुका,पंचक्रोशीसह विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

Tuesday 18 June 2024

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी - वारीची भव्यता, 'सार्वजनिक आरोग्य विभागा'ची सज्जता !!

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी - वारीची भव्यता, 'सार्वजनिक आरोग्य विभागा'ची सज्जता !!

पुणे, प्रतिनिधी : आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या भेटीसाठी राज्यात पालखी सोहळा सुरू झाला असून १३ जूनला श्री संत गजानन महाराज मंदिर 'श्रीं'च्या पालखीने शेगाव, बुलढाणा जिल्ह्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. 'आरोग्याची वारी - पंढरीच्या दारी' या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण पालखी मार्गावर आतापर्यंत (१४ जून) एकूण १ हजार ७४३ वारकऱ्यांना आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य सेवा देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, देहू-आळंदी ते पंढरपुर तसेच महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या हजारो पालख्या, दिंड्या मार्गावर आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य विषयक सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रातील मानाच्या विविध पालख्यांच्या मार्गावर देण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सेवा-सुविधा -

आरोग्य विभागाकडून एकूण ६ हजार ३६८ अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत महाराष्ट्रातील विविध पालखी मार्गावर आवश्यकतेनुसार वारकऱ्यांची मोफत तपासणी व औषधोपचार करुन आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.

२५८ तात्पुरत्या 'आपला दवाखान्या'च्या माध्यमातून (प्रत्येकी पाच किलोमीटर अंतरावर १ याप्रमाणे) मोफत सेवा पुरविण्यात येत आहे.

७०७ (१०२ व १०८) रुग्णवाहिकांमार्फत पालखी मार्गावर २४x७ पद्धतीने आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे.

पुणे परिमंडळ पुणे व पुणे जिल्हा परिषद स्तरावरुन ४ आरोग्य पथके सुसज्ज रुग्णवाहिकेसह अविरत पालखी परतेपर्यंत सोबत राहणार आहेत.

 २१२ आरोग्यदुतांमार्फत (बाईक ॲम्बुलन्स) पालखी मार्गावर आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.

५ हजार ८८५ औषधी किटचे विविध दिंडी प्रमुखांना मोफत वाटप करण्यात येणार आहे.

१३६ हिरकणी कक्षांची स्थापना पालखी मार्गावरील आरोग्य संस्थेच्या ठिकाणी तसेच पालखी तळावर करण्यात आलेली आहे.

महिला वारकऱ्यांसाठी १३६ स्त्रीरोग तज्ज्ञ पालखी मार्गावरील रुग्णालयामध्ये कार्यरत असतील. 

पालखी मुक्कामच्या प्रत्येक ठिकाणी ५ बेडची क्षमता असलेले ८७ अतिदक्षता विभाग उभारण्यात आलेले आहेत.

पालखी मार्गावरील सर्व हॉटेल्स व त्याअंतर्गत असलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी तसेच पाणी नमुने तपासणी करण्यात येत असून, पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणच्या किचनची देखील तपासणी करण्यात येणार आहे.

पालखी मार्गावर १५६ टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येणार असून पालखी मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी धूर फवारणी, पाण्याच्या सर्व स्रोतांचे ओटी टेस्ट तसेच आरोग्य संस्थांमार्फत जैव कचरा विल्हेवाट करण्यात येत आहे.

पालखी मार्गावर आरोग्य विषयक जनजागृती करण्यात येणार आहे.

अध्यात्मिक पिता- संत राजिन्दर सिंह जी महाराज


अध्यात्मिक पिता
-  संत राजिन्दर सिंह जी महाराज

प्रभु-परमेश्वर आपला अध्यात्मिक पिता आहे. प्रत्येक पालकांप्रमाणे, प्रभु-परमेश्वरची देखील इच्छा आहे की आपण त्याची आज्ञाधारक मुले व्हावीत आणि प्रभु-परमेश्वराकडून आपल्याला मिळालेल्या दैवी देणगी साठी कृतज्ञ असावे.  प्रत्येक पालकाला आपल्या मुलांमध्ये सद्गुण असावेत असे वाटते जे सद्गुण मुलांमध्ये त्यांच्या मते असतात.  आपला मुलगा किंवा मुलगी चांगली व्यक्ती व्हावी हा प्रत्येक पालकाचा प्रयत्न असतो.  पालकांना आपल्या मुलांकडून खूप अपेक्षा असतात, पण सर्वप्रथम आपल्या मुलाने एक आदर्श मानव व्हावे, अशी त्यांची इच्छा असते.
प्रभु-परमेश्वर हा देखील यापेक्षा वेगळा नाही. जेव्हा प्रभु-परमेश्वराने सर्व आत्मे निर्माण केले तेव्हा आपण सर्वांनी प्रभु-परमेश्वराचे रूप बनावे, अशी त्याची अपेक्षा होती. मानवाला प्रभु-परमेश्वराच्या प्रतिमेत निर्माण केले आहे. म्हणून वास्तवात मानव हा प्रभु-परमेश्वराच रूप आहे. प्रत्येक मानवाने माणुसकीने सदाचारी पवित्र जीवन जगावे अशी प्रभु-परमेश्वराची इच्छा होती, परंतु मानवी शरीरात राहून आपण आपल्या मनाच्या प्रभावाखाली येऊन आपले वास्तविक अध्यात्मिक रूप विसरतो आणि प्रभु-परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत नाही. प्रभु-परमेश्वरही प्रत्येक माणसाकडून अशीच चांगली अपेक्षा करतो.
आपण सर्वांनी त्याच्या सृष्टीतील प्रत्येक प्राणीमात्रावर प्रेम करावे, एकमेकांना मदत करावी तसेच प्रभु-परमेश्वरावर प्रेम करावे अशी त्याची अपेक्षा आहे. या हेतूने विश्वाची निर्मिती केली गेली आणि मानवाची रचना केली. असे म्हणतात की प्रभु-परमेश्वराने मानवाची निर्मिती केली जेणेकरून त्याने आपल्या सोबतीं बरोबर आणि इतर प्राण्यांशी दया आणि करुणेने वागावे. संत आणि सतगुरुंच्या रूपाने आपल्या अध्यात्मिक पित्याने आपल्याला दिलेले संरक्षण चक्र अद्वितीय  आणि उदार आहे.
प्रभु-परमेश्वर हा आपला खरा पिता आहे जो नेहमी आपले रक्षण करतो. प्रभु-परमेश्वराने संत आणि सतगुरुंना संसारात यासाठी पाठविले आहे कारण ते आपल्या आत्म्याला परत प्रभु-परमेश्वरामध्ये लीन करतील. ते प्रभु-परमेश्वराचे प्रतिनिधी म्हणून या जगात नेहमी असतात आणि सर्व जीवांना मदत करतात. असे जगात नेहमीच घडत राहील. जेव्हा जेव्हा आत्मा प्रभु-परमेश्वराला भेटण्यासाठी व्याकुळ होतो, तेव्हा प्रभु-परमेश्वर असे साधन निर्माण करतो ज्याद्वारे आत्मा पूर्ण सद्गुरुंच्या आश्रयाला येतो आणि त्याला समजते की कशा प्रकारे अत:र्मुख होऊन प्रभु-परमेश्वराशी कसे जोडले जाऊ शकतो आणि त्याला प्राप्त करू  शकतो.
आपले सद्गुरु आपल्याला आपल्या जीवनात कर्माची फळे भोगण्यापासून मुक्त होण्यास मदत करतात. जर आपण अध्यात्मिक आणि सद्गुणी जीवन जगलो तर आपण स्वतःसाठी नवीन वाईट कर्म तयार करीत नाहीत, ज्यासाठी आपल्याला पुढे कष्ट भोगावे लागत नाही. जर आपण जीवनात प्रेमळ, दयाळूपणा आणि निःस्वार्थ सेवा हे गुण अंगिकारले आणि इतरांना मदत करतांना, त्या बदल्यात कोणत्याही फळाची अपेक्षा केली नाही, तर आपण स्वतःसाठी नवीन कर्म तयार करत नाही, ज्यामुळे आपणास या जगात परत येण्याचे कारण बनेल. 
संत आणि महापुरुष आपल्याला समजावून सांगतात की आपलया जीवनाचा 75 टक्के भाग आधीच निश्चित आहे पण 25 टक्के आपल्याला कर्म करण्यासाठी स्वातंत्र्य आहे. ज्याचा योग्य रीतीने वापर करून, ध्यान-अभ्यास साधना, सत्संगाला जाणे, पूर्ण सद्गुरूंचे दर्शन घेणे इत्यादी कामात वेळ देऊन निष्काम सेवा करण्याच्या अवस्थेला पोहोचतो. असे केल्याने आपल्या कर्माचा हिशेब या जन्मातच संपतो. आपण परमेश्वराची चांगली मुले बनतो, परिणामी जीवनाच्या शेवटी आपल्या आत्म्याला परत यावे लागत नाही आणि तो परत प्रभु-परमेश्वराच्या कुशीत लीन होतो.

