Friday, 25 July 2025

"कोकण रत्न" पदवीसाठी नामांकन पाठविण्याचे स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे आवाहन !!

"कोकण रत्न" पदवीसाठी नामांकन पाठविण्याचे स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे आवाहन !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

              स्वतंत्र कोकण राज्य अभियान अंतर्गत विविध श्रेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० भगिनी आणि २५ कोकणी बांधवाना शनिवार १३ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, दुसरा मजला, महापालिका मार्ग, आझाद मैदान शेजारी मुंबई येथे दुपारी ४ ते ६ या वेळेत "कोकण रत्न" पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये पदवी प्राप्त भगिनींना सेमी पैठणी साडी, गोल्ड प्लेटेड मेडल, आकर्षक फ्रेम मध्ये कोकण रत्न पदवी प्रमाणपत्र तर पुरुषांना कोकणरत्न पदवी प्रमाणपत्र, गोल्ड प्लेटेड मेडलप्रदान
 करण्यात येईल.
           कोकण रत्न पदवीसाठी संजय कोकरे संस्थापक / अध्यक्ष 9224443119, 2) धंनजय कुवेसकर मुंबई अध्यक्ष 9869076602, 3) सुखदेव पवार संघटक 8082769 091 यांच्या व्हाट्सअप नंबरवर आपले नामांकन पाठवावे असे आवाहन स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक / अध्यक्ष संजय कोकरे यांनी केले आहे. कोकण रत्न पदवीसाठी कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही याची नोंद घेण्यात यावी. तरी इच्छुकांनी दिलेल्या व्हाट्सअप नंबरवर आपली सविस्तर माहिती पाठवावी असे आवाहन स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे करण्यात करण्यात आले आहे.

बारवी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा !!

बारवी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा  !! 

**पाण्याच्या  पातळीत वाढ होत असताना कोणीही  नदी ओलांडू नये, किंवा अशा मार्गाने प्रवास करु नये -"एम.आय.डी.सी.प्रशासन"

मुरबाड  ( मंगल डोंगरे ) - संततधार पावसामुळे बारवी धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, औद्योगिक विकास महामंडळाने संभाव्य धोका लक्षात घेऊन, तसेच शुक्रवार दिनांक 25/07/2025 रोजीची दुपारी 3.00 वाजता ची धरणाच्या पाण्याची पातळीची पाहणी केली असता, ती 70.60 मि.मि.असुन उत्साहीत पातळी ( overflo level) 72.60 हि.मि. एवढी आहे व सद्य स्थितीत बारवी धरणातील पाणीसाठा 83.07, टक्के आहे. बारवी जल ग्रहण क्षेत्रात सततच्या पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य येवा वाढत आहे. त्यामुळे बारावी धरणाची पातळी वाढुन बारवी धरणाचे स्वयंचलित ( वक्र द्वारे ) गेट येणाऱ्या काही दिवसांत उघडण्याची शक्यता आहे. परिणामी बारावी धरणातून बारावी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होईल. 

तरी क्रुपया  बारावी नदीत काठच्या विशेषतः आस्नोली, चांदप, चांदप पाडा, पिंपळोली, सांगाव, पाटील पाडा, पादीर पाडा, कारंद मो-याचा पाडा, चोण, राहटोली या नदी काठावरील गावांनी तसेच इतर शहरे व शहरातील सरकारी यंत्रणा, तसेच गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, यांनी गावांतील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असलेबाबत सतर्कतेच्या सुचना देण्याची ताकीद दिली असुन, या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरीकांना व पर्यटकांना प्रवेश न देणे बाबत तसेच नदीच्या पात्रात पोहण्यास मज्जाव करण्यात यावा - सुचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई -गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे रविवारी दादर येथे कोकणकरांची महासभा !!

कोकणवासीयांनो, एकत्र या... आपल्या हक्कासाठी आवाज उठवा !!

** मुंबई -गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे रविवारी दादर येथे कोकणकरांची महासभा


मुंबई-गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी विशेष नियोजन करावे, कोकण रेल्वे व एसटी प्रवासासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अपघातग्रस्त ठिकाणी तात्काळ उपाययोजना व रस्त्यांची दुरुस्ती करावी यावर चर्चा आणि सरकार कडे मागणार मागण्या .....  

मुंबई (शांताराम गुडेकर) 
         
                 गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा सर्वांत भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी लाखो कोकणवासी मायभूमीकडे – कोकणात – गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि सण साजरा करण्यासाठी प्रवास करतात. मात्र, मुंबई-गोवा महामार्गाचे दीर्घकाळ चालू असलेले आणि अद्याप अपूर्ण असलेले काम हे Background मार्गातील सर्वात मोठे अडथळे ठरले आहे.

             यंदाही, महामार्गाच्या कामातील दिरंगाईमुळे हजारो प्रवाशांना अपार त्रास सहन करावा लागणार आहे. वेळेवर पोहोचता येत नाही, अपघातांचे प्रमाण वाढते आहे, तसेच सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीवरही गंभीर परिणाम होत आहेत. हे दुर्लक्ष कोकणवासीयांच्या आणि गणेशभक्तांच्या श्रद्धेवरच घाला घालणारे आहे.
              या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती’ मार्फत कोकणकरांची महासभा आयोजित केली आहे. यामध्ये मुंबई व ठाण्यातील कोकण वाशीयांच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील संस्था तसेच विकास मंडळे, एस.टी. प्रवासी संघटना, कोकणातील रेल्वे प्रवासी संघटनासह खाजगी वाहतुकदार तसेच ट्रान्सपोर्ट यांच्यासंघटना, तसेच राजकिय पक्षांचे मान्यवर, समाजसेवक, सर्व सामान्य कोकणकर उपस्थित राहणार आहेत. ही सभा सुरेन्द्र गावस्कर सभागृह मराठी ग्रथसंग्रहालय, नायगाव, दादर पुर्व मुंबई येथे रविवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित केली आहे.
             यावेळी कोकणकरांचा कौल घेत सरकार ला अल्टिमेटम व मान्यवरांचे मार्गदर्शन घेत पुढील मागण्या अडचणीकडे लक्ष वेधण्यात येईल.  मुंबई-गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे,गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी विशेष नियोजन करावे, कोकण रेल्वे व एसटी प्रवासासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अपघातग्रस्त ठिकाणी तात्काळ उपाययोजना व रस्त्यांची दुरुस्ती करावी यावर चर्चा आणि सरकार कडे मागण्या करण्यात येणार आहेत.
               सरकारकडे एकच मागणी करतो की, कोकणवासीयांचा संयम अजून किती वेळ पाहणार? तरी सर्व संघटनांना, कार्यकर्त्यांना, कोकणप्रेमींना आणि सामान्य प्रवाशांना विनंती करण्यात येते की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारवर दबाव आणण्यासाठी, आणि प्रशासनास जाब विचारण्यासाठी एकत्र येऊया. आपल्या हक्कासाठी... आपल्या रस्त्यांसाठी... आपल्या गणेशोत्सवासाठी... आवाज उठवायलाच हवा.तरी या सभेला कोकणवाशीय मुंबई कर यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असं आवाहन मुंबई -गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे करण्यात आले आहे.

विक्रोळी पार्कसाईट मध्ये संरक्षण भिंतींच्या कामात महाघोटाळा !!

विक्रोळी पार्कसाईट मध्ये संरक्षण भिंतींच्या कामात महाघोटाळा !!

*** संरक्षण भिंतींच्या निधीलाचं संरक्षणाची गरज

विक्रोळी, (केतन भोज) : म्हाडा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट येथील संरक्षक भितींच्या कामांमध्ये महाघोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विक्रोळी पार्कसाईट मध्ये बहुतांश मोठ्या प्रमाणावर डोंगराळ भाग आहे त्यामुळे याठिकाणी पावसाळ्यात दरडीचा भाग कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये लगतच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. या घटनांना आळा घालण्यासाठी म्हाडाने ठिकठिकाणी दरडीच्या ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक निधी मंजूर करून त्यासाठी निधी देखील पास केला होता. विक्रोळी पार्कसाईट मध्ये एकूण २७ संरक्षण भिंतींच्या कामासाठी आतापर्यंत निधी मंजूर होऊन त्या म्हाडा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत मंजूर ही झाल्या आहेत. तसेच अजून ही पुढे विक्रोळी पार्कसाईट करिता नऊ संरक्षण भिंतींच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. फक्त आता त्याच्या वर्क ऑर्डर निघायच्या बाकी आहे. मात्र प्रत्यक्षात याठिकाणी संरक्षण भिंतींच्या कामासाठी निधी मंजूर आणि वर्क ऑर्डर निघून देखील संरक्षण भिंतींचे बांधकाम चालू झालेले नाही. तसेच काही ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम याआधी पूर्ण होऊन ही त्या पुन्हा- पुन्हा नव्याने मंजूर केल्या गेल्या आहेत असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मग एवढा निधी कुठे गेला ? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक संबंधित प्रशासनाला विचारत आहेत. या पावसाळ्यात देखील विक्रोळी पार्कसाईट मधील डोंगराळ भागात संरक्षण भिंतींअभावी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अखेर येथील स्थानिक लोकांना जीव मुठीत घेऊन जगाव लागत आहे.मात्र तरी संबंधित प्रशासनाला याचेे काहीही देणेघेणे नसल्याचे याठिकाणी दिसत आहे. म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत डोंगर उतारांवरील भागांमध्ये संरक्षण भिंत उभारण्यात येतात. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे काम केले जातंय. मात्र सध्या स्थितीत विक्रोळी पार्कसाईट मध्ये संरक्षण भिंतीच्या कामात मोठ्या प्रमाणावर महाघोटाळा झाला असल्याचे चित्र दिसत आहे. याठिकाणी संरक्षण भिंती उभारण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये लाटल्याचा धकादायक प्रकार विक्रोळी पार्कसाईट मध्ये समोर आला आहे. विक्रोळी पार्कसाईट मधील अनेक भागांमध्ये संरक्षण भिंती उभारण्याच्या नावाखाली, तद्दन खोटे कागदी घोडे नाचवत यामध्ये कोणत्या लोकप्रतिनिधीच्या कंत्राटदाराला खुश करण्यासाठी फक्त संरक्षण भिंतींच्या नावाखाली टेंडर काढली जात आहेत का? तसेच यामध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत कोट्यवधी रुपये लाटल्याचं धडधडीत प्रकार याठिकाणी समोर आला आहे. यामध्ये म्हाडा दक्षता विभागाची भूमिका देखील संशयास्पद असल्याची दिसत असून, यामुळेच विक्रोळी पार्कसाईट मध्ये संरक्षण भिंतींच्या कामात महाघोटाळा झाल्याचे तरी दिसत आहे. म्हणूनच निव्वळ संरक्षण भिंतींचे खोटेनाटे बुजगावणे उभे करत स्थानिक रहिवाशांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या संबंधित प्रशासनाचा याठिकाणी पर्दाफाश करावा असे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच आता या संरक्षण भिंतींच्या निधीलाच संरक्षण देण्याची गरज याठिकाणी दिसत आहे.