मेधा पाटकर यांचे उपोषण थांबवण्यासाठी न्याय मागण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आले !!

मेधा पाटकर यांचे उपोषण थांबवण्यासाठी न्याय मागण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आले !!

ठाणे, १८ जून, प्रतिनिधी : नर्मदा बचओ आंदोलांनाच्या वतीने नर्मदा खोऱ्यात बेमुदत आंदोलन पुन्हा सुरू करावे लागले आहे. आंदोलनाच्या नेत्या मा. मेधाताई पाटकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह दि, १५ जून २०२४ पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बेदखल झालेल्या प्रतिनिधींचे साखळी उपोषण सुरू आहे. आंदोलक काही हजार लोक त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कावर ठाम असून त्यांना देशभरातून लाखो लोकांचे समर्थन मिळत आहे. पुनर्वसना शिवाय डुब नाही. सरदार सरोवर धरणाची पाणीपातळी १२२ एमएसवर कायम ठेवा ही आमची प्रमुख मागणी आहे. सरदार सरोवर बाधित आदिवासी, शेतकरी, मजूर आणि नर्मदा खोऱ्यातील सर्व भूमिहीन समुदायांनी अहिंसक सत्याग्रही म्हणून संघर्ष केला आणि पुनर्वसनाचा हक्क, जीवन आणि उपजीविकेचा हक्क मिळवला. भूमिहीन, स्त्रिया, भूमीधारक, मत्स्य कामगार, आदिवासी, कुंभार इत्यादींचाही कायदेशीर आणि सामूहिक कृतीं मुळे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात उदारीकरण केलेल्या राज्य धोरणांमुळे समावेश झाला. कालांतराने सुमारे ५० हजार कुटुंबांचे पुनर्वसन झाले आहे. तथापि, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अजूनही काही शेकडा सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त कुटुंबे आहेत, तर मध्य प्रदेशात हजारो कुटुंबे आहेत, ज्यांचे पुनर्वसन होणे बाकी आहे.असे असूनही नर्मदा न्यायाधिकरणाच्या पुरस्काराचे, कायद्याचे आणि धोरणाचे उल्लंघन करून, निमाड, मध्य प्रदेशच्या मैदानी भागातील वरची गावे आणि एका टाऊनशीपसाठी बॅकवॉटरची पातळी बदलण्यात आली. पात्र कुटुंबांच्या यादीतून १५९४६ कुटुंबांना वगळण्यात आले. परंतु त्यांची घरे अधिग्रहित करण्यात आली. त्यांचे सर्व सामान उध्वस्त झाले. गुरेढोरे आणि माणसं मरणासन्न झाली !! अधिकाऱ्यांशी संघर्ष आणि संवादानंतर त्यांना काही मदतीची रक्कम मिळाली, पण अद्याप पूर्ण भरपाई मिळालेली नाही.

 २०२४ चा पावसाळा दारात आलेला असताना पुढचे पाऊल म्हणून नर्मदा बचाव आंदोलन सत्याग्रहाची सुरुवात करत आहे. आंदोलनाच्या रास्त मागण्या खालीलप्रमाणे आहेत., केंद्रीय जल आयोगाने १९८४ मध्ये अंदाजित केलेली आणि २०२३ मध्ये ती बरोबर असल्याचे सिध्द झालेली बॅकवॉटरची पातळी ( जुनी ) स्वीकारा., बेकायदेशीरता आणि अनियमिततेमुळे घरे, शेते, गुरेढोरे, माणसे आणि सर्व मालमत्तेचे २०२३ मध्ये झालेल्या नुकसानाची बाजारमूल्याने भरपाई द्या., कायदे, धोरणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पूर्ण पालन करून सर्व प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करा., रिक्त पदांवर पुनर्वसन अधिकारी आणि तक्रार निवारण प्राधिकरण, मध्य प्रदेशच्या माननीय सदस्यांची लवकरात लवकर नियुक्ती करा., वरील कामे पूर्ण होईपर्यंत सरदार सरोवरची पाण्याची पातळी १२२ मीटर (क्रेस्ट लेव्हल) राखा, १७ मीटरचे दरवाजे उघडे ठेवा.

वरील मागण्या घेऊन जिल्हाधिकारी  ह्यांना भेटून हे निवेदन मा. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे ह्यांना निवेदन द्यावं. मागण्या मान्य करण्यासाठी खालील संस्था संघटने तर्फे ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे निर्देशने करण्यात आली.

ह्या निर्दशनास जगदीश खैरालिया, राष्ट्रीय सरचिटणीस, श्रमिक जनता संघ, डॉ. संजय मंगला गोपाळ, राष्ट्रीय समन्वयक, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, राजेंद्र चव्हाण, ठाणे लोकसभा समन्वयक, भारत जोडो अभियान, नरेश भागवाने, महासचिव, बहुजन विकास संघ, लिलेश्र्वर बनसोडे, निमंत्रक, कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिति, निर्मला पवार,  भारतीय महिला फेडरेशन, सुब्रतो भट्टाचार्य स्वराज अभियान, ठाणे
हर्षलता कदम, अध्यक्ष, समता विचार प्रसारक संस्था, नितीन देशपांडे उपाध्यक्ष, धर्मराज्य पक्ष ह्या संस्था संघटना सहभागी झाले होते. हे निर्देशन यशस्वी करण्यासाठी अजय भोसले, सुनिल दिवेकर, गणेश चव्हाण ह्यांनी मेहनत घेतली.

Monday 17 June 2024

मनोगत...

मनोगत...

मला आज ही आठवते, पवार साहेबांसोबत माझी पहिली भेट ॲागस्ट २०१७ च्या दरम्यान उल्हासनगर मध्ये झाली. १ तासाच्या चर्चेनंतर त्यांनी मला पक्षात सक्रीय काम करण्यास आग्रह केला. तेंव्हा मला पक्षात काम करण्यात रस नव्हता; पण त्यांचा आग्रह होता. मा. बच्चू भाऊंच्या कर्तृत्वावर प्रचंड विश्वास पण तरीही मला पक्षात काम करण्यापेक्षा फक्त काम करण्यात अधिक रस होता. स्वर्गीय कमलाकर पवार साहेबांच्या आग्रहास्तवः मी पक्षात आलो, कामाची जबाबदारी घेतली आणि दिलेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली . 

माझी आणि मा.बच्चू भाऊंची भेट होण्याचे एकमात्र दुवा पवार साहेब होते . ज्याप्रमाणे पवार साहेबांचा माझ्यावर विश्वास होता, त्याच प्रमाणे बच्चू भाऊंचा देखील माझ्यावर विश्वास दृढ होत गेला . 

त्यावेळी आम्ही मनोरा सी -६६ वर जायचो. गेलो म्हणजे असे कधीच व्हायचे नाही की आम्ही उपाशीपोटी परत आलो असणार, तूमची कामे राहू द्या ..ते करतो मी.. मला विषय आला लक्षात .. तुम्ही जेवले नसणार पहिले जेवून घ्या आपण सोबत जेवू ... आपुलकीने म्हणणारे म्हणजे पवार साहेब  .. घड्याळात रात्रीचे १२ वाजलेले असोत किंवा २ वाजलेले असोत, मनोरा सी-६६ मधला संगणक जो पर्यंत कार्यकर्त्यांचे , सामान्यांचे  प्रश्न संपत नाहीत तो पर्यंत बंद व्हायचा नाही !  स्वीय्य सहाय्यक असले तरी अतिशय साधी राहाणी. अनेक वेळा बनियन, हाफ चड्डीवर पत्र बनवणाऱ्या पवार साहेबांच्या पत्रात वेगळीच धार होती. त्यांनी बनवलेले पत्र व बच्चू भाऊंची त्याला जोड म्हणजे काम झालेच असचे समीकरण होते ...

अनेक लोकांची निस्वार्थ सेवा, महाराष्ट्रातील कोणीही पदाधिकारी, व्यक्ती पवार साहेबांना भेटल्यावर निराश होऊन गेला नाही. त्यांच्यात सतत २४ तास काम करण्याची धमक होती. पत्र कसे बनवायचे, विषयाचा अभ्यास कसा करायचा, एखादा विषय मार्गी कसा लावायचा हे सर्व काही आम्ही  पवार साहेबांच्या सानिध्यात शिकलो. अनेक अनाथ मुलांचे पालकत्व त्यांच्याकडे होते. अनेक आश्रमशाळांमध्ये त्यांचे व्यक्तिगत लक्ष असायचे . 

सन २०१७ ला ज्यावेळी माझी भेट झाली तेव्हापासून किंबहुना त्याच्या अगोदर पासून ते सन २०१९ पर्यंत त्यांच्याकडे साधे बॅंक अकाउंट देखील नव्हते. मी नेहमी त्यांना विचारायचो साहेब तुम्ही एवढे मोठे कार्य करतात आणि अद्याप तुमच्याकडे बॅंक अकाऊंट नाही. त्यांनी त्यावेळी मला सांगितले ,"मला पैश्यांची गरज नाही, मी निव्वळ समाज कार्य करणारा माणूस आहे. अकाउंट कश्याला हवे, दोन वेळचे जेवण मी इथे करतो मग मला पैसे हवेत तरी कशाला". एकंदरीतच कधीच पैश्याची अपेक्षा न करता फक्त आणि फक्त समाजासाठी काम करणारे. "श्रीमंत फकीर" होते आमचे पवार साहेब. 

पवार साहेबांसोबत असतांना अनेक मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळखी झाल्या बहुतेक वेळा त्यांनी स्वतःहून अनेकांच्या भेटी घालून दिल्या. पण या भेटीचा उपयोग हा समाजासाठी झाला पाहिजे हे ते नेहमी सांगत. मा.बच्चू भाऊंकडे येण्याआधी अनेक आमदार, मंत्री यांच्यासोबत त्यांनी काम केले होते, त्यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. अगदी त्यावेळचे प्रधान सचिव श्री भूषणजी गगराणी, माजी कृषी मंत्री श्री अनिल बोंडे, आमदार कपिल पाटील, आमदार विद्याताई चव्हाण, आमदार देवेंद्र भूयार, शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याप्रमाणे कित्येक आमदार, मंत्री, प्रशासकीय सेवक त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात असायचे पण त्यांच्या ओळखीचा त्यांनी जीवनात कधीच दुरूपयोग केला नाही. समाजासाठी दीनदुबळ्यांसाठी जे काय करता येईल त्यासाठी प्रयत्न केले. 

अपक्ष कार्यालयात कार्यरत असतांना अनेक आमदारांचे स्वीय्य सहाय्यक यायचे आणि कमलाकर पवारांना डॅडी म्हणायचे मी सहज विचारात पडलो आणि मग त्यांना विचारायचे ठरवले की नेमकं त्यांना हे सर्वचजण डॅडी का म्हणतात .. त्यावेळी अनेक स्वीय्य सहाय्यकांशी संबंध आला त्यावेळी समजले की ते आज ज्या पदावर आहे ते म्हणजे केवळ श्री पवार साहेबांमुळेच .. पवार साहेबांनी त्यांना घडवले त्यांना शिकविले व त्यांच्यातील सद्गुण हेरत त्यांना त्या -त्या पदापर्यंत नेवून बसवले . पवार साहेब म्हणजे एक चालती फिरती कार्यशाळाच होती ... प्रत्येकाचा आधार होते, विचारांचा आणि कर्तृत्वाचा बाप माणूस होते आमचे डॅडी...

आज माझ्या सभोवताली अनेक चांगले मित्र व चांगले सहकारी मला पवार साहेबांमुळे लाभले श्री अनिल गावंडे साहेब, गौरव जाधव, हितेश जाधव, भूषण मदकरी, श्रीकांत जगताप, अजय चौधरी, मनोज टेकाडे, अजय तापकीर, सुनिल शिरीषकर, प्रविण खेडकर, चंद्रकांत उतेकर असे अनेक मित्,  जिवाभावाचे सवंगडी मला पवार साहेबांमुळेच लाभले. 

त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या प्रसंगी त्यांच्या पत्नी शेवटच्या क्षणापर्यंत योद्धा बनून लढल्या. अनेक अडचणी आल्या तरी पवार साहेब इतके खमके होते की त्यांनी त्यांचे विचार शेवटच्या क्षणापर्यंत बदलू दिले नाहीत. आयुष्यात प्रचंड रूग्णसेवा करणारा माणूस ज्याने अनेकांचे जीव वाचवले,त्यांच्यावर पैश्यांअभावी उपचार बंद होण्याची वेळ आली होती. त्यावेळी आम्ही सर्वच प्रहार पदाधिकारी खंबीर पणे उभे राहिलो आणि त्यांचे उपचार चॅरिटीच्या माध्यमातून मोफत करण्याकरता शर्तीचे प्रयत्न केले. या सर्व प्रयत्नादरम्यान त्यांच्या पत्नी प्रत्येक क्षणोक्षणी संघर्ष करत होत्या. त्यांनी त्यांची हिंमत कधीच खचु दिली नाही.  

मा.आमदार श्रीकांत भारतीय साहेब आणि मा.आमदार बच्चू भाऊ कडू साहेब, यांनी वैयक्तीकरित्या वेळोवेळी रूग्णालयात भेट दिली, डॅडींकडे विशेष लक्ष दिले. 

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख श्री मंगेश चिवटे यांनी रूग्णालयाला भेट दिली, सहकार्य केले. ज्याला जे शक्य होईल त्याने ती मदत केली, आर्थिक सहाय्य दिले परंतु नियतीने घात केला आणि आम्ही आपल्या मार्गदर्शक डॅडींना वाचवू शकलो नाही. कॅंन्सरच्या विळख्यात ते इतके अडकले की पुन्हा त्यातून बाहेर निघूच शकले नाही. 

ते नेहमी गर्वाने सगळ्यांना सांगायचे "आपला स्वप्निल बोलतो कमी पण जेव्हा पण बोलतो मुद्याचे बोलतो " , सकाळ झाली की बाबू कुठे आहे .. एक काम आहे आणि ते तू आणि हितेशच करू शकतो विश्वासाने येणारा फोन ,कायमचा बंद झाला. पवार साहेब म्हणजे व्यक्ती नाही तर पर्व होते त्या पर्वाचा आज अंत झाला.

🙏🏻तुमच्या आठवणींचा जिवंतपणा हाच आमचा आधार आहे. भावपूर्ण आदरांजली डॅडी 🙏🏻

ॲड.स्वप्निल दिलीप पाटील 
मो. ९३२२२१७७७९
दिनांक -१६/०६/२०२४

**आपल्या सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गीय कमलाकर पवार साहेब (डॅडी) यांचे दि.१६/०६/२०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.**

**स्वर्गीय कमलाकर पवार साहेब यांचा दशक्रिया व उत्तरकार्य विधी रविवार दि.२३/०६/२०२४ रोजी त्यांचे राहते घरी रूम क्र.१,जय वर्षा को ॲाप हौसिंग सोसायटी,पारसिक बँकेच्या पाठीमागे,शास्त्री नगर,कळवा ठाणे (पश्चिम) येथे सकाळी १०.०० वाजता उपस्थित राहावे,ही विनंती.🙏🏻**

**टीप - स्वर्गीय कमलाकर पवार साहेब यांना नेहमीच सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांच्या या कार्याचा एक भाग म्हणून सदर दिनी अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला असून ज्यांना कोणाला सढळ हाताने या कार्यक्रमास सहकार्य करण्याची इच्छा आहे,त्यांनी श्रीम.विद्या पवार 9619624031 यांचेशी संपर्क साधावा.**

कमवा व शिका या योजनेअंतर्गत CEDP ने सुरु केले अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम !!