रामनगर सज्जनगड सोसायटी येथील नाल्यालगत बांधण्यात आलेल्या भिंतीच्या बांधकामात भ्रष्टाचार ...

रामनगर सज्जनगड सोसायटी येथील नाल्यालगत बांधण्यात आलेल्या भिंतीच्या बांधकामात भ्रष्टाचार ...

*** आशिर्वाद कोणाचा ?

घाटकोपर,‌ (केतन भोज) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये नाल्यालगत वसलेल्या झोपडपट्टी वासियांच्या संरक्षणार्थ नाल्याच्या ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम अंतर्गत १६९ घाटकोपर (पश्चिम) विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १२३ मधील रामनगर- ब सज्जनगड सोसायटी येथील नाल्यालगत बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये कंत्राटदाराला खुश करण्यासाठी जास्त रक्कमेचे टेंडर काढण्यात आले होते. आणि त्यामधील निम्म्याहून कमी रक्कम खर्च करून हे काम करण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होत आहे. यासाठी याला आशिर्वाद नक्की कोणाचा आहे ? याची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच मनपा एन विभागाचे प्रभाग क्रमांक १२३ (देखभाल)चे जबाबदार अधिकारी यांची भूमिका देखील याठिकाणी संशयास्पद असून या सर्व प्रकरणाची आणि या कामाची सखोल चौकशी करण्यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी महापालिका एन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली असून मनपा एन विभागाचे (देखभाल) प्रभाग क्रमांक १२३चे संबंधित अधिकारी आणि सदर कामाच्या कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

Thursday, 24 July 2025

कारगिल विजय दिवस व सैनिक फेडरेशन वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन !!

कारगिल विजय दिवस व सैनिक फेडरेशन वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्यतर्फे कारगिल विजय दिवस व सैनिक फेडरेशन वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. २६ जुलै, २०२५ रोजी शहीद स्मारक, बीएमसी ऑफिस समोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे करण्यात आले आहे. 

सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी कारगिल युध्दाचे २६ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल (विजयोत्सव) सोहळा साजरा करण्याचे नियोजित केले आहे. या कार्यक्रमाचे स्वरूपरेषा पुढील प्रमाणे आहे. सकाळी ८.०० वाजता : देशभक्ती गीतांची धून,सकाळी ९.३० मि.: प्रमुख पाहुण्यांचे आगमन, सकाळी १०.०० वाजता : कारगिल युद्धातील शहिदांना मानवंदना, सकाळी ११.०० वाजता : विविध सांस्कृतिक कार्यक्रम व छत्रपती शिवाजी महाराज शिवकालीन कवायती चे प्रदर्शन, सकाळी ११.३० वाजता : प्रमुख मान्यवरांचे संबोधन, दुपारी १२.०० वाजता :कारगिल युद्धात सहभागी असलेल्या सैनिकांचा व वीरनारी, वीर पिता, वीरमाता यांचा सत्कार सोहळा पार पडणार असल्याची माहिती डी.एफ. निंबाळकर( जनरल सेक्रेटरी -सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य)यांनी दिली.

नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर शिवसेनेने घेतली हरकत !!

नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर शिवसेनेने घेतली हरकत !!

** नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचना नव्याने करण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी 

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अ कोकण विभागीय पुरवणी क्रमांक RNI NO. MAHBIL/२००९/३५५७४, दिनांक १४/०७/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर आदेशानुसार उरण पंचायत समिती येथे झालेल्या बैठकीमध्ये नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचना नव्याने करण्यात यावी, त्यामध्ये २०१७ च्या निवडणुकी पूर्वी नवघर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये सोनारी, करळ, सावरखार अशी तीन गावे आताच्या प्रभाग रचनेत वगळण्यात आलेली आहेत. ती पुन्हा एकदा नवघर जिल्हा परिषदेमध्ये घेण्यात यावी.त्याचबरोबर काळा धोंडा हे चाणजे ग्रामपंचयातीमध्ये समाविष्ठ असल्यामुळे तो भाग चाणजे जिल्हा परिषद प्रभागात घेण्यात यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे पत्रव्यवहारद्वारे केली आहे.भारतीय लोकसंख्येची जनगणना मागील बारा वर्षे झाली नसल्याकारणाने उरण मतदार संघातील जिल्हा परिषद प्रभाग रचनेमध्ये लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. तरी नवघर जिल्हा परिषदेत पारंपारिक असलेले प्रभागातील गावे न वगळता नव्याने २०१७ च्या निवडणुकीत अगोदर असलेले प्रभाग रचना तसेच ठेवण्यात यावी अशी मागणी तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून व हरकत घेऊन जिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी केली आहे.

रामनगर सज्जनगड - सिद्धार्थ सोसायटी येथील नाल्यावरील जीर्ण झालेला पूल धोकादायक स्थितीत ; स्थानिक नागरिकांचा जीवमुठीत घेऊन प्रवास !!

रामनगर सज्जनगड - सिद्धार्थ सोसायटी येथील नाल्यावरील जीर्ण झालेला पूल धोकादायक स्थितीत ; स्थानिक नागरिकांचा जीवमुठीत घेऊन प्रवास !!

घाटकोपर, (केतन भोज) : रामनगर ब प्रभाग क्रमांक १२३ मधील सज्जनगड सोसायटी - सिद्धार्थ सोसायटी येथील मुख्य मोठ्या नाल्यावरील स्थानिक रहिवाशांकरिता असलेला नाल्यावरील पूल धोकादायक स्थितीत झाला असून या नाल्याच्या मुख्य बांधकामाला आणि नाल्यावरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे.तर नाल्याचा काही भाग हा खचला आहे त्यामुळे तो आता पावसाळ्यात कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.परिणामी येथील स्थानिक सोसायट्यांना जोडणाऱ्या या नाल्यावरील मुख्य पूलावरून स्थानिक नागरिक आपला जीव मुठीत घेऊन रोज येजा करत आहेत. 

तसेच या धोकादायक ठरत असलेल्या नाल्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना तसेच लहान मुलांना देखील आपला जीव मुठीत घेऊन याठिकाणी राहावे लागत आहे.परिणामी याठिकाणी आता धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून हा पूल आता कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच येथील स्थानिक नागरिकांसाठी हा पूल येण्या - जाण्याचा हा एकमेव मार्ग असल्यामुळे जर हा धोकादायक पूल कोसळ्यास स्थानिकांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद होऊ शकतो.तरी या समस्येकडे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे,असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.या मुख्य नाल्यावरील पुलाच्या दुरुस्तीसाठी किंवा पुनर्बांधणीसाठी पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मनपा प्रशासनाच्या विरुद्ध नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.तरी सज्जनगड - सिध्दार्थ सोसायटी येथील मुख्य नाल्यावरील जीर्ण पुलाच्या या समस्येकडे संबंधित मनपा पालिका प्रशासनाने दुर्लक्ष करणे अत्यंत गंभीर आहे.मनपा प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करणे आवश्यक असून, जेणेकरून स्थानिक नागरिकांची गैरसोय दूर होईल आणि कोणतीही दुर्घटना होणार नाही याची हमी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे.

Wednesday, 23 July 2025

उद्घाटनाच्या दिवशीच ग्रामसेवक निलंबित !!