कमवा व शिका या योजनेअंतर्गत CEDP ने सुरु केले अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम !!

कल्याण, प्रतिनिधी : बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याचे स्वप्न प्रत्येक विद्यार्थ्यांचे असते. 'हातात पदवी असली की बस्सं', अशा मानसिकतेतून विद्यार्थी आता बाहेर पडले असून, हमखास नोकरीची हमी देणारे किंवा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांनाच हे विद्यार्थी प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे केवळ पदवी मिळविण्यापुरते शिक्षण घेण्यापेक्षा शिक्षणातून नोकरीची हमी मिळायला हवी, याकडे त्यांचा कल आहे. म्हणूनच अशाच अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यासाठी हजारो विद्यार्थी 'प्रतीक्षेत'(वेटिंग) असल्याचे दिसून येते.

आज व्यवसायिक अभ्यासक्रम अत्यंत महागले आहेत, अल्प उत्पन्न, मध्यमवर्गीय परिवारातील मुलांना अशा अभ्यासक्रमांना आर्थिक परिस्थिती मुळे वंचित रहावे लागत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून CEDP इन्स्टीट्यूट यांनी फक्त ११०००/- या नाममात्र फी मध्ये UGC मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी चे अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. तसेच यात अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर नोकरीची सुध्दा हमी देतात.

या अभ्यासक्रमा बद्दल माहिती देताना या इन्स्टिट्यूट चे मनिष देसाई यांनी सांगितले BSC नर्सिंग (४२ महिने), GNM-MNC (४२ महिने), Bachelor of physiotherapy, BOVC Auto+ Auto Technician (36 month), GNM+GDA/OTT (42 month), BOVC- Hotel Management+ commichef/ steward/ Hk/ Aviation (36 month) असे नोकरीची हमी असलेले अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम कुर्ला, ठाणे, डोंबिवली येथे सुरू केले असुन हे सर्व अभ्यासक्रम "कमवा व शिका" या योजनेअंतर्गत फक्त ११०००/- रुपये शुल्क भरून करता येतील. 

या संदर्भातील अधिक माहितीसाठी आपण 8888698768 / 9819807386 / 9819817386 यांना संपर्क करावा

बार्टीमार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सूरू !!

बार्टीमार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सूरू !!

पुणे, प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षांच्या निःशुल्क अनिवासी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रीया सुरु करण्यात आली असल्याची  माहिती बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी दिली आहे. 

बार्टीमार्फत मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी जेईईसाठी  १०० व नीटसाठी १०० जागांकरिता प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. उमेदवारांने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये  इयत्ता ११ (विज्ञान)  शाखेत प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांजवळ राज्यातील अनुसूचित जातीचा व अधिवास दाखला असावा. 

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापर्यंत असावे. विद्यार्थी दिव्यांग असल्यास ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक राहिल. अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. 

प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तानिहाय निवड केली जाईल. प्रशिक्षणासाठी महिला ३० टक्के, दिव्यांग ५ टक्के, अनाथ १ टक्का, वंचितमध्ये वाल्मिकी व तत्सम जाती, होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी इत्यादीसाठी ५ टक्के जागा आरक्षित असतील. 

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. प्रशिक्षण कालावधी २४ महिन्यांचा राहिल. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान ७५ टक्के पेक्षा जास्त कालावधीसाठी उपस्थित  राहिल्यास त्या विद्यार्थ्यांना दरमहा ६ हजार रूपये विद्यावेतन अदा करण्यात येईल. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरिता प्रती विद्यार्थी ५ हजार रूपये इतकी एकरकमी रक्कम अदा करण्यात येईल. 

योजनेबाबत व प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे सर्व अंतिम अधिकार शासनास व बार्टीचे महासंचालक यांना राहतील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी १३ जून पासून http://jee-neet.barti.co.in/public/ या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहनही  श्री. वारे यांनी केले आहे.

प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखड्यावर नागरिकांना हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन !!

प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखड्यावर नागरिकांना हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन !!

पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ मसुदा तज्ज्ञ व्यक्ती व शासकीय अधिकाऱ्यांच्या समितीने तयार केलेला असून त्यावर नागरिकांनी त्यांच्या हरकती व सूचना ३० जूनपर्यंत पाठविण्याचे आवाहन महिला व बाल विकास आयुक्तालयाने केले आहे. 

प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा २०२२ हा इंग्रजी व मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या https://womenchild.maharashtra.gov.in आणि https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदर प्रस्तावित बाल धोरण हे मुळ इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आलेले असून त्याचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. या बाल धोरण व कृती आराखड्यामध्ये आवश्यक बाबी, सूचना, सुधारणा तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या मसुद्यामध्ये शब्द रचना, व्याकरण या संदर्भाने हरकती व सूचना नागरीकांकडून मागविण्यात येत आहेत.

नागरीकांनी आपल्या हरकती व सूचना  ३० जून रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत महिला व बाल विकास आयुक्तालय, २०, राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ पुणे-०१ या पत्त्यावर अथवा childpolicy@gmail.com या ईमेल वर पाठवाव्यात, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

कमवा व शिका या योजनेअंतर्गत CEDP ने सुरु केले अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम !!

कमवा व शिका या योजनेअंतर्गत CEDP ने सुरु केले अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम !!

कल्याण, प्रतिनिधी : बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याचे स्वप्न प्रत्येक विद्यार्थ्यांचे असते. 'हातात पदवी असली की बस्सं', अशा मानसिकतेतून विद्यार्थी आता बाहेर पडले असून, हमखास नोकरीची हमी देणारे किंवा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांनाच हे विद्यार्थी प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे केवळ पदवी मिळविण्यापुरते शिक्षण घेण्यापेक्षा शिक्षणातून नोकरीची हमी मिळायला हवी, याकडे त्यांचा कल आहे. म्हणूनच अशाच अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यासाठी हजारो विद्यार्थी 'प्रतीक्षेत'(वेटिंग) असल्याचे दिसून येते.

आज व्यवसायिक अभ्यासक्रम अत्यंत महागले आहेत, अल्प उत्पन्न, मध्यमवर्गीय परिवारातील मुलांना अशा अभ्यासक्रमांना आर्थिक परिस्थिती मुळे वंचित रहावे लागत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून CEDP इन्स्टीट्यूट यांनी फक्त ११०००/- या नाममात्र फी मध्ये UGC मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी चे अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. तसेच यात अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर नोकरीची सुध्दा हमी देतात.

या अभ्यासक्रमा बद्दल माहिती देताना या इन्स्टिट्यूट चे मनिष देसाई यांनी सांगितले BSC नर्सिंग (४२ महिने), GNM-MNC (४२ महिने), Bachelor of physiotherapy, BOVC Auto+ Auto Technician (36 month), GNM+GDA/OTT (42 month), BOVC- Hotel Management+ commichef/ steward/ Hk/ Aviation (36 month) असे नोकरीची हमी असलेले अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम कुर्ला, ठाणे, डोंबिवली येथे सुरू केले असुन हे सर्व अभ्यासक्रम "कमवा व शिका" या योजनेअंतर्गत फक्त ११०००/- रुपये शुल्क भरून करता येतील. 

या संदर्भातील अधिक माहितीसाठी आपण सचिन बुटाला 981-981-7386 / 9819807386 यांना संपर्क करावा

Sunday 16 June 2024

कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा 'प्रवेशोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा !!

कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा 'प्रवेशोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा !!

  
वसई, प्रतिनिधी : उन्हाळी सुट्टी संपून शाळा सुरू झाली की विद्यार्थी आणि पालकांची लगबग सुरू होते. २०२४-२५ ह्या नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्कर्ष विद्यालय मराठी माध्यमात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. मुग्धा लेले मॅडम आणि उपमुख्याध्यापिका श्रीमती. चित्रा ठाकूर यांनी नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण केले. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून शाळेचे प्रवेशद्वार आकर्षक पद्धतीने  सजविण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू आणि खाऊ देण्यात आला. प्रत्येक वर्गात वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना गाणी, गोष्टी सांगून आनंदाचे वातावरण निर्माण केले. 

यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका  श्रीमती मुग्धा लेले व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. भक्ती वर्तक मॅडम उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांचे विविध मनोरंजक खेळ घेऊन 'आनंददायी शनिवार' प्रत्येक वर्गात साजरा करण्यात आला. यावेळी माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक, शिक्षकवृंद व सर्व सहकारी वर्ग  उपस्थित होते.

Saturday 15 June 2024

के. ईश्वर फाउंडेशन अंतर्गत न्यूरोथेरपी प्रशिक्षण व आरोग्य केंद्राची स्थापना !!

के. ईश्वर फाउंडेशन अंतर्गत न्यूरोथेरपी प्रशिक्षण व आरोग्य केंद्राची स्थापना !!

**मुंबई, (प्रतिनिधी) : के. ईश्वर फाउंडेशन (एनजीओ) अंतर्गत आशा आरोग्य केंद्राची स्थापना केली असून नुरोथेरपी, आयुर्वेद, निसर्गोपचार, होमिओपॅथी आणि मॉडर्न मेडीसिन द्वारे अत्यल्प दरात उपचार तसेच निदान करण्यात येणार आहे.

के. ईश्वर फाउंडेशन च्या सर्वे-सर्वा श्रीमती एम. राणीताई वाघमारे  यांच्या नेतृत्वात संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असून सर्वतोपरी जनकल्याणासाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

साईधाम गौतम नगर येथे महापालिकेच्या निधीतून के. ईश्वर फाउंडेशन चे मार्गदर्शक विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी पाठपुरावा करून जनतेचे आरोग्य राखले जावे यासाठी परिसरातील मोकळ्या जागेत व्यायाम करण्याचे उपकरणे जोडली आहेत.

या शिवाय "आशा आरोग्य केंद्र" उभारून अत्यल्प दरात रुग्णाची सेवा केली जाणार असून रिपब्लीकन पँथर नेते दिवंगत ईश्वर कांबळे साहेबांचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. सदरील केंद्रात आठवड्यातून ३ दिवस स्त्री रोग तज्ञ, 3 दिवस नेत्र तज्ञ, 2 दिवस ईएनटी, आणि लकवा, हाडाचे व नस दबली असलेल्या आजाराचे अतिशय कमी खर्चात चष्मा व रोगाचे निदान केले जाईल.

आरोग्य केंद्र प्रमुख व फाउंडेशन चे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र कुमार यांनी आपल्या अनुभवातून हजारो रुग्णांना न्युरोथेरपी च्या माध्यमांतून बरे केले आहे. एनजीओ च्या माध्यमांतून वर्सोवा, अंधेरी, कांदिवली, मड व मालाड येथे न्युरोथेरपी केंद्र मागील ७/८ वर्षापासून चालू आहेत.

न्युरोथेरपी ही आरोग्यदायक कला  नवतरून व तरुणींनी शिकून आपल्या देशात चाललेली हाडे व नसांची दुःखी कमी करून स्वत:चं बेरोजगारपन कमी करून स्वावलंबी व निरोगी भारत बनविण्याच्या आमच्या धेयात सामील होवून फ्रांच्यायशी किंवा प्रशिक्षण घेवून सहभागी होवू शकता असा आशावाद जितेंद्र कुमार यांनी व्यक्त केला.

के. ईश्वर फाउंडेशन च्या माध्यमातून जनहितार्थ बरेच उपक्रम राबवले जाणार असून राज्यभर फ्रांच्यायशी देवून अल्पदरात फ्रांच्यायशी घेण्यासाठी संस्थेच्या प्रतिनिधीशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने बॉबी जाधव यांनी केले आहे.

आपल्याला मतदारसंघात कामांचा दर्जा आणि गुणवत्तेशी तडजोड न करता चांगले काम करायचे आहे - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा)

आपल्याला मतदारसंघात कामांचा दर्जा आणि गुणवत्तेशी तडजोड न करता चांगले काम करायचे आहे - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा)


कल्याण, प्रतिनिधी : कल्याणचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीचे काम आता उद्यापासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाची गुरुवारी (१३ जून) रोजी पडझड झाली असून भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह दुर्गाडी किल्ल्याची पाहणी केली.

विशेष म्हणजे पीडब्ल्यूडीकडून काही वर्षांपूर्वीच या बुरुजाचे काम करण्यात आले होते. हा बुरुज ढासळल्याची माहिती मिळताच सायंकाळच्या सुमारास पीडब्ल्यूडी अधिकारी, केडीएमसी अधिकारी आदींच्या उपस्थितीत भिवंडी मतदारसंघाचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी आधी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचे दर्शन घेतले आणि नंतर या ढासळलेल्या बुरुजाची पाहणी केली. त्यावेळी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून त्यांनी संपर्क साधला. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच हे डागडुजीचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले.

आपण विकासकामांसाठी कोणाकडूनही एक रुपया घेणार नाही. आपल्याला मतदारसंघात कामांचा दर्जा आणि गुणवत्तेशी तडजोड न करता चांगले काम करायचे आहे. जर काम चांगले केले नाही तर, मग तो कंत्राटदार असो की शासकीय अधिकारी, त्यांचा कोणताही मुलाहिजा न ठेवता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू.' असे सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी सांगितले.

Friday 14 June 2024

कलगी तुरा परंपरेतील "श्री सुंकाई देवी नृत्य कलापथक -अडुर(मुबंई) शाखेचा ६ व्या वर्षात दमदार पदार्पण !!

कलगी तुरा परंपरेतील "श्री सुंकाई देवी नृत्य कलापथक -अडुर(मुबंई) शाखेचा ६ व्या वर्षात दमदार पदार्पण !!

[ मुबंई : उदय दणदणे ]

मुंबईतील विविध नाट्यगृहात कोकणची बहुप्रिय लोककला शक्ती-तुरा (जाखडी नृत्य) कार्यक्रमांचे फलक झळकू लागले असून, खऱ्या अर्थाने ह्या मोसमातील शक्ती-तुरा सामने सुरू झाले असल्याचे चित्र मुबंईतील नाट्यगृहात होत असलेल्या रसिकांच्या गर्दीने दिसून येते, ही लोककला जोपासण्यासाठी अनेक शाहिर लोककलावंत, नृत्य कलाकार, वाद्य-संगीतकार, आयोजक, निर्माते अहोरात्र मेहनत घेत असतात, त्यातीलच एक कलगी तुरा परंपरेतील जाखडी नृत्यात अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरलेली "श्री सुंकाई देवी नृत्य कलापथक-अडूर (मुंबई) शाखेला ०५ वर्षे पूर्ण होत असून ही शाखा ०६ व्या वर्षात दमदार पदार्पण करत आहे. प्रत्यर्थ "श्री  सुंकाई देवी नृत्य कलापथक"-अडूर (मुबंई) वतीने कलापथक प्रमुख रोहित तुपट, प्रशांत मांडवकर, विकास तेलगडे आणि सहकारी वतीने शाखेस ५ वर्षे पूर्णत्वाचे औचित्य साधत रविवार दिनांक १६  जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, दादर-मुंबई येथे शक्ती-तुरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, शक्तीवाले शाहीर -राजेश निकम व तुरेवाले शाहीर -सुशांत गराटे ह्या दोन युवा शाहिरांची जुगलबंदी रसिकांना पाहायला मिळणार आहे. "श्री  सुंकाई देवी नृत्य कलापथक"-अडूर (मुबंई) यांचा शक्ती-तुरा कार्यक्रमाचे हे पहिलेच आयोजन असून सदर कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रयोगाला, कलाक्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे उपरोक्त कला पथकाचे प्रतिनिधी रोहित तुपट व सहकारी यांच्या वतीने सांगण्यात येते, तरी तमाम कोकण कलाप्रेमी रसिकांनी सदर शक्ती-तुरा (जाखडी नृत्य) कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थितीत राहावे...