**उद्घाटनाच्या दिवशीच ग्रामसेवक  निलंबित,,**

मुरबाड , ( श्री.मंगल डोंगरे ) : तालुक्यातील न्हावे  या गावातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात यशस्वी ठरलेले सरपंच जगदिश हिंदुराव, यांचे कारकीर्दीत बांधण्यात आलेल्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मा.आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आले. या गावात अगोदरच दोन कार्यालय असताना हे नवीन ग्रामसचिवालय झाले आहे. यामुळे येथूनच ग्रामपंचायतीचा कारभार चालणार आहे. या गावाला प्रशस्त असे ग्राम सचिवालय मिळाल्याने त्या नुतन सचिवालयाचे आमदार किसन कथोरे यांचे शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र त्याच दिवशी न्हावे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक  दिपक कासार यांना  सीईओ  रोहन घुगे यांनी केलेल्या कारवाईत तडकाफडकी  निलंबित  केल्याने ग्रामपंचायतीच्या कामाचा गौडबंगाल समोर आल्याच्या  चर्चैला उधाण आले आहे .   

सीईओ श्री.रोहन घुगे यांनी पदभार स्वीकारल्यापासून  त्यांची कार्यपद्धती आणि धमक हि त्यांनी केलेल्या कामातून दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत त्यांनी कारवाईचा बडगा  उगारला असुन, कामात दिरंगाई, अनियमितता, अफरातफर अशा भोंगळ कारभार करणा-या ग्रामसेवकांच्या छातीत धडकी भरली आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे एकाच दिवशी मुरबाड तालुक्यातील प-हे  व न्हावे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर तात्काळ केलेली निलंबनाची कारवाई हे होय. त्यामुळे तालुक्यातील असे अनेक ग्रामसेवक कारवाईच्या भितीच्या सावटाखाली काम करत असून, सीईओ ची कारवाईची टांगती तलवार कधीही त्यांच्या मानगुटीवर पडुन शकते.अशी आपसात चर्चा सुरु आहे. मात्र ह्या कारवाई झालेल्या ग्रामसेवकांनी केलेल्या चुकीच्या कामांना केवळ ग्रामसेवकच जबाबदार आहेत.की गावातील ठेकेदार या अन्य कोणी लोकप्रतिनिधी याबाबत अंतर्गत चौकशी सुरू असल्याची माहिती लवकरच स्पष्ट होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दिपक खाटेघरे यांची निवड !!

मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दिपक खाटेघरे यांची  निवड !!

मुरबाड, ( मंगल डोंगरे ) :-  आज झालेल्या मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत मुरबाड पंचायत समितीचे माजी उपसभापती दिपक खाटेघरे यांची बिनविरोध सभापती म्हणुन निवड झाली आहे.
             बाजार समितीचे माजी सभापती बाळकृष चौधरी यांनी राजीनामा दिल्याने सभापती पद रिक्त होते.त्या रिक्त असलेल्या जागेची आज निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मुरबाड श्री.सुजय पोटे यांनी कामकाज पाहिले. प्रक्रिया सुरू झाली तेव्हा श्री. दिपक खाटघरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. दुसरा अर्ज दाखल नसल्याने दिपक खाटघरे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी  ठाणे जी. प. चे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी त्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी बाजार समितीचे संचालक तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्या साठी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा तालुकाध्यक्ष पदाबाबत इंजि.चेतनसिंह पवार यांच्या नावाला हिरवा कंदील !

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा तालुकाध्यक्ष पदाबाबत इंजि.चेतनसिंह पवार यांच्या नावाला हिरवा कंदील ! 

**प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा इंजि.चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास कायम** !


मुरबाड /श्री.मंगल डोंगरे : मंगळवार, दि.२२ जुलै २०२५ रोजी मुरबाड तालुका ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी इंजि. चेतनसिंह पवार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेनुसार प्रदेश उपाध्यक्ष अँड.गणेश पाटील यांनी पुनर्नियुक्ती केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षाच्या पुनर्बांधणी कार्यक्रमांतर्गत मुरबाड तालुका ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पदाबाबत मुंबई येथील प्रदेश कार्यालयात विविध इच्छुकांच्या मुलाखती झाल्या होत्या परंतु प्रदेशाध्यक्ष व मुलाखत कमिटीने इंजि.चेतनसिंह पवार यांनाच तालुकाध्यक्षपदी कायम केल्याबाबतचे पत्र ई-मेल द्वारे पाठवले.‌‌ 

सदरील नियुक्त बद्दल प्रदेशाध्यक्ष श्री.हर्षवर्धन सकपाळ, राष्ट्रीय सचिव यू बी व्यंकटेश, प्रदेश कार्याध्यक्ष खा.चंद्रकांत हंडोरे ह्या नेतृत्वाचे व विशेष करून प्रदेश उपाध्यक्ष अँड.गणेश पाटील, प्रदेश सचिव-निरीक्षक गुरुविंदरसिंग बच्चर तसेच जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांचे आभार चेतनसिंह पवार व्यक्त केले तर मुरबाड तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते आणि सहकारी पदाधिकारी यांच्या मेहनती मुळेच पुनर्नियुक्ती झाल्याचे प्रतिपादन यांनी केले. मुरबाड तालुक्यातील उच्चशिक्षित, सर्वसमावेशक, उत्तम संघटक व  सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये तसेच तालुक्यातील प्रशासकीय प्रश्न सोडवण्यामध्ये हातखंडा असलेले नेतृत्व म्हणून चेतनसिंह पवार यांचा परिचय तालुक्यात आहे त्यामुळे तालुक्यातील विविध भागातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्याध्यक्षपदी श्री संजय बनसोडे !!

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्याध्यक्षपदी श्री संजय बनसोडे !!

श्री संजय बनसोडे यांची सर्वानुमते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांच्या नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री संजय बनसोडे सर यांची एक चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. सतत सक्रीय राहून अंधश्रद्धा चळवळीस सक्रीय ठेवण्यात त्यांचा फार मोठा हातभार लागला आहे. जे करायचे ते स्वच्छ व पारदर्शक करायचे ही सरांची खासीयत आहे. त्यांच्या अविश्रांत कामाची ही पोहोच आहे. त्यांच्या या दैदिप्यमान निवडीबद्दल वाळवा तालुक्यातील सर्व परिवर्तनवादी संस्था, संघटना आणि चळवळींच्यावतीने नागरी सत्कार समारंभ आयोजित केला आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मा. कुमार केतकर (ज्येष्ठ संपादक) माजी खासदार हे उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्षस्थानी श्री विश्वास सायनाकर (माजी प्राचार्य) उपस्थित राहणार आहेत.
सोहोळ्याचे निमंत्रक प्रा. शामराव पाटील (अध्यक्ष, नागरी सत्कार समिती) आणि सर्व समविचारी परिवर्तनवादी संघटना आहेत. शनिवार दि. 2 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी  पाच वाजता, बी. के. पॅलेस, मल्टीपर्पज हॉल, ताकारी रोड, इस्लामपुर येथे हा समारंभ पार पडणार असुन सदर समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे असे संयोजक यांनी आवाहन केले आहे.

वृत्तांत - विलासराव कोळेकर सर (+91 94224 20611)

अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार महिलांना प्रेरणादायी ठरेल - रामहरी रुपनवर माजी आमदार.

अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार महिलांना प्रेरणादायी ठरेल - रामहरी रुपनवर माजी आमदार.
     
अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वास व कर्तृत्वास इतिहासामध्ये तोड नाही अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार महिलांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर साहेब यांनी केले. ते अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली च्या वतीने सावित्रीबाई फुले सभागृह पुणे येथे अहिल्यादेवी होळकर यांच्यात्रि  शताब्दी जयंती निमित्ताने कर्तृत्ववान  ९० महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की लोककल्याणकारी अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वास व कर्तृत्वास इतिहासामध्ये तोड नाही युद्ध टाळून शांतता कायम ठेवली राज्यसमृद्ध झाले पाहिजे अशी ही कर्तृत्ववान महिला यांनी महिला सक्षमीकरण धार्मिक विचार रोजगार निर्मिती सतत लोकहितेचा विचार करणारी एकमेव अद्वितीय स्त्री म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय महिलांना साक्षर करण्यासाठी अथक प्रयत्न जगातील सर्वात मोठी महिलांची फौज उभी करणारी स्त्री म्हणजे अहिल्यादेवी होळकर होय प्राणी पक्षी यांची काळजी. अखंड देशांमध्ये समाज उपयोगी कामे केली नेतृत्व गुण व ज्ञानलालसा मुत्सद्दीपणा व झुंज घेण्याचा खंबीरपणा अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे होता ....  अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने कराड येथे १४६ महिलांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन पुरस्कार ने सन्मानित केले व पुणे येथे ९० महिलांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातील सर्वात मोठा महिलांचा गौरव करणारी एकमेव अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट यांचे कार्यकर्तुकास्पद आहे असे रामहरी रुपनवर साहेब यांनी केले.  