अधिक माहितीसाठी प्रशांत मांडवकर-७०४५१६५३६४  रोहित तुपट-८७८८११३०६९, विकास तेलगडे-७०३९६२५२६३  यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Thursday 13 June 2024

बनेली (टिटवाळा) येथे अनधिकृत चाळींचे बांधकाम जोरात !!

बनेली (टिटवाळा) येथे अनधिकृत चाळींचे बांधकाम जोरात !!

** 'अ' प्रभागाकडून दिखाव्या पुरती कारवाई 



कल्याण, प्रतिनिधी : टिटवाळा-बनेली येथील २५ एकरच्या एका मोकळ्या भूखंडावर भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारण्याचा सपाटा लावला आहे. राजरोस बेकायदा चाळींची बांधकामे सुरू असताना या बेकायदा चाळींवर अ प्रभागाकडून फक्त दिखाव्या पुरती कारवाई केली जाते, अशा तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या आहेत.

अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त किशोर खुताडे यांच्या आशीर्वादाने ही बेकायदा चाळींची बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवासी करत आहेत. यासंबंधीच्या चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील टिटवाला बनेली भागातील २५ एकरचा मोकळा भूखंड भूमाफियांनी बेकायदा चाळी बांधून हडप करण्यास सुरुवात केली आहे. तरीही अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त आणि तोडकाम पथक, बीट मुकादम हा सगळा प्रकार कारवाई न करता पाहत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अनेक नागरिकांनी पालिका मुख्यालयात तक्रारी केल्या आहेत.

टिटवाळा, मांडा भागातील बनेली परिसर हा एकमेव मोकळा पट्टा आहे. तोही आता माफियांच्या बेकायदा चाळींच्या विळख्यात चालल्याने स्थानिक रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. पावसाळ्यात या सर्व बेकायदा चाळींना पावसाच्या पाण्याच्या विळखा पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



अंबरनाथ नगरपालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पावसाने केली पोलखोल !!

अंबरनाथ नगरपालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पावसाने केली पोलखोल !!


अंबरनाथ, प्रतिनिधी : शहरात आज दुपारी तीननंतर आलेल्या पावसाने झोडपून काढले. पहिल्याच पावसात शहरातील महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प होती.

पावसाचा जोर वाढल्याने शहराच्या पूर्ण आणि पश्चिमेकडे सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने कल्याण-बदलापूर रस्ता, विमको नाका, डीएमसी कंपनी रोड, गजानन महाराज मंदिर, बी-केबिन, रेल्वे स्थानक परिसरात पावसाचे पाणी साचले. बी-केबिन परिसर, तसेच बुवा पाडा भागात काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मनस्ताप झाला. दोन ठिकाणी झाडे पडल्याची नोंद आहे. महत्त्वाचे म्हणजे, शहरातील अनेक भागांत पावसाचे पाणी साचल्याने पालिका प्रशासनाने केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरल्याने समाज माध्यमांवर वेगळीच चर्चा रंगली होती.

पाणी साचून नागरिकांना असुविधेला सामोरे जावे लागू नये यासाठी उपाययोजना करा- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पाणी साचून नागरिकांना असुविधेला सामोरे जावे लागू नये यासाठी उपाययोजना करा- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, प्रतिनिधी : पुणे शहर तसेच जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या हद्दीत मोठ्या पावसामुळे पाणी साचण्याची स्थिती पाहता नालेसफाई, गटारे स्वच्छता, नदी, नाल्यांच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे काढणे याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्तीव्यवस्थापनाच्या अनुषंगाने बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते. 

गेल्या काही दिवसात पुणे शहर तसेच बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचून नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पाणी साचू नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांनी सूक्ष्म पातळीवर नियोजन करावे. कठोर कारवाईसाठी पोलीस संरक्षणात एक्सकॅव्हेटर आदी यंत्रे वापरुन नाले, नद्यांच्या कडेची अतिक्रमणे काढावीत. 

जाहिरात फलकांमुळे वारंवार दुर्घटना घडत असून अनधिकृत तसेच धोकादायक होर्डिंग्ज पाडण्याची कार्यवाही गतीने करावी. शासकीय यंत्रणा तसेच खासगी कंत्राटदारांकडून रस्ते तसेच अन्य बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यांवर दुर्घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी बैठकीस सहायक जिल्हाधिकारी डॉ. पूजा मनोरमा दिलीप खेडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महानगरपालिका, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आरोग्य विभाग, पोलीस, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळ, अन्न व औषध प्रशासन, महावितरण, परिवहन विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

वारकऱ्यांना पाणी, स्वच्छता, आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासह सुरक्षेची काळजी घ्या- जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

वारकऱ्यांना पाणी, स्वच्छता, आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासह सुरक्षेची काळजी घ्या- जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

पुणे, प्रतिनिधी : जिल्ह्यात वेळेत पाऊस सुरू झाल्याचे पाहता पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालये, वाहतूक, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा पुरविण्यासह त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते. 

पालखी सोहळा सुरक्षित व्हावा यासाठी सर्व संबंधित तालुक्यांनी इन्सीडन्स रिस्पॉन्स सिस्टीमचा (आयआरएस) प्रभावी उपयोग करावा. सोहळ्यातील संबंधित विभागविषयक निश्चित कामकाजासाठी संपर्क अधिकारी नेमून त्याला पालखी सोहळ्यासंबंधित जबाबदारी द्यावी जेणेकरुन समन्वय साधताना गोंधळ होणार नाही. 

पाऊस पडत असल्याचे लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्याचे स्रोत तपासून ते निर्जंतूक करुन घ्यावेत. पाणीपुरवठ्यासाठी आवश्यकता असल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडून पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करता येतील. पाणीपुरवठ्याचे टँकर आणि शौचालयांच्या संख्येत वाढ करण्यासाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड मनपा तसेच स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.

तात्पुरत्या शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. पुढील गावी शौचालयांच्या वाहतुकीसाठी योग्य वाहतूक आराखडा (ट्रान्झिट प्लॅन) तयार करा. आपल्या घरातील शौचालये वारकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यास पालखी मार्गावरील इच्छुक नागरिकांच्या घरांना वेगळे मार्किंग करा. वारी पुढे गेल्यानंतर मागील गावातील स्वच्छतेवर विशेष भर द्यावा, असेही ते म्हणाले.

पालखी मार्गावरील दवाखान्यांमध्ये औषधे उपलब्ध ठेवावीत. पालखीच्या रस्त्यावर कोठे अतिक्रमणे असल्यास ती तात्काळ काढून टाकण्यात यावीत. सुरक्षेच्यादृष्टीने मार्गावरील, नगरपालिका हद्दीतील सर्व जाहिरात फलकांची (होर्डिंग्ज) तपासणी करावी. अवैध आणि असुरक्षित सर्व जाहिरात फलक काढून टाकावेत. पालखीला अडथळा येऊ नये आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालखी महामार्गावरील कामे पूर्ण करण्यासह अडथळे काढावेत. एनएचएआयने पोलीस, उपविभागीय अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी करुन त्यानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही ते म्हणाले.

अन्न व औषध प्रशासन विभागाने मार्गावरील सर्व हॉटेल्समधील खाद्यपदार्थांची नियमित तपासणी करत रहावे. त्रुटी आढळलेल्या ठिकाणी कठोर कारवाई, प्रसंगी अनुज्ञप्ती रद्द करा. आपत्कालीन व्यवस्थेसाठी आळंदी येथे एनडीआरएफ तसेच इतरत्र गृहरक्षक दलाच्या जवानांची आपदा मित्रांची मदत घ्या. रात्री गरजेच्या ठिकाणी मोठी प्रकाशव्यवस्था करण्यासाठी नगरपालिकेकडील लायटिंग टॉवरचा उपयोग करावा, असेही ते म्हणाले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा आदींबाबत माहिती सादरीकरणाद्वारे दिली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी १ हजार ५००, संत तुकाराम महाराज पालखीसाठी १ हजार आणि संत सोपान महाराज पालखीसाठी पालखीमुक्कामी, विसाव्याच्या ठिकाणी २०० शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे. तिन्ही पालख्यांसाठी मिळून १२ तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. पाण्याचे स्रोत, वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, फिरते आरोग्य पथक, औषधे, रुग्णवाहिका यांची आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार आहे. स्तनदा माता आणि बालकांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

पालखी तळाचे सपाटीकरण, इंधन आणि वीज पुरवठा, शोषखड्डे, तात्पुरता निवारा केंद्र, आरोग्य किट आदींची माहिती यावेळी देण्यात आली. १४० रुग्णवाहिका आणि ५७ रुग्णवाहिका पथक, ११२ वैद्यकीय अधिकारी, ३३६ आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी २०० टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही यावेळी श्री. पाटील यांनी सांगितले. पालखीसाठी तसेच पोलीसांसाठी तालुकास्तरावर देण्यात आलेले तात्पुरते तंबू (टेन्ट्स) देण्यात यावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

पोलीस अधीक्षक श्री. देशमुख यांनी पालखी बंदोबस्त, वाहतूक आराखडा, पालखी महामार्गावर एनएचएआयकडून सुरू असलेल्या कामांच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या उपाययोजना आदींच्या अनुषंगाने माहिती दिली आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.

इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढणे, प्रदुषित पाणी वाहून जावे यासाठी धरणातून पाणी सोडणे, पालखी प्रस्थानावेळी उपस्थितीसाठी आळंदी येथे मंदिरात मर्यादित स्वरुपात मंदिर समितीकडून पासेस देणे तसेच प्रस्थानाच्या दिवशी वाहनांना अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय अन्य वाहनांना प्रवेशबंदी आदींच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीस सहायक जिल्हाधिकारी डॉ. पूजा मनोरमा दिलीप खेडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, संबंधित उपविभागांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महानगरपालिका, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आरोग्य विभाग, पोलीस, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळ, अन्न व औषध प्रशासन, महावितरण, परिवहन विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डासांची उत्पत्ती रोखुया, हिवतापाचे निर्मुलन करूया !!

डासांची उत्पत्ती रोखुया, हिवतापाचे निर्मुलन करूया !!

दरवर्षी जून महिना हा 'हिवताप प्रतिबंध महिना' म्हणून पाळला जातो. किटकजन्य आजारांमुळे दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो. हिवताप, डेंग्यू, चिकनगुन्या, हत्तीरोगसारखे आजार डास चावल्यामुळे होतात. असे जीवघेणे आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात, घरात डासांची निर्मिती होवू नये म्हणून विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 

किटकजन्य आजारांचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती साचलेल्या पाण्यात होत असते. डास हा साचलेल्या पाण्यात अंडी घालतो. ८ ते १० दिवसात नवीन डास जन्माला येतो. हा डास आजारी व्यक्तीला (रुग्णास) चावल्यास रुग्णाच्या शरीरातील जंतू डासाच्या शरीरात जातात. तेथे त्यांची वाढ होते व त्यानंतर हा असा दूषित डास ज्या निरोगी व्यक्तींना चावेल त्यांना डेंग्यू, चिकनगुन्या व हत्तीरोग यासारखे आजार होतात. 

*हिवतापाची लक्षणे:*
थंडी वाजून ताप येणे हे हिवतापाचे लक्षण आहे. ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो. नंतर घाम येवून अंग गार पडते. ताप आल्यानंतर डोके दुखते व बऱ्याच वेळा उलट्याही होतात.  

*डास आणि त्यांच्या उत्पत्तींची ठिकाणे:*
ॲनॉफिलीस डास हा हिवतापाचा प्रसार करतो. त्याची उत्पत्ती नदी, नाले, विहिरी व तळी याठिकाणच्या स्वच्छ पाणीसाठ्यांमध्ये होते. एडिस एजिप्ती हा डास डेंग्यू आणि चिकनगुन्या या आजारांचा प्रसार करतो. त्याची उत्पत्ती ही घरगुती पाण्याच्या टाक्या, बॅरल, रांजण, हौद, फुटके डबे, निरूपयोगी साठविलेले पाणी, घरातील कुलर, फ्रिजच्या डीप ट्रे मधील पाणी, मनी प्लॅन्ट मधील पाणी इत्यादी स्वच्छ पाण्यासाठ्यामध्ये होते. क्यूलेक्स डास हा हत्तीरोगाचा प्रसार करतो. त्याची उत्पत्ती शौचालयाचा सेप्टिक टँक, तुंबलेली गटारे व पाण्याची डबके या अस्वच्छ पाणीसाठ्यात होते.

*अशी घ्यावी दक्षता:*
ताप आल्यास त्वरीत डॉक्टरकडे जावे. डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे आवश्यक चाचण्या कराव्यात. शासकीय रुग्णालयात यासाठी मोफत औषधोपचार उपलब्ध आहेत. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरावेत. डासांपासून संरक्षणासाठी घराच्या दारे, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. क्रीम, मॅट, कॉईलचा वापर करावा.
 
*डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी करा उपाययोजना:*
घराच्या शौचालयाच्या सेप्टीक टँकच्या व्हेन्ट पाईपला (गॅस पाईप) जाळी बसवावी अथवा कापड बांधावे यामुळे डासांची उत्पत्ती रोखली जाते. घर आणि परिसरात स्वच्छता ठेवावी. सेप्टीक टँकचे ढापे सिलबंध ठेवावेत. गच्चीवरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण बसवावीत. घरातील पाण्याच्या टाक्या, रांजण, बॅरल, हौद हे आठवड्यातून किमान एकदा घासून पुसून स्वच्छ करावेत व ते घट्ट झाकनाने आणि कापडाने नेहमी झाकून ठेवावेत. घरातील, गच्चीवरील, घराच्या परिसरातील भंगार सामान, फुटके डबे, वस्तू, निरूपयोगी टायर यांची विल्हेवाट लावावी. या ठिकाणी पावसाचे पाणी साठून डासांची उत्पत्ती होते. घरातील कुलर, मनी प्लॉट, चायनीज प्लॉटमधील पाणी आठवड्यातून किमान एकदा बदलून स्वच्छ करून पुन्हा भरावे. फ्रीजच्या ट्रेमधील पाणी वेळोवेळी काढून टाकावे. गच्चीवर अंगणात घराच्या परिसरात कोठेही पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

Wednesday 12 June 2024

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातर्फे यशवंत खोपकर यांची मुख्य संयोजक धडगांव तालुका पदी नियुक्ती !!

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातर्फे यशवंत खोपकर यांची मुख्य संयोजक धडगांव तालुका पदी नियुक्ती !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

               सामाजिक, पर्यावरण, शिक्षण, ग्राहक संरक्षण, आरोग्य, क्रीडा आदी क्षेत्रात कार्यरत असलेले विक्रोळी पश्चिम पार्क साईट -घाटकोपर विभागातील सामाजिक कार्यकर्ते शिवसैनिक, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे विक्रोळी विभाग संघटक श्री. यशवंत खोपकर यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष बसवेकर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष शेखर उर्फ चंद्रभान कोलते यांच्यातर्फे यशवंत खोपकर यांची मुख्य संयोजक धडगांव तालुका पदी तीन वर्ष करिता नियुक्ती  करण्यात आली आहे. माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार व्यापक जनहितासाठी प्रचार, प्रसार  शिवाय भारतीय संविधान, भारतीय कायदे, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघची आचारसंहिता यांचे काटेकोर पालन करून काम करण्याचे आदेश खोपकर यांना नियुक्ती वेळी दिले आहेत. खोपकर यांची निवड झाल्यामुळे घाटकोपर विधानसभा क्षेत्रातील गोर गरिब व दुर्बल, गरजवंत नागरिकांना याचा नक्कीच फायदा होईल यात शंकाच नाही. खोपकर यांची निवड झाल्याबदल विभागातील आजी-माजी शिवसेना पदाधिकारी यांनी श्री.यशवंत खोपकर यांना अभिनंदनासह  पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सहा बालके निरीक्षण गृहात दाखल, पालक व नातेवाईक यांना संपर्क साधण्याचे आवाहन !!