याप्रसंगी डॉ नितीन वाघमोडे आयकर आयुक्त पुणे डॉ प्रा महेश थोरवे संचालक एमआयटी इन्स्टिट्यूशन पुणे बाळासाहेब कर्णवर पाटील चेअरमन श्री सद्गुरु साखर कारखाना श्री दीपक राहीज उद्योगपती श्री महेश इनामदार रिजन हेड्स सॅटर्डे क्लब ट्रस्ट पुणे यांची भाषणे झाली. प्रमुख अतिथी म्हणून प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व सुनील शेंडगे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ बाळासाहेब झोरे राजू दुर्गे माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड अशोकराव पवार ज्येष्ठ समाजसेवक मुंबई शेषराव शेंडगे चेअरमन स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्था कोल्हापूर मुकुंद कुचेकर ज्येष्ठ समाजसेवक पिंपरी चिंचवड. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष  श्री प्रवीण काकडे यांनी केले व आभार प्रा महावीर काळे यांनी केलेकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा शितल काकडे नथुराम डोईफोडे राजगड बाबुराव शेडगे मावळ सुनील शेंडगे पुणे दिनेश शिंदे भोर वसंतराव हिरवे बारामती अशोकराव शिंदे विश्रांतवाडी हरिभाऊ लबडे भोसरी इंद्रजित ताटे अजित ताटे वारजे यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला, यावेळी एमडी दडस संजय नायकवडी, संजय कवितके, सोमनाथ देवकाते, शंकर दाते, संतोष पांढरे, अरुणा गडस, भाऊसाहेब आखाडे, नानासाहेब मरगळे, तुकाराम कोकरे, नवल राजकाळे, सोमनाथ ओव्हाळ, संदीप शेंडगे, प्रशांत शेंडगे इत्यादी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौजन्य - विलासराव कोळेकर सर (+91 94224 20611)

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा !!

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीचा  वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
               मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित जी.के. एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडावलीची २२ जुलै २०१२ या दिवशी स्थापना झाली आहे. महाविद्यालयास  १३ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे..जी.के. एस. कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खडवली अंतर्गत श्रीमती कविता शिकतोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धापन दिन मोठया थाटामाटात संपन्न झाला. वर्धापनदिन कार्यक्रमास प्रमुख अतिथी कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.एल.जाधव सर उपप्राचार्य श्री.प्रशांत तांदळे सर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.विकास सावंत सर, उपप्राचार्य श्री.शफिक शेख सर यांचे मार्गदर्शन  लाभले.

             या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रिया बांगर मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापिका रसिका लोकरे मॅडम यांनी सादर केली. महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा प्राध्यापक प्रशांत तांदळे सर यांनी दिला.तसेच प्राध्यापक घरत सर, प्राध्यापक सावंत सर, प्राध्यापक शेख सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व मार्गदर्शनातून सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापिका नीता वाघ मॅडम यांनी केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांना संस्थेमार्फत भेटवस्तू देण्यात आली व वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास विद्यार्थी व कर्मचारी वर्ग अत्यंत उत्साहात सहभागी होता. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Tuesday, 22 July 2025

विविध उपक्रम राबवून अजित दादा पवार यांचा वाढदिवस वाडा तालुक्यात साजरा !!

विविध उपक्रम राबवून अजित दादा पवार यांचा वाढदिवस वाडा तालुक्यात साजरा !!

वाडा, प्रतिनिधी :
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाडा तालुका राष्ट्रवादीच्यावतीने मंगळवार (दि.22 जुलै) रोजी विविध उपक्रम राबविण्यात आले. 

सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालय वाडा येथे रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. तर भाजीपाला विक्रेत्या महिलांना जंबो छत्र्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर श्री क्षेत्र तीळसेश्वर येथे व गारगाव शासकीय आश्रम शाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद मांगरूळ (वंगणपाडा) येथे विद्यार्थ्यांना वह्या, शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

या सर्व उपक्रमांसाठी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा रोहिणीताई शेलार, वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार, आमदार दौलत दरोडा यांचे स्वीय सहाय्यक रोहीदास शेलार, महिला जिल्हा उपाध्यक्षा चित्राताई पाटील, तालुका सरचिटणीस महेश भोईर, तालुका उपाध्यक्ष भगवान भोईर, संगीत मेने, जिल्हा युवक उपाध्यक्ष नंदकुमार वेखंडे, तालुका सचिव मिलिंद सुतार, युवक तालुका अध्यक्ष नितीन देसले, विभागीय उपाध्यक्ष अशोक नाईक, आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष सुधीर विशे, पीक उपसरपंच दीपक पाटील, मांगरूळ उपसरपंच चंद्रकांत दुधवडे उपसरपंच कल्पेश लुटे, 
यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
 --------------------------------
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभर जनविश्वास सप्ताह साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने राष्ट्रवादीच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.
- जयेश शेलार 
(वाडा तालुका अध्यक्ष : राष्ट्रवादी)

उरणमध्ये 'रत्नागिरी ८' भात वाणाची ४ सूत्री पद्धतीने लागवड !!

उरणमध्ये 'रत्नागिरी ८' भात वाणाची ४ सूत्री पद्धतीने लागवड !!

** शेतकऱ्यांना आधुनिक तंत्राचे मार्गदर्शन

उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील आवरे गावातील शेतकरी काळुराम पोशीराम गावंड यांच्या शेतात रत्नागिरी ८ या भात वाणाची ४ सूत्री पद्धतीने यशस्वीरित्या लागवड करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी श्रीमती अर्चना सूळ नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रायोगिक उपक्रम राबवण्यात आला.

या प्रात्यक्षिकादरम्यान, उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना ४ सूत्री भात लागवड पद्धतीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच या आधुनिक लागवड पद्धतीमुळे होणारे विविध फायदे समजावून सांगण्यात आले.

कोट (चौकट ):- 

चार सूत्री भात लागवड पद्धतीचे फायदे:- 
 * उत्पादन वाढ: या पद्धतीमुळे भाताचे उत्पादन वाढण्यास मदत होते.
 * पाण्याचा कार्यक्षम वापर:- पाण्याची बचत होते आणि पाण्याचा अधिक प्रभावीपणे वापर होतो.
 * खतांचा योग्य वापर:- खतांचा योग्य वापर होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते.
 * रोग आणि कीड नियंत्रण:- पिकांवरील रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
 * श्रम आणि वेळेची बचत:- पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी वेळात आणि कमी श्रमात लागवड करता येते.

कामोठे येथे रयतच्या मुख्याध्यापकांची सविचार सभा संपन्न !!

कामोठे येथे रयतच्या मुख्याध्यापकांची सविचार सभा संपन्न !!

उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) : नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी व शाखाप्रमुख भूमिका या विषयावर रायगड विभागीय कार्यशाळा रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभाग प्राचार्य व मुख्याध्यापक कार्यशाळा सोमवार दिनांक २१/७/२०२५ रोजी रायगड विभागीय चेअरमन माजी आमदार बाळाराम पाटील यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाली. सदर प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिग कौन्सिल सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहून प्राचार्य व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेसाठी सातारा येथून माहिती अधिकारी व नवीन शैक्षणिक धोरण तज्ञ शिवाजी राऊत यांनी नवीन शैक्षणिक धोरण व माहिती अधिकार या वर दोन सत्रात प्रभावी मार्गदर्शन करून‌ प्रशासकांना भेडसावणाऱ्या अडचणींचे निराकरण केले. रयत शिक्षण संस्थेचे कायदा अधिकारी विनोद गोडगे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी विभागीय चेअरमन यांनी गुणवत्ता वाढ आणि शिक्षण धोरण यावर मार्गदर्शन करून सर्व सेवकांचे पाठीशी रयत शिक्षण संस्था व आम्ही पदाधिकारी असून सर्व शाळा इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड युक्त लवकरच होतील असा विश्वास प्रकट केला. 

मान्यवरांचे हस्ते नवोदित प्राचार्य व मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेची ध्येयधोरणे व गुणवत्ता या बाबत विचार प्रकट केले. संस्था मॅनेजिग कौन्सिल सदस्यां ठाकूर मॅडम, लाईफमेंबर कोळी, लाईफ वर्कर महेश पाटील, वाशी कॉलेज प्राचार्या नायक मॅडम, वीर वाजेकर कॉलेज प्रभारी प्राचार्य आमोद ठक्कर व विभागातील आश्रम शाळांचे माध्यमिक शाळांचे मुख्याद्यापक उपस्थित होते. मुख्याद्यापक डी सी पाटील यांनी उत्तम सुत्रसंचालन तर सहाय्यक विभागीय अधिकारी जगताप सर यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमातून जेई, नीट, स्पर्धा परीक्षाची मांडणी केली गेली. रायगड विभागीय कार्यालयीन सेवकांचे या प्रसंगी मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचीही उपस्थिती मोलाची होती. एकंदरीत अत्यंत उत्साहात व उत्तम प्रतिसादात कार्यशाळा संपन्न झाली.

मोफत गणवेश वाटप व फुंडे विद्यालयात विविध समित्या पुनर्गठीत !!

मोफत गणवेश वाटप व फुंडे विद्यालयात विविध समित्या पुनर्गठीत !!

उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) :
रयत शिक्षण संस्थेच्या तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे शाखेत इयत्ता ५ वी ते १० वी मधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सारिका पाटील -बोकडविरा, चंद्रविलास घरत भेंडखळ, निलेश ठाकूर शिवाजी नगर यांच्या मार्फत गणवेश देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य साळुंखे बी.बी. यांनी केले. विविध स्पर्धा परीक्षा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न केले जात आहेत असे प्रतिपादन केले.

प्रसंगी उपस्थित प्राचार्य साळुंखे बी.बी. उपमुख्याध्यापिका थोरात एस.डी, पर्यवेक्षिका बाबर एस. एम, पाटील एस.एस, सारिका पाटील, चंद्रविलास घरत, निलेश ठाकूर, सतीश घरत, प्रांजल भोईर, विकास शर्मा, निलेश झावरे, नितिन साखरे, व सेवक वृंद यांचा सन्मान करण्यात आला. त्या नंतर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते गणवेशाचे वाटप करण्यात आले.

या वेळी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील विविध शालेय समिती पुनर्गठीत करण्यात आल्या. विविध समित्यांची माहिती विभाग प्रमुखांनी दिली. शाळा व्यवस्थापन - गावंड व्ही. व्ही., माता पालक संघ- खारपाटील एम.एम., पालक शिक्षक संघ- पाटील पी.ए. व शालेय पोषण आहार नाईक एस.डी,नवभारत साक्षरता - पाटील एच. एन., SQAAF व गुरुकुल म्हात्रे ए. आर. तंबाखू नियंत्रण समिती यांची निवड झाली. यावेळी नितीन साखरे, निलेश झावरे वैद्यकीय अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व समिती सभेसाठी पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला होता.

पोपटराव वाकसे यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरच्या इचलकरंजी शाखेच्या संचालक पदी निवड !!

पोपटराव वाकसे यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरच्या इचलकरंजी शाखेच्या संचालक पदी निवड !!

हातकणंगले : प्रतिनिधी      
श्री रामराव इंगवले हायस्कूलचे पर्यवेक्षक, इंग्रजी विषयाचे  शिक्षक, पोपटराव वाकसे यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरच्या इचलकरंजी शाखेच्या संचालक पदी निवड झाली .

त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन ही निवड स्वाभिमानी आघाडीचे सर्वेसर्वा दादासाहेब लाड, इचलकरंजी शाखेचे चेअरमन श्री जितेंद्र म्हैशाळे व कोजिमाशिचे संचालक  श्रीकांत कदम, संचालक डॉ. दत्तात्रय घुगरे यांचे सहकार्य लाभले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयोजित पाककला स्पर्धेला महिलांचा उत्तम प्रतिसाद !!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयोजित पाककला स्पर्धेला महिलांचा उत्तम प्रतिसाद !!

** पाककला स्पर्धेचे सर्वच स्तरातून कौतुक ; पाककला स्पर्धेतून महिलांच्या कलागुणांना, कौशल्यांना मिळाला वाव 

उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच महिला व बालविकास मंत्री कु. अदितीताई तटकरे व मा. आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली, जिल्हा महिला अध्यक्षा उमाताई संदिप मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली खासदार श्री. सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त "पाककला स्पर्धा २०२५" उरण तालुक्यातील चिरनेर गावातील पी.पी. खारपाटील हायस्कूल व कॉलेज येथील हॉलमध्ये  आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महिला अध्यक्षा उमाताई संदिप मुंढे, जिल्हा महिला उपाध्यक्षा प्रतिमाताई जाधव, उरण तालुका अध्यक्षा कुंदा ठाकुर, उरण तालुका उपाध्यक्षा सुमिता तुपेकर, प्राध्यापिका सुलोचना सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्त्या भारती समाधान कटेकर, उज्ज्वला सुनिल ठाकुर , सुगंधाताई सुभाष कडू, कामिनीताई मच्छींद्र  ठाकुर, चिर्ले ग्रामसंघ बचतगट अध्यक्षा विश्रांतीताई रमाकांत घरत, साक्षी ताई धुमाळ, जान्हवी मॅडम, सि.डी.पी.ओ. पल्लवीताई भोईर, उरण तालुका अध्यक्ष  परिक्षीत दादा ठाकुर, उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकुर उपस्थित होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचीही मोठी उपस्थिती होती.

सदर स्पर्धेत सुत्रसंचालक श्याम ठाकुर यांनी सुंदर असे सूत्रसंचालन केले तर परिक्षक म्हणून जिल्हा महिला उपाध्यक्षा प्रितमताई जाधव यांनी भुमिका पार पाडली. पाककला स्पर्धेत शेवग्याचे पकोडे, कडीपत्ता चटणी, मिक्स थालीपीठ, केशर फालुदा, चिंबो-या लालिपॉप, रव्वा आप्पे, तांदूळाचे लाडू, भाकरी, चिकन, ओले वाटण, तांदळाची खीर आदी पदार्थ बनविण्यात आले होते. पाकलला स्पर्धेमध्ये महिला भगिनींनी सर्वच पदार्थ इतके चविष्ट बनवले होते कि परिक्षकांना कुणाला बक्षीस द्यावे असा प्रश्न पडला होता. पाककला स्पर्धा कार्यक्रम पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सहकारी मित्र मैत्रिणींचे मोलाचे सहकार्य लाभले. पी.पी.खारपाटील हायस्कूल व कॉलेज यांनी  हॉल  तसेच माईक सिस्टीम, टेबल आणि खुर्च्यांची व्यवस्था केली. एकंदरीत पाककला स्पर्धा २०२५ मोठया उत्साहात उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयोजित पाककला स्पर्धेला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केल्याने सदर पाककला स्पर्धेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सदर पाककला स्पर्धेतून महिलांच्या कलागुणांना, कौशल्यांना मोठया प्रमाणात  वाव मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महिलांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्याच्या या उपकमातुन नवनवीन महिला उद्योजक तयार होण्यासाठी हातभार लागणार आहे. त्यामुळे या उपक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले होते.


कोट (चौकट ):- 

एकुण सहभागी स्पर्धक ४३,

प्रथम क्रमांक : सौ. स्नेहा नितीन ठाकुर  ( चिरनेर )
द्वितीय क्रमांक : सौ.राणी सागर ठाकुर ( धुतूम),
तृतीय क्रमांक : सौ.प्रणाली प्रविण घरत  ( धुतुम ),
उत्तेजनार्थ - 
सौ. अर्पिता जगदिश जोशी ( चिरनेर ),
सौ. ज्योती सुरेश म्हात्रे ( चिरनेर  ),
सौ. आश्विनी ज्ञानेश्वर ठाकुर ( धुतुम )

लोकशाहीच्या तीन स्तंभांना वळण देण्याचे काम पत्रकार करतो - अमित सानप

लोकशाहीच्या तीन स्तंभांना वळण देण्याचे काम पत्रकार करतो - अमित सानप

** किशोर दादाच्या कार्यामध्ये प्रामाणिकता व सच्चाई असल्यामुळे आज पावसाला देखील हजेरी लावावी लागली- सचिन पाटील

** स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भिवंडी शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांना रेनकोटचे वाटप  व मोफत आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर) :
              भिवंडी तालुक्यातील स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने  भिवंडी पत्रकार महासंघ व महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघ मुंबई यांच्या सहकार्याने भिवंडी शहर व ग्रामीण भागातील 100 पत्रकारांना रेनकोटचे वाटप कार्यक्रम सोमवार (दि. २१जुलै) ग्रामपंचायत कार्यालय वळ येथे पार पडला. यानिमित्ताने सर्व पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन देखील आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन कल्याणचे अध्यक्ष श्री.जितेंद्र पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते.

             या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोटिवेशन स्पीकर तथा जिल्हा माहिती अधिकारी ठाणे श्री.अमित सानप, वळ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.सचिन सत्यवान पाटील, ग्रामपंचायत अधिकारी श्री.राकेश जोशी,आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन कल्याण चे अध्यक्ष श्री.जितेंद्र पाटील, स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील, ज्येष्ठ पत्रकार श्रीमती संध्याताई पवार, राजेंद्र काबाडी, आचार्य सुरज पाल यादव, अबु बकार,अरुण मिश्रा, कुसूम देशमुख व मोठ्या संख्येने भिवंडी शहर व ग्रामीण भागातील पत्रकार उपस्थित होते. पत्रकार ,जनता आणि शासन यांच्या मधला दुवा म्हणून जो काम करणारा अधिकारी असतो तो म्हणजे जिल्हा माहिती अधिकारी होय. तहसीलदार ,प्रांत, एसीपी, डीसीपी, एसपी, ही पदे सर्वांना माहीत आहेत. परंतु जिल्हा माहिती अधिकारी हे पद बऱ्याच जणांना माहित नाही. हे राजपत्रित वर्ग एकचे पद आहे ते एमपीएससी कडून भरले जाते.
             पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ. हे समजून घेणे मुख्य तीन स्तंभ आहेत कार्यपालिका, विधिमंडळ व न्यायपालिका त्यामुळे समाजाच्या जडणघडणीमध्ये, समाज सुधारणेमध्ये, समाजाच्या विकासामध्ये पत्रकार म्हणून विचार स्वातंत्र्याच्या आधारावर जे आपलं मत व्यक्त केलं जातं त्या मताला सुद्धा प्रचंड महत्त्व आहे ते या तीन स्तंभाइतकच आहे. कार्यपालिका, विधिमंडळ व न्यायपालिका या सगळ्यांना एकत्रपणे काम करण्याची उर्मी देणे, त्यांच्यावर इनडायरेक्ट कंट्रोल ठेवणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या चुका दाखवणे हे तुम्हाला संविधानामधल्या कलम १९ अ एक प्रमाणे विचार मांडण्याचे शस्त्र मिळालेले आहे व ते समाजाच्या विकासासाठीच केलं पाहिजे. म्हणूनच लोकशाहीच्या तीन स्तंभांना वळन देण्याचे काम पत्रकार करतो. असे म्हणायला वावग ठरू नये असे यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करताना सांगितले तसेच त्यांनी स्वतःशी प्रामाणिकपणे राहून काम केलं तर आपला आरसा स्पष्ट दिसेल विषयी सांगितले. आजचा कार्यक्रम म्हणजे पत्रकारांचा कार्यक्रम आहे, पत्रकार व कवी यांच्याकडे शब्दांचा महासागर असतो व या महासागरातून ही लोकं कसे कसे शब्द काढतात आणि यांच्यासमोर मी बोलावं म्हणजे सचिन तेंडुलकर समोर जस्टीस बुमराणे बोलावं की कशी बॅटिंग करावी.आमच्यापेक्षा तुम्ही उत्कृष्ट बॅटिंग करता कारण लेखणी ही तुमच्या हातामध्ये असते व लेखणीची काय करामत असते हे सर्वांनी पाहिले आहे. याचे जिते जागते उदाहरण म्हणजे संजय राऊत होय.
             ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांचा माझ्यापेक्षा जास्त तुमचा परिचय असेल तरी देखील त्यांची छोटीशी ओळख मी आपल्यासमोर मांडतो. किशोर दादा ज्या पाटील परिवारातून येतात त्या परिवाराला या परिसरामध्ये मोठी परंपरा आहे या परिवाराने गावाला डॉक्टर, इंजिनियर, वकील अशी शैक्षणिक क्षेत्रातील कुठलीही गोष्ट बाकी ठेवलेली नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपले नाव लौकिक केले आहे. त्याचे उदाहरण म्हणजे पत्रकार क्षेत्रातील किशोर दादा असे म्हणायला वावगे ठरू नये.
              दादांनी दोन दिवसापूर्वी मला सांगितले ही पत्रकारांसाठी मला रेनकोट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे मी विचार केला पावसाचा कोणताच लवलीश नसताना आता रेनकोट वाटणे बरोबर वाटत नाही. परंतु दादांच्या कार्यामध्ये प्रामाणिकता व सच्चाई आहे म्हणूनच पावसाला देखील आज यावं लागलं म्हणजेच दादांची भावना योग्य होती व ती आज यशस्वी झाली. असे वळ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.सचिन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. गेल्या १७ वर्षापासून पत्रकारांसाठी विविध उपक्रम स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट व दैनिक स्वराज्य तोरणच्या माध्यमातून राबवित असतो.या कार्यक्रमा मागचा एकच उद्देश असतो की यानिमित्ताने पत्रकारांचा स्नेह मेळावा साजरा होतो. सर्व जाती-धर्माचे पत्रकार एकत्र उपस्थित राहून आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात. त्यामुळे हा कार्यक्रम यापुढेही अखंडितपणे सुरू राहील अशी मी आपणाला ग्वाही देतो असे यावेळी दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.श्री.किशाेर बळीराम पाटील यांनी प्रास्ताविक करताना सांगितले. तसेच ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काबाडी व आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन चे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन, कल्याण यांच्या वतीने करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने या शिबिरात बीपी, शुगर, डोळे, चष्मा, तसेच इतर आजारांची तपासणी करण्यात आली.
           कार्यक्रमाचे एक विशेष आकर्षण म्हणजे पत्रकारिता करत असताना कायद्याचे शिक्षण (एलएलबी) पूर्ण करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यामध्ये अँड- संतोष जानू चव्हाण, अँड- सोमनाथ बाळाराम ठाकरे, अँड- शरद वसंतराव भसाळे, अँड- रवि रामदुलार वर्मा, अँड. श्री.नितीन चंद्रमणी पंडीत व अँड-मोनिश सुमती मोहन गायकवाड यांचा समावेश होता.
           या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मनोहर तरे व अफसर खान यांनी केले. तर आभार प्रदर्शन आचार्य सुरजपाल यादव यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किशोर पाटील यांचे विशेष योगदान राहिले. कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी किशोर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले व भविष्यातही असे उपक्रम राबवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. हा उपक्रम पत्रकारांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एक आदर्श पायंडा घालणारा ठरला असून, समाजहिताच्या कार्यात पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा एक सकारात्मक प्रयत्न ठरला.

Monday, 21 July 2025

बळीराज सेनेच्या वतीने दक्षिण रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद, ११ पंचायत समिती व सात नगरपंचायतीच्या जागा लढविणार..!

बळीराज सेनेच्या वतीने दक्षिण रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद, ११ पंचायत समिती व सात नगरपंचायतीच्या जागा लढविणार..!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

             बळीराज सेनेच्या वतीने दक्षिण रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद, ११ पंचायत समिती व सात नगरपंचायतीच्या जागा लढ़विणार असे मुंबई मध्ये झालेल्या एका महत्वपूर्ण सभेत जाहीर करण्यात आले. बळीराज सेना पक्षाध्यक्ष अशोकदादा वालम यांच्या उपस्थितीत मुंबईतील मूलुंड पूर्व येथिल प्रधान कार्यालयात संगमेश्वर तालुक़ा पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली.

            या बैठकीमधे पक्षाध्यक्ष अशोकदादा वालम यांच्या निर्देश्यानुसार दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित ४ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती जागा लढ़वीण्याबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते - माज़ी जिल्हापरिषद विरोधीपक्ष नेते तथा उपाध्यक्ष सन्मा:- सुरेश भायज़े यांच्या नेतृत्वाख़ाली लवकरच जिल्हा पाहणी दौरा आयोजित करुन अहवाल सादर करण्याचे सूचविण्यात आले. सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य संपर्क नेते डॉ:- प्रा:- प्रकाश भांगरथ, सरचिटणीस - संभाजी काजरेकर, जिल्हा अध्यक्ष- तानाजी कुलये, उपाध्यक्ष - दत्ताराम लांबे, चिपळूण- संगमेश्वर विधानसभा संपर्क प्रमुख -: प्रभाकर धनावडे, संगमेश्वर तालुक़ा संपर्क प्रमुख श्री:- संजय गोंधळी, सहसंपर्क प्रमुख संतोष टक्के, संघ कार्यकारिणी सदस्य  सुरेश कानाल, युवा पदाधिकारी तन्मय टक्के, नविमुंबई तालुक़ा अध्यक्ष तथा ऐरोली विधानसभा अध्यक्ष राजेंद्र जोशी , खापरे, सनगरे, आणि सहकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वाडा तालुक्यातील विविध पदांच्या नियुक्त्या !!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वाडा तालुक्यातील विविध पदांच्या नियुक्त्या !!

मंगळवार दि. 21 जुलै रोजी पालघर येथे झालेल्या कार्यक्रमात वाडा तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी अनुसूचित जमाती कल्याण समिती अध्यक्ष आमदार दौलत दरोडा साहेब, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर, महिला जिल्हाध्यक्षा रोहिणीताई शेलार, युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार, आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष भालचंद्र खोडके, शहापूर विधानसभा अध्यक्ष नाना साबळे यांसह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1. श्री. पद्माकर म्हात्रे, हमरापूर (वाडा तालुका उपाध्यक्ष)
2. श्री. मिलिंद सुतार (वाडा तालुका सचिव)
3. अशोक नाईक, कासघर (विभागीय उपाध्यक्ष, डाहे गण)
4. श्री. पवन पाटील, नाणे (कंचाड विभाग प्रमुख)
-------------- ------ ------ 
5. नंदकुमार वेखंडे (पालघर जिल्हा युवक उपाध्यक्ष)
6. नितीन देसले (वाडा तालुका युवक अध्यक्ष)
--------------------------
7. सुधीर विशे (अध्यक्ष : कृषी आघाडी वाडा तालुका)
---------------------------
8. गणेश सांबरे, गुहीर (वाडा तालुका उपाध्यक्ष, आदिवासी आघाडी)
9. भास्कर गावित, खैरे (वाडा तालुका उपाध्यक्ष, आदिवासी आघाडी)
10. जयेश भुरकुंड, कुयलु (विभागीय उपाध्यक्ष, आदिवासी आघाडी)
11. मोनिश काशीद, अंबिस्ते (वाडा तालुका उपाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग)

वृत्तांत - जयेश शेलार 
जेष्ठ पत्रकार/ संपादक / वाडा तालुका अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस)

६,६६,६६६ श्री हनुमान चालीसा पठण यज्ञ, श्री हनुमत यज्ञ व श्री महादेव रुद्राभिषेक यांचा भव्य आयोजन यशस्वीरित्या संपन्न...

६,६६,६६६ श्री हनुमान चालीसा पठण यज्ञ, श्री हनुमत यज्ञ व श्री महादेव रुद्राभिषेक यांचा भव्य आयोजन यशस्वीरित्या संपन्न...

कल्याण (महेंद्र उर्फ अण्णा पंडीत) - विठ्ठलवाडी येथे डॉ. विजय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली श्री हनुमान मंदिर परिवार समूह तर्फे ६,६६,६६६ श्री हनुमान चालीसा पठण यज्ञ, श्री हनुमत यज्ञ व श्री महादेव रुद्राभिषेक यज्ञ अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे संयोजन डॉ. विजय पंडित, किरण शुक्ला व बलराम मिश्रा यांनी केले. महंत श्याम बाबा गुरु हनुमान दास जी यांच्या सान्निध्यात देवपूजन, श्री विष्णु यज्ञ, श्री हनुमत यज्ञ व महारुद्राभिषेक संपन्न झाले. या यज्ञात सुमारे १०० कुटुंबांनी सहभाग घेतला. या दिवशी १५१ श्री हनुमान चालीसा पठण व श्रीसुंदरकांडाचे सामूहिक पठण करण्यात आले. आचार्य शिवमोहन पांडेय व ११ विद्वान ब्राह्मणांच्या उपस्थितीत मुख्य यजमान नरेंद्र पंडित (सपत्नीक) यांनी २१ लिटर गायीच्या दुधाने श्री रुद्राभिषेक केला. या अभिषेक यज्ञात शेकडो भक्तांनी सहभाग घेतला.

उत्तर भारतीय समाजातील अनेक मान्यवर — रामचंद्र पांडेय, मुरलीधर तिवारी, विश्वनाथ (नन्हे) दुबे, रामचंद्र पांडेय (माजी शिक्षणाधिकारी), प्रा. दिनेश सिंह, शोभनाथ मिश्रा, आय. पी. मिश्रा, दिनेश दुबे, अजय मिश्रा, अरविंद त्रिपाठी, अभय मिश्रा, महादेव पंजाबी, डॉ. पद्मिनी कृष्णा, गोपाल दुबे, अरुण दुबे, विजय त्रिपाठी, सुनील कुकरेजा, श्रीचंद केसवानी, अमर पांडेय, हृदय पंडित, कुमार पंडित यांचा शाल व "यथार्थ गीता" पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

श्री हनुमान चालीसा दररोज पठण करणारे तपस्वी बंधू — मुरलीधर तिवारी, डॉ. दीप नारायण शुक्ला, राधेश्याम अवस्थी, रामकुमार पराशर, विजय पंडित, किरण शुक्ला, रोहन शुक्ला, बलराम मिश्रा, सचिन मिश्रा, सच्चिदानंद पांडेय, अरविंद त्रिपाठी, रवि शुक्ला आणि तपस्विनी बहिनी — माधवी शुक्ला, माधवी पवार, उर्मिला सिंह, गायत्री मिश्रा, श्रुती शुक्ला, डॉ. पद्मिनी कृष्णा, प्रमिला शुक्ला यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

सृजन संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र पांडेय यांनी डॉ. विजय पंडित, किरण शुक्ला व बलराम मिश्रा यांचे विशेष कौतुक केले. विश्वनाथ (नन्हे) दुबे यांनी भारतीय संस्कारांचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

बलराम मिश्रा यांनी सांगितले की, आतापर्यंत २३ लाख ३० हजार हनुमान चालीसा पठण पूर्ण झाले असून, पुढील टप्प्यात ७,७७,७७७ पठणांचे संकल्प लवकरच पूर्ण केले जातील.
किरण शुक्ला यांनी आपली सेवा मंदिरातील पुजारी म्हणून करत असल्याचे सांगितले, तसेच भक्तांनी केलेल्या पठणाचे अर्पण श्री हनुमानजींच्या चरणी करण्यात येते असे स्पष्ट केले.
डॉ. विजय पंडित यांनी सर्व तपस्वी बंधू-भगिनी, आचार्य शिवमोहन पांडेय व सर्व मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी महंत श्याम बाबा गुरु हनुमान दास जी यांनी सर्वांना महाप्रसाद घेऊन जाण्याचे आवाहन केले.
------

श्री कांडकरी विकास मंडळ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा !!

श्री कांडकरी विकास मंडळ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

             श्री कांडकरी विकास मंडळ, कासार कोळवण ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी आयोजित इयत्ता दहावी, बारावी आणि पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक २० जुलै २०२५ रोजी पर्ल सेंटर, दादर (पश्चिम) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. श्री कांडकरी विकास मंडळाचे अध्यक्ष मान.श्री संतोष करंबेळे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. श्री. अक्षय दत्ताराम तोरस्कर यांनी बनविलेला श्री विकास मंडळाचा नवीन बॅनर विशेष लक्ष वेधून घेत होता.
             या विद्यार्थी गुणगौरव सोहळयाचे सुत्रसंचालन श्री.‌ अक्षय दत्ताराम तोरस्कर आणि श्री. प्रकाश अनंत करंबेळे या मंडळाच्या तरुण तडफदार पदाधिकाऱ्यांनी उत्तमरित्या सांभाळले तर या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दिलीप तोरस्कर सर यांनी केले. आधुनिक काळातील शिक्षण आणि आजच्या विद्यार्थ्यांचे करिअर यावर सरांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.श्री कांडकरी विकास मंडळाचे विद्यमान सचिव आणि वक्ते श्री. राजाराम रावणंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनेक सुंदर गोष्टींचा खजिना विद्यार्थ्यांसमोर सादर केला. त्यांनी संगतीचा शिक्षणावर कसा परिणाम होतो हे अनेक उदाहरणांसह समजावले. मंडळाचे प्रमुख हिशोब तपासणीस आणि उत्कृष्ट निवेदक श्री निलेश धावडे यांनी कवितेतून मांडलेले विचार उपस्थित विद्यार्थ्यांच्या आणि उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेले. तसेच मंडळाचे खजिनदार आणि प्रसिध्दीप्रमुख श्री. दिलीप गणपत तोरस्कर यांनी आपले मौलिक विचार मांडत असताना अंकांच्या आधारे एकीचे बळ उत्तमपणे समजावून सांगितले.

           अध्यक्षीय भाषणात मान.श्री संतोष करंबेळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना आपले मंडळ नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहील आणि येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना करिअर संबंधित मार्गदर्शन करण्यासाठी मंडळ कटिबद्ध आहे याची ग्वाही दिली.या गुणगौरव कार्यक्रमात कु. भुमी सुनील करंबेळे, कु. प्राची प्रविण धावडे, कु. अक्षरा दिपक करंबेळे, कु. सेजल सतीश करंबेळे, कु. तन्वी अनंत करंबेळे, कु. यश अशोक तोरस्कर, कु.अनिकेत अनिल धावडे, कु.संकेत संतोष धावडे (सर्व दहावी उत्तीर्ण) आणि कु. नौरंग सचिन करंबेळे, कु. प्रणव संजय करंबेळे, कु. शुभम सुनील दळवी, कु. गौरांग रामचंद्र घाटबाणे, कु. आर्यनी नरेश तोरस्कर, कु. प्रणव अनिल धावडे, कु. जान्हवी प्रकाश सनगले, कु. जय संतोष करंबेळे (सर्व बारावी उत्तीर्ण) तसेच कु. ओमकार संतोष करंबेळे, कु. सौरभ संजय करंबेळे, कु. हर्षदा किशोर करंबेळे (सर्व पदवीधर) या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

            विद्यार्थ्यांचे गोड कौतुक करण्यासाठी या शैक्षणिक कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक, मंडळाचे पदाधिकारी, गावातील बहुसंख्य प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्याने मंडळाचे कार्याध्यक्ष मान. श्री.अशोक तोरस्कर, श्री सीताराम करंबेळे, श्री श्रीधर करंबेळे, श्री. नितीन तोरस्कर, श्री कृष्णा रावणंग, श्री. शशिकांत तोरस्कर, श्री रघुनाथ करंबेळे, श्री. सदानंद धावडे, श्री सुरेश तोरस्कर, श्री किशोर करंबेळे, श्री सुनील करंबेळे, श्री प्रवीण धावडे, श्री निलेश सनगले, श्री सचिन घडशी आणि पालक महिलांसह इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.या कार्यक्रमात अनेक पालकांनी आपले मनोगते व्यक्त केली. सर्वश्री सचिन करंबेळे, श्री दिपक करंबेळे, श्री सुनील दळवी यांसह अनेक पालकांनी आपले मौलिक विचार मांडले आणि मंडळाच्या कार्याची प्रशंसा केली. गुणवंत विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी आपल्या सुंदर भावना व्यक्त करताना मंडळाचे आभार मानले.
             कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात श्री.दिलीप तोरस्कर सर यांनी मंडळाच्या शैक्षणिक आणि इतर सामाजिक कार्यांचा संक्षिप्तपणे उल्लेख करत मंडळाचे महत्त्व विशद केले. तसेच आजचा शैक्षणिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वाडीतील अनेक मान्यवर व्यक्तींनी मोलाचे सहकार्य केले, त्या सर्वांचे आभार मानले आणि वाडीतील विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत कार्यक्रमाची उत्तम सांगता केली.

नालासोपारा विरार रहिवासी पंचक्रोशी मंडळ दाभोळतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न !!

नालासोपारा विरार रहिवासी पंचक्रोशी मंडळ दाभोळतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न !!

** मान्यवरांच्या वतीने कार्यकारी कमिटीचे कौतुक

मुंबई (शांताराम गुडेकर) :

              नालासोपारा विरार रहिवाशी पंचक्रोशी मंडळ दाभोळच्या वतीने रविवारी दिनांक २० जुलै रोजी नालासोपारा पूर्व दुबे हॉल येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. सुरुवातीला मंडळाचे अध्यक्ष श्री.संतोष अडखळे व सचिव श्री.अतुल वाडकर खजिनदार रवींद्र पेंढारी, उप अध्यक्ष श्री विनोद टक्के, उप सचिव दिलीप चिविलर उप खजिनदार  श्री प्रभाकर वाडकर व मंगेश गोरीवले, सुभाष जाधव व अन्य सर्व कार्यकारी मंडळींच्या वतीने कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. प्रमुख मान्यवर म्हणून श्री.नवनाथजी शिंदे श्री.दीपक मांडवकर (पत्रकार), दाभोळ करजाई भैरी प्रतिष्ठान सचिव श्री. सुरेश नारकर, महाड तालुका कुणबी समाज संघटना प्रमुख श्री.संजय गोलांबडे, श्री.राजेश पिचुडले, श्री.विनोद पार्टी, श्री.सचिन मांडवकर, श्री.उदयजी जाधव व अन्य मंडळी उपस्थित होती. कार्यकारी कमिटीच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात झाली तर श्री.सुरेश नारकर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच मान्यवरांचा सत्कार करून मुख्य कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न करताना तालुक्यातील उच्च शिक्षीत मुले व दहावी बारावी यश प्राप्त केलेल्या मुलांचा सन्मान केला. व त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. याप्रसंगी तालुक्यातील नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व सर्वानी कौतुक केले.शिक्षण हेच भवितव्य घडवते, आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना लागणाऱ्या आवश्यक मार्गदर्शक ही काळाची गरज आहे, असे मत अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
             कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये कार्यकारिणी सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. नियोजन,सन्मान संकलन, वितरण व्यवस्था, नोंदणी प्रक्रिया या सर्व गोष्टी काटेकोरपणे राबवण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाच्या सर्व मान्यवरांचे, पालकांचे आणि स्वयंसेवकांचे आभार मानण्यात आले.भविष्यात अशा उपक्रमांची संख्यात्मक व भौगोलिक वाढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.हा उपक्रम म्हणजे समाजसेवा, शैक्षणिक मदत आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम ठरला असून, सर्व मान्यवरांच्या वतीने कार्यकारी मंडळाचे आभार मानले.

कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने न्हावे सासणे गावायला मिळाले दर्जेदार ग्राम सचिवालय !!

कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने न्हावे सासणे गावायला मिळाले दर्जेदार ग्राम सचिवालय !!

**थाटामाटात संपन्न झाला उद्घाटन सोहळा**

मुरबाड, { मंगल डोंगरे } :-  तालुक्यातील मुरबाड - कर्जत या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या न्हावे - सासणे या गावातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात यशस्वी ठरलेले सरपंच जगदीश हिंदुराव, उपसरपंच शशांक हिंदुराव यांचे विशेष प्रयत्नांनी तसेच मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने न्हावे सासणे गावाला प्रशस्त असे ग्राम सचिवालय मिळाल्याने त्या नुतन सचिवालयाचे उद्घाटन आमदार किसन कथोरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचे शुभहस्ते  थाटामाटात संपन्न झाले .त्याप्रसंगी बाळकृष्ण हिंदुराव, वाळकु हिंदुराव, संजय जाधव, यांचेसह गावातील सर्व समाजातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. 

मुरबाड कर्जत पुणे या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या न्हावे सासणे गावात सर्व समाजाचे लोक वास्तव्य करीत असल्याने गावात सुसज्ज असे रस्ते, गटारे असल्याने गाव सांडपाण्या पासुन मुक्त असुन स्वच्छता अभियानात अग्रेसर आहे. तसेच अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालयाच्या च्या  भव्य दिव्य इमारती आहेत, शिवाय गावातील प्रत्येक  समाजासाठी घरकुल योजना राबविण्यात आली असुन, संपूर्ण गाव सध्या एक प्रकारे निवारा मुक्त झाला आहे. प्रत्येक समाजासाठी स्वतंत्र समाज हाॅल अशा विविध सुविधांनी गाव नटलेला असल्याने संपूर्ण गावची ओळख दाखविणारे ग्राम सचिवालयाची मोठी समस्या होती.त्यासाठी आमदार किसन कथोरे यांचे प्रयत्नाने ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध झाला आणि सरपंच उपसरपंच यांनी भव्यदिव्य असे ग्राम सचिवालयाची उभारणी केली. त्याचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

**** गावातील ग्रामस्थांना 'मोफत वाय फाय सुविधा' पुरविण्यासाठी तसेच सुरळीतपणे विज पुरवठा मिळण्यासाठी गावातील विजेचे जुने पोल आणि तारा बदलण्यासाठी ग्रामपंचायत चा पाठपुरावा सुरू आहे.ते काम लवकरच पूर्ण होईल - मनोहर हिंदुराव.सरपंच न्हावे सासणे.

मुरबाड मधील शेतकर्यांसाठी साठी लढा देण्यास मी सज्ज !! **माजी आमदार गोटीरामभाऊ पवार**

मुरबाड मधील  शेतकर्यांसाठी साठी लढा देण्यास मी सज्ज !! **माजी आमदार गोटीरामभाऊ पवार**  

मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी हमीभावात विकलेल्या भाताचे पैसे आतापर्यंत मिळाले नाही. तसेच २५ मार्च २०२५ पर्यंत जर शेतकऱ्यांचे पैसे मिळाले असते, तर त्या शेतकऱ्यांना बँकेमध्ये आपले पैसे भरता आले असते,, परंतु सरकारने पैसे देण्यास मोठ्या प्रमाणात विलंब केल्याने  त्या शेतकऱ्यांना सेवा सहकारी सोसायटी मार्फत घेतलेले कर्ज वेळेवर भरता आले नाही, त्यामुळे त्यांना थकीबाकी म्हणून राहावं लागलं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा रस्त्यावर उतरला पाहिजे, तसेच त्यासाठी मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे लढायला सज्ज आहे. असा विश्वास लोकनेते तथा माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांनी  विद्या मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिवले संकुलातील सभागृहात २० जुलै २०२५ रोजी आयोजित केलेल्या कार्यकर्ता व स्नेहभोजन मेळाव्यात केले. 

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार गोटीरामभाऊ पवार, ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, माजी सभापती कमलाकर भोईर, ह. भ. प. रामभाऊ दळवी, बाजार समिती सभापती बालकृष्ण चौधरी, ठाणे जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पवार, किसन गिरा, रवींद्र चंदणे, लक्ष्मण भगत, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश पवार, रवींद्र टेंबे, चंद्रकांत गायकर वसंत गायकर, दिपक वाघचौरे, जिल्हा परिषद माजी सदस्य प्राजक्ता भावथे॔, दिपा भला, पदमा पवार अनिल देसले, रमेश जाधव, प्रकाश व्यापारी, रमेश तुंगार, महिला संघटक रेखा इसामे, महिला सरपंच, उपसरपंच, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन, सेवा सोसायटीचे चेअरमन/ व्हाईस चेअरमन, सरपंच /उपसरपंच तालुक्यातील तळागाळातील महिलावर्ग तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,.

तर ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी कार्यकर्त्यांना मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपण विधानसभेची निवडणूक लढलो आणि हरलो, यापेक्षा आपल्याला मिळालेले मताधिक्य हे फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा आपण या तालुक्यातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करणार आहोत .तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात कामाला लागा, गावातील सर्वांना घेऊन एकत्र बसा ज्या काही छोट्या-मोठ्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तसेच आपण आज कोणत्या पक्षात गेलो नाही. परंतु तुम्ही जे म्हणता आपला पक्ष म्हणजे माजी आमदार गोटीरामभाऊ  पवार होय, खरच आहे त्याचप्रमाणे आपण काम करूया भविष्यात पुढचा निर्णय काय घ्यायचा तो आपण सर्व एकत्र बसून निर्णय घेऊ या. 

तसेच माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांनी बोलताना सांगितले की तालुक्यामध्ये खरेदी-विक्री संघावर जे काही प्रशासक मंडळ नेमला आहे पण नेमलेला प्रशासक मंडल हा मागच्या दारातला आहे, त्यांना आपण एक महिन्याच्या आत  मागच्या दारात घरी पाठवू असा इशारा माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांनी दिला आहे. त्याचबरोबर अनेक समस्या उद्भवल्या असल्या तरी त्या आपण सर्व एकत्र बसून सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच विधानसभेमध्ये ज्या काही तालुक्यातल्या प्रलंबित समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी एकही शब्द विधानसभेत काढताना दिसत नाही अशी खंत  गोटीरामभाऊ पवार यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश पवार यांनी केले तर सूत्रसंचालन हिंदुराव यांनी केले.

Sunday, 20 July 2025

मुलींना कोणीही त्रास देत असल्यास भीती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी - पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांचे आवाहन

मुलींना कोणीही त्रास देत असल्यास भीती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी - पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांचे आवाहन

लैंगिक शोषण असो की अन्य कोणीही त्रास देत असल्यास मुली व महिलांनी कोणतीही भीती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन वाडा पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवसानिमित्त "जनविश्वास सप्ताह" साजरा करण्यात येत असून या अंतर्गत पालघर जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रोहिणीताई शेलार यांच्यावतीने वाडा तालुक्यातील परळी आश्रमशाळा येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर व वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना दत्तात्रेय किंद्रे यांनी महिला कायदे व सायबर क्राईम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने परळी येथे वृक्षारोपण उपक्रमही राबविण्यात आला.

यावेळी महिला राष्ट्रवादीच्या उपजिल्हाध्यक्षा चित्रा ताई पाटील, वाडा तालुका सचिव रंजनाताई भागडे, परळी गावच्या सरपंच सौ. वैशालीताई पवार तसेच पंचायत समिती माजी सभापती रघुनाथ माली, पोलीस पाटील बबन पाटील, परळी माजी उपसरपंच रुपेश दत्तू पाटील, परळी आश्रम शाळेतील सर्व महिला शिक्षिका व शिक्षक वर्ग सर्व उपस्थित होते.

वृत्तांत - जयेश शेलार 
जेष्ठ पत्रकार / संपादक/ वाडा तालुका अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस)

"कोकण रत्न" पदवीसाठी नामांकन पाठविण्याचे स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे आवाहन !!

"कोकण रत्न" पदवीसाठी नामांकन पाठविण्याचे स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे आवाहन !! मुंबई (शांताराम गुडेकर) :           ...