सहा बालके निरीक्षण गृहात दाखल, पालक व नातेवाईक यांना संपर्क साधण्याचे आवाहन !!

रायगड, प्रतिनिधी :-- बाल कल्याण समिती, रायगड यांच्या आदेशाने जिल्हा परिवीक्षा संघटना संचालित मुलांचे निरीक्षण गृह बालगृह कर्जत, ता. कर्जत जि. रायगड येथे काळजी व संरक्षणासाठी दाखल करण्यात आले आहे. सोबत छायाचित्रातील १) कु. सोनू मनोज कांबळे वय १३ वर्षे २) कु. विजय रामु सिंग वय ०९ वर्षे ०४ महिने ३) कु. राज सुरेश वाघमारे वय १२ वर्षे ०४ महिने, ४) कु. सोनू विजय वय १३ वर्षे ०४ महिने ५) कु. लक्ष्मण संतोष पवार वय १५ वर्षे ११ महिने ६) कु. महेश लक्ष्मण वय १४ वर्षे ०४ महिने आहे.
हे निवेदन प्रसिद्ध झाल्यापासून तीस (३०) दिवसाच्या आत वरील वरील ६ बालकांचे पालक व नातेवाईक यांनी  जिल्हा परिवीक्षा संघटना संचालित मुलांचे निरीक्षण गृह । बालगृह कर्जत, ता. कर्जत जि. रायगड ४१०२०१ फोन नंबर ९९७०१२२६२३ या नंबर वरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्कासाठी पत्ता :
१) जिल्हा परिवीक्षा संघटना संचालित मुलांचे निरीक्षण गृह / बालगृह कर्जत, ता. कर्जत जि. रायगड संपर्क क्रमांक- ९९७०१२२६२३
२) मा. बाल कल्याण समिती, रायगड
३) जिल्हा महिला व बालविकास विभाग, अलिबाग - रायगड, संपर्क क्रमांक ७७७५०१८१९७ 
येथे संपर्क साधावा.

अन्यथा  बालकांची जबाबदारी घेण्यास कोणीही नाही असे समजून मा बाल कल्याण समिती, रायगड यांच्या मार्फत बालकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल.

राज्य बाल धोरण व कृती आराखडा 2022 धोरणाचा प्रारुप मसुदा प्रसिद्ध !!

राज्य बाल धोरण व कृती आराखडा 2022 धोरणाचा प्रारुप मसुदा प्रसिद्ध !!

पुणे, प्रतिनिधी :- महिला व बालविकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश समिती गठीत करण्यात आली होती. या गठीत समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा 2022 मसुदा तयार केलेला आहे. सदर प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा 2022 हा इंग्रजी व मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाचे  

https://womenchild.maharashtra.gov.in  व  
https://www.wcdcommpune.com या 

संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 

तरी सदर प्रस्तावित बाल धोरण हे मुळामध्ये इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आलेला असून त्यांचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे. या बाल धोरण व कृती आराखडा यामध्ये आवश्यक बाबी,सूचना, सुधारणा तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या मसुद्यामध्ये शब्द रचना, व्याकरण या संदर्भाने हरकती व सूचना नागरिकांकडून मागविण्यात येत आहे.

तसेच महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा-2022 च्या संदर्भाने नागरिकांच्या हरकती व सुचना दिनांक 30 जून 2024 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत महिला व बालविकास आयुक्तालय,28 राणीचा बाग, जुन्या सर्कीट हाऊस जवळ, पुणे-01 या पत्त्यावर अथवा childpolicy@gmail.om या इमेलवर पाठविण्यात याव्यात असे आवाहन डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त, महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी न केलेल्यांसाठी गावपातळीवर विशेष मोहिम !!

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी न केलेल्यांसाठी गावपातळीवर विशेष मोहिम !!

पुणे, प्रतिनिधी :- प्रधानमंत्री किसान  योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा 17 वा हप्ता वितरणापूर्वी स्वत:   बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता 5 ते 15 जून, 2024 या कालावधीत या विशेष मोहिमेमध्ये करून घेण्याचे आवाहन  शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे 

शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये)  2000 रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000 रुपये लाभ अदा करण्यात येते.लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे eKYC केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. या योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या या तिन्ही बाबींची पूर्तता राज्यातील 90 लाख 20  लाभार्थ्यांनी केलेली आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 05 जून, 2024 ते 15 जून, 2024 या कालावधीत या बंधनकारक बाबींची उर्वरित लाभार्थींनी पूर्तता करण्यासाठी गावपातळीवर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी व e-KYC साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र (CSC) तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे.

त्यानुसार भूमी अभिलेख नोंदीनुसार (RoR नुसार) जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता या विशेष मोहिमेमध्ये करून घ्यावी. यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या (Land Seeding - No) लाभार्थींनी संबंधित तलाठी / तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. त्याचप्रमाणे eKYC व बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र (CSC) व इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) च्या मार्फत कार्यपूर्तता करावी, असे विकास पाटील,कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू !!

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू !!

          
रायगड, प्रतिनिधी :-  सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व  परिचालन या मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रायगड - अलिबाग येथे  दिनांक 1 जुलै 2024 पासून प्रशिक्षणाच्या सुरु होणा-या प्रशिक्षण सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील युवकांकडुन 30 जून 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे प्रशिक्षणा अंतर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण केंद्राच्या 57 फुट लांबी असलेल्या, 63.35 टनेज क्षमंतेच्या सिलेंडर संख्या 6 व 205 अश्वशक्तीचे इंजीन असलेल्या "मत्स्यप्रबोधिनी" नोंदणी क्र. IND-MH-3-MM-4266 या प्रशिक्षण नौकेद्वारे सागरी सफरीवर नेवुन प्रात्यक्षिक व सिध्दांतिक ज्ञान दिले जाते. त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

प्रशिक्षण कालावधी- 01-07-2024 ते 31-12-2024 (6 महिने) आहे.

आवश्यक पात्रता खालील प्रमाणे आहे. 

उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे. आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे. तसेच विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी. उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे.  प्रशिक्षण शुल्क :- i) प्रतिमाह रु. 450/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 2700/- मात्र. ii) दारिद्रय रेषेखालील असल्यास प्रतिमाह रु.100/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 600/- मात्र.  (दारिद्रय रेषेखालील उत्पन्नाचा गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडावा.)  

प्रशिक्षनमुळे रोजगार  स्वयंरोजगाराच्या संधी असून i) राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थसहाय्य घेवून मच्छिमारी नौका बांधता येते. ii) सरकारी किवा खाजगी  विभागांच्या सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होवू शकते. 

संपर्कासाठी पत्ता- :- श्री. धीरज शहुराव भोयर, यांत्रिक निदेशक, रायगड अलिबाग, 102/103, समृध्दी को-ऑप. हौसिंग सोसायटी, घरत आळी, एस.टी.स्टँडजवळ, रायगड अलिबाग, मु. पो. ता. अलिबाग, जि. रायगड. पिन - 402201
ईमेल : ftoalibag@rediffmail.com  मोबाईल व Whas app क्र. - 9860254943.

तरी इच्छुक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा मोबाईल व Whas app क्र. 9860254943 सपंर्क साधल्यास विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध  करुन देण्यात येइल. अर्ज स्वत:चे हस्ताक्षरात भरुन त्यावर संस्थेची शिफारस घेऊन दिनांक 30-06-2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाचे दिवशी वर नमुद Whas app किवा ईमेल सादर करावेत, असे गणेश शंकर टेमकर, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रायगड - अलिबाग यांनी कळविले आहे.

अभिनेते विकास वायळ यांचा" संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई" पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !!

अभिनेते विकास वायळ यांचा" संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई" पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !! मुंबई, (शांताराम गु